Skip to main content

समाज

`वादळ' आणि `वादळग्रस्त'...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 14/11/2009 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
`वादळ' आणि `वादळग्रस्त'... दुष्काळाचे सावट दूर करूनच मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला, आणि राज्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता सारे काही सुरळीत झाले, याची खात्री देणारे, स्थिरतेचे वारेदेखील वाहू लागले आणि काही दिवस जाणवणारी एक अस्वस्थता संपुष्टात आली. राज्याला गुलाबी थंडीचे वेध लागले. कपाटातले ऊबदार स्वेटर, मफलर, शाली बाहेर आल्या, आणि पावसाने कोंदटलेल्या छ्त्र्या, रेनकोटांनी कपाटातल्या त्या जागेत दडी मारली. हवेत एक नवा उत्साह वाहू लागला. या उत्साहाने भारलेली मने `नवनिर्माणा'च्या या चाहुलीने मोहरू लागली. पण मध्येच अचानक हवामान बदलून गेले.

जेंव्हा ते पहील्यांदा चालून आले...

लेखक विकास यांनी शनिवार, 14/11/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
मनसेवरून गेल्या दोनचार दिवसात झालेल्या अनेक चर्चांमधे एक प्रकर्षाने वेगळी जाणवलेली चर्चा ही श्री. कलंत्री यांची होती.

महाराष्ट्र खरेच पुढारलेला आहे?

लेखक विकास यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या चिंतनाचा विषय "विरंगुळा" सदरात मोडला आहे हे पाहूनच प्रतिसाद द्यावात ही विनंती! ;) मनसे आमदारांनी घातलेल्या "विधानसभेतील" गोंधळामुळे मला जितके वाईट वाटले त्याहूनही अधिक वाईट आपण किती मागासलेले आहोत हे खालील चित्रफिती पाहाताना जाणवून शरमेने मान खाली गेली :) तैवानमधे एक स्त्री खासदार सभागृहात सभापती स्त्रीच्या कानाखाली वाजवू शकते (हा व्हिडीओ दुव्यावर टिचकी मारूनच बघता येईल!) -------------- फक्त अठ्ठावन्न सेकंदात लोकशाही कशी वागू शकते ते कोरीयातील सभागृहातील दृश्यात खाली पहा.

यांच असं का होतं ते कळतं नाही ... विचारवंताना समर्पित !

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : त्या दिवशीच्या विधानसभेतल्या अभुतपुर्व प्रसंगानंतर संकेतस्थळांवर "विचारवंतांच" एकदम पेव फुटलं.
काव्यरस

ते मीठ खारे नव्हते

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 13/11/2009 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
हे लुटण्या आले अमुच्या देशा, उर्मट सोजीर गोरे का लोकही अमुचे मिंधे होती, स्वत्व विकुनी सारे? हे गरीबा शोषून फ़िरती मजेने, मिजास दाविती मारे का खावी आम्ही मीठ भाकरी?
काव्यरस

उचललेस तू मीठ मुठभर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 12/11/2009 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

हवामानखात्याचा निषेध

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 11/11/2009 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भूमीजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळाला Phyan हे फिरंगी नाव दिल्याबद्दल हवामानखात्याचा निषेध...

बुधवारची कविता: तमाशा

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 11/11/2009 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
विधानसभेच्या बोर्डावर अबूचा तमाशा हिंदीची पुंगी अन मराठीचा ताशा मराठीची सक्ती अन् वांजळेची शक्ती काँग्रेसची लोचटगिरी अन् मनसेपासून मुक्ती राष्ट्रभाषा हिंदी म्हणत मराठीचा र्‍हास बंडलबाजी करुन म्हणती,"विधायक मार्गाचा ध्यास" सामान्य माणूस म्हणे 'कशाला आम्हाला त्रास' म्हणतो ना तोच "भैया,दो पानीपुरी और दो पान खास"? म्हणो कोणी काही, हलकट राजकारण्यांचा अनर्थ "भाषा माझी मराठी, मी पाहीन माझा स्वार्थ" मालक, मित्र,समविचारी पाठींबा स्वाभिमान्यांचा गांधीगिरी सोडून बसंत्री वाजवती ढोल वांजळेचा -पुण्याचे पेशवे
काव्यरस