Skip to main content

समाज

जिथे सागरा धरणी मिळते........

लेखक JAGOMOHANPYARE यांनी गुरुवार, 15/10/2009 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
'व्हाय डोन्ट यू गो टू विजिट द सबमरिन?' डॉ. नवीनने विचारले. 'सबमरिन? मालदिव में सबमरिन है?' डॉ. अनिल. 'तिथे आहे.... ' डॉ. नविनने खिडकीतून बाहेर दाखवले.. समुद्रात दूर अंतरावर एक पांढरी बोट दिसत होती. इन्दिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून समुद्र फार देखणा दिसतो. मी मुंडके खाली वळवले आणि मुकाटपणे चहा पिऊ लागलो. मालदीवमध्ये चार महिने राहूनही इथे २०० फुटांवर पाण्यात एक सबमरिन आहे हे मला पहिल्यांदाच समजत होते! शनिवारचा दिवस म्हणजे मालदीवमधील सुट्टीचा दिवस. माझा मित्र डॉ. अनिल मगदूम भारतात परत जाणार असल्यामुळे मला भेटायला मालेमध्ये आला होता. तिथूनच तो कोचीला जाणार होता.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 15/10/2009 03:53 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी आपणा सर्वांना, आपल्या कुटूंबीयांना, मित्रपरीवाराला आनंदाची, भरभराटीची, आरोग्यदायी जावो या सदिच्छा!

'ठेवणीतला' प्रश्‍न!

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 13/10/2009 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
'ठेवणीतला' प्रश्‍न! 'आकाशातून कोसळणाऱ्या धारांच्या माऱ्यातून वाट काढत आमची एस. टी. मुंगीच्या पावलानं पुढे सरकत होती. खिडक्‍यांच्या काचांवरही ढग साचले होते आणि त्यावर बोटं फिरवून साफ केलेल्या काचेतून बाहेर पाहात माझ्या शेजारच्या सीटवरचा तो वयस्कर प्रवासी सुन्न सुस्कारे सोडत होता. त्याचा चेहराही काळजीनं भरल्यासारखा होत होता. ...धुवांधार पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात थैमान घातलंय, जनजीवन पुरतं कोलमडून गेलंय....एरव्ही वाहनांनी गजबजून पळणारा मुंबई-गोवा महामार्ग सुनासुना आहे. एखादं मागे फिरून परतणारं वाहन आणि पावसातून वाट काढत जमेल तितकं पुढे जाण्याचा प्रयत्न करणारी एस. टी.

परिवर्तन!!!

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 13/10/2009 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
दोस्ता, कुठे बेपत्ता झालास? बऱ्याच दिवसांत गाठभेट नाही! भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! अगदी डिलक्स नाही, पण शोभेलसा बार पाहू, व्होड्का मिळेलच तिथे; नाही तर ओल्ड मंक सांगू, अर्धा सोडा, अर्धे पाणी; संगतीला विल्स घेऊ, आपण दोघंही ब्राह्मण, त्यामुळं चिकन चिली मागवू, दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! कोकण, विदर्भ, मराठवाडा, उरलेला महाराष्ट्र, प्रश्नांचा नाही तुटवडा, हवे तर बेळगाव मांडू, मुंबईला फोडण्याच्या आरोळीचा माग घेऊ, डावे-उजवे करीत करीत, आपण चिअर्स म्हणू, दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! सेझ, खासगीकरण, उदारीकरणाचा समतेत पाय, राज्याच्या घसरलेल्या नंबरावर नाही कोणताच
काव्यरस

तहान

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 11/10/2009 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
कालीदासाने पाठवला हजारो वर्षापुर्वी एक मेघ प्रेयसीकडे प्रेमाचा संदेश घेऊन काल आम्हीही पाठवला मुद्दाम तयार केलेला एक मेघ प्रेमी युगुलांना प्रेमाची स्फ़ुर्ती देणाऱ्या प्रेमपुजाऱ्याकडे आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाला जपण्याकरता. काय झाले शंभर कीलोमिटर व्यासाचा आणखी एक व्रण उठवला तर? आधीचेच हजारो व्रण त्याच्या चेहऱ्यावर आहेतच! व्रण देऊन धुळीचे टन घेऊन उठला तो मेघ. आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाचा संदेश तो आता तिथे पसरवेल. त्या अबोल प्रेमपुजाऱ्याला आमचे येवढेच सांगणे आहे, बाबारे, आमची तहान फ़ार मोठी आहे. तुझ्या अंतरंगात छुपवून ठेवलेला थोडासा ओलावा, तो तुला काय कामाचा? आम्ही तो घेऊन दुषीत करा

जननायक प्रभू राम अभ्युदय कादंबरीचे महानायक

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 06/10/2009 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
जननायक प्रभू राम शतकानुशतके रामकथा भारतीय समाजाला प्रेरणा देत आली आहे. विविध कालखंडात, वेगवेगळ्या प्रांतात राम कथेची विविध रूपे लोककलेतून, काव्यातून, नाटकातून, नृत्यातून, प्रकट केली गेली. महाराष्ट्रात गीत रामायणाच्या रूपाने राम कथा तेजाळली. मराठी भाषेला धन्यता लाभली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सन 2005 मधे गीत रामायणाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गीत रामायणाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. हजारो वर्षांच्या कालप्रवाहात या कथेला अनेक रंगांचे वेष्टण लाभले.