Skip to main content

समाज

हे वारिस शाह! - अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 17/06/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कितीतरी दिवस तिची ती कविता मनात ठाण मांडून बसली आहे. त्या कवितेवर लिहिण्यासाठी अनेकदा सुरुवात केली.... पण त्या अभिजात कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या त्या काव्याचा अनुवाद मांडताना ''लिहू की नको'' अशी संभ्रमावस्था व्हायची... लिहिताना माझे हात उगाचच थबकायचे!
काव्यरस

मिपामिपा खेळणार

लेखक सहज यांनी गुरुवार, 17/06/2010 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा, डिस्क्लेमर, आवाहन, माफी - संपादकांना वाटल्यास धागा उडवू शकतात, मी उडाल्याची तक्रार अथवा निषेध करणार नाही. धागा निखळ करमणुकीसाठी आहे कृपया हलके घ्या. प्रतिसादातुन कवितेत बिन्धास्त भर घाला ही मिपाकरांची कविता आहे.
काव्यरस

पेपराचं फेफरं

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 16/06/2010 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या गोष्टीचं अतिरेकी वेड किंवा छंद उफाळला की 'आलं का फेफरं?' असा प्रश्न ग्रामीण भागात विचारला जातो. आमच्या पेपराचं फेफरं असंच नाक मुरडण्यासारखं. पेपर म्हणजे परिक्षेच्या उत्तरांचा अथवा प्रबंधाचा नसून आमच्यालेखी 'समाजमान' आणि 'भान' या संबंधाचाच आहे. कालच्या वर्तमानाचा भूतकाळ आज वर्णन करणारे ते एक 'पत्र' जरी असले तरी त्याला पाने मात्र अधिकच असतात. तसं पाहिलं तर पोस्टाचे पत्र आता कालबाह्य झाल्यातच जमा आहे. 'आपली चालू वर्षाची सदस्य वर्गणी त्वरित जमा करा अन्यथा पुढील अंक पाठविला जाणार नाही' अशा आशयाची 'पत्रे' फलाण्या बिस्ताण्या अंकाच्या संपादकाकडून वर्षभर येत राहतात.

धमालरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ...

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 16/06/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी उठलो आणि पहिल्याछुट आपण "पुण्यात" नसल्याचे लै दु:ख झाले. मायला पुण्यात असतो तर काय दणका झाला असता की बोलायचे काम नाही. काय ते भल्लेभल्ले होर्डिंग्स, पोश्टर्स, पेप्रात जैराती, केबल टीव्हीवर शुभेच्छांच्या क्लिपिंग्स वगैरे वगैरेचा दणका उडवला असता. आज आमच्या मित्राचा वाढदिवस. नव्हे नव्हे, आमच्या परममित्राचा आणि आंतरजालावरचे एक लोकप्रिय व्यक्तीमत्व व 'कट्टा स्पेशालिस्ट' श्री. श्री. श्री.

मॅनेजर्स

लेखक शुचि यांनी बुधवार, 16/06/2010 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर - खालील व्यक्ती पूर्ण धवल अथवा कृष्ण नव्हत्या अर्थात खूप चांगल्या जमेच्या बाजूदेखील दिसल्या. माणूसकी, कामावरील निष्ठा, व्यावसायीकता, सचोटी हेदेखील गुण काहींच्यात होतेच. पण आपल्या बॉसवर टीका हा सदाबहार विषय आहे म्हणून हा लेख ... मान्य की मॅनेजर्स ना काम करवून घ्यायचं असतं पण कधीकधी त्याकरता ज्या उपायांची अंमलबजावणी ते करतात ते मला तरी विनोदी वाटतात.

एस्पेरान्तो : एक वैश्विक भाषा

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 15/06/2010 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
''एस्पेरांतो? ही कसली भाषा? ही तर एखादी इटालियन किंवा स्पॅनिश रेसिपीच वाटते बघ!'' माझी मैत्रीण मला हसून म्हणाली. खरेच, तिचा तरी काय दोष म्हणा.... १२५ वर्षांपूर्वी निर्माण झालेली ही भाषा भारतात येऊन गेली ३० वर्षे झाली तरी अद्याप भारतातील लोकांना तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. ह्या लेखाचा उद्देश एस्पेरांतो या आगळ्यावेगळ्या भाषेची तोंडओळख करून देणे हा आहे. कधी काळी ह्या भाषेचे प्राथमिक, अगदीच जुजबी ज्ञान मिळविण्याचा योग मला प्राप्त झाला आणि एका नव्याच भाषाविश्वात प्रवेश करण्याची संधी त्याद्वारे खुली झाली. (मी ह्या भाषेचा अगदीच प्राथमिक अभ्यास केला आहे ही नोंद जाणकारांनी कृपया घ्यावी.

असाही असतो 'अभिमान'?

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 14/06/2010 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात अनेक वळणांवर काही मजेशीर लोक भेटतात. कित्येकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही गमतीशीर गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात, तर काही वेळा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आपली निखालस करमणूक होत राहते. आणि सर्वात मजेची गोष्ट म्हणजे अश्या व्यक्तींच्या गावीही नसते की त्यांच्या वागण्यातून उत्तम विनोदनिर्मिती होत आहे! असाच एका कुटुंबातील हा खराखुरा किस्सा. थोडा आंबटगोड आहे आणि थोडा कडूपण! तर हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहाणारे कुटुंब म्हणायला पाचजणांचे.... पण त्यांच्या घरात, दहा बाय बाराच्या दोन खोल्यांमध्ये साधारण आठ ते दहा माणसे नांदत. शिवाय गावाकडून येणारा पै पाहुणाही असायचा सोबत.

शनी, अवलिया, निखील आणी मकी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 12/06/2010 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता काही वेळापुर्वीच एक गंमतीशीर योगायोग लक्षात आला. आज शनी, अवलिया, निखील देशपांडे आणी मस्त कलंदर ह्या सर्वांचा वाढदिवस आहेत. *देव पण काय काय दिवस दाखवणार आहे अजुन काय महिती ?* असो.. तर ह्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपलं कोण मेलं ?

लेखक जीएस यांनी गुरुवार, 10/06/2010 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
भोपाळचे गुन्हेगार सुटले ! बर मग ? पुढे ? मस्त फिफा वर्ल्ड कप सुरू होत आहे. हे कुठल कधीपर्यंत घेउन बसायच ? मरणारे वीस हजार कधीच मेले. यातना भोगणारेही बरेचसे मरून गेले असतील एव्हाना. मग आता काय उगाच ? ज्यांच्यावर खटला भरला ते सुटले, ज्यांच्यावर भरलाच नाही त्यांचे काय ? योग्य देखभाल न करता घातक रसायनांचा साठा करणारे कंपनी व्यवस्थापन हे गुन्हेगार क्रमांक एक. अशा कारखान्यांची तपासणी करायला सरकारचे अनेक विभाग असतात, ती तपासणी न करताच पैसे खाऊन प्रमाणपत्र देणे हेच चालत असते सर्रास सगळीकडे. तसे ज्यांनी दिले ते गुन्हेगार क्रमांक दोन. पण आता खालची बातमी बघा...