Skip to main content

समाज

सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 13/07/2010 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना
भिऊ नको मराठी जना, काय तूझा गुन्हा राहीला सीमाभागी वेळ काढ जराशी जरा, येशील महाराष्ट्री पुन्हा चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||धृ|| दिलेत भरपूर लढे, रक्ताचे पडले सडे विचार नको करू, नको मनामधे झुरू समजू नको अभागी चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||१|| आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू अन्यायाला वाचा फोडू, सीमाभाग महाराष्ट्रा जोडू जरी लाठ्या डोक्यास लागी चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||२|| जय महाराष्ट्र बोलू बोल, मराठीचे उपकार अनमोल झालो मोठे त्य
काव्यरस

आज जगन्नाथाची रथयात्रा

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 13/07/2010 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
नंदीघसा तोरा अटकी गला बडसंखठारे किए से भकत एते आपणर डाकिला चंदनपुरे... काळीया रे काळीया रे काळीया रे...
अरे काळ्या, तुझा नंदीघोष (रथ) बड शंखाच्या ठिकाणी अडकून थांबला...असा कोण तुझा भक्त आहे की त्यानं चंदनपुरातून तुला हाक मारली आणि तू तुझा रथ थांबवलास? ओरीसाच्या सांस्कृतिक तसेच धार्मिक जीवनातील महत्त्वपूर्ण अशी जगन्नाथाची रथयात्रा आजपासून सुरू होतेय. पुरीतील रथयात्रेचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर पाहू शकता. जगन्नियंता जगन्नाथाच्या चरणी शतकोटी प्रणाम! (इथे अधिक माहिती यापूर्वी दिली होती.)

बेळगावी मराठी बांधवांवर हल्ला: सीमावासीयांनो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 13/07/2010 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
काल दि. १२ जुलै २०१० रोजी बेळगाव शहरात सीमावासीयांनी मराठीचा झेंडा फडकावत बेळगावात उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चावर कर्नाटक सरकारने अमानुष लाठीमार केला. शांततेने चालणार्‍या मोर्चावर अचानक लाठीमार करून सीमावासीयांच्या भावना कर्नाटकी सरकारने पायदळी तुडवल्या. म्हातार्‍या कोतार्‍या माणसांनाही पोलीसांनी सोडले नाही. केंद्रसरकारला अजून किती वेळा लाठीमार व सीमावासीयांचे बळी हवेत? न्याय्य मागण्यांना न्याय मिळेल की नाही? सीमाबांधवांनो, तुम्ही एकटे समजू नका.

मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन!

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 13/07/2010 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी मी एक कोडं ऐकलं होतं, 'पोळी का जळली? घोडा का अडला? विड्याचं पान का सडलं? या तीनही प्रश्नांचं एकच उत्तर सांगा.' तसाच अनेक प्रश्नांचं एकच उत्तर देणारा अनुभव आज मला आला. 'मराठी माणूस धंद्यात मागे का पडतो? पुस्तकांचा खप कमी का होतो? पुणेरी दुकानदाराची प्रतिमा वाईट का आहे?' हे ते प्रश्न. अनुभव अगदी ताजा आहे. काही तासांपूर्वीचा. अमेरिकेला परत जायचे वेध लागले की पुस्तकांच्या खरेदीसाठी काही फेऱ्या होतातच. आज वैजूमावशीबरोबर पुण्यात अप्पा बळवंत चौकात गेलो. पुस्तकांची भरपूर दुकानं, पण बहुतेक सगळी टेक्स्टबुकं, अमुक कसे करावे वगैरेची, ज्योतिष, पाककृतींसारखी गृहोपयोगी दुकानं.

आणिबाणी

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 12/07/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाचा उद्देश स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाविषयी माहिती देणे हा आहे. त्यानिमित्ताने लोकशाहीला असलेले धोके आणि धोक्यांची लक्षणे आणि त्यांपासून बचाव करण्याची गरज यांवर चर्चा करण्याचा आहे. १९७१ च्या मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीत "गरीबी हटाओ" या घोषणेच्या जोरावर काँग्रेस पक्षाने मोठे यश मिळवले. निवडणुकीनंतर थोड्याच काळात पूर्व पाकिस्तानचा प्रश्न निर्माण झाला. डिसेंबरात पाकिस्तानबरोबर युद्ध होऊन बांगला देशाची मुक्तता होऊन हा प्रश्न निकालात निघाला. युद्धातल्या यशामुळे इंदिरा गांधींची लोकप्रियता शिगेला पोचली.

ध्वनी - गॅरे कैझर या लेखकाच्या दृष्टीकोनातून

लेखक शुचि यांनी गुरुवार, 08/07/2010 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल फिरायला जाताना मी आणि नवरा इकडच्या तिकडच्या विषयांवरच्या गप्पा मारत होतो. सहज विषय निघाला "कोबेअर रिपोर्ट" शो चा. मध्यंतरी व्हरमाँट चा एक लेखक या शो मधे येऊन गेला. या लेखकाचं नाव "गॅरे कैझर". त्यानी या शो मधे काही नावीन्यपूर्ण विचार मांडले होते - ध्वनी या विषयावर. या लेखकाने एक पुस्तक लिहीले आहे "द अन्वाँन्टेड साऊंड ऑफ एव्ह्रीथिंग वी वाँट" घरी जाऊन मी मी जालावर त्याचे विचार वाचले आणि पुढील काही रोचक गोष्टी सापडल्या. त्या या लेखाकाच्या शब्दात- "उपासमार, महायुद्ध, पृथ्वीचे सातत्याने वाढणारे तापमान आदि समस्यांशी तुलना केली तर ध्वनी ही अजीबात समस्या वाटत नाही.

भागीमारी - एका पुरातत्वीय उत्खननाची अनुभवगाथा

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 08/07/2010 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
भागीमारी हे नाव आठवले तरी ते सावनेर तालुका (जि. नागपूर) येथील छोटेसे गाव डोळ्यांसमोर उभे ठाकते. जवळपास सोळा-सतरा वर्षांपूर्वी ह्या गावाशी आणि तेथील परिसराशी एका पुरातत्वीय उत्खननाच्या निमित्ताने संबंध आला आणि एक वेगळाच अनुभव माझ्या पदरी पडला. सर्वात आधी सांगू इच्छिते की आता माझा पुरातत्वशास्त्र इत्यादी विषयांशी फक्त वाचनापुरताच संबंध राहिला आहे. पण कधी काळी एका नामवंत शिक्षणसंस्थेत भारतीय प्राच्यविद्यांचा अभ्यास करताना मला आणि माझ्या तीन सख्यांना पुरातत्वीय उत्खननात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची अनमोल संधी मिळाली आणि त्या संधीचा लाभ घेताना आम्ही त्या प्रात्यक्षिकपूर्ण अनुभवाने बरेच काही शिकलो.