Skip to main content

समाज

शिवकल्याणराजा - ११ गाणी निवेदनासहित

लेखक कौन्तेय यांनी बुधवार, 18/07/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
॥ शिवकल्याणराजा ॥ लहानपणापासून कॅसेटवर ऐकत असलेली ही गाणी. शिवचरित्राभोवतीचं सगळं भावविश्व चपखलपणे लघुरूपात उभं करणारी. समर्थ रामदास, वीर सावरकर, कुसुमाग्रज, शंकर वैद्य आदि दिग्गजांच्या रचना, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, लताबाईंचा आवाज नि खुद्द बाबासाहेब पुरंद्ऱ्यांच्या आवाजात ओजस्वी निवेदन! आणखी काय पायजे? हे संकलन काही वर्षांपूर्वी सीडी स्वरूपात आल्यावर एक एक गाणं वेगवेगळं ऐकता येत नाही ही बोच बरेच दिवस मनात होती. काल रात्री बैठक मांडून हे काम फ़त्ते केलं. सगळी गाणी अन्य उपकरणांवर सहज ऐकता तर येतीलच, पण आयफ़ोन/पॅड/पॉड सिंकेबलही आहेत.

पाणीवाली बाई!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 18/07/2012 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
त्यावेळी गोरेगाव खरंच एक छोटंसं गाव होतं. गावातले बहुतेक लोक एकमेकांना ओळखायचे. पश्चिमेला ग्रामदैवत अंबाबाईचं देऊळ आहे. त्याला लागूनच, एका बाजूला अ. भि. गोरेगावकर शाळा आणि दुसर्‍या बाजूला केशव गोरे स्मारक ट्रस्टची इमारत. मंदिरात नेहमीच येणं जाणं असल्यामुळे केशव गोरे हे नाव अगदी ओळखीचं आणि आठवणीत फिट्ट बसलेलं. गोरेगाव त्यावेळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं. प. बा.

गनीम

लेखक निळकंठ दशरथ गोरे यांनी मंगळवार, 17/07/2012 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
माघचा आठवडा भारताकरिता काळा आठवडाच होता. स्त्रीयावरील अत्याचार शिगेला गेला. वर्तमानपत्र वाचले की मन विषण्ण होऊन जाते.

हे सगळे गेले कुठे?

लेखक स्मिता. यांनी सोमवार, 16/07/2012 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसात कोणत्या मित्र-मैत्रिणीला प्रत्यक्ष भेटून मनसोक्त गप्पा केल्या आहेत असा प्रश्न विचारल्यास फार कमी लोकांना ठाम उत्तर देता येईल. मात्र त्यात जीमेल वरच्या लिखित गप्पा किंवा स्काइपवरच्या ऑडिओ-व्हिडिओ गप्पांचा पर्याय टाकला तर बहुतेकांना ठाम उत्तर देता येईल. मी स्वतः या दुसर्‍या गटातली म्हणजे बहुसंख्यांपैकी आहे.

इशारा..

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 16/07/2012 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
सोकावालास का रे? अलिशान मंदिरात राहून? डॉलबी आरत्यांच्या गजरान कानाचे पडदेही फाटले असावेत. बहिरा झालायस का? सांजसकाळच्या छप्पन भोगांनी अ-पचन झाली असावीत अन धुपादिपांच्या आडून काही दिसतही नसाव आधी बरा होतास चार तुळ्यांनी कसबस पेललेल शिखर आत्ता पडतय की मग तुला चांगला जागृत ठेवत होत. एखादा गुळाचा खडा अन अधीमधी चव पालटिला चार फुटाणे बरचस चलाख ठेवत असावेत तुला कधी उमलली तर दिसणारी गुलबक्षिचि फुल तरतरी आणून जायची कापऱ्या आवाजातल्या स्तोत्रांना भुकेला होतास तेंव्हा चल उठ चल परत माळरानावर कुठेतरी शेताच्या बांधाला बस पुन्हा शेंदूर फासून अन त्यावर रेखलेले डोळे रोखून

मंदी आली का हो !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 15/07/2012 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवाची गोष्ट. आमचा एक मित्र आहे. नुकतेच त्याचे कॉलेज संपले. नोकरीच्या शोधात आहे. म्हणून त्याचा बायो डेटा एका परीचिताकडे पाठवला. हा परीचित एका बँकींग क्षेत्रासाठी आय टी सर्व्हिस देणार्‍या कंपनीत काम करतो. म्हणाला 'अहो चूकीच्या वेळेला आलात." मागील आठवड्यातच आमच्याकडे काही शे लोकांना नारळ दिला. आम्हालाही नोटीस मिळालीये. निरोप समारंभ ३ महिन्यांनी होणार आहे. म्हणून तो बायोडेटा घेऊन गेलो दुसर्‍या मित्राकडे. त्याचे कम्पनी जागतिक, त्यामुळे बेंचही जागतिक.

अस्पृश्यता, आरक्षण आणि पुणे करार

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 13/07/2012 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या रविवारचा सत्यमेव जयतेचा भाग अस्पृश्यता ह्या सामाजिक विषयाला वाहिलेला होता. शहरी भागात राहणार्‍या बर्‍याच जणांसाठी त्यात दाखविलेल्या बर्‍याच गोष्टी कदाचित धक्कादायक असू शकतील. ह्या भागानंतर बर्‍याच मराठी संस्थळांवर ह्या अनुषंगाने चर्चा झडल्या. मिपावरही कोणाचा रे तू' ह्या शीर्षकाचा लेख आला आणि त्यावरच्या प्रतिसादांमधून एक चर्चासत्र झडले. त्या चर्चेत बहुतकरून सध्याच्या तरुण पिढीतले युवक युवती हिरीरीने सहभाग झाले होते. त्या गदारोळात चर्चा अपरिहार्यपणे 'आरक्षण' ह्या मुद्द्यावर येऊन थडकली.

"कोणाचा रे तू?"

लेखक चिगो यांनी सोमवार, 09/07/2012 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
"कोणाचा रे तू...?" गावात बालपण गेलेल्या कुणालाही हा प्रश्न नवीन नसावा. ह्या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्हाला मिळणारी वागणूक ठरत असे. वाटलं होतं, की शहरे, उच्च शिक्षण संस्था, उच्च पदस्थ नोकर्‍या इ. मध्ये कुठल्याही व्यक्तीला मिळणारी वागणूक कदाचित त्याच्या/तिच्या बौद्धीक प्रतिभेवर निर्धारीत असेल. पण काल "सत्यमेव जयते" बघितल्यावर कळले, की भारत असो वा इंडीया, अजूनही "कोणाचा रे तू" ह्याच्या उत्तरावर बरंच काही निर्भर आहे.. "सत्यमेव जयते" च्या बर्‍याच आधी, लाबशाराप्र अकादमीमध्ये, "इंडीया अनटच्ड" ही डॉक्युमेंटरी बघितली होती. खरे तर स.ज. पेक्षाही ही फिल्म जास्त सत्यदर्शी आहे.