Skip to main content

समाज

रक्षाबंधन.. रक्षाबंधन ..

लेखक विदेश यांनी गुरुवार, 02/08/2012 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
. रक्षाबंधन... रक्षाबंधन दोन मनांची अतूट गुंफण ! हिरा भाऊ अन् बहीण अंगठी अंगठीस हो सुरेख कोंदण ! मदतीस्तव वा संकटातही धावे बंधू करण्या रक्षण ! भावाचा बहिणीस आधार द्रौपदीसखा तो नारायण ! दुजाभाव ना मनांत कोठे दोघांचे ते एकच रिंगण ! रक्षाबंधन ... रक्षाबंधन दोन जिवांचे अतूट बंधन ! .
काव्यरस

शेतकरी आत्महत्या : संशोधनातील एक अनुभव

लेखक Kavita Mahajan यांनी बुधवार, 01/08/2012 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
काही विषय लिहायचे राहून जातात. विदर्भात होणार्‍या शेतकरी आत्महत्यांबाबत मी एक अभ्यास टाटा सामाजिक विज्ञान संस्थांसाठी केला होता. सोबत अंजली पवार ही कार्यकर्ती मैत्रीण होती. ज्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकर्‍यांच्या विधवांची सद्य:स्थिती, असा विषय होता. सुमारे ७५ डिप केसस्टडीज केल्या. या अभ्यासात आम्ही विदर्भातले ५ जिल्हे खेडोपाडी विभागून फिरलो. दोघी एकेकट्या फिरत होतो. यात काही अत्यंत विपरित अनुभव वाट्याला आले. आज त्यापैकी एक सांगते आहे. काही भागांत आत्महत्यांचे प्रमाण खूपच जास्त होते. एकेका लहानशा गावात १२ ते १६ आत्महत्या झालेल्या होत्या.

चावडीवरच्या गप्पा - साहित्य संमेलने आणि सरकार

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 01/08/2012 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
“सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असे पुन्हा विचारायची वेळ आली आहे”, घारूअण्णांनी तणतणत चावडीवर हजेरी लावली. “ऑ?”, नारुतात्या. “अहो, सरकार संवेदनाशून्य झाले आहे. समाजाची सांस्कृतिक जडणघडण नावाची काही चीज आहे की नाही? साहित्यिकांची कदर राहीलेली नाही”. घारूअण्णांचा तांबडा चेहेरा लालेलाल झाला होता. "अहो काय झाले ते सांगाल का? का उगाच सकाळी सकाळी घशाच्या शिरा ताणताय!", इति नारुतात्या. “अहो साहित्य संमेलनाविषयी काही जिव्हाळा नाही ह्या सरकारला. साहित्य संमेलनं म्हणजे मराठी भाषेची शान. त्याला अनुदान देणे कर्तव्य आहे सरकारचे, नव्हे, तो साहित्यविश्वाचा हक्कच आहे ”, घारुअण्णा.

शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 29/07/2012 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
'राजा शिवछत्रपती' हा ग्रंथ म्हणजे मराठी माणसाची अस्मिता. राजा शिवछत्रपती न वाचलेले किमान आमच्या पिढीतले तरी कुणी शोधुन सापडणार नाही. लहानपणी म्हणजे प्राथमिक शाळेत असताना मला बाबासाहेबांची राजा शिवछत्रपती ही व्याख्यानमाला ऐकायची संची मिळाली. पहिल्या पुष्पातच सर्व श्रोते अगदी भारावुन गेले होते. त्यावेळी बाबासाहेबही पन्नाशीत होते. तेजस्वी चेहरा, लकाकणारे डोळे आणि आवेशपूर्ण आवाजाच्या या शिवशाहीराने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन ठेवले होते.

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 25/07/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आजचा दिवस कसा जाणार आहे किंवा आत्ता इथे आहोत, दिवस संपताना कुठे असणार आहोत वगैरे काहीच आपल्याला माहित नसतं. याचं अगदी शब्दशः प्रत्यंतर मला आलं, परवा, २२ जुलैला. दिवस सुरू झाला पुण्यात आणि अगदी अनपेक्षितपणे संपला मेंढ गावात, जितूच्या घरी. *** गेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'.

गणपुले काकू

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 24/07/2012 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
(जानेवारी २०१२ मध्ये हा लेख लिहिला होता. माझ्या आयुष्यात ज्या माऊलीने अमुलाग्र बदल घडवून आणला त्या गणपुले काकू यांच्या बद्दलच्या भावना या लेखात प्रकट केल्या आहेत.) काही दिवसांपूर्वी राहुलचा फोन आला होता. म्हणत होता सोमवार, १६ जानेवारी बद्दल कळलं ना??? फेसबुकवर मेल टाकलं आहे. काकूंचा वाढदिवस साजरा करायचा आहे, शुभमंगल हॉलमध्ये, संध्याकाळी ७ ते ९. जरूर ये.पण काकूंना काही बोलू नकोस, त्यांना हे सरप्राईज आहे. मी येतो म्हटलं आणि १६ ला संध्याकाळी कुठलही काम ठेवायचं नाही असं मनाशी पक्कं केलं.

भक्तीची शक्ती?

लेखक चिगो यांनी मंगळवार, 24/07/2012 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
परवाचा दिवसच साला सुरु झाला तोच बेक्कारपणे.. ऑफीसला जायला निघणार तेवढ्यात फोन आला, " सर, इथून जवळच एक अपघात झालाय. एक बस पलटलीय.." म्हटलं, बोंबला ! आधी किती जखमी, मृत असतील ह्याची भिती. त्यातून मृत असतील तर बॉडीज हलवायला लागतात पटकन, नाहीतर जनक्षोभ, लॉ & ऑर्डर प्रॉब्लम नी काय काय.. मनात हे टेंशन असतांनाच हॉस्पिटलला फोन लावला, उपचारादींची तयारी करुन ठेवा म्हणून. ह्या धाकधूकीत स्पॉटवर पोचलो. बस घसरुन उलटली होती तो गड्डा जेमेतेम ६-७ फुटांचा असल्याने, सुदैवाने जिवीतहानी झालेली नव्हती. तोपर्यंत लोकांनीही जखमींना इस्पितळात हलवलेले होते.

आजाद हिंदची रणरागिणी हरपली

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 24/07/2012 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुस्थानचे स्वातंत्र्य लक्ष्मीच्या पावलांनी आले असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य समरातील पाउल होते राणी लक्ष्मीचे आणि १९४३ मध्ये आजाद हिंद ने केलेल्या इंग्रजी साम्राज्यावरील लत्ताप्रहारात पाउल होते ते झाशी राणी पलटणीच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी यांचे. हिंदुस्थानातील स्त्रीचे तेजस्वी रुप जगाला दाखविणारी आजाद हिंद सेनेची रणरागिणी कॅप्टन लक्ष्मी आज हरपल्या.