प्रश्न !
मेणबत्या पेटवणार्यांनो तुम्ही
हातात मशाल कधी धरणार ?
चिमुरड्यांवर होणारे बलात्कार
अजुन किती काळ पाहणार ?
स्फोटात लोक हल्ली रोजच मरतात,ती ब्रेकिंग न्युज असते
आपण त्यात तसे मेलो नाही,यातच का आपण धन्यता मानणार ?
भ्रष्टाचाराने संपुर्ण देश आपला गांजला असा
राजकारण्यांच्या पंगतीत आता धुतला तांदुळ शोधणार कसा ?
देशाच्या सिमेवर जवानांची क्रुरपणे मुंडकी छाटली जातात
तरी सुद्धा आपण त्यांना फक्त इशारेच देत राहणार ?
मंगळावर यान पाठवायचे म्हणुन मिशन आखणार
पण गरिबाला घास देण्यासाठी प्रयत्न कधी करणार ?
कोट्यावधींच्या देशात आता माणसाला नाही किंमत
चार जण जसे जगातात तसे तुम्हीपण का जगणार ?
जग
मिसळपाव
***
“ह्या शिंच्या सरकारला एकेक नवीन योजना आणायचा भारीच जोर असतो बरं का! पण त्यांच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.”, घारुअण्णा तणतणत चावडीवर प्रवेश करत.
“आता काय झाले? आणि एवढे घामाघूम का झाला आहात?”, नारुतात्या काळजीभर्या आवाजात.
“अहो काय झालें काय विचारताय? त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.
“अरे व्वा! चांगले आहे की मग, त्यात एवढे चिडताय काय?