Skip to main content

समाज

नाटेकर

लेखक गोगट्यांचा समीर यांनी गुरुवार, 28/03/2013 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
नाटेकर , आम्ही सगळे त्यांना नाटेकर म्हणूनच ओळखायचो , त्यांचं नाव माहित करायच्या भानगडीत बहुधा कोणीच कधी पडलं नाही. मी रत्नागिरीचा मूळचा, तिथे आजुबाजूला जमीनीवर खटले हे चालुच असतात. नाटेकर ही तिथलेच . रत्नागिरी च्या बाजुलाच केळ्ये गाव आहे , तिथले सर्वात मोठे खातेदार ,म्हणजे सर्वात जास्त सारा भरणारे, पण तो आहे केवळ कागदावरचा हक्क , प्रत्यक्षात त्यांच्याकडे एक गुंठाही नाही. लहानपणापासून जेव्हा बघत आलोय तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे अनेक पिशव्या दिसत.नंतर कळलं , की यात सर्व खटल्यांची कागदपत्रं आहेत. स्वत:चे खटले चालवता चालवता ते यात इतके तरबेज झाले की ते इतरांचेही कज्जे घेऊ लागले.

जिकडं खोबर, तिकडं चांऽऽगभलं!!!.....२

लेखक साऊ यांनी रविवार, 24/03/2013 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
.तर अश्या पद्धतीने गावचा मारुती पुन्हा वेशीला उभा राहिला. अजुन ही उभाच आहे, त्याच्या अंगावरल्या घणांच्या घावांत आता चुना भरलाय, अन दरवेळच्या नव्या शेंदराने त्या भेगा जरी उठुन दिसत नसल्या तरी त्या भेगा आहेतच. आता याच दु:ख मानुन घ्यायला आम्ही काय मायनॉरीटीवाले, आमच्या दु:खांना काही किंमत नाही. आता हे ही असोच. भेगाही असोच अन आमच दु:खही असोच. तर पुढे तर झाल काय ? तर तो जो जुलुमान लादलेला पंजा गावात होता, तो तसाच त्या एका घरात देवघर बांधुन पडुन होता. एक जरा ऐसपैस चौथरा बांधुन त्यावर जरा कमान बिमान बांधुन तो पंजा त्या घरात पड्लेला असायचा.

लहान मुलांच्या बाबतीत

लेखक नर्मदेतला गोटा यांनी शुक्रवार, 22/03/2013 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मूल गाढ झोपलय. कविला वाटतं त्याच्या झोपेत अजिबात व्यत्यय येऊ नये. म्हणून तो कुणाकुणाला काय काय सांगतो पहा. चंद्राला म्हणतो, नकोस चंद्रा येऊ पुढती, थांब जरासा क्षितिजावरती चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू किंवा यक्ष-पर्‍यांनो स्वप्‍नीं नाचून नीज नका चाळवू म्हणजे अगदी स्वप्नात जाऊन सुद्धा कुणी त्याची झोपमोड करू नये. किती खोलवर विचार केलाय कविने. लहान मुलांची काळजी घेताना इतका खोलवर विचार व्हायला हवा. पण उदाहरणे मात्र उलट दिसतात. परवा एक प्रसंग पाहीला.

सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा...

लेखक मन यांनी शुक्रवार, 22/03/2013 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा. मस्त पतंग उडवा, तीळ्गूळ वाटा. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि फटाके उडावताना काळजी घ्या. . धुळवड साजरी करा, रंग खेळा, पण पाण्यानं नको फार; ऑर्गॅनिकच बरे. आणि तुमचा केक कापून झाला की मस्त भांगेची कॉकटेल घेउन पडले रहा मस्त मी सध्या पडलोय तसा. . दिवाळीतील होळीच्या पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा . :) . बोला कॉकटेलच्या बैलालाsssss (एका sms वरुन साभार, पण समयोचित वाटलं.) --मनोबा

गपगार

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 22/03/2013 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
बामनाची ईदद्या ग्येली. म्हंजे म्येली. शेताला गेल्ती सक्काळी. हा-या धावत आला सांगाया. मोटी माणसं ग्येली पळत. म्याबी चाल्ली व्हती. आयनं पायलं, म्हन्ली, “मुकाट्याने निमीकडं जा. तिथं दिसलीस तर लाथ घालीन.” आमच्या घरातली मान्सं सूद्द बोल्तेत. म्या येकलीच खेडवळ. ईदद्या माज्याशी चांगली व्हती. बोलायची न्हाई जास्ती, पण कायबाय द्यायची मला. गजगं; फुटकी काकणं; चिचोके; गूळश्यांगदाणं; आवळं; जांभळं; – समदं फुकाट. म्याबी तिला मोराचं पीस दिल्त येकडाव. हसली व्हती. “आता ईदद्याचं भूत व्हनार,” जग्या म्हन्ला. “हाडळ”, भान्या म्हन्ला. “हाडळ कशापायी?

कॉर्पोरेटिझम, समाज आणि संशोधन

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 20/03/2013 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
“It is one of the great ironies of corporate control that the corporate state needs the abilities of intellectuals to maintain power, yet outside of this role it refuses to permit intellectuals to think or function independently.” ― Chris Hedges तुमचा भुतांवर विश्वास आहे का? तुमचा भानामतीवर विश्वास आहे का? तुमचा देवावर विश्वास आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या चालीवर तुमचा ग्लोबल वॉर्मिंगवर विश्वास आहे का असा प्रश्न लोक एकमेकांना विचारताना पाहिले की विज्ञान ही एक श्रद्धा-अंधश्रद्धा ठेवण्याची गोष्ट आहे की काय असे वाटू लागते.

काक मृत्यू

लेखक मेघनाद यांनी बुधवार, 20/03/2013 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
एक कावळा मुंबईच्या सकाळच्या सुंदर कोमल वातावरणात आकाशात घिरट्या घालत होता. आपल्या मित्र परिवारात विहार करत असताना तो खाली उजाडत असलेल्या मुंबई नगरीचे दृश्य देखील पाहत होता. काहीवेळात तो आणि त्याचे काही मित्र उडत उडत भायखळा रेल्वे स्थानक परिसरात आले. तिथे येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या, त्यातून उतरणारी ठीगभर माणसे, बायका, पोर. उतरल्यावर त्यांची जिना गाठण्यासाठी होणारी धावपळ हे सर्व तो कावळा रेल्वेच्या विद्युत पुरवठा तारेवर बसून पाहत होता, आणि अचानक काही कारणास्तव त्याच्या पंखांना तारेतील विजेचा जोरदार झटका बसला तसा तो खाडकन भानावर आला आणि दुसऱ्या क्षणी जमिनीवर देखिल.

जिकड खोबर, तिकड चांऽऽगभल!!!

लेखक साऊ यांनी बुधवार, 20/03/2013 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
आता सांगायच म्हणजे फारा वर्षापुर्वीची गोष्ट. आता किती वर्षापुर्वीची म्हणता? तर बघा त्या सिद्दी जौहरनं ते वेढा घातला होता किनी पन्हाळ्याला तेंव्हाची. तेंव्हाची म्हणा किंवा त्या आधीचीही असेल, पण मला आपली वाटते; तेंव्हाची, म्हणुन तेंव्हाची!! तर तेंव्हा काय झाल तर सारा मुलुख लुटला गनिमांनी. बायाबापड्या बाटवल्या. मंदिरं तोडली. देवादिकांच्या मुर्ती फोडल्या. उभी पिकं कापुन न्हेली हत्ती घोड्यांना चारायला. जित्रापंच्या जित्रापं पळवली कापुन खायला. असा वणवा पसरावा तशी पसरली त्यांची फौज दख्खनावर. कुठं कुठं आसरा र्‍हायला नाही. माणसं सैरावैरा पळाली रानोमाळ. शिवाजी राजा सुद्धा संकटात पडला.

जॉली एल एल बी

लेखक जयवी यांनी मंगळवार, 19/03/2013 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी ह्या सिनेमाबद्दल बोलणं झालं आणि सिनेमा बघायचाच असं ठरलं. तसा आज सिनेमा बघूनही झाला. आवडला !! एक कलाकृती म्ह्णून सिनेमा आवडलाच ! कथानक काही वेगळं नव्हतं खरं तर. नेहेमीचेच गरीबांवरचे अत्याचार आणि कायदा आंधळा असल्याचा फायदा घेणारे धूर्त वकील आणि त्याविरुद्ध लढा देणारा नायक !! सोबत एक छान नायिका, साथ देणारे त्याचे मित्र आणि शेवटी त्याला मिळणारा विजय. अगदी नेहेमीच्याच वळणाने जाणारी स्टोरी. पण तरीही काहीतरी वेगळं होतं !! मला वाटतं, सिनेमा ज्या सहजतेने पुढे सरकत जातो त्यामुळे कथेत पुढे काय होणार हे आधीच समजत असूनही आपण पुढे काय होणार ह्याची वाट बघतो.

भीषण दुष्काळ...

लेखक निश यांनी सोमवार, 18/03/2013 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
गेलो होतो असाच एकदा कामासाठी ऐका गावी जिकडे तिकडे नुसतीच धुळ पाण्याविना करपली होती शेत, हिरवाई जरासुध्दा नाही. लागली होती तहान म्हणुन ठोठावले एक दार म्हटले, ताई द्याल का पाणी भागवावयास तहान ? ताई घरात वळली डोळ्यात तिच्या आसवांची दाटी. थोडसच पाणी घेऊन ती बाहेर आली. म्हणाली ऐव्हढच आहे पाणी, ठेवल होत लेकरासाठी, ते देते आहे तुम्हाला. तहानलेल्याला पाणी देण पुण्य मानतो आम्ही. ऐव्हढच पाणी का ते मात्र विचारु नका नदी कधीच आटली बघा जगण आता सोसवत नाही. सरकारी मदतीसाठी धनी गेले आहेत तालु़क्याला आमच्या वाटणीच पाणी दिल मंत्र्याच्या कारखान्याला. हे सांगताच ती माय धाय मोकलुन रडली पाण्यासाठी तिची वणवण म