Skip to main content

समाज

आन्जी: शतशब्दकथा: पैला नंबर

लेखक आतिवास यांनी शनिवार, 09/03/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या म्हाडिक गुर्जींना बाळ झालं. म्हंजे त्यांच्या बायकोला वो. गोरी मिटट पोरगी. मी कडे घेतलं की खिदळायची. आमी सर्वे मऊ हून जायचो. नादच झाला तिला कडेवर घेऊन हिंडायचा. कुटंकाबी जावा. म्हाडिक बै सारखी वरडाय लागली, “आन्ज्ये, अगं घे की पोरीला ...” अंक्या म्हणला, आता तुजा पैला नंबर पक्का. पण मला कटाळा यायला. सारखी बबली माझ्यासंगं. कुणी मला खेळायला बी घेईना. झाडावर चढता यीना, पळता यीना, मारामारी तर बंदच. हात बी दुखायला लागला. बबली जड लई. एक दिस कुणाचं ध्यान नाही ते बगितलं. जोरात चिमटा काढला बबलीला. रडली लई.

दारू - म्हणजे काय रे भाऊ ?

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 05/03/2013 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
   दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय? हेच बहुतेकांना माहिती नसते.

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

लेखक सुज्ञ माणुस यांनी मंगळवार, 05/03/2013 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य bus ( हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा.: http://sagarshivade07.blogspot.in/2013/01/st.html ) हीच ती वेळ ...आणि हीच ती जागा ...( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि ) जेव्हा माझ्या मनात आले कि ST चा लाल डबा म्हणजे खरच जगातले १० वे आश्चर्य असावयास हवे. वास्तविक, छायाचित्रात टिपलेली ST

धावती भेट . . . . गणपती बाप्पाची ! ! !

लेखक पूनम शर्मा यांनी मंगळवार, 05/03/2013 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी शिकवणीला प्रथम शब्द शिकवतात तो “श्री” म्हणून म्हटलं प्रथम लेख लिहावा तो “श्री” चे नाव घेऊनच. आपले म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा. पूर्वी देवपूजा शास्त्रोक्त पद्धतीने केली जायची परंतु आता मात्र देवदर्शनाचे किंबहुना देवाचेच मार्केटिंग सुरु झाले आहे. गेल्याच आठवड्यात सासू-सासरे मुंबईस आले तेव्हा म्हटलं मुंबई दर्शनाची सुरुवात “श्री” चे नाव घेउनच करू. १२ वा. सुमारास सिद्धिविनायक, दादर येथे पोहोचलो. गाडीतून पाय काढला तोच दुकानाचे मार्केटिंग अधिकारी मागे लागले त्यांचा ससेमिरा चुकवत नेहमीच्याच दुकानात गेलो. बाप्पांसाठी प्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या गेट पाशी आलो.

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 26/02/2013 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 तिच्या नजरेतली शांतता थोडीशी विस्कटलेली होती. किंचित गर्वानं भारलेला तिचा आवाज मला ऐकु आला ' क्षत्रिय' ....

प्रश्न !

लेखक मदनबाण यांनी रविवार, 24/02/2013 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
मेणबत्या पेटवणार्‍यांनो तुम्ही हातात मशाल कधी धरणार ? चिमुरड्यांवर होणारे बलात्कार अजुन किती काळ पाहणार ? स्फोटात लोक हल्ली रोजच मरतात,ती ब्रेकिंग न्युज असते आपण त्यात तसे मेलो नाही,यातच का आपण धन्यता मानणार ? भ्रष्टाचाराने संपुर्ण देश आपला गांजला असा राजकारण्यांच्या पंगतीत आता धुतला तांदुळ शोधणार कसा ? देशाच्या सिमेवर जवानांची क्रुरपणे मुंडकी छाटली जातात तरी सुद्धा आपण त्यांना फक्त इशारेच देत राहणार ? मंगळावर यान पाठवायचे म्हणुन मिशन आखणार पण गरिबाला घास देण्यासाठी प्रयत्न कधी करणार ? कोट्यावधींच्या देशात आता माणसाला नाही किंमत चार जण जसे जगातात तसे तुम्हीपण का जगणार ? जग

यावे दुर्गपूजेला..!-शिवाजी ट्रेल

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 22/02/2013 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
......गेल्या वर्षी मी शिवाजी ट्रेल या संघटने बद्दल माहितीवजा लेखन इथे केलं होतं... http://misalpav.com/node/20831 ... तसा दरवर्षी नवा गड असतो..पण गेल्याच वर्षी क्षिरसागर सर(शिवाजी ट्रेलचे प्रमुख आणी सर्व काही...) म्हणाले होते,की हा गड अतिशय दुर्लक्षित आणी विषेश निधि न मिळालेला असल्यानी याचं काम २/३ वर्ष चालेल...त्यामुळे गेल्या वर्षीच्या धाग्याची लिंक मुद्दामच डकवली आहे...कारण या वर्षीही तोच किल्ला आहे...

समवेदना

लेखक अनघा आपटे यांनी बुधवार, 20/02/2013 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
"समवेदना" ते २००३ साल होते. एका अस्वस्थ काळातून मी जात होते. पहिल्यांदाच आयुष्यात मला कोणत्या तरी अशा आधाराची गरज वाटत होती, कि जी नुसतीच मला त्यातून बाहेर काढेल नव्हे तर माझे मनोबल टिकवून देखील ठेवेल. सर्वकाही कोणावर तरी सोपवावे आणि त्याने आपल्याला सावरावे असे कोणीतरी. त्या वेळी देवावर नेहमीपेक्षा जास्त (कारण मुळात मी सश्रद्ध आहे )विश्वास ठेवावा असे कुठेतरी वाटू लागले होते. आणि त्यानुसार मी, सोळा सोमवारचे उपास सुरु करून त्या भोळ्या सांबावर सारा माझा भार सोपवून निर्धास्त झाले. जसजसे दिवस सरत होते तसतसे माझे मनोबलही वाढत होते.