Skip to main content

मुक्तक

प्रश्न..!

लेखक महेंद्र दळवी यांनी बुधवार, 15/01/2020 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसानंतर मंदिराच कवाड बंद दिसलं. चला देवाने ही रजा घेतली. आस्तिकांचं गाऱ्हाणं ऐकून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना 'तो' ही थकत असेल म्हणा... पण एक मात्र चांगलं झालं, मनात दडलेले असंख्य न पटणारे अनुत्तरित विज्ञानवादी प्रश्न तुझ्याकडे मांडायला माझा नंबर लागतोय आज. . - एक नास्तिक (तळटीप :- मी नास्तिक नाही..) #mD...

मुंगूसाची गोष्ट

लेखक मायमराठी यांनी मंगळवार, 14/01/2020 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
।। मुंगूसाची गोष्ट ।। ' गोष्ट ' हा शब्द ऐकल्यावर कान टवकारले जात नाहीत; नीट सरसावून बसत नाही; भुवया आभाळापर्यंत उंचावून उत्सुकता चेहऱ्यावरून सांडत नाही; आपण ज्यांच्याशी गप्पा छाटत होतो त्यांनाच गप्प करत "जरा ऐकू दे रे." असं म्हणत नाही, आहे का असं कोणी? दुसऱ्याही प्रकारचे मनुष्य असतातंच. म्हणजे " हा मला काय अक्कल शिकवणार? ", " हा कुठली गोष्ट सांगणार ते मला माहितेय.", "मला माहीत नाहीत अशा गोष्टीच नाहीत." अर्थात ही वाक्ताडनं मनातल्या मनातंच हो.

एपिक चॅनेल वरील एक उल्लेखनीय मालिका

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 10/01/2020 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
एपिक चॅनेल वरील एक उल्लेखनीय मालिका कलियुग - एक आरंभ दिनांक १८ नोव्हेंबर पासून एपिक या चॅनेल वर रात्री ८.३०वाजता "कलयुग - एक आरंभ " या नावाची अतिशय उत्तम मालिका सुरु झाली आहे. मालिका ऍनिमेशन प्रकारात मोडत असली तरी लहानांसोबत मोठ्यांनीही आवर्जून बघावी अशी हि मालिका आहे. उलट मोठ्यांना त्यातले संदर्भ पटकन कळतील. आम्ही देखील जरा उशिराच हि मालिका बघायला सुरवात केली. पण आता मात्र सर्वाना हि मालिका बघण्याची विनंती करतो. महाभारतावर आधारित अशी हि मालिका आपल्याला अनेक विचार करायला भाग पाडते.

महाराष्ट्राचा गवगवा वाढत आहे

लेखक माहितगार यांनी बुधवार, 08/01/2020 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
मी मागे एक महाराष्ट्रीय स्त्री जेव्हा देशाची लाज काढते ? :( नावाचा लेख लिहिला. इंटरेस्टींगली संदर्भाचा व्हिडीओ कदाचित माजी पाकिस्तानी राजदूतांनी चुक उमगल्या नंतर कधितरी हळूवार डिलीट केला त्यामुळे त्या लेखात पोक्ळी निर्माण झाली होती. त्याच महाराष्ट्रीयन स्त्री लेखिकेस स्वदेश विरोधाचे काम सध्या कसे चालू आहे हे माहित नाही पण केवळ स्वदेश विरोध पुरेसा नसतो त्याचा गवगवाही झाला पाहिजे तर गवगवा चालू ठेवणारे आणखी नव्या मराठी कथालेखिकेचे नाव पुढे आले आहे. तर सदर मराठी लेखिका हिवाळ्याची गार हवा खाण्यासाठी बाहेर निघते.

हतबल

लेखक शब्दसखी यांनी मंगळवार, 07/01/2020 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर टक्क जागा आहे मी. घरच्यांना वाटतंय की झोपलोय मी अजून, पण जागा आहे मी. डोक्यावरचा पंखा मंद फिरतोय. तोही सहन नाही होत आहे मला. पण उठून बंद नाही करू शकत मी. हतबल आहे मी.

मन्या व्हर्सेस अंबानी..

लेखक चिनार यांनी सोमवार, 06/01/2020 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या मन्यानी नवीन वर्षाचा संकल्प वगैरे करणं कधीच सोडलं आहे. वारंवार संकल्प करून तो पूर्ण न करणं, मग त्याची लाज वाटणं,मग स्वतःला दोष देणं आणि ह्यातून हळूहळू निगरगट्ट होण्याकडे झुकणं अन फायनली निगरगट्ट होणं ह्या सगळ्या स्टेजेस मन्याने पार केल्या आहेत. आता त्याच्यासमोर कोणी न्यू इयर रिझोल्युशन वगैरे गोष्टी सुरु केल्या की मन्या मनातल्या मनात हसतो. तरीसुद्धा खूप वर्षांपासून मनात असलेला पण कधीही पूर्णत्वास न गेलेला, सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटे लवकर उठण्याचा निर्णय यंदा मन्याने घेतला होता.

पंखा

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 03/01/2020 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
।। पंखा ।। एप्रिल- मे मधील दहावीचे सुट्टीतले वर्ग सुरू होते. गरागरा फिरणाऱ्या पंख्याखाली बसूनही घामाच्या धारा लागलेले विद्यार्थी , त्या धारांशी रुमालांनी लढत होते. मधेच वहीच्या पुठ्ठ्यांनी वारा घ्यायचा फुका प्रयत्न. आजकालचे पुठ्ठेही तसे तकलादूच. मुलंमुली भिजलेल्या चोळामोळा झालेल्या रुमालाने कसेबसे स्वतःला गोळा करत करत अभ्यासाकडे नेत होते. एरवी तसाही गणिताने घाम फुटतोच त्यात उन्हाळ्याच्या नवीन समीकरणांची भर पडली होती! अचानक न जाणे कुठून एक बुलबुल पक्षी खिडकीतून पंख्याकडे झेपावला.

रायगड भ्रमंती

लेखक मालविका यांनी रविवार, 29/12/2019 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
रायगड भ्रमंती दिनांक १५ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही रायगड किल्ल्यावर जायचे ठरवले. मी, नवरा श्रीनिवास, मुलगा ईशान (इयत्ता ३री ) आणि भाची जुई (इयत्ता ५वि ). मुलांनी छत्रपती संभाजी मालिकेत अनेकदा ऐकलेला रायगड प्रत्यक्षात कसा आहे बघितला नव्हता. आता जरा मोठी झाल्याने त्यांना किल्ला, आणि त्याची माहिती कळेल अशी आशा होती. त्याप्रमाणे आम्ही प्लॅन केला. जाताना आम्ही चढून जायचं ठरवलं आणि येताना रोप वे ने. जेणेकरून मुलांना दोन्हीची ओळख होईल. रायगड चढायला १६०० पायऱ्या आहेत असं ऐकलं होतं. मुलं कितपत जमवतील जरा शंका होती. पण मुलांचा उत्साह होता. जमेल जमेल म्हणून उड्या मारत होती.

कविता: शब्द

लेखक bhagwatblog यांनी गुरुवार, 26/12/2019 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांनी केला शब्दांवर घाव विसरलो शब्द राहिला नाही ठाव माणसांनी केला शब्दांचाच खेळ आता कसा घालू शब्दांना मेळ अवधानांनेे झाला शब्दांवरच वार कशी लावू आता शब्दांना धार अविश्वासाने केला शब्दांचाच घात शब्दांनी करायची अविश्वासा वर मात शब्दांनी केला नात्यातच बुद्धिभेद एकत्र येऊन सारू नात्यातील मनभेद

उरलो आता भिंतीवरल्या ...  

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 25/11/2019 05:11 या दिवशी प्रकाशित केले.
तुका म्हणाला  उरलो आता  उपकारापुरता ...  मी म्हणालो उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता. नुरली शक्ती विरली काया  शिथिली गात्रे  आटली माया ... उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता.