Skip to main content

मुक्तक

केशरी लाट

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 13/06/2020 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल महिन्याचे अखेरचे दिवस असतात. सुट्यांची चाहूल लागलेली असते आणि अंगाच्या काहिलीचीही. `तो` आग ओकायला लागलेला असतो. अशात एक थंड झुळूक पिवळसर मंद गोड सुगंध घेऊन येते. गावातला कुणी काका/मामा हातात एक मळक्या रंगाची पिशवी घेऊन आलेला असतो. असा नातेवाईक नशीबात नसला, तर आपणच बाजारात काहीतरी घेऊन येताना एखाद्या कोपऱ्यावर सुरकुतलेल्या चेहऱ्याची एखादी म्हातारी समोर भरलेली टोपली घेऊन आपल्याकडेच आशेने बघत बसलेली दिसते.

आई घरी जायला निघते तेव्हा...

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 13/06/2020 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
आई घरी जायला निघते तेव्हा, प्रवासासाठी म्हणून केलेले तिचे पराठे थोडे जास्तच होतात, चुकून. फ्रिजमध्ये केलेली असते माझ्या आवडीची केळफुलाची भाजी, रसाची आमटी.. बाबांकडून खवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण.. डब्बा भरलेला असतो तिखट पु-या, चकलीनं.. दाण्याचं कूट, जीरेपूड, धणेपूड..

वादळ

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 12/06/2020 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
छप्पर उडून गेल्यानंतर पाऊस घरात येतो तोंडचा घास नाहीसा होतो भणाणता आलेले वादळ सारं उध्वस्त करीत जातं वाटेत येईल ते पाडत जातं मग ते काहीही असो घर खांब छप्पर झाड माड आणि मनही.

फुलपाखरू

लेखक मन्या ऽ यांनी मंगळवार, 09/06/2020 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
फुलपाखरू एक होते रंगेबेरंगी फुलपाखरू .. त्याचे 'मन' ऐसे नाव.. ईवलेसे नाजुक पंख तयाचे त्यावर सुंदर नक्षी संस्कारांची. फुलपाखराच्या पंखावरचे काही रंग लाल-गुलाबी स्वप्नांचे बालपणीच्या आठवणींचे उमलणार्या फुलांचे चांदण्या रातींचे तर काही रंग आहेत.,मात्र निळे-काळे नको त्या कटु आठवणींचे भळभळत्या जखमांचे चुलीतल्या विस्तवाचे.. त्याच कटु आठवणींने बळ तयाच्या पंखास दिले संकटावर मात करुन त्यास नव्या उमेदीने जगण्यास शिकवले!.. -दिप्ती भगत (१३जून, २०१९)

गनिमी कावा

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 08/06/2020 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
``तू पहिल्यासारखा राहिला नाहीस.`` पहिल्याच वाक्यानं त्याचं कामातलं लक्ष उडालं. ``आता काय झालं?`` त्यानं काळजीनं विचारलं. ``काही नाही. जाऊ दे.`` तिनं दोनचार तोंडवाकडे, लालबुंदे, भुवईउडवे इमोजी टाकले. अशा प्रसंगी काय करायचं असतं, हे त्याला लग्नाच्या दहा आणि व्हॉट्स अपच्या सहा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर नीटच माहीत झालेलं होतं. ``अगं सांग ना, काल तुला फोन केला नाही, त्याचा राग आलाय का तुला?`` ``कालचं काय विशेष? हल्ली फोनच करावासा वाटत नाही तुला! चॅट करायलाही वेळ नसतो!`` ``….`` ``आता काही बोलणार नाहीस, माहितेय मला. मी इकडे एकटी असते, सगळं घर सांभाळते, काही कुरकुर न करता.

DDLJ

लेखक चिनार यांनी शनिवार, 06/06/2020 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
#दिलवाले_दुल्हनिया_ले_जायेंगे टीव्हीवर डीडीएलजे सुरु आहे. राज (शारक्या) नुकताच युरोप टूर वरून परतला आहे. आपण सिमरनच्या प्रेमात आहोत हे त्याला आता कन्फर्म झालंय. तो स्विमिंग पूलजवळ बसलाय. तेवढ्यात त्याचे वडील अनुपम खेर तिथे येतात. शारक्याच्या हातात 'बीयर'चा टिन देतात. आणि मी शेगावचं दर्शन घेऊन आल्यावर वडील ज्या कॅज्युअलतेने मला, "किती वेळ लागला बे दर्शनाले?" असं विचारायचे त्याच कॅज्युअलतेने ते शारक्याला विचारतात, "लडकी का नाम क्या है?" हातात बीयरचा टिन आणून देणं वगैरे तर कहर आहे. आम्ही शेगावचा प्रसाद वडिलांच्या हातात देताना डाव्या हाताने दिला म्हणूनसुद्धा शिव्या खाल्ल्या आहेत.

जरी आंधळी मी तुला पाहते

लेखक मी-दिपाली यांनी शुक्रवार, 05/06/2020 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हाना मन की बात सगळ्यांच्याच परिचयाची झाली आहे. पण हे गाणं ऐकलं ..जरी आंधळी मी तुला पाहते ...आणि वाटलं अरेच्चा ! हे तर मन की आँख! दिव्यदृष्टीच म्हणा ना! महाभारतात महर्षी व्यास संजयास दिव्यदृष्टी बहाल करुन जातात; कुरुक्षेत्रावरील वृत्तांत धृतराष्ट्रास कथन करण्यासाठी. गांधारीची दिव्यदृष्टी मात्र तशी बक्षीसपात्र नाही. अंध धृतराष्ट्राशी लग्न होणार समजताच आजन्म डोळ्यावर पट्टी बांधुन घेण्याच्या कठोर प्रतिज्ञेत स्वतःला बद्ध केलं तिने. त्या साधनेतुन, तपश्चर्येतून ती कमावलेली.

अनामिका

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 04/06/2020 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
मला प्रेम करायला तिने शिकवले. तिरस्कार कसा करावा हे ही मी तिच्याकडूनच शिकलो. तिचे डोळे नेहमी सांगायचे, की नजर बोलकी असते. ती रसिका होती अन् मी मनातला भावतरंग. ती दृश्य तर मी अदृश्य. मला माझ्याच शब्दांत पकडून हरवणे फक्त तिचीच मक्तेदारी होती. तिच्यासाठी माझे शब्दही माझ्याशीच दगा करायचे. आम्ही तासंतास सोबत असायचो. पण मी तिला कधी बोलूच द्यायचो नाही. वाटायचं की तिला असंच जपून ठेवावं. तिच्या जीवाला काही तोशीस नाही पडू द्यावी. मग तिच्या वाट्याचं बोलणं सुद्धा मीच बोलायचो... माझ्याशी. तिच्या नजरेचे वर्णन मी पामराने काय करावे? त्या पाणीदार डोळ्यांत जणू सारा समुद्र सामावलेला असायचा.

प्रवासी

लेखक अनुस्वार यांनी बुधवार, 03/06/2020 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
एका दिशेचा भेटला किनारा प्राक्तनाची दौड बाकी वाट दे तू सागरा. नाव माझी हलकी जरी मी खलाशी रानातला. लाटांची वादळे प्रचंड उरात लाव्हा तप्तला. आकाशी दुंदुभी गर्जना करावी वाऱ्यासवे वेगाची स्पर्धा हरावी. उन्मळून पडले गर्ववृक्ष सारे ओहोटीत गेले जीव सर्व प्यारे. पाहुणा मग पाऊस आला भरावया एक रिक्त प्याला. प्याला-होडी ची गल्लत मोठी झाली वल्हवणी आता पाण्यात शांत झाली. हे भास्करा, नको होऊस तू लुप्त लढणाऱ्यांना किती ठेवशील गुप्त. चांदण्यांचे मर्म थोडे वाटून घे निशेस सावलीची साथ दे.

प्रेम..

लेखक मन्या ऽ यांनी सोमवार, 01/06/2020 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम.. प्रेम म्हणजे अथांग सागर प्रेम म्हणजे वाळवंटातील मृगजळ ज्याने तहानलेल्याची तहान काहीकेल्या भागत नाही प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे आपुलकी जो वेळप्रसंगी माणुसकीला जागलेच असे नाही प्रेम म्हणजे अटी प्रेम म्हणजे बंधन जे माणसाला एक माणुस म्हणुन वागवत नाहीत मुक्तपणे जगु देत नाही तरीही हे प्रेम वाटे मजला हवेहवेसे ते प्रेम जे एकमेकांच्या अबोल गोड शब्दांचे एकमेंकाच्या साथीचे समोरच्याच्या मंद गुढ हास्यातले ते प्रेम जे आयुष्यात देवघरातल्या नंदादिपाप्रमाणे अखंड तेवणारे स्वतः जळून काळोख मिटवणारे -दिप्ती भगत (२०जून,२०१९)
काव्यरस