गोपाला गोपाला... देवकीनंदन गोपाला......!
द्वापारयुगी मथुरानगरीचा राजा होता 'कंस'.....
सदा छळे तो सज्जना, करी अति विध्वंस....
अत्याचारांचा भार न पेलवला धरणीमातेला....
दुष्टाच्या निर्दालना, जन्म घेण्या...ती विनवी प्रभुला...
या कंसाची, पाठची बहीण होती 'देवकी'...
पुढे 'वसुदेवा'ची ती राणी झाली लाडकी...
वरातीच्या रथाचे सारथ्य पत्करले होते कंसाने...
बहिणीची पाठवणी करत होता मानाने....
इतक्यात, घनगंभीर आवाजात, एक आकाशवाणी वदली...
ऐकून ती, कंसाची जणू पाचावर धारण बसली...
"कंसा, तुझी लाडकी बहीण आता तुझीच वैरिणी बनेल.
देवकीच्या 'आठव्या' गर्भाकडून तुझा मृत्यू घडेल."
ऐकून ती आकाशवाणी, चवताळला, संतापला कंस...
नवपरिणित दांपत्याला मग घडला बंदिवास
मिसळपाव
...तरीही "भारतकुमार' विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा कपाटातल्या "ओम शांती ओम'च्या सीडीपाशी गेला. सीडी काढून त्यानं खिशात टाकली अन् थेट न्यायालयाचा रस्ता धरला. विक्रमादित्य चालत असताना सीडीतून शाहरुख नावाचा वेताळ बाहेर आला.
""काय रे मिळतं तुला बॉलिवूडच्या बादशहाला त्रास देऊन? प्रसिद्धी?'' वेताळानं विचारलं.
विक्रमानं चेहऱ्यावरचा हात हलकेसे बाजूला केला.
वेताळ आणखी कावला. म्हणाला, ""बरं, असो. एक गोष्ट ऐक! आटपाट नगराचा एक राजा होता. तो काही राजघराण्यात जन्मला नव्हता.