खाण्याशी सख्य लहानपणापासूनच जडल्यामुळे आणि कुणी मखरात बसवून आवडीचे पदार्थ करून खायला घालण्याची शक्यता नसल्यामुळे मुदपाकखान्यात स्वतःचं कौशल्य आजमाविण्याविना पर्याय नव्हता. उपाशी राहायला लागणार नाही, एवढा स्वयंपाक इयत्ता नववीत असल्यापासूनच यायला लागला होता. दहावीत असताना तर त्यावर कडीच झाली.
तेव्हा रत्नागिरीत राहत होतो. दहावीचं महत्त्वाचं वर्ष होतं. वर्षभर थेटरात जाऊन चित्रपट न पाहण्याचं पथ्य वगैरे (आई-वडिलांच्या धाकामुळे का होईना,) पाळलेलं. अभ्यासाचं "शिवधनुष्य' पेलताना खांद्याचे पार वांधे झालेले. त्यातून नेमकं फेब्रुवारी का मार्च महिन्यात आत्तेबहिणीचं पुण्यात लग्न ठरलं.
अनिरुद्ध अभ्यंकर 'दूर पळ दूर पण' सांगताना बघितले आणि आमच्या मनात आजूबाजूची वेगवेगळी चळिष्ट चित्रे साकारली! ;)
खोकत खोकत
पहाता पहाता
उठते जेव्हा
एक कळ
मन माझे
म्हणते तेव्हा
म्हातार चळ म्हातार चळ
एरंडाचं पान माझ्या
टाळू वरुन ढळलं नाही
काशाची ती वाटी गं
उष्मा अंगचा सरला नाही
खिडकीमधे आज पुन्हा
दिसलं आहे 'मृगजळ'
मन माझे म्हणते तेव्हा
म्हातार चळ म्हातार चळ
समोरच्या घरामधे
अशी एक रात्र येईल
नजर तेव्हा माझी अगदी
पहा धुंद होऊन जाईल
वासनेच भूत नुसतं
शरिरात नाही बळ
मन माझे म्हणते तेव्हा
म्हातार चळ म्हातार चळ
चतुरंग
सापशिडीच्या खेळात
'९८' च्या सापाला चुकवायचं आहे
कवड्यांच्या खेळात
'तीन पाय कुत्रं' टाळायचं आहे
'पांच, तीन दोन' मध्ये
कुणाचेतरी हात ओढायचे आहेत
'नाठेठोम' मध्ये
अजुन, सगळ्या जोड्या जिंकायच्या आहेत
कॅरम मध्ये
कधीतरी, क्वीनचे 'कव्हर' घ्यायचे आहे
आयुष्याच्या 'ल्युडोत'
अजून सहाचे 'दान' पडायचे आहे !
द्वापारयुगी मथुरानगरीचा राजा होता 'कंस'.....
सदा छळे तो सज्जना, करी अति विध्वंस....
अत्याचारांचा भार न पेलवला धरणीमातेला....
दुष्टाच्या निर्दालना, जन्म घेण्या...ती विनवी प्रभुला...
या कंसाची, पाठची बहीण होती 'देवकी'...
पुढे 'वसुदेवा'ची ती राणी झाली लाडकी...
वरातीच्या रथाचे सारथ्य पत्करले होते कंसाने...
बहिणीची पाठवणी करत होता मानाने....
इतक्यात, घनगंभीर आवाजात, एक आकाशवाणी वदली...
ऐकून ती, कंसाची जणू पाचावर धारण बसली...
"कंसा, तुझी लाडकी बहीण आता तुझीच वैरिणी बनेल.
देवकीच्या 'आठव्या' गर्भाकडून तुझा मृत्यू घडेल."
ऐकून ती आकाशवाणी, चवताळला, संतापला कंस...
नवपरिणित दांपत्याला मग घडला बंदिवास