Skip to main content

मुक्तक

बालगीत

लेखक दवबिन्दु यांनी सोमवार, 06/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कविता स्वताच्या जबाबदारीवर वाचवी. १ होती उ आणि १ होती टु, दोघी गेल्या फिरायला, उ ला सापडला रुपया, उ म्हणाली आईला - आई, आई, याचं काय करु ? आई म्हणाली आण जा भाजी. उ : आई मी भाजी आणली. धुवु कशी ? सपासपा. चिरु कशी ? कराकरा. शिजवु कशी ? रटा रटा. खाऊ कशी ? मटा मटा. झोपु कशी ? डाव्या कुशी. पादु कशी ? ढुम्मदिशी. (लोकगित)
Taxonomy upgrade extras

तु !

लेखक दशानन यांनी शनिवार, 04/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
एका प्रेमवीराची मानसीक अवस्था जेव्हा त्याची ती त्याला असेच मध्ये सोडून जाते तेव्हा तो प्रेमवीर काय विचार करत असेल ह्यांची एक कल्पनामात्र... ************************************ किती सोपा शब्द आहे नाही, पण ह्यांचा अर्थ माझ्यापेक्षा कोण जाणेल.. ह्या शब्दांचे! तुझ्या शिवाय माझे अस्तिव काय ?

(ब्यूटी पार्लर अर्थात काव्यफुफाटा)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 03/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळी सक्काळी मिपावर आलो आणि 'ब्यूटी पार्लर अर्थात यौवन फुफाटा' ही कविता वाचून डोळे भरुन आले! काल भडकमकर मास्तरांनी जालिंदर जलालाबादींची ओळख काय करुन दिली आणि आज ही नवकविता वाचायला काय मिळाली, सगळेच विलक्षण! हे म्हणजे आज आर्त भावाने विठ्ठलाची भक्ती करावी आणि लगेच दुसर्‍या दिवशी साक्षात पांडूरंगाने आपल्याला डब्बलसीट न्यावे तसा प्रकार झाला!! धन्य आहेस माऊली धन्य आहेस!!

आणखी एक कविता पूर्ण करा

लेखक अभिरत भिरभि-या यांनी गुरुवार, 02/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एका (अर्धवट) कवीची (अर्धवट बिघडलेली) कविता. बघा ब्वॉ रिपेअर करता येते का .. रात्र झाली, दीप निवले आकाश झाले काळे | भुरा चंद्र हसे पहा; बोले काय गो झाले |
Taxonomy upgrade extras

लग्नाच्या `बाजार'गप्पा (भाग २)

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 02/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाच्या `बाजार'गप्पा (भाग १) स्थळ ः सिंधुदुर्गातील कुडाळमधील एक छोटेखानी घर. वेळ ः दुपारी चारची. पात्रे ः अस्मादिक व मातुःश्री. ----------- पार्श्‍वभूमी ः कोकणातील व्यवस्थित घर, मुलगी साधीसुधी, आज्ञाधारक, गृहकृत्यदक्ष वगैरे. त्यामुळे मातुःश्रींच्या एकदम सर्वाधिक प्राधान्यातली. "नाकारण्याचा प्रश्‍नच नाही!' या गटातली. त्यामुळे भेटून "पारखण्यासाठी' स्वतः मातुःश्री हजर. पण मुलगी मुंबईला काही कामासाठी गेलेली. आम्ही गोव्याहून मावशीकडून थेट कुडाळात दुपारी दाखल.

`पद्मश्री'चा सन्मान...कित्ती छान!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 01/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
akshay1 अक्षयकुमारला "पद्मश्री' सन्मान झाला, तेव्हा कोण टीका झाली होती! पुरस्काराला काही किंमतच उरली नाही, कुणालाही देतात, वशिलेबाजीचा जमाना आहे, वगैरे वगैरे! 31 मार्चला हा पुरस्कार प्रदानही झाला. अक्षयनं त्याच्या आदल्याच दिवशी आपल्याला मिळालेला सन्मान किती योग्य होता, हे सिद्ध करून दाखवलं. मुंबईच्या लॅक्‍मे फॅशन वीकमध्ये अक्षय रॅम्पवर चालला.

ओसाड राजमार्ग

लेखक जयवी यांनी सोमवार, 30/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
सोपं जगायची सवय झाली की .... कठीण उत्तरं नकोशी होतात थोडीशी बेरीज, वजाबाकी करुन उत्तरं कशीबशी जुळवता येतात. उगाच ती क्लिष्ट आकडेमोड कशाला सापडतोच कुठला तरी वशिला चढ उतार नकोच असतात आडवळणं मग शोधली जातात तीच वाट दाखवतो पुढच्या पिढीला नकळत आडवळणाचेच बनत जातात..... राजमार्ग नकळत मिरवत जातो दिमाखात त्याच मार्गावरुन खरी वाट सोयिस्करपणे विसरुन सवयी त्याच अंगवळणी पडतात आणि खरे राजमार्ग ओसाड पडतात. जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

देवाने माश्यांना अस का बनवल ?

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 28/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
देवाने माश्यांना अस का बनवल? की बघताच मन पत्येकीवर चिडायच सगळ्याच मेल्या नकोनकोश्या वाटायच्या मग कोणा एकाच्याच ताटात का पडायच?
Taxonomy upgrade extras

पातेलीभर खिरीची गोष्ट!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 27/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात एके दिवशी कधी नव्हे तो संध्याकाळी घरी होतो. काम करूनही कंटाळा आला होता. थोडंसं (कथित) पाककौशल्य दाखविण्याची खुमखुमी आली. शिवाय, मुलीच्या आवडीचा पदार्थ करून तिची मर्जी संपादन करण्याची संधीही होतीच. म्हणून मुदपाकखान्याकडे वळलो. काय करावं, काही ठरलं नव्हतं. नेहमीचं पोहे-उप्पीठ-भजी प्रकरणांनी कन्येला जिंकणं म्हणजे दीपिका पदुकोनला आपल्या पगाराची स्लिप दाखवून लग्नाची मागणी घालण्यासारखंच होतं! त्यामुळं वेगळा बेत आखला. कधीकाळी आजी रव्याची खीर करायची. तेव्हा मीही शिकलो होतो. बऱ्याच वर्षांत तिच्याकडे (म्हणजे, खिरीकडे) ढुंकून पाहिलं नव्हतं. म्हटलं, करून बघूया आज!

तुझ्या दु:खाविना

लेखक शिवापा यांनी बुधवार, 18/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
अजुन किती वेळ जाईल? तुझी आठवण कुठपर्यंत राहिल? तु गेलायेस पण आठवण छळतेय तुझ्या सांवल्यात मी अजुन चालतेय कुठलाच विचार येत नाहि तुझ्या दु:खाविना अवचित वाजलेला फोन काळजाचे ठोके चुकवतो गर्दीतला प्रत्येक चेहरा तुझाच भासतो प्रत्येक रात्री वाट पहात रहाते झोपेची झोपही येत नाहि तुझ्या दु:खाविना जाग आल्यावर हात तुझ्या स्पर्शासाठी आसुसतो तु नसल्याची आठवण झाल्यावर एकदम बावरतो कधितरी थांबेलच हे सर्व दु:खांचे हेहि संपेल पर्व आयुष्याच्या पटलावर पुढे सरकतांना आठवणीची सारी भुते जळतांना हसणे तेव्हढेसे कठिण रहाणार नाहि अवेळी अश्रुही तरळणार नाहि तुझी आठवण तेव्हांहि येईल पण तुझ्या दु:खाविना