Skip to main content

मुक्तक

ऒळखीचे भेळवाले

लेखक सुबक ठेंगणी यांनी बुधवार, 20/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या कुठल्याही नाक्यावर असतो तसाच आमच्याही नाक्यावर एक भेळवाला होता. ब-याच लहानपणीपासून माझा त्याच्यावर (म्हणजे त्याच्या भेळेवर) डोळा होता. आपण चांगले मार्क मिळवावेत आणि मग आईने “जा, नाक्यावरच्या भेळवाल्याकडून भेळ घेऊन ये” असं म्हणावं असं माझं एक माफक स्वप्न होतं. पण आईपुढे आमची डाळ शिजत नसे. त्यामुळे इव्हसारखंच मलाही त्या भेळेच्या “forbidden fruit” चं कायम आकर्षण वाटत राहिलं. आणि मग एका कोजागिरीला भय्याची भेळ खायचा “दुग्धशर्करा” योग आला आणि मग पुन्हा पुन्हा आला, येतच राहिला. कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी “को जागर्ती” असं म्हणत जागत्या घरी जाते असं म्हणतात.

उंदीरनामा

लेखक सुबक ठेंगणी यांनी मंगळवार, 19/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी लहानपणी उंदीर मला आवडायचा. कारण तेव्हा जेरी किंवा मिकी माऊस हाच खरा उंदीर अशी उंदराची प्रतिमा भलतीच ग्लॅमरस होती. खरा उंदीर पाहिला तेव्हा अशा विध्वंसक आणि पाताळयंत्री प्राण्याला गोंडस रूप देताना वॉल्ट डिस्नेने किती कल्पकता खर्ची घातली असेल ह्याचा अंदाज आला. बहुतेक जो जेरीस आणतो तो जेरी असंही वाटलं. शाळा-कॉलेजात असतानाही माझ्या कित्येक स्वप्नांचा व्हिलन उंदीर (किंवा उडरं झुरळ) असायचा. घरची बेल वाजते आणि दरवाजा उघडावा तर शे दीडशे गलेलट्ठ उंदीरांची टॊळीच घरात शिरते किंवा एम. ए. चा पेपर आहे आणि माझ्या सगळ्या नोट्सचं उंदराने भुस्कट पाडलंय अशी स्वप्न मला कितीतरी वेळा पडायची.

बेणारे

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 19/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
बेणारे युद्धपिपासू साम्राज्यटोळ्यांच्या शोकसंघर्षातून गर्वल्यालेला बधिराsकांत तोंडी लावायला लब्धप्रतिष्ठित सुरुंगा-तुरुंगांच्या चित्ताकर्षक बाजारगप्पा चिअर्स चिअर्स आणि विद्धनजरेने पहायची पैलतीरावरच्या बेणारेची सुटकाधडपड किंवा वितळून राहायचे ऐलतीरी झारीतल्या शुक्राचार्यासारखे आळोखे पिळोखे देऊन कंटाळा आल्यावरती मात्र टाळ्या पिटून निघून जायचे उगाच तो आकांत मनाला चिकटला तर काय घ्या म्हणत म्हणत की "अशी धडपड अनुभवायची म्हन्जे " हौ एक्सायटिंग नै "? १८ मे २००९, पुणे
Taxonomy upgrade extras

`उत्तर'क्रिया!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 18/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणूक निकालाची धामधूम संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून राज ठाकरे त्यांच्या नित्यक्रमाला लागले होते. नाही म्हटलं, तरी प्रचार संपूनही प्रत्यक्ष निकालापर्यंत गडबड कायम होतीच. बेरजा वजाबाक्‍यांची चर्चा सुरू होती, समीकरणं मांडली जात होती. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी तर मनसेची दिवाळीच साजरी झाली होती. पहिल्याच निवडणुकीत अनेक उमेदवारांनी लाख-दीड लाख मतांपर्यंत बाजी मारली होती. अधिक जोर लावला असता, तर आणखी काही जागा जिंकलोही असतो, अशी परिस्थिती होती. लोकांच्या अगदी "मनसे' प्रतिसादामुळं सगळेच भारावले होते.

लग्न म्हणजे...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 18/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या एका टप्प्यावर कुणाची तरी साथ हवीशी वाटते...(तात्यासारखा "बाई-बाटली'त न गुंतणारा एखादाच!) निर्णय कसा घ्यायचा, हे मात्र ठरलेलं नसतं. "अमक्‍याची तमकी लग्नाची आहे...' कुणीतरी सुचवतं. "तमका तुला अगदी शोभून दिसेल हो!' भोचक शेजारीण काकू मध्येच नाक खुपसतात. प्रत्यक्ष निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो.

एका आय सी यू तली आठवण

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 18/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कळिकाळाच्या हिंदोळ्यावर मीपण जळले रुसले तुटले अद्वैताच्या पुण्याईशी ललाटरेषा जुंपून घेते पुन्हा विखारी तल्लख अडसर अर्थव्यथेचे फ़ासे फ़सले प्राणपाखरू उडता उडता काय राहिले, कोणी न उरले १७ मे २००९, पुणे ________________________________________ एका गरीब रुग्णाच्या कुटुंबाला मोठ्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक ताकद नसल्याने कठीण परिस्थितीतून जावे लागले, तो प्रसंग पाहिल्यानंतर त्या आठवणीत लिहिलेली ही कविता आहे..... यापेक्षा अधिक स्पष्टीकरण देणे मला अशक्य आहे.... ...
Taxonomy upgrade extras

ओढ माहेरची

लेखक जयवी यांनी रविवार, 17/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतं लग्न होऊ दे नाहीतर लग्नाची पंचवीस वर्ष होऊ देत……. माहेरी जायचं म्हटलं की एक आगळाच आनंद होतो…….आईला आणि लेकीलासुद्धा. आपल्या कोडकौतुकात वाढलेली लेक एकदम दुस-याला देऊन टाकायची आणि मग वर्षातून किमान एकदा तरी तिला भेटायची इच्छा कुरवाळत कुरवाळत दिवस पुढे ढकलायचे. “निघाले आज तिकडच्या घरी….” म्हणणा-या लेकीला डोळ्यात साठवून अश्रूंच्या पडद्यातून निरोप द्यायचा आणि तिच्या वाटेकडे डोळे लावून बसायचं. आपल्या भारतीय संस्कृतीतच असतं मात्र हे असलं जीव लावणं. सगळं आयुष्य मुलांभोवती गुंफ़णं. त्यांच्यापलीकडे विचारच करायचा नाही.

बालकवी

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 13/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.

मराठी कविता म्हटले की, बालकवीशिवाय पुढे जाता येणार नाही. बालकवींची कविता वाचून मन वेडावून जाते. त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी यांचे बालपण खेड्यात गेलेले. वडिलांची नौकरीनिमित होणार्‍या बदलीमुळे त्यांना वेगवेगळ्या गावात जाता आले. निसर्गाच्या सहवासातच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. लहानपणीच पाने फुले गोळा करण्याचा नाद त्यांना निसर्ग विषयक लेखनाकडे असे ओढत गेला. गावाच्या बाहेर जाऊन सूर्यास्त निरखत राहणे, नदीला निरखत बसणे. असे निसर्गात रममाण होण्याची ऊर्मी बालकविंना लहानपणापासून होती. आणि कवितांच्या आद्याक्षरावर कवितांच्या भेंड्या अडल्या की, स्वतःच एखाद्या कवितेची निर्मिती करायचे.

बिंदू

लेखक मनीषा यांनी मंगळवार, 12/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
क्षणात फुलतं ओठांवर एक कुत्सित हास्य .... आणि उगारले जातात विखारी शब्दांचे भाले रोखून पाहणार्‍या डोळ्यांमधे दिसते अघोरी चमक एक असहाय्य सावज कोंडीत पकडल्याच्या उन्मादाने लखलखणारी स्वतःचं 'मी' पण सुखाउन शांत झालेलं त्यांचं मन मश्गुल होतं .....यशाच्या धुंदीत ------- आणि माझ्या मनात उमलत असतो ..रसरसलेला एक बिंदू .... तिरस्काराचा ! या आत्ममग्नांच्या कळपात राहूनही मनावर तरंगत असते एकच जाणीव " मला जायलाच हवं .." कुठे? -- कसं? काहीच माहिती नसतं पण ...
Taxonomy upgrade extras