ओढ माहेरची
नुकतं लग्न होऊ दे नाहीतर लग्नाची पंचवीस वर्ष होऊ देत……. माहेरी जायचं म्हटलं की एक आगळाच आनंद होतो…….आईला आणि लेकीलासुद्धा. आपल्या कोडकौतुकात वाढलेली लेक एकदम दुस-याला देऊन टाकायची आणि मग वर्षातून किमान एकदा तरी तिला भेटायची इच्छा कुरवाळत कुरवाळत दिवस पुढे ढकलायचे. “निघाले आज तिकडच्या घरी….” म्हणणा-या लेकीला डोळ्यात साठवून अश्रूंच्या पडद्यातून निरोप द्यायचा आणि तिच्या वाटेकडे डोळे लावून बसायचं.
आपल्या भारतीय संस्कृतीतच असतं मात्र हे असलं जीव लावणं. सगळं आयुष्य मुलांभोवती गुंफ़णं. त्यांच्यापलीकडे विचारच करायचा नाही. पूर्ण आयुष्यभर त्यांच्यासाठीच कमवायचं आणि ते व्यवस्थित मार्गी लागले की मगच आपला विचार करायचा. पण तोपर्यंत आयुष्य संपत आलेलं असतं. फ़क्त स्वत:साठी जगणं आपल्या संस्कृतीतच नाहीये. त्यात आई म्हणजे तर कळस! खरंच आपल्या आई – बाबांच्या पिढीसारखं आपल्याला रहाता येईल का…..?
आजकाल कुटुंब इतकी छोटी झालीयेत ना की पाहुणे म्हणून कोणाकडे रहायला जाणं वगैरे सगळं बंदच झालंय. येऊन जाऊन एक नाहीतर दोन मुलं, शिक्षणासाठी दूर कुठेतरी जाणार….तिकडेच नोकरी आणि छोकरी पसंत करुन तिथेच स्थायिक होणार. मग आई-वडील, नातेवाईक ह्यांचा गोतावळा आपोआपच दूर होणार. नाही म्हणायला वर्षा दोन वर्षातून आई-वडीलांना असतं बरं का तिकीट ! ३-४ वर्षातून एकदा देशात यायचं….त्यातला जास्तीत जास्त वेळ जाणार बॅंकेची कामं, शॉपिंग मधे. शिवाय तिकडल्या मित्रांच्या घरी भेटी, त्यांच्यासोबत ठरलेले कार्यक्रम…..! ह्या सगळ्यात आपल्या आई-बाबांच्या वाटेला कितीसा वेळ उरतो?
इकडे यायच्या ३-४ महिने आधीपासून आईची आपली धावपळ सुरु असते…. माझ्या लेकीसाठी हे करु दे…….माझ्या नातवासाठी ते करु दे….! पण हे सगळं कौतुक करुन घ्यायला खरंच आपण वेळ काढतो…..? किती आत्मकेंद्रीत झालंय ना सगळं….!
“घाल घाल पिंगा वा-या, माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात…….” म्हणणा-या लेकीचा हळुवारपणा आजकाल कमी झालाय का…? आईच्या कुशीत शिरुन तिच्याकडून कोडकौतुक करुन घ्यायला तरी वेळ उरलाय का? फ़क्त आपल्या माहेरपणासाठी माहेरी जायचं….पण आपल्या आईलासुद्धा आपल्याशी खूप काही बोलायचं असेल…. मन मोकळं करावंसं वाटत असेल ह्याचा विचार किती वेळा येतो मनात? आपली लेक आता सुखानं संसार करतेय ह्यात खूप खूप सुख असतं पण त्या सुखात रमलेल्या आपल्या लेकीशी थोडा वेळ काढून आपल्या मनातलं पण खूप काही सांगायचं असतं, विचारायचं असतं… काही निर्णय घ्यायचे असतात. ह्यासाठी मात्र तिला उरल्यासुरल्या वेळात सगळं कसंबसं बसवायचं असतं. खरंच लग्न झाल्यावर इतक्या परक्या होतात का मुली……..की आपल्या आई-बाबांसाठी वेळ सुद्धा अगदी मोजून मापून द्यावा लागावा. कितीतरी अशा गोष्टी असतात की ज्या सगळ्यांच्या समोर बोलता येत नाहीत, त्या रात्री जागूनच बोलायच्या असतात.
आता जाणार आहे भारतात...... भली मोठी कामाची यादी घेऊन. पण आता असं वाटतं…. कधीतरी फक्त आईसाठीच भारतात जावं. तिच्याकडे तिचं मन भरेपर्यंत रहावं. तिचं पोट भरेपर्यंत गप्पा कराव्या….तिला आराम द्यावा…. आयुष्यभर केलेली तिची तडतड आपल्या सहवासानं विसरायला लावावी. तिला तिच्या आवडीचं करुन खायला घालावं....!!
मुलं लहान आहेत तोवर हे जरा कठीणच आहे. पण तोपर्यंत दुधाची तहान ताकावरच भागवावी लागणार आईला !!
वर्गीकरण
सुंदर !
In reply to सुंदर ! by सायली पानसे
ह्म्म
In reply to ह्म्म by पर्नल नेने मराठे
खरचं .................
In reply to सुंदर ! by सायली पानसे
सहमत
लवकरात लवकर
हम्म् ..
पण आता असं
मनातलं लिहिलंस..
छान..
छान विचार!
मस्त !
छान..
अगदी मनातलं!
खास लिहिलंस!
माsssहेर
नशीबवान आहांत...
In reply to नशीबवान आहांत... by पिवळा डांबिस
अगदी बरोबर रे...माय मा़झी मला
मस्त लेख
मनापासून
भारतात
हळवा कोपरा
अगदी अगदी!