Skip to main content

मुक्तक

अजीब दासताँ है ये - तिला आठवताना

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 24/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
...आज अचानक संध्याकाळी का कोणास ठाऊक. पत्नी छायाचा हसरा गोरापान चेहरा, घारे डोळे, त्यावर गॉगल,बेलबॉटम पँट, बुशकोट टाईप टाँप, हाय सँडल्स, कपाळावर जरा मोठी लाल टिकली. - 'सो व्हॉट' - म्हणायची स्टाईल आठवली.छाया आली आणि गेली. आठवणींची सौगात देऊन. त्याला ३२-३३ वर्षे झाली... ... एक साडेसात नंतरची चंदीगढजवळच्या पिंजोर गार्डनजवळ रविवारची संध्याकाळ. रस्त्यावरच्या वाहनांचे दिवे डोळ्यांना दिपवत होते. तेंव्हा धक्का बसल्याचे जाणवले व मी लुडकून स्कूटर अंगावर घेऊन धडपडलो. छाया कोसळली. रस्त्याच्या मध्यावर जाऊन आडवी झाली. म्हशींचा तांडा जात होता.

सांजवेळ

लेखक जयवी यांनी सोमवार, 22/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सावल्या लांब व्हायला लागल्या तशी सूर्याला आपल्या विश्रांतीची वेळ झाल्याची जाणीव होते. आपली मंदावलेली सोनसळी किरणं गोळा करुन तो निघतो. दूरवर हलकेच पैंजणांचा आवाज येतो....तो वळून बघतो. आपली पायघोळ काळी चंद्रकळा नेसून...यामिनी नखशिखान्त चांदणं लेवून.....आकाशाच्या दर्पणात आपलं प्रतिबिंब न्याहाळताना त्याला दिसते. तो कौतुकाने हसतो. रोज तितक्याच तल्लीनतेने तिचं त्या दर्पणात न्याहाळण्याचं त्याला कौतुक वाटतं. तो कित्येकदा ते बोलूनही दाखवतो. तीही दिलखुलासपणे ते मान्य करते.

शिव-वडा

लेखक पॅपिलॉन यांनी शनिवार, 13/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
राहुल आला अन् टोपी घालून गेला! खान आला अन् टपली मारून गेला!! ढाण्या वाघाचा पार शिव-वडा झाला!!!
काव्यरस

आओ म्हारो जैसलमेर

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 11/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
झी टीव्हीच्या एका सीरियलच्या शूटिंगसाठी जैसलमेरला घेऊन जाण्याचं निमंत्रण आलं होतं. माझी या दौऱ्यासाठी निवड झाल्यानं एक नवं ठिकाण पाहायला मिळण्याचं समाधान मिळालं. राजस्थानात भरतपूर अभयारण्यात मी सात-आठ वर्षांपूर्वी गेलो होतो. तेव्हा जयपूरही फिरून आलो होतो. पण जोधपूर-जैसलमेरची वारी पहिल्यांदाच घडणार असल्यानं जरा अधिक उत्साहित होतो. प्रवास जरा आडनिडा होता. तीन फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता मुंबईहून विमानाने जोधपूरला जायचं होतं. त्यापूर्वी सकाळी मला पुण्याहून मुंबईला पोचणं आवश्‍यक होतं. कूल कॅबची चौकशी करून सकाळी लवकर निघायचं ठरवलं. साडेपाचची कूल कॅब फोन करकरून शेवटी सहा वाजता अवतीर्ण झाली.

आज हिंदुस्तानका हर बूढा संकेतस्थळ मालक बनना चाहता है!

लेखक मिसळभोक्ता यांनी गुरुवार, 11/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
(आमची प्रेरणा: आता, सांगायलाच हवी का ?) हल्ली कधी कधी असे व्यनी येतात की ते वाचून मला जाम जालमहर्षी झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी जालमहर्षी झालेला सर्वात खडूस म्हातारा आहे असंही वाटायला लागतं. शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून टुकार आहेत. तेव्हा आता डायरेक्ट विवक्षित ठिकाणी हात... गेले १० वर्षं माझा नेट संचार रखडत रखडत चालू आहे. मनोगतासकट इतरही अनेक पोर्टल्स (सदस्यत्व रद्द होईपर्यंत) आणि आता स्वतःचा ब्लॉगही (जो कोणी वाचत नाही) अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो (हल्ली निनावी).

आज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है!

लेखक नीधप यांनी बुधवार, 10/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली कधी कधी असे इमेल्स येतात की त्या वाचून मला जाम महत्वाची व्यक्ती झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी महत्वाच्या जागी बसलेली सर्वात खडूस व्यक्ती आहे असंही वाटायला लागतं. शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून बर्‍या आहेत. तेव्हा आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात... गेले १० वर्षं माझा नेट संचार मुक्तपणे चालू आहे. मायबोलीसकट इतरही अनेक पोर्टल्स आणि आता स्वतःचा ब्लॉगही अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो. या गेल्या १० वर्षात माझ्या आयुष्यात शिक्षण, करीअर इत्यादी संदर्भात अनेक उलथापालथी घडल्या.

मनात माझ्या...

लेखक अजिंक्य यांनी सोमवार, 01/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मनात माझ्या विचार आले, अफाट वेगामधे पळाले, कुठून आले, कुठे निघाले, कळे न काही... मनात माझ्या उरे न जागा, लगाम नाही विचारवेगा, हजार घोडे लहान पागा, कळे न काही... मनात माझ्या अनेक वाटा, दिशादिशांना अनेक लाटा, जिथे बघावे नवीन फाटा, कळे न काही... मनात माझ्या विचार आले, सुसाट वेगे नभी उडाले, विहार केला, उडून गेले, कळे न काही...

माझी अगतीकता

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
माझी अगतीकता अगदी सकाळी मी उठलो, उठलो म्हणजे काय, सध्या जागाच असतो. पण आत्ता मी जागेवरून उठलो. तर काय सांगत होतो मी...

`बोध-कथा'

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 25/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी बसमध्ये घडलेल्या मिनिटभराच्या त्या प्रसंगानंतर रोज तिथून वळताना मी सिग्नलच्या खांबाकडे पाहातो. `सबसे प्रेम करो' असा संदेश देणारा फलक हातात ऊंच धरून तो खांबाला टेकून उभा असतो. निर्विकारपणे. बाजूने वाहात असलेल्या गर्दीशी आपल्याला काहीच देणेघेणे नाही, असे भाव चेहेर्‍यावर सांभाळत. ... त्या दिवशी पुन्हा मी सवयीनं तिथे पाहिलं. तो तिथे नव्हता. त्याच्या हातात असणारा तो फलक मात्र, खांबाला टेकून व्यवस्थित ठेवलेला होता. `कंटाळला असणार'... मी मनाशी म्हटले. तरीदेखील, आजूबाजूला कुठे `तो' दिसतो का, हे शोधत माझी नजर भिरभिरत होतीच. तासाभरानंतर त्याच रस्त्यावरून परतताना मी पुन्हा तिथे पाहिले.

मैत्र जिवांचे

लेखक रविंद्र गायकवाड यांनी बुधवार, 13/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मला शिकायला आवडते अभ्यासातही खूप रस आहे, पण आज वर्गात लक्ष लागत नव्हते. मी अस्वस्थही नव्हते. कोणते ही टेंशन नव्हते. कुणी काही मनाला लागेल असे बोलले नव्हते कि एखाद्या अपयशामुळे खचून गेले नव्हते. सगळे जग निर्जिव वाटत होते. चालती बोलती मानसे यंत्रवत भासत होती. ईतक्यात एक खट्याळ वर्गमैत्रिण थट्टेने म्हणाली, "चुपचुप बैठे हो जरुर कोई बात है?? आज लक्ष कुठे आहे तुझे? प्रेमाबिमात पडलीस काये?. थोडावेळ स्वतःवरच शंका आली. असं तर नसेल?... पण कोणताही चेहरा किंवा व्यक्ती डोळ्या समोर येत नव्हती. का्हीतरी झालं होतं पण नक्की काय झालं होतं मला?.