Skip to main content

मुक्तक

२ रुपये? छे हे तर तत्त्वासाठी....

लेखक स्वानन्द यांनी शुक्रवार, 11/12/2009 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, आपण डोंबिवली फास्ट पाहिला आहे का हो? अर्थात, आवर्जून मराठी संकेत्स्थळावर येणा-या, मनसोक्त लेखन करणार्‍या आणि तेवढीच उत्साहाने प्रतिक्रियांचा पाऑस पाडणार्‍या बहुतेक मिपाकरांनी पाहिला असावा असं ग्रुहीत धरतो. तर वरील प्रश्न विचारायचे कारण म्हणजे, त्यात दाखवलेला थंड पेयाच्या किमतीवरून झालेला प्रसंग माझ्या बाबतीत कालच घडला. हपिसात एका कठीण समस्येवर काम करत होतो. बराच वेळ डोकं घुसवून सुद्धा काही उत्तर मिळत नव्हतं. म्हणून मग जरा ताजतवानं व्हावं या विचाराने एकटाच बाहेर पडलो. कंपनीच्या गेट च्या बाहेर पडलो. जवळच दोन तीन टपर्‍या आहेत. एका टपरीतून वडापाव घेतला.

<सवयीने मंद >

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 10/12/2009 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरीत होऊन लढवावे असे सध्या तुरळकच आढळते तरी ही आमची प्रेरणा ही (सवयीने मंद) होळीची याद देऊन जाणारे विविध नावांचे विरविरीत धागे... काही खुळे, आणि दिशाहीन मठ्ठ काही नेहमी व्यस्त काही सुस्त तेच वळण तेथेच नेणारे फक्त कधी रोडावलेले, निष्कारण थंडावलेले अतीसामान्य कवितेचे जंत ... तरीही एकूणएक कवीता वाचणारा रटाळलेला विचारवंत ... पोळीची साद घालून जाणारे विविध आचार्‍यांचे सुनसान धाबे... काही बळेबळे, आणि चववीहीन घट्ट काही स्वस्त काही फस्त काही जेवण तेच ;तेच वाढणारे रीक्त चवीचे तेच मीठ पीठ अन मसाले कधी शिजलेले , अर्धवट भिजलेले ,

मलकापूरचा म्हातारा

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/12/2009 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
बालपण किती रम्य असतं नाही? लहान असताना आमच्यासाठी लांबचा प्रवास म्हणजे रत्नागिरी-मुंबई किंवा रत्नागिरी-पुणे असायचा. दोन्हीकडे आत्या राहायच्या, राहतात. त्यामुळे वर्षातून एकदा, विशेषतः मे महिन्यात किंवा काही सणानिमित्त एक ट्रिप या ठिकाणी असायची. रत्नागिरीत झोपाळ्यावर खेळतानाही आम्ही बसची जमवलेली तिकिटं घेऊन रत्नागिरी-मुंबई एसटी असा खेळ खेळायचो. असो. मुंबईपेक्षाही पुण्याचा प्रवास जास्त वेळा झाला. पुण्याची साधी गाडी रात्री सात वाजता निघायची. नंतर ही वेळ वाढत नऊपर्यंत गेली. तेव्हा सेमीलक्‍झरी गाडीत बसणं म्हणजे चैनच होती. त्यातून वडील एसटीत असल्यानं वर्षातून दोन महिने पास मिळायचा.

निरंजन

लेखक दमनक यांनी सोमवार, 07/12/2009 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी म्हटलं, प्रवासात शिकलेली गाणी चिरंतन प्रवाशांच्या ओठी देऊन जावीत. मग त्यांच्या किलबिलाटातून ती गाणी सगळीकडे पसरतील. सकाळी घरट्याबाहेर पडताना ही गाणी आठवत असतील आणि संध्याकाळी परत येताना अंगभर साठवत असतील... मग एखादे दिवशी याच गाण्यांनी उजवलेल्या एखाद्या स्वरभारल्या कुशीतून मी परत जन्म घेईन आणि ती गाणी परत... नव्याने शिकेन. नाहीतरी, माझं असं काय होतं जे मी घेऊन आलो ? माझं असं काय आहे जे मी घेऊन जाईन ? पण एक मात्र नक्की. जगण्याची गाणी निरंजनपणे गात राहीन.

मी आणि मनू- सॉल्लिड टीम!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/12/2009 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
मनस्वीला सांभाळायची आता पाच वर्षं सवय झालेय. लहानपणी रात्री दीड-दोनला आल्यानंतर ती झोपेपर्यंत पाळणा हलवत बसण्याचं कंटाळवाणं कामही न कंटाळता केलं. त्यामुळं तिच्यासोबत एकटं असण्यात भीती किंवा टेन्शन वाटण्याजोगी परिस्थिती नव्हती. तरीही, एक दिवसापेक्षा जास्त काळासाठी ही वेळ कधी आली नव्हती. ती एक वर्षाची असताना हर्षदा बारामतीला कार्यक्रमाला गेली होती, तेव्हा एक दिवस पूर्णपणे मी तिला सांभाळलं होतं. अन्यथा आमची जबाबदारी काही तासांपुरतीच. या वेळी गोव्याला जायचं होतं आणि हर्षदाला रजा नव्हती. म्हणून मी मनस्वीला घेऊन जायचं ठरवलं. आई-बाबाही रत्नागिरीहून सोबत येणार होते.

एक मुक्तक.

लेखक रामदास यांनी बुधवार, 02/12/2009 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
अहो, पोर किंचाळत उठली राफा --राफा म्हणत, घोर लागला मला मेलीला. (पण ) तुम्ही आपले घोरत होतात. मला मेलीला (पण ) स्वप्न पडतात भलती सलती. पोर किंचाळत उठली आणि तुम्ही आपले तोंड उघडून.. (श्शी बाई!

तो, हा आणि मी

लेखक निखिल देशपांडे यांनी बुधवार, 02/12/2009 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल मला त्याचे दर्शन दुर्मिळच झाले आहे...... गेल्या काही दिवसात तर तो दिसलाच नाही... कुठे गेला असेल तो??? आज काल का मला भेटत नाही??? आधी नेहमी माझ्या बाजूला उभा असायचा.... कधीही साथ न सोडणारा तो असा अचानक कुठे गेलाय???? दंगा घालतानाही त्याची साथ असायची, ऑफिसात काम करताना पण त्याची साथ असायची.... सर्व मित्रांसोबत असतानाही त्याचीच साथ असायची.... तो असताना कधीच कुठले काम करणे जिवावर आले नाही. सुखातही तो माझ्या सोबतीला व दुखा:तही तो माझा साथी!!!! काय झाले असेल त्याची माझी साथ सुटण्यासारखे...???? कदाचित हा दुसरा जो सध्या माझ्या साथीला असतो त्यामुळे असेल का?? कोण 'हा'???

अपॉरच्युनीटी कॉस्ट

लेखक शब्देय यांनी सोमवार, 30/11/2009 04:38 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे तीन-सव्वा तीन वाजलेले. स्टडी ग्रुपचे पार्टनर्स आजची केस स्टडी सोडवून नुकतेच आपापल्या रुमवर परतलेले.याच्या डोक्यात मात्र अजूनही "अपॉरच्युनीटी कॉस्ट", आजच्या केस स्टडीचा विषय, याचेच विचार घोळत होते. एक्सिक्युटीव्ह एम्.बी.ए. च्या पहिल्या सेमिस्टरच्या पुस्तकांच्या मधे कुठेतरी अ‍ॅश ट्रे सापडला.तुडूंब भरलेला.पर्यायच नव्हता.

मी मुंबई बोलतेय...

लेखक मड्डम यांनी बुधवार, 25/11/2009 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
-विकास शिरपूरकर ''मी मुंबई. कधी कुणी मला बॉम्बे म्हणायचं तर कुणी बंबई. त्याही आधी तर कधी मुंबा, कधी मुंबापुरी, कधी Bombaim तर कधी बंबई आणि Bombay. गेल्‍या तीन-चारशे वर्षांत मी अनेक बदल पचवले आणि रूचवले सुध्‍दा. म्हणूनच मला कुणी काय संबोधावं ही तक्रार घेऊन मी आलेलीच नाहीये. ही नावे बदलतानाच मी इतकी बदलून गेले की माझी मीच मला ओळखू येत नाहीये. पण हो मी कितीही बदलले असले तरी माझ्या वृत्ती मात्र तशाच आहेत, माझ्या लेकरांमध्येही त्या वृत्तीच सामावल्या आहेत.

मी कोण?

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 24/11/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांनी जेव्हा मला विचारलं आपण कोण! तेव्हा माझ्या मनी प्रथम उत्तर आलं या अफाट विश्वातला एक छटाक माणुस मी! पण मनातलं उत्तर ओठांवर येण्याआधीच कानी आला ओरडा देशद्रोही, भारत माता की जय, जयहिंद! अन तेव्हा मी म्हणलं मी एक भारतीय हेच बरोबर उत्तर असेल बहुतेक! तेव्हढ्यात कुणीतरी चिरकलं काफीर, दार-उल-हर्ब, गर्व से कहो हम हिंदु है! तेव्हा मी विचार केला मी हिंदु असंच सांगण योग्य! पण तेव्हढ्यात कानी आला गलका घाटी, भांडी घासा आमची, घास रे रामा, जय महाराष्ट्र! मग मनी म्हणलं आहेच मी मराठी तर गरजेन जय महाराष्ट्र! तोवर कुजबुज सुरु झाली सवर्ण, दलीत, बामण, ९६ कुळी! मग मला आठवली जातीकरता खावी माती ही उक्ती!