Skip to main content

मुक्तक

जडण-घडण 20

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 05/03/2015 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
बघण्या-दाखवण्याचे कार्यक्रम उत्साहात सुरू होते. या बाबतीत माझ्या आई-बाबांच्या बरोबरीने इतर नातेवाईकांचा उत्साह बघून मला मौज वाटत होती. मी या बाबतीत तटस्थ राहायचं ठरवलं होतं, त्यामुळे नव्या कामाकडे लक्ष केंद्रित करता येत होतं. नव्या माध्यमात मी रूळू लागले होते. आमच्या संचालक बंगाली बाई, भरपूर उत्साही आणि प्रयोगशील. सतत नाविन्याच्या शोधात. त्यांचं मराठी बोलणं, हा आणखी एक गमतीचा भाग. त्यांच्या बोलण्यात केवळ नपुंसक लिंगाच्या अनुषंगाने उल्लेख यायचे. ते कामत, ते कागद, ते पंखा, ते टिव्ही, ते मधुरा आणि ते स्टोरी. असं बरंच काही.

आमच्या विवाहाची कहाणी

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 04/03/2015 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या विवाहाची कहाणी ता क -- यात कोणतीही अतिशयोक्ती नाही किंवा सनसनाटी घटना, उत्कंठावर्धक असे काव्य असे काहीच नाही. म्हणजे झाले असे कि मी लष्करात( नौदलात) डॉक्टर म्हणून विक्रांत या जहाजावर तैनात होतो. वय वर्षे २५(१९९० ची गोष्ट). मुळात आमच्या आईचे म्हणणे असे होते कि घरापासून लांब राहणार तेंव्हा वेळेत लग्न झालेले बरे. पण मला एक, एक वर्षाने मोठा भाऊ( इंजनेर) आहे. आणी त्याचे नुकतेच लग्न झाले होते म्हणजे पाच वर्षे नोकरी करून झाल्यावर धंदा चालू केलेला होता आणि नोकरी सोडण्या अगोदर लग्न केलेले बरे अशा विचाराने त्याचे २६ व्या वर्षी लग्न केले.

क्लिकक्लिकाट !

लेखक चिनार यांनी सोमवार, 02/03/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
नवरा- बायको रम्य अश्या एखाद्या हिल स्टेशन वर आलेले आहेत. छानशी संध्याकाळ झालेली आहे . गार वारा घोंगावतोय. निसर्ग सौंदर्य अगदी दृष्ट लागण्याइतकं मनमोहक आहे. इतक्या रम्य वातावरणामुळे असेल कदाचित पण नवऱ्याला कधी नव्हे ती बायको सुंदर दिसतेय. अशातच त्याला 'आज मौसम बडा बेईमान हैं' गुणगुणाव वाटतंय. तेवढ्यात ती म्हणते," चल ना फोटो काढू " पुढची पूर्ण संध्याकाळ तो तिचे, स्वत: चे ,त्यांचे फोटो काढतोय. त्या दोघांनी केलेली बेईमानी सहन न होऊन मौसम निसर्गाशी ईमान राखून शांत झालेला आहे ! वरील प्रसंग ओळखीचा वाटतोय का ? या सारखे कितीतरी प्रसंग आजकाल तुम्ही आसपास बघत असाल.

अस्वस्थ!!

लेखक VINOD J. BEDGE यांनी मंगळवार, 24/02/2015 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी असं कुणासाठी का वेडं व्हावं ?? कुणासाठी कुणाचं जगणं अस थोडं व्हावं …. धरणीने पावसाची इतकी वाट पहावी भरभरून कोसळण्याची त्यालासुद्धा इच्छा व्हावी … एकटं आकाश पसरत जातं निळ्याशार पाण्यावर तुझी आठवण वाहत येते कातरवेळी वाऱ्यावर …। तू म्हणतेस कोण आहे असं आयुष्याला पुरणारं आहे कुणीतरी तुझ्यासाठी जळून पुन्हा उरणारं

ऐ....चल न....

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 23/02/2015 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
ऐ चल.... थोडस भटकू... थोड़ी गाणी ऐकू... थोड़े हसू... थोड़े आसू.. हातात हात घालून; एकमेकांचे पुसू! थोड लांब पळु.. एखादा डोंगर चढू.. दमल्यानंतर मात्र; हिरवळीत सोबतिन बसु! मग? गेलेल्या वर्षांच्या.. मनातल्या आठवणी. shear केलेले क्षण; विश्वासाच्या किनारी. ऐ चल... समुद्र किना-यातुन... तळव्याना स्पर्श करणा-या.. नाजुक लाट़ातुन. तारे मोजु.. वाळुच्या कुशीत पडून. ऐ....चल न.... ते सगळ सगळ करू... आणि मग? हातात हात अन् खुप सार हसू!

अंधार

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 20/02/2015 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
एकटाच आहे, असतो आणि राहणार तो त्याला त्याची ना सावली, ना प्रतिबिंब ना कसला डाग, ना कुठला बट्टा सदा एकटाच, पण शाश्वत, निर्मळ . जेव्हा कुठे कोणीही, काहीही नसते, तिथे तो आपले हातपाय पसरतो.. मस्त राहतो.. . तोच त्याला घेरुन राहतो अन् तोच त्याच्यात भरुन राहतो पण शांत शांत, एकटा जरूर आहे पण एकाकी नाही तोच त्याचा सोबती, तोच त्याचा सवंगडी . तिन्ही लोकात स्वैर संचार त्याचा त्याला आमंत्रण नाही लागत आगत स्वागत नाही लागत तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा तोच येतो तुमच्याकडे तुम्हाला कुशीत घेतो त्याच्यातली शांतता जी अमर आहे, निर्व्याज, नि:स्वार्थी आहे ती तुमच्यासोबत वाटून घेतो, नि:संकोचपणे . अंधार एकटाच आहे

ब्रेकिंग न्यूज!!

लेखक चिनार यांनी गुरुवार, 19/02/2015 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
एखादं आवडणारं गाणं जसा त्याच्या संगीतासहित आपल्याला पाठ असतं. तसंच सातच्या बातम्या सुरु होताना ऐकू येणारं संगीत माझ्या आजही लक्षात आहे. त्या आवाजाला संगीत म्हणणं म्हणजे आशिष नेहराला गोलंदाज म्हणण्यासारखंच आहे. नेमके कोणते वाद्य वापरून ते संगीत निर्माण केलं असेल हे एक कोडं आहे.पण सातच्या बातम्या म्हणजे आमच्या दृक्श्राव्य जीवनातला एक महत्वाचा भाग आहे. दिवसभरातल्या घडामोडी फक्त पंधरा मिनिटात सांगून होऊ शकतात यावर आजकालच्या पत्रकारांचा कदाचित विश्वास बसणार नाही. त्यांना तर आजकाल एक बातमी सांगायला अख्खा दिवसही पुरत नाही. एखादी गोष्ट सांगावी तशी बातमी रंगवून रंगवून सांगतात.

भूत... वर्त्तमान.... भवीष्य

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 18/02/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
गेला होउन जो.... भूत; होऊ घातला तो... भविष्य हातात काही न ज्यांच्या तेच भुत अन भविष्य.... वर्तमानाचा तो सागर उचंबळुन येई ग किनारी करंटया मनुष्याला परी नाही किम्मत तयाची नाही हातात जे जे ते ते हवे म्हणे माणूस म्हणुनच का ग त्याला वर्तमान आणि रंजिस?! --------

आनंदाचे डोही

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 18/02/2015 03:09 या दिवशी प्रकाशित केले.
बाबु मोशाय सांगून गेलायं आनंद मरा नही.... आनंद मरते नही.... आनंद जिवंत असेल, अगदी भले आपल्या आसपासही असेल, पण आपल्याशी सतत लपाछपीचा खेळ कां खेळत असतो? आत्ता आपण त्याच्याबरोबर हसत खेळत होतो, आणि क्षणातच कुठे नाहीसा झाला? खरचं बरोबर असलेला तो आनंदच होता, की कोणी तोतया? आनंद कसा दिसतो, कुठे रहातो, काय खातो, आपण वेगळेवेगळे तर्क करीत असतो. तो ना समोरच्या आलिशान बंगल्यात रहातो... छे! त्या आलिशान बंगल्यात फ़क्त त्याची सावत्र भावंडे रहातात. ईर्षा आणि घमेंड.

मिसळपाव कशेळे कट्टा

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 17/02/2015 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ रोजी मिपा चा कट्टा कर्जत कशेळे जवळ आंबिवली येथील वन विहार या रिसोर्ट मध्ये झाला त्याची प्रकाशचित्रे मी टाकत आहे त्याचा वृत्तांत श्री चौकट राजा साहेब टाकणार आहेत. . .