Skip to main content

मौजमजा

माझे आजोळ

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 14/03/2016 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहानपणी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जात असे. मामाचे गाव आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथे आहे. मी, आई, ताई व लहान बहिण असे चाैघेजण प्रथम परभणीला मावशीकडे जात असू. तेथून मावशी व मावशीच्या ३ मुली, १ मुलगा असे ९ जण पुर्णा जंक्शनला रात्री मुक्कामाला जात. रात्री भुरटे चोर असल्यामुळे पाळीपाळीने एकेक जण जागत असू. पुर्णा येथून सकाळी ४ वाजता आदिलाबादला रेल्वे असे. रेल्वे कोळशावर चालणारी होती. रेल्वे नांदेड, मुखेड, किनवट मार्गे दुपारी २ वाजता आदिलाबादला पोहचे.

आर्ट ऑफ लिव्हिंग

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 14/03/2016 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : आणीबाणीची काळ : प्यायला उठलेला स्थळ : जागतिक खंड्या पक्षी पालक श्री श्री विजु भौ आपल्या भव्य राज प्रासादात चकरा मारताना विजु भौ : ए कोण आहे का रे तिकडे ???? इकडे आमचा ग्लास रिकामा झाला तरी कोणाच लक्ष नाही. खंड्या ग्लास भर माझा जरा, श्या आजकाल बियर पण गोड लागत नाहिये.... खंड्या : ओ बाबा ते नाही जमणार आता!!!! विजु भौ : (बुचकळ्यात पडून) का म्हणून ??? का म्हणून नाही जमणार, हाय रे दैवा काय आमच नशीब ज्यांना आम्ही मोठ करण्यासाठी दिवसाची रात्र करू खस्ता खाल्ल्या. जिथे पाण्याची बियर करून समस्त तहानलेल्या जनतेची तृष्णा भागवली ते हे दिवस पाहण्यासाठी. अरे हेच का ते अच्छे दिन.

< अश्शी सासू असती तर >

लेखक अन्नू यांनी बुधवार, 09/03/2016 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
अश्शी सासू असती तर, आंम्ही असे झालो नसतो भर तारुण्यात बायकोला, असं उठसूट सासुरवाडीला घेऊन गेलो नसतो तिची नसती आली कुणालाच सर अश्शी सासू असती तर आळी सगळी गाजवली असती, मिजास मोठी केली असती, राजा बनून हिंडलो असतो मेव्हणीही म्हणली नसती मेल्या बाजु सर अश्शी सासू असती तर घरातल्या कार्ट्यांजवळ तिला सोडून गेलो असतो आंम्हीसुद्धा नवरा-बायको मग सतत जवळ दिसलो असतो मळ्यातल्या शिदुबाने दिले असते अनेक वर अश्शी सासू असती तर सासुरवाडीतल्या मेव्हण्यांनी ठोकला असता सलाम दहा ते दहा रोज मस्त केला असता आराम सासर्‍यांनी माझं ऐकून वेळेअगोदर भरले असते लार्ज पेग अश्शी सासू असती तर मिपाबंधुंनी रम डिलेवरी केली असती म

गाव तस न्यार

लेखक शाहिर यांनी सोमवार, 07/03/2016 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावामंदी बगा, समदं कसा निवांत हुतं ! समदे पब्लिक गुन्या गोविंदाने नांदायचा आणि भांडायचा . त्याच असा हाये , आमच्या गावात हये एक पार, चार गल्ल्यातले चार रस्त्ये हितेच येउन टेकत्यात. दिवसभर कुठ कुठ काम करून माणस , बाया बापड्या यायच्या. चार घटका पारावर टेकायच्या, काय सुख दुख असेल तर सांगनार, कुनाला काय दवा पानी विचारणार , कुणाच्या घरी काय कालवणं याची बातमी काढणार आणि कुनी नवीन पाव्हना घावला तर येड्यात काडून रिकामा व्हनार ! सगळी टाळकी एकदम १२ **ची ! पण टाईम कसा जायचा कळ्ळाचा नाही आणी थोरामोठ्याकंन कायबाय कानावर पडायचा त्यात ज्ञानाचा मार्जिन पन निघायचा.. पन गेल्या साली घोळ झाला..

स्वानंदचा बावरा आणि कबीराचा निरंजन

लेखक Anand More यांनी सोमवार, 07/03/2016 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक एक सकाळ एक एक नवीन गाणं घेऊन येते. आणि मग तेच गाणं दिवसभर माझा ताबा घेऊन बसतं. दोन दिवसापूर्वी असंच झालं. "हजारो ख्वाहिशे ऐसी" या चित्रपटातलं, "बावरा मन देखने चला एक सपना" हे गाणं आठवलं. स्वानंद किरकिरे साहेबांनी एकंच शब्द वापरला आहे "बावरा" पण काय मौज केली आहे ! या "बावराला" समर्पक शब्द मला मराठीत सापडला नाही. पण त्याला जवळ जाणारा एक शब्द आहे बेभान. तुम्हाला अजून चांगला शब्द सापडला तर कमेंट मध्ये सुचवा. गाण्याचे बोल खाली देतोय.

सावध

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 06/03/2016 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री वडाच्या बुंध्याशी मी सुक्षात निजतो. खोल काळोखात घुबडांचे चित्कार मला घाबरवुन सोडतात. सुकलेली पाने टपाटप खाली ओघळत राहतात. मधुनच पक्ष्याचा एक भलामोठा थवा झाडावर येऊन विसावतो. माझी झोप चाळवली जाते. कान टवकारुन मी ईकडे तिकडे बघतो.भयाण काळोखात चमकणारे दोन डोळे दिसतात. डोळे विस्फारुन मी त्यांच्याकडे पाहतो. तो पक्या, गब्र्या कि सुशी याचा अंदाज लागत नाहीये. कि अजुन काही निराळचं प्रकरण. ओळख पटवण्यासाठी मी बसुनच तालासुरात लांबलचक साद घालतो. प्रत्युतरादाखल सतराशेसाठ केविलवाण्या किंकाळ्या माझ्यावर येऊन आदळतात.

::: मिपा विडंबन स्पर्धा :::

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 02/03/2016 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
अरे होली के दिन, दिल खिल जाते है रंगो मे रंग मिल जाते है... अरे होली खेले रघुवीरा अवध में होली खेले रघुवीरा... आज ना छोडेंगे बस हमजोली; खेलेंगे हम होली...
काही नाही; होळी, रंगपंचमीचे वेध लागलेत. होळी जवळ आली की असंच होतं; हो की नाही? कुणाच्या नावाने बोंबा मारायच्या; कुणाला रंगवायचं, असे बेत मनात शिजायला लागतात. तसं, आपलं मिपा सदोदित रंगलेलंच असतं वेगवेगळ्या रंगांत; पण होळी, रंगपंचमी म्हणजे स्पेशलच. याच स्पेशल रंगपंचमीच्या निमित्ताने एक स्पेशल स्पर्धा घ्यायची ठरलेली आहे. रंगपंचमीत जशी रंगांची उधळण असते तसेच रंग कवितांच्या विश्वातही असतात.

अखेर ऑस्करला लिओ भेटलाच

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 01/03/2016 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा दिवस संपतांना एक समाधानाची भावना आहे … कारण आहे लिओनार्डो दि काप्रिओ ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे जे ऑस्कर मिळाले तो क्षण …. अनेक महान अभिनेत्यांना कधीच ऑस्कर मिळाला नाही आहे त्यात लिओ पण येतो कि काय अशी धाकधुक मनाला होती, तसे ऑस्कर काही अभिनयाचे सर्वस्व नाही हे पण वास्तव आहेच पण तरीही अखेर लिओला ती बाहुली मिळालीच !!

पुण्यात...

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 28/02/2016 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात शनिवारवाड्यासमोर जो पुल आहे ना तिथे खुप गर्दी असते, गोंगाट असतो डुप्लिकेट पीनांचे चार्जर तिथे मिळतात ते अगदीच टाकाऊ असतात मला तो भाग आवडत नाही स्वारगेटला तुडुंब भरलेल्या पीएमटी बघितल्यावर मला भोवळ येते चिंचवडला प्रशस्त महामार्गावरील हॉटेलात पावाबरोबर फरसाण्याची भाजी खाल्ल्यावर मला अशीच भोवळ आली होती तेव्हापासून मिसळपाव हा पदार्थ मी व्यर्ज केलाय बाकरवड्या खाल्ल्यावर नेहमी पोट दुखते मग तीही मी कधी खात नाही दगडूशेटला जाता जाता जोशी वडेवाल्याकडे मी ढुंकुनही कधी पाहत नाही येरवड्याला एकदा बाईक पलटी झाली होती मग तिकडे मी कधी गेलोच नाही कोथरुडला जायचा मात्र प्रसंगच कधी आलाच नाही रॅडीसनमध्य