Skip to main content

कविता

असाही ऊपदेश

लेखक शाली यांनी बुधवार, 02/05/2018 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
फार पुर्वी माबो वर टाकली होती ही कविता. आता हे परत वेगवेगळे विषय घेऊन पुढे वाढवावे असे वाटतेय. ही कविता मित्राचे लग्न ठरले होते तेंव्हा त्याला सल्ला देण्यासाठी लिहिली होती. नंतर सासरे मंडळींची बाजू घेऊनही याच कवितेचा दुसरा भागही लिहिला होता. हळू हळू पुढेही लिहिलच.

माझ्या महाराष्ट्राचं गाणं

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 30/04/2018 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राच्या अभिमानास्पद वैशिष्ट्यांना एकत्र गुंफण्याचा माझा प्रयत्न : =================== बेलाग कातळ कड्याची कपार त्यातून खुणवी गरुडाचे घर घाटाचे वेटोळे माळती डोंगर माडा पोफळीशी खेळतो सागर पाटाच्या पाण्याची खळाळ लकेर घामाच्या खताने फुलते शिवार शेताच्या बांधाशी चटणी भाकर कष्टाच्या घासाला तृप्तीचा ढेकर खिलारी जोडीला पोळ्याचा शृंगार भारूडा भुलवी लावणी शृंगार ओवीच्या अंतरी शांतीचा सागर अभंग झंकारे झेलून प्रहार भक्तीने भिजतो चंद्रभागातीर दिंडीच्या रिंगणी विठूचा गजर पडघम ढोलाचा,लेझीम लयदार तडतड ताशाची, वाजंत्री सुस्वर मंजुळ सनई, चौघडा गंभीर कीर्तनाचे रंगी टाळांचा झंकार
काव्यरस

कविची गाडी

लेखक प्रदीप यांनी शनिवार, 28/04/2018 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
कवि गाडीत बसून आहे गाडी सुसाट धावते आहे गाडी माणसांना तुडवते आहे हाडांच्या चिंध्या करते आहे शब्द हवेत फेकते आहे कल्पनांचे भुंगे सोडते आहे कवि गाडीत बसून आहे गाडी सुसाट धावते आहे 'शब्द बापुडे केवळ वारा' म्हणून गेला एक येडा त्या येड्याला काय ठावी जालाची किमया नाही गावी आता वाराही न दवडावी फुकटात 'काव्ये' प्रसिद्ध व्हावी कवि गाडीत बसून आहे गाडी सुसाट धावते आहे
काव्यरस

हा असा राम की ज्याच्या हजार सीता

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 28/04/2018 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुखवटे त्याचे दिखाऊ, प्रिय तुला प्राणाहुनी मात्र तो अपुलाच चेहेरा बघू न धजतो दर्पणी !   मृगजळाचे भरुनी  पेले पाजले त्याने तुला स्वार्थ अन भोगात त्याचा जीव पुरता गुंतला  प्रेषिताचे पाय कसले? मातीची ती ढेकळे ! पूज्य तो बनतोय केवळ आंधळ्या भक्ती मुळे अजुनी नाही वेळ गेली, सोड त्याची संगत सोड ते हतवीर्य जगणे,  सोड उष्टी पंगत  आतला आवाज सांगे, ऐक मग ते सांगणे "कवडीमोले विकू नको तू लाखमोलाचे जिणे"   ........(स्वयंघोषित बाबा, बापू, महाराज, माताजी यांच्या अंधभक्तांस समर्पित)

असं वाटतं !

लेखक श्वेता२४ यांनी बुधवार, 25/04/2018 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
असं वाटतं सारं काही मनासारखं व्हावं............... निळंभोर आभाळ सगळं कवेमध्ये घ्यावं......................
काव्यरस

हो मी अर्जुन आहे..

लेखक निओ यांनी मंगळवार, 24/04/2018 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
हो मी अर्जुन आहे.. तोच तो अचूक लक्ष्यवेध करणारा गुणवत्तेने भरलेला नव्या चक्रव्यूहात अडकलेला न लढताच पराभूत झालेला हो मी अर्जुन आहे.. या महाभारतात कृष्ण शोधतो आहे जगण्याचे सर्व संदर्भ बदललेल्या या महाभारतात कृष्ण कोठे शोधायचा जरी सापडला तरी माझ्या वाटणीला किती यायचा ईथे अवती भवती सारेच अर्जुन दिशा हरवलेले... तो कृष्ण.. सखा गुरू ज्ञाता परिस्थितीची जाणीव करून देणारा ध्येयाची जाणीव करून देणारा मला कृष्ण हवाय मार्ग दाखवणारा माझ्या रथाचं सारथ्य करणारा माझं मनोधैर्य ऊंचावणारा नारायणा....

दिवसातून छप्पन वेळा

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 22/04/2018 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसातून छप्पन वेळा माझा चेहेरा बदलत असतो अस्थिर अचपळ पारा माझ्या नसानसात दौडत असतो दोन देतो दोन घेतो चेहेरा तेव्हा निब्बर होतो अचाट ऐकतो अफाट बघतो तेव्हा चेहेरा कोकरू होतो कोsहं प्रश्न छळतो तेव्हा मुमुक्षूचा होतो भास टपरी चहा भुरकताना मीच टपोरी टाईमपास जुनी गाणी, जुने छंद, वार्‍यासंगे विस्मृत गंध, दर्वळतात भोवती जेव्हा चेहेरा कवळा होतो तेव्हा तोच लोलक, तिरीप नवी जुना पडदा, हुरहूर नवी अनंतरंगी अद्भुत खेळ बघायचा तर हीच वेळ
काव्यरस

शीर्षक नाही

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 21/04/2018 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णा करु आता काय लागे अबलांची हाय शील प्राण आता जाय नका करु आता गय दुर्जनांचे पुन्हा कौरव मातले कृष्णे करीतसे धावा देवा आता तरी पावा ज्योतिलाही तेल आता आसवांचे पुन्हा देवा घे अवतार कर पुन्हा चमत्कार तूच देशी न्याय भार आण तुला आता आहे रगताचे

आत्मताडनाची कविता.....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/04/2018 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मताडनाची कविता लिहू नये... यात होते असे, कि आत्मा सोडून बाकी सगळे दुखावतात यात काय हशील आहे, सांग! काय कामाची असली कविता? माणूस जोडत नाही, ती कविता नाही ही घे चिकन बिर्याणी, तुला सांगतो, कविता म्हणजे बिर्याणी मसालेदार, स्वादिष्ट! बोन प्लेट तयार ठेवायची होय, होय... तसेच होते.. आत्मताडनाच्या कविता शेवटी बोनप्लेट मध्येच पडतात... मी म्हणतो, मुळात कशाला करून घ्यायचे आत्मताडन? कशाला? तुझे आज काय, तर स्वतःच स्वतःचे अपहरण उद्या काय तर स्वतः च स्वतः चा तुरुंग बांधायचा... कशासाठी म्हणतो मी?

सगळीकडे सारखेच

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 17/04/2018 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी क्रिकेट खेळायला मैदानावर जमल्यावरच्या गप्पा ते यूपी बिहारवाले लै भुरटे विश्वास न ठेवण्याच्या लायकीचे दिल्ली हरयाणावाले तर आगाव एकजात सगळे माजोरडे साले गुजराती मारवाडी तर काय लुटायलाच बसलेत सारे चांगले वाटतात बाहेरून पण हे मल्लू मद्राशी पक्के आतल्या गाठीचे आसामी बंगाली पण त्यातलेच गोड बोलून गंडा बांधणारे दुपारी जेवल्यानंतर टपरीवर जमलो चहा बिडीकाडी करत बोलू लागलो धुळे जळगाव खानदेशवाले अमुक हे नागपूर विदर्भवाले तमुक सांगली सोलापूरवाले साले दुष्काळी आडमुठे अर्धवट नाशिक नगरी सातारा कोल्हापूरवाले पण त्यातलेच आणि कोकणी एक नंबर चिक्कू बीड उस्मानाबादी तर मजाच गड