Skip to main content

कविता

ओढ

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी सोमवार, 07/09/2009 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
जगणार्‍याला मरणाची ओढ अन मरणार्‍याला जगण्याची ओढ नास्तिक म्हणुन जगलो आयुष्यभर म्हातारपणी आता मला देवघराची ओढ नाही साधले काहीच फिकट जगुन कापसाला आता मात्र वातीची ओढ आयुष्य गेलो मुडद्यासारखे जगत अन माझ्या मुडद्यालाही आता जिवणाची ओढ दु:खेच आली सदैव नशिबी माझ्या सुखांना सुद्धा दु:खाची ओढ सहन नाही होत हे जगणे असले माझ्या मढ्याला मात्र आता सरणाची ओढ आठवणींचा किती हा पसारा, का माझ्या वर्तमानाला भुतकाळाची ओढ भुतकाळातच रुतुन पडलोय वर्तमानाला मात्र भविष्याची ओढ गेल्यावर जगातुन काय उरेल मागे माझ्या मरणाला आता मागे उरण्याची ओढ

मी बदलणार नाही

लेखक अमृतांजन यांनी रविवार, 06/09/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
कॉंन्क्रिटच्या भल्यामोठ्या इमारती बांधीन त्यावर काचेचे आवरण बसवेन आत भट्टी झाल्यावर येसी बसविन भरमसाठ वीज वापराने लोडशेडींग झाले तरी पण मी बदलणार नाही मोठ्या शहरात राहून प्रगती करेन स्टायलिश सोसायट्यांमधे राहीन ब्रॅडेड वस्तू वापरुन नद्या-नाले घाण करेन तरी पण मी बदलणार नाही सहापदरी रस्ते बांधेन ते लहान गावात आणून सोडेन गावाच्या मागे ५-स्टार औद्योगिक वसाहत बांधेन ट्रॅफिक जाम होऊन लोकांचा वेळ पैसा आणि पेट्रोल वाया गेले तरी पण मी बदलणार नाही माझे विचार तेच इतरांचे असे गृहीत धरेन कशाला खुलासा करायचा प्रश्न विचारुन माझेच विचार पुढे रेटून काहीच साध्य झाले नाही तरी पण मी बदलणार नाही मला घाई आहे

बाबासाहेब ते भैय्यालाल...

लेखक हृषीकेश पतकी यांनी शुक्रवार, 04/09/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
खालील कविता दि. ४-१२-२००६ रोजी केली आहे... या कवितेतील काही जातीवाचक शब्द कुणाच्याही भावना दु़खावण्याच्या हेतूने वापरले नाहीयेत... महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात नैतिक मूल्यांची होळी होत असताना... मीही तुमच्यासारखाच निद्रिस्त... तेव्हा तुमच्या आमच्यातल्याच चार जीवांना समाज दूर सारत होता | आणि रिकामं डोकं नसलेला प्राणी म्हणून आपली ओळख जपणारा...
काव्यरस

पोवाडा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा - राज ठाकरेंचा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 03/09/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
पोवाडा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा - राज ठाकरेंचा सदर पोवाडा हा चालीत म्हणण्यासाठी काही ठिकाणी काही शब्दांची द्विरुक्ती होवू शकते. (पोवाडा वाचतांना मागे डफ वाजतो आहे अशी कल्पना करा.) स्टाँग डिस्क्लेमर: माननिय बाळासाहेबांचा व राज ठाकरेंचा मी आदर करतो व यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. तत्राप कोणाला कोणतेही आक्षेप असतील तर हा पोवाडा माझा वैयक्तिक समजावा.
काव्यरस

मन इंद्रधनू

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 01/09/2009 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधी दंवात भिजावे, कधी चांदणे वेचावे येता आभाळ भरून मन इंद्रधनू व्हावे ऊन-पावसाचा लपंडाव, श्रावणाची गाणी मेघांतून झरणारी वेड्या यक्षाची कहाणी निळ्यासावळ्या दूताने माझ्या दारी बरसावे तहानेली काळी धरा जसा यशोदेचा कान्हा धारा पावसाच्या जसा झरे देवकीचा पान्हा प्राशून त्या अमृताला तनमन तृप्त व्हावे दूर मंदिरात घुमे टाळ-मृदुंगाची वाणी सुरावटी त्या वाहते गावयमुनेचे पाणी सूर गुंफून शब्दांत हरीरूप रंगवावे
काव्यरस

.. जगण्यात काय आहे?

लेखक राघव यांनी सोमवार, 31/08/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळ, कर्ज यात बुडालेले शेतकरी असोत का नर्मदातीरी भंगलेली घरटी असोत.. दु:ख शेवटी काळीज पिळवटणारेच असते.. नाहीच आस जेथे जगण्यात काय आहे? आयुष्य ठेवलेल्या सरणात काय आहे? दिसतात येथ सारे मिठ्ठास बोलणारे.. स्वार्थात रंगलेल्या शब्दांत काय आहे? आता नको पुन्हा ती आश्वासने, दिलासे.. बोलावयास सारे.. पोटात काय आहे? तू सांग देवराया आता कसा जगू मी.. काळीज फाटलेले.. ठिगळात काय आहे? देऊ कसा भरवसा कोमेजल्या मनाला.. तुटतात जेथ नाती मैत्रात काय आहे? असतो असाच थोडा पाऊस सांडलेला.. भेगाळल्या धरेला पुरणार काय आहे? पडत्या घरास माझ्या सोडून मीच जातो.. अवशेष दावणार्‍या दगडांत काय आहे? (विषण्ण) राघव
काव्यरस

धा धिन धिन धा

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 31/08/2009 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मेघांचा डफ, तडीतेची थाप गगनाच्या अधरी, मल्हारराग लय.. जलतरंग, भुई छेडीता तालास येई, लयबद्ध जाग पवनाने धरिला सुर अन नाचे गणेश धा धिन धिन धा .... धा धिन धिन धा शुभसुंदर .. अरूपाचे रूप गौरीतनय .. तो गण नृप लोभस मुर्त .. मुखगजस्वरूप आल्हादघन, सांबनंदन नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा पदी पैंजणे .. झंकारती रसभाव मुखी .. साकारती तुंदील तन .. मोही मती अंगांग मीन, मुद्रेत लीन नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा आकाशगंगा .. तेजाळली नक्षत्रे नभी .. उल्हासली चैतन्यगंधी .. हर्षावली विश्वाचा मंच, अपुरे अनंत नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा
काव्यरस

कावीळलेल्या भींती

लेखक ॐकार यांनी शनिवार, 29/08/2009 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
भिजलेली रास खडीची, गंजत पडलेले पत्रे निसरड्या पायरीवरती हुंगत बसलेले कुत्रे कचरापेट्यांना आली बुरशीची दमट नव्हाळी कावीळलेल्या भींती आता झाल्या शेवाळी बिथरला डांबरी रस्ता, बिचकली मातकट धरती विटकरी गांडुळे आली माना वेडावत वरती पागोळ्यांच्या गोळ्या टपर्‍यांवर तडतड करती चहाळ वाफा आल्या की मेणकापडे चळती दरवाज्यावरती आली वाळवी तरणीताठी कुरबुर करण्यात उलटली बिजागरींची साठी वैचित्र्यातील सौंदर्ये पाऊस घेऊनी आला मनातल्या चिखलाचा शिंतोडा एक उडाला
काव्यरस

मन

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शनिवार, 29/08/2009 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
मन गवताचे पाते ,मन मेघ पावसाचे मन पहाटवार्‍याचे , दव होउन बोलते.. मन नाजूक सतार ,मन अबोल गंधार मन सांजावल्या रानी, कृष्ण बासरीचा स्वर... मन रात्र शांततेची ,मन नक्षी चांदण्यांची मन लाट सागराची, वाट आडवळणाची मन तेज भास्कराचे,मन वार्‍याच्या वेगाचे मन अलवार सूर नभी एकटे गुंजते मन श्वास या देहात, मन पाखरु रानात मन ज्योत राउळात कधी वीज आकाशात मन पावसाचे थेंब ,मन जणु प्रतिबिंब मन सुकल्या रानात, एक नाजुकसा कोंब..
काव्यरस