Skip to main content

कविता

उत्सव ...!

शुक्रवार, 08/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
*********************************************** मेघांचे उत्सव रिमझिमणारे जलदांचे अन गूढ चिंतन समीर बावरा निरंतर गातो आषाढातील जलदाच्या वेणा... निळे सावळे घन थरथरणारे दव-बिंदूचे अन हळवे स्पंदन विहग स्वरांचे सुखे मिरवती शुभ्र क्षणांचा सुरेल मेणा... गीत अधरीचे ते हुळहुळणारे थिजलेल्या अन मौनाचे मंथन मेघही वळले होवून आतूर अन जलधारांची अक्षयवीणा... ते मुग्ध इशारे प्रतिबिंबांचे रुजलो अन होवून हिरवे पाते लंघून सार्‍या सीमा शब्दांच्या एकटा कोरतो मौनाच्या लेण्या... *****************************************************
काव्यरस

ओझी

शुक्रवार, 08/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आहे तीच जड झाली, नका लादू रे आणखी खुळ्या अपेक्षांची ओझी किती पेलावी सारखी? रोज अंतहीन चालणारी जीवघेणी स्पर्धा उरी फुटेतो धावून इवलासा जीव अर्धा तोही राही कुठे आता?
काव्यरस

आठवण

लेखक प्रभो
बुधवार, 06/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कवितेचा विषय आमची 'ती'.......दुसर्‍या विषयावर कविता जमत नाहीत :) जाता दुरदेशी वाटलं होतं विसरेन तूला पण नुसत्या विचारानेच त्रासले मला नाही विसरू शकलो मी येते का कधी आठवण गं माझी? शेवटचे पाहिले तुला त्या दिवशी सोडवायला ही आली नाहीस तू वाट बघून वाट धरली मी प्रवासाची अशी का पाठवण केलीस गं माझी? पहिल्याच दिवशी पावसाने स्वागत केलं आठवली आपली पहिल्या पावसातली एकाच छत्रीतली सफर बसस्टॉपवरची पावसाने का पाठ सोडली नाही गं माझी? मनाची समजूत घालत फोन केला तूला आवाज ऐकताच मनातलं एक वादळ शांत झालं आणी दुसर्‍या शिडाला वारा भेटला या वेगालाही का कीव नाही आली गं माझी? आता थोडेच दिवस उरलेत इथे परत य
काव्यरस

(ती)

लेखक चतुरंग
मंगळवार, 05/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची सुरेख कविता 'ती' वाचली आणि ही लगेच डोळ्यांसमोर तरळलीच! ;) ती समीप माझ्या येते, खेटुन जाते मी स्तब्ध, बावरा लगेच निसटुन जाते ती लेउन जाते 'अर्थपूर्ण' कपड्यांना जागवते हृदयी भलभलत्या स्वप्नांना ती तिच्या बॉससह गर्दित मिसळुन जाते ती ओष्ठशलाका रेखुन अलगद रेषा मस्कारा लावुन नेत्रपल्लवी भाषा ती टाटा म्हणुनी बोटे हलवुन जाते मी तिच्याचसाठी शब्द जुळवतो काही ती समोर येता मुळी बोलवत नाही ती सहजच राखी हाती बांधुन जाते ती रसिक, साजिरी सखी कल्पना त्यांची, ती कविता, आराधना, साधना त्यांची, 'रंग्यास' विडंबन लगेच सुचवुन जाते चतुरंग
काव्यरस

ती

मंगळवार, 05/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ती समीप माझ्या येते, निसटुन जाते मी स्तब्ध, बावरी मलाच विसरुन जाते ती देउन जाते अर्थ नवे शब्दांना जोजवते हृदयी सृजनाच्या स्वप्नांना संध्यारंगांसह नभात मिसळुन जाते तळहाती रेखुन अलगद हलकी रेषा तनमनी जागवुन नवी अनामिक भाषा ती मोहरलेल्या क्षणांत हरवुन जाते मी त्या रेषेवर लिहिते काहीबाही ते मनासारखे कधीच उमटत नाही ती सहजच त्या ओळींना सजवुन जाते ती रसिक, साजिरी सखी कल्पना माझी, ती कविता, आराधना, साधना माझी निर्भेळ सुखाच्या राशी उधळुन जाते
काव्यरस

अंत:स्थ

मंगळवार, 05/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एकविसावे शतक शेती आणि शेतक-यांसाठी, अनेक संकटे घेऊन आले. दुष्काळ, वीज, महागाई, व्यवस्थेतील धर्म, जात, भाषा, उद्योग, लोकशाही, माणूसपण, हे आणि असे कितीतरी प्रश्न आणि त्याची संदिग्ध उत्तरे याची आकडेमोड करत बसलो तर केवळ निराशा वाट्याला येते. माणूस हताश होतो. वर्तमानातील या सर्व वास्तवाला सामोरे जात संवेदनशील माणूस कुठेतरी व्यक्त होत असतो. अशाच एका व्यक्त होणा-या कवीची ओळख करुन द्यावीशी वाटते आणि हा कवीमाणूस आहे, डॉ.सर्जेराव जिगे.

प्रेम काव्य संग्रह

मंगळवार, 05/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या दोन आयुष्यांचे क्षण एकमेकांत मिसळून जाती झालो मी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा सोबती ------------------ एका क्षणी तुला पाहिले क्षण तो खास अगदी त्या क्षणी मिळाला क्षणाला क्षणाचा सोबती ------------------ तुझ्या प्रेमातला "मी" ------------------ प्रेमात तुझ्या गुंतलो मी माझाच नाही उरलो मी प्रेमाच्या खेळात जिंकलो मी हृदयात तुझ्या व्यापून उरलो मी..... भेटलीस तेव्हा हरखलो मी हसलीस तेव्हा हर्षलो मी रुसलीस तेव्हा हुरहुरलो मी निघालीस तेव्हा हिरमुसलो मी..... तू दूर होतीस तेव्हा तुझ्या हृदयात दिसलो मी परत कधी आलीच नाहीस तेव्हा माझ्याच अश्रूंमध्ये
काव्यरस

रान वाट

सोमवार, 04/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पाठीवर घेउन उगवती, रान वाट ही पळते सरते, सुवर्णकण कवडशांमधुनी, देवाचे ऐश्वर्य उसळते.. काठावरच्या झाडावरुनी, पक्षी मंजुळ स्वरास गाती.. गवताच्या पात्यावर हलके, सोन्याचे हे थेम्ब चमकती.. मंद मंद वा-याचे गुंजन, ऐकून सारे चित्र डोलते ... सुवर्ण कण कवडशा मधुनी, देवाचे ऐश्वर्य उसळते.. बैसुनी थोड़े निवांत व्हावे, मनातले झाकोळ पुसावे वाटेला या गुज सांगावे, वाटे फिरुनी इथेच यावे विश्व हे सारे आनंदाचे, जगण्या पुन्हा उमेद देते पाठीवर घेउन उगवती, रान वाट ही पळते सरते, सुवर्ण कण कवडशा, मधुनी देवाचे ऐश्वर्य उसळते.. -- सागर लहरी १४-८-२००९ ,

करतो अजून आशा....

सोमवार, 04/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दी अशी दरिद्री, जगते ही रोज मरुनी, निर्लज्ज लांडग्यांचे, असहाय्य भक्ष्य बनुनी, पिचली उरेही फूटती, खळगीत अन्न भरुनी करतो अजून आशा, शिवभूप येई म्हणुनी, बघतो नवीन चाळे, गीधाड कावळ्यान्चे... घेतो मिटून डोळे, बघताच थेर त्यांचे .. जगतो कसे म्हणावे, मरतोच रोज आम्ही .. करतो अजून आशा, शिवभूप येई म्हणुनी, घेउन अमर पट्टा, नव्हता कुणीच आला, झुन्जात सांडला तो , नव्हता कधीच मेला, तानाजी बाजी सारे, होऊ सवेच आम्ही, करतो अजून आशा, शिवभूप येई म्हणुनी, - सागर लहरी ८-१०-२००९

परी

सोमवार, 04/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
परीच्या गावची अबोल राणी शांत असे जस नितळ पाणी नितळ पाण्याच्या गाभ्यात काय? उजाड़ रानात मन झोके खाय .. राणीचे गाणे अबोलीचे लेणे.. कुण्या राव्याचे अंतरीचे देणे.. अंतरीचे देणे असे फिटेल काय ? उजाड़ रानात मन झोके खाय .. सूर्य सांजावला अन धुके दाटले मळभ उरी , मनी आर्त साठले , राव्याला हे आर्त असे कळेल काय? उजाड़ रानात मन झोके खाय .. -- सागर लहरी ०४-०१-२०१०