Skip to main content

कविता

एकविसाव्या शतकातली कहाणी

लेखक कोमल यांनी बुधवार, 02/03/2011 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
एक आहे ही गोष्ट, आटपाट नगरीची यामद्धे आहेत अर्थातच, एक राजा- एक राणी ! पूर्वी सारखं नव्हे बरं,एकच राजा आणि एकच राणी, एकविसाव्या शतकांत असते, प्रत्येकाची स्वतंत्र नगरी,स्वतंत्र कहाणी! आपल्या गोष्टितल्या राजाला,राणी आवडली अगदी सहजच आणि राणीनेही संमती दिली,थोड्या हित्गुजांताच ! दोघांची मग सुरु झाली स्वतंत्र कहाणी, दोघांची नगरी, हिच्या मनाचा "तो" राजा, त्याच्या मनाची "ही" राणी, उघड्या डोळ्यानी दोघांनी,संसाराची स्वप्नं रचली, आई-बाबा वगैरे ठीक,पण बाळाची सुद्धा नावे ठरली ! प्रत्येक गोष्ट दोघांच्या मताप्रमाने,मनासारखी घडत होती, राजा-राणी आणि त्यांची दुनिया एकमेकाताच गुरफतात होती ! राजाच्या घरी द
काव्यरस

त्रिवेणी - पहीला प्रयत्न

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 02/03/2011 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणी या गुलजारजीनी निर्माण केलेल्या नविन काव्यप्रकाराबद्दल (आता तसा जुना झाला आहे!) खुप वाचले. लिहायचा मोह झाला. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडीशी माहीती: तीन ओळी असतात. तिसरी ओळ ही पहील्या दोन ओळींना पुढे नेणारी किंवा कमालीचा विरोधाभास असणारी आणि ती वाचल्यानंतरच खरा दोन ओळींच्या मागे दडलेला अर्थ उमगावा अशी असते. १. आधी येतो पाऊस.. मग तुझी आठवण.. . . . अंती शिल्लक राहतो तो मृदगंधच... २. तू, मि, पाऊस..

जिद्द जगण्याची

लेखक निनाव यांनी बुधवार, 02/03/2011 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या चाळी च्या तिसर्‍या मजल्या वरची ती त्याची खोली! लाकडी जिना जातो नं?..त्याला लागून असलेली.. दोन वयातल्या मुली त्याला..माय नसलेल्या तारुण्याचा आवाज लपवत... ओल्या भिंत्यांच्या मागे जगण्याचा प्रयत्नात.... तिन कोणात मिळून चौकोनी कुटुंब.. दिवसा वळते अगरबत्ती, होतात शिकवण्या अन मेहंदी चे वर्ग रात्र पिळते दोरा-फॉल-पिको वर येता घरी मग, त्याची हाडे वाजतात मधेच, टेकताच त्या लुळ्या कॉट वर जिद्द जगण्याची अधिकच स्पष्ट होते दर रात्री 'गीत-माला' -ऐकता रात्र मग होते लयबद्ध त्या १०० वॉट च्या पिवळ्या प्रकाशातही मग.. तरूणाई कशी रंगीत स्वपन सारे बघते... भरलेल्या बेड वरचा सामान सारुन बाजुला दुमडलेल्या अंगा

मज काय भाळी उमगेना ...

लेखक विश्वेश यांनी मंगळवार, 01/03/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
रात काळी, झोप जाळी, काय भाळी उमगेना ... नभ दाटले, भर सकाळी, काय भाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... विरली वाणी, सरली गाणी, सुकली रातराणी उमगेना ... जाळत जाती, खोलवर मज, तुझ्या आठवणी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... जुनीच वाट, जुन्याच खुणा, का छळती पुन्हा उमगेना ... फिरवी पाठ, ओळखीची लाट, वागणूक निराळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... साठवले बळ, फाडले उर, पण का? न फुटले सूर उमगेना ... फिरोनी आलो, त्याच समेवर, का? न पडली टाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ...
काव्यरस

मज काय भाळी उमगेना ...

लेखक विश्वेश यांनी मंगळवार, 01/03/2011 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
रात काळी, झोप जाळी, काय भाळी उमगेना ... नभ दाटले, भर सकाळी, काय भाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... विरली वाणी, सरली गाणी, सुकली रातराणी उमगेना ... जाळत जाती, खोलवर मज, तुझ्या आठवणी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... जुनीच वाट, जुन्याच खुणा, का छळती पुन्हा उमगेना ... फिरवी पाठ, ओळखीची लाट, वागणूक निराळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... साठवले बळ, फाडले उर, पण का? न फुटले सूर उमगेना ... फिरोनी आलो, त्याच समेवर, का? न पडली टाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ...
काव्यरस

गाभार्‍यातील शिव शंभो ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 01/03/2011 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
त्या छोट्याश्या अरुंद गल्लीत जुन्या पुराण्या वाड्यात मध्यभागी खोलवर उतरत गेलेल्या त्या पायर्या आत शंकराचा गाभारा मिट्ट काळोख . मिणमिणता दिवा टिपुकल्या प्रकाशाची काळोखाला साथ मामा शिवशंभो करीत वाजवायचा ती छोटीशी घण्टा किणकिण नाद उडवून जायची काळोखाची पाखरे अंधाराला भोके पाडीत घुमायचा नाद गोल चौफेर भीती वाटायची मला मी गप्प घाबरून .. मामाचा नाद घुमायचा शी ssss व शsss भो ...!! माझे कान गच्च .....!!! खूप वर्षांनी गावी गेलो गल्लीत गेलो उध्वस्त झालेला वाडा नि चकाचक नवी ईमारत उत्तम बांधणीची भळभळून प्रकाशाची शंकराचा गाभारा सुंदर मार्बलचा प्रकाशाने ओघळलेला सुशिक्षित वा
काव्यरस

नावं

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी सोमवार, 28/02/2011 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
नात्यांची नावं शोधायची नसतात नात्यांना नावं ठेवायची नसतात नावांच्या पिंजा-याबाहेर सुद्धा एक सुंदर बन आहे त्यातल्या एकेक प्राण्यालाही एक सुंदर मन आहे ‘कोण आहे तो तुझा’ हे व्यवहाराला बर आहे ‘ओळख आहे आमची’ हेच उत्तर खर आहे ओळख असते दाट जुनी चेहर्यामागच्या माणसांशी जखमेवरच्या खपल्यांशी, भिजलेल्या दिवसांशी ओळख असते गाता गाता जुळलेल्या सुरांशी परसातल्या चाफ्याशी अन कुंपणाच्या तारांशी ओळख पटते आगंतुक डोळ्यामधल्या हसण्याशी आणि ओळख निघते गही-या लाघव डोळ्यामधल्या स्वप्नाशी नातीच ना हो हि सगळी कळत नकळत जोडलेली बहरलेल्या वेलीसारखी अंगा खांद्यावर वाढलेली नावं देवून सांगा त्यांना व्याख्येत कस बांधाय

वो सांस हूं जो लबोंपे.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 28/02/2011 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
रफीसाहेबांची अनेक गैरफिल्मी गाणी आपल्याला माहीत आहेत, असतील. त्याची मजा काही औरच आहे. मुख्य म्हणजे कमीत कमी संगीत व ह्रदयाला भिडणारा त्या गाण्यांचा अर्थ आणि सरळ ह्रदयात एखादी सुरी उतरावी तसा मनाला भिडणारा साहेबांचा आवाज...... त्यातच त्या गाण्यात भावनांची तडफड असेल तर ते गाणे खरच ह्रदय कापत जाते.