Skip to main content

कविता

पाऊस म्हणाला

लेखक मालविका यांनी मंगळवार, 22/04/2014 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस म्हणाला, मी येतो नि धरतीला आनंद मी येतो नि शेतकरी सुखावतो मी येतो नि झाडं फुलं तरारतात मी येतो नि प्राणी पक्षी आनंदतात पाऊस म्हणाला, मी आलो कि मोर नाचू लागतात मी आलो कि नद्या वाहू लागतात मी आलो कि सागराला उ

बघ जरा बघ जरा,

लेखक माहितगार यांनी रविवार, 20/04/2014 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
जातं फिरवता फिरवता, कुणी माणुसकी भरडू नये, खूंटीचे त्रैत मांडून, स्वतः इब्लिस होऊ नये ! रक्ताच कांडणं दळूनं, कुणी माज जोडू नये श्रमीकांच्या रक्तानं माखून, 'वाह ताज' म्हणू नये ! फिरकी घेत, गिरकी घेत, किती बेफिकीर होशील ? भरडलेल्या अमानूष गणितांवर थिरकत, किती ओंगाळवाणा होशील ? मेंदूला चिडवताना, मनांना डिवचताना कुठे आहे भान ? नको चिवडतबसू बापजाद्यांची अस्तीत्वहीन शान बस्स झालं, रक्ताळलेलं जातं तूझ, आता फिरवू नको कुठे, बघ जरा बघ जरा, पेटलयं चोहीकडे माणूसकीच रानं !

तिला समुद्र आवडतो...

लेखक माधुरी विनायक यांनी शनिवार, 19/04/2014 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
तिला समुद्र आवडतो... तिला पाऊसही आवडतो... आणि हे त्याला चांगलंच ठाऊक आहे तिचा रूसवा कळतो त्याला तो कसा काढायचा, हे सुद्धा कळतं... पाठीवर स्पर्श जाणवला की सुसाट सुटतो तो काही बोलत नाही, विचारतही नाही ती तिच्याच रूसव्यात दंग एक हलका धक्का आणि समोर पसरलेला समुद्र ती शांत.. स्तब्ध.. सुखावलेली... समुद्राच्या दिशेने धावलेली... वळून त्याच्याकडे बघताना भरून आलेलं आभाळ अवचित आलेला पाऊस आणि वाहून गेलेला रूसवा...

आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं?

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 15/04/2014 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं? आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं, अॅडव्हान्स पाठबळ असतं तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं तुमच्या जन्मापासून; त्यांच्या मरणापर्यंत, त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणार स्टीअरींग असतं अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं आईच प्रेम हे; रोजच्या आयुष्यात, कामाला येणार बँक बॅलन्स असतं बाप म्हणजे; गरजेच्या वेळी मिळणारा, तुमचा बोनस किंवा वेरीएबल पेमेंट असतं आई म्हणजे; तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच नेटवर्क असतं कधी नेटवर्क थकले; तर बाप, अर्जंट “

तू

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 15/04/2014 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
कधी तुझी याद....संधीप्रकाशात आणि मग खळबळ....कुठेतरी आत चिंब जणू तू....चिंब पावसात ओला ओला शहारा....चिंब शरीरात उरी काहिली काहिली....जरी चांदरात होई काळीज निखारा....तुझ्या विरहात मन पाखरू पाखरू....फडफडे पिंज-यात आणि पिंज-याची चावी....जगाच्या हातात कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासात कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत कधी माझी लाट....नेई तुला सागरात दूर देशी तू....तरीही मनात ठायी ठायी तूच....मन-देश अंतरात

फैसला

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 12/04/2014 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
फैसला जीवनाचा हाच साला घोर आहे येथला प्रत्येक मुर्दा थोर आहे भामटा असणार हा नक्कीच नेता ऐकतो, सर्वत्र त्याचा जोर आहे खेळतो पैसा भल्यामोठ्यांत आता हे कुणाचे माजलेले पोर आहे मांडतो प्रस्ताव आता एकतेचा कालचा तो हाच दंगेखोर आहे मी निघालो आणि तू आलीस राणी फैसला हा छान काटेकोर आहे डॉ.सुनील अहिरराव

विलक्षण कविता - असाध्य वीणा

लेखक शुचि यांनी शनिवार, 12/04/2014 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
"अज्ञेय" नावाच्या कवीने हिंदी भाषेत लिहीलेली एक विलक्षण कविता "असाध्य वीणा" मध्यंतरी वाचनात आली. भारदस्त अन कसदार शब्दसौंदर्याचे बावनकशी लेणे ल्यालेली ही कविता माझ्या मनाला चिंब भिजवून, अतिशय आल्हाद देउन गेली. मी तर म्हणेन सर्वाधिक आवडलेल्या काही कवितांपैकी ही एक! ___________ कवितेचा गाभा हा आहे की - गुहावासी ऋषी प्रियंवदा हे राजाकडे आलेले आहेत अन राजाने त्यांना एका वीणा छेडून , वाजवून दाखविण्याची, वीणावादन करण्याची विनंती केलेली आहे.
काव्यरस

आयुष्याचे सात वार

लेखक sunrise यांनी शुक्रवार, 11/04/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्राचा शीतल प्रकाश, बाप्पा सगळ्यांना देतो गोंडस बाळाच्या रुपात, प्रत्येकजण जन्माला येतो बालपण कसे संपते, कधी कळतच नाही असा सोमवार परत, कधी मिळतच नाही मंगळाचा जोश, संपूर्ण तारुण्य व्यापतो आभाळा एवढ्या आकांक्षा, आपण उरात जपतो खूप काही करायला, वेळ कमी पडतो आपल्या नकळत अचानक, बुधवार उजाडतो बौद्धिक आणि आर्थिक, आपण झेप घेत असतो कुटुंब, तब्येत, मित्र - ह्यांसाठी वेळच नसतो अनुभवाचं लक्षण म्हणून जग, पांढऱ्या केसांकडे पाहतं स्वतःसाठी थोडं जगायचय, असं मनात वाटत राहतं एक महत्वाचा निरोप घेऊन, मग गुरुवार येतो खरा मार्ग दाखविण्याचा, प्रयत्न करून जातो स्वार्थात भिजलेलं मन, इतक्या लवकर

छन्दोरचना

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 10/04/2014 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा.माधव त्रिंबक पटवर्धन (माधव जूलियन) ह्यांचा छन्दोरचना हा ग्रंथ प्रथम १९२७ साली प्रसिद्ध झाला. त्यात आणखी भर घालून हाच ग्रंथ १९३७ मध्ये छापून प्रसिद्ध झाला.
काव्यरस

निवडणुकीचा बिगुल . . .

लेखक संचित प्रमोद कुलकर्णी यांनी शुक्रवार, 04/04/2014 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणुकीचा बिगुल देशभर वाजला कालचा तो 'आम आदमी', आज एकदम खास झाला कॉलर पकडणारे हात, नमन करू लागले ओळख विसरलेल्या चेहेऱ्यावरती, भुलवणारे हसू खुलू लागले झोपड्यातलं ते फाटक पातळ, नव्या साडीत बदलून गेलं व्हरांड्यातल्या गांजलेल्या नळांना, ५ वर्षांनी परत पाणी आलं रस्त्यामधले काल परवाचे खड्डे, अचानकच हरवून गेले पल्याड गावच्या दुष्काळग्रस्तांना, एका रात्रीत अनुदान मिळाले शेकडो पोकळ आश्वासनांचा, रोजचा रतीब चालू झाला सफेद सदरेवाल्यांचा घोळका, दारोदारी फिरू लागला चार महिन्यांचा सारा खेळ, पुन्हा सगळं तसंच घडणार पुन्हा पदरी तीच निराशा, आमचा शेतकरी पुन्हा रडणार रस्त्यांवरती तसेच खड्डे, पुन्हा रस्