Skip to main content

कविता

रस्ता...

लेखक शब्दबम्बाळ यांनी बुधवार, 08/04/2015 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना मी कधी फार अडखळलोच नाही, किंवा अडचणी काय असतात हे पाहायला, रस्त्याच्या त्या बाजूला मी कधी गेलोच नाही… त्यांच जगणं तर मी रोजच पाहायचो, जगणे ही लढाई आहे हे रोजच अनुभवायचो, पण लढाईत त्यांची कुमक करायला मी कधी धजावलोच नाही, कदाचित हरण्याच्या भीतीपायी मी त्या बाजूला कधी गेलोच नाही… चटणी बरोबर पण जेवता येत हे मला माहीतच नव्हतं, कधी कधी भुकेची आग शमवायला त्यांना पाणी देखील पुरेसं होत, पण जेवणात मीठ कमी म्हणून टाकून द्यायला मी कधी वरमलोच नाही, कदाचित उपासमारीच्या भीतीपायी मी त्या बाजूला कधी गेलोच नाही… त्यांच्यासाठी डोक्याचा वापर फक्त ओझी वाहून न्यायलाच होता, त्यात

मराठी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 08/04/2015 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात मराठी चित्रपट सिनेमागृहात प्राइम टाइम ला दाखवणे चित्रपटगृहांना अनिवार्य करण्यात आले ही बातमी वाचली. ट्विटरवर या विरोधातील पोस्ट्स मुळे का होईना #Marathi ट्रेंडिंग झालं.

नाटक वाटू नये

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 07/04/2015 19:27 या दिवशी प्रकाशित केले.

नाटक वाटू नये


थुंकली थुंकी पुन्हा पुन्हा, उगीच चाटू नये
नाटक सुद्धा असेच वठव की, नाटक वाटू नये

लाख उमटू दे देहावरती, आपुलकीची चरे
पण इवलेसे काळीज माझे, तितुके फाटू नये

नकोस दाखवू दिव्य धबधबे, अत्तरवर्णी झरे
मी मागत नाही फार परंतु; पाझर आटू नये

वरून सांत्वन, आतून चिमटा; नाद तुझा वेगळा
जाणीव इतकी तरी असू दे, मैतर बाटू नये

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नये

अशी कशी ग तु...........

लेखक एक एकटा एकटाच यांनी सोमवार, 06/04/2015 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस असतेस दिवसभर डोळ्यात अन रात्री स्वप्नांतही जागतेस........... मी पहातो तुझे प्रातिबिंब या चमचमणार्‍या नभात कधी भेटतेस होउनी चांदवा कधी चंदेरी चांदण्यात लपतेस.............. अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस सजतेस अल्लड सरींनी अलवार ओल्या मिठीत शहारतेस मी मागतो तुझा इशारा या चिंब भिजणार्‍या पावसात कधी वेढतेस तुझ्या आवेगाने कधी अलगद ओंजळीत साठतेस अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस अशी कशी ग तु........... नेहमीच हवीहवीशी वाटतेस मोहरतेस आसमंत अस्तित्वाने हवा तुझ्या श्वासाने

जायचे आहेच तर जावेस आता ..

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 06/04/2015 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
जायचे आहेच तर जावेस आता का असे वाटेत थांबावेस आता मी तुला द्यावे असे उरले न काही तू हवे तर दु:खही न्यावेस आता ही किती तलखी जिवाची होत आहे ग्रीष्म तू विझवून टाकावेस आता संपवाया अंतरे माझ्यातुझ्यातिल जवळ थोडे आणखी यावेस आता अडथळ्यांना टाळणेही ठीक नाही अडथळे मोडून काढावेस आता मी प्रतिक्षेचा पुरावा काय देऊ तू युगे चालून ठरवावेस आता - डॉ.सुनील अहिरराव

संध्याछाया..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 06/04/2015 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस संपला होता होता झालि संध्याकाळ संध्येच्या त्या छायेमध्ये झोपे थकला बाळ वाट वाकडी करून दिसाला संध्या छाया आली बाळाच्या त्या चर्येवरती मावळणारि लाली तो ही थकला ती ही थकली सांज वातीला जागा उद्या पुन्हाही सकाळ होइल तोवरि कसला त्रागा? मी ही वदतो छोटी कहाणी प्रत्येका दिवसाची कुठे कुठे ती दिसे पौर्णिमा-बाकी ही अवसेची! चला गड्यांनो समजुन घेऊ रूपक हे संध्येचे जुने जाणते जे जगले ते साधे जीवन साचे ----------------------------- अतृप्त..

सये भांडतेस कशा..

लेखक कहर यांनी सोमवार, 06/04/2015 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
(दूर असलेला नवरा आज बऱ्याच दिवसांनी घरी येतोय म्हणून बायकोची उडालेली त्रेधा पाहून तिच्या मैत्रिणी तिची अशी फिरकी घेतात ) सांज दाराशी गं आली, सये भांडतेस कशा.. काय लागीर लागली अशा राती येड्यापिश्या । सये भांडतेस कशा, भरे घागर पाण्याची तुझे ध्यान कोठे बाई? येळ जाहली जाण्याची । येळ जाहली जाण्याची, बिगीबिगी टाक पाय आडवाट चकव्याची.. मन लागंल वढाय । मन लागंल वढाय, या गं चांदणचाहूली भीव घाली गोरीमोरी तुझी कातर सावली । या गं चांदणचाहूली, रंग ठेव कि राखून मीठ उतरून टाक..
काव्यरस

एका बापाची व्यथा .......

लेखक चुकलामाकला यांनी मंगळवार, 31/03/2015 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
पाटी पुसून कोरडी करणं इतकं सोपं नसतं गं मागे राहिलेल्यांचं जगणं इतकं सोपं नसतं गं फोडासारखं जपलं तुला, मनासारखं फुलू दिले रागावलोही बाप म्हणून, जरी मुक्त खुलू दिले तेव्हाचं ते रडू विसरणं इतकं सोपं नसतं गं सतरा हे काय वय का गं असा निर्णय घेण्याचं अव्हेरून सारी नाती शरीर झोकून देण्याचं तुझं नसणं मान्य करणं इतकं सोपं नसतं गं काय सलत होतं तुला कधी बोलली असतीस तर त्या घडीला तुझ्याजवळ मी हजर असतो तर 'जरतर'ला या सामोरं जाणं इतकं सोपं नसतं गं शेवटच्या त्या क्षणी पिल्ला, तुला खूप दुखलं का ? कणभर का होईना , आमची आठवण आली का ? सतत प्रश्न घेऊन जगणं इतकं सोपं नसतं गं
काव्यरस

संस्कृत सुभाषिते -२

लेखक शरद यांनी शुक्रवार, 27/03/2015 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत कवी पंडित होते. त्यांना धर्म, तत्वज्ञान, काव्यशास्त्र इ. चे चांगले ज्ञान होते. पण हल्लीच्या विद्वानांप्रमाणे ते हस्तिदंती मनोर्‍यात रहात नव्हते. सामान्य माणसाबद्दल त्यांना कणव होती. वाटसरू उगीचच लुटला जाऊं नये म्हणून एकाने दिलेली धोक्याची सुचना पहा कामिनीकायकान्तारे स्तनपर्वतदुर्गमे ! मा सन्चर मन:पान्थ ! तत्रास्ते स्मरतस्कर: !! (कांतार ...अरण्य, पान्थ ....वाटसरू, स्मरतस्कर ....मदन नावाचा चोर) असे त्यांचे (मदतनीसाचे) सल्ले आपण पुढेही पहाणार आहोतच. आज एक नवीन दिशा दाखवावयाची आहे. संस्कृत कवी व उर्दु शायर यांच्यामध्ये काही शतकांचे अंतर. पण दोघांचेही एका बाबतीत एकमत दिसून येते.

डोळे आमचे आहेत म्हणुनी

लेखक विदेश यांनी बुधवार, 25/03/2015 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
नकोस टाकू कटाक्ष तिरपा मोहकसा ग पुन्हा पुन्हा - नकोस करू गर्व रुपाचा ठुमकत मिरवत पुन्हा पुन्हा - घमेंड तुजला रूपगर्विते दाखवी आरसा पुन्हा पुन्हा - नित्य आवडे आत्मस्तुती मनास कशी पुन्हा पुन्हा - डोळे अमुचे आहेत म्हणुनी रुपडे बघतो पुन्हा पुन्हा - आम्ही नसतो डोळेही नसते विचार कर ग पुन्हा पुन्हा .. !