मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

जगणे...!

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो मरता इथे जरासा, थोडा जगून गेलो. ती वेल अमृताची, मीहि तृषार्त होतो गोडीस चाखताना, पुरता भिजून गेलो. लागून आस तेंव्हा, त्या मोहमयं क्षणांची जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो. ते वेड जन्मपंथी, त्याची मनात दाटी भोगावयास त्याला, मी जन्ममृत्यू झालो. ह्या धाडसास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी! मिटताच त्यात अंती, थोडा शिकून गेलो. जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो...... .... अत्रुप्त...

ग टा री...

दिनेश५७ ·
लेखनविषय:
ग्लास झाले रिते सारे भरा पेग तो नवा रे भास अन आभास आता संगतीला हवा रे .. रात्र चढली अंगावरती जरा सावरा जिवा रे अंधाराच्या सोबतीला लुकलुकणारा दिवा रे... किती रिचविले हे आम्ही ग्लास ऐसे किती उधळिले त्यावरी वेळ पैसे किती रात्री आम्ही असे टुन्न झालो रिते ग्लास ते पाहुनी सुन्न झालो...

अस्वस्थामा...

दिनेश५७ ·
लेखनविषय:
आभासी सुखाची शंभर शकले डोक्यावर मिरवत फिरत होता एक उन्मत्त अश्वत्थामा... पोतडीतले उद्याच्या चिंतेचे बाटलीबंद भूत पाठीवरल्या गाठोड्यातून शोधत होते सुटकेचा रस्ता ... निराश सुस्काऱ्याचे फवारे शकलांच्या सुकल्या खपल्या भेदून चौफेर उसळत धावत सुटले भळाळत्या चिळकांड्या कारंजी होऊन नाचू लागल्या... बाटलीतलं भूत बाहेर काढून रिती बाटली फिरवत अस्वस्थ अश्वत्थामा फिरतोय दारोदार, तेलाची भीक मागत... बाटलीतलं भूत आता मानगुटीवर बसलंय!!

विस्फोट

योगेश कोकरे ·
लेखनविषय:
काव्यरस
खुप भांडावस वाटत , ओरडावसं वाटत, जेव्हा गरिबांवर होतो अन्याय, सत्य बोलणाऱ्याची जीभ कापली जाते, जिथे कष्टाचे पैसे उन्माद झालेली गिधाडं पळवतात, अशी एकेक ठिणगी पडत राहते, ठिणग्यांचा बनतो अग्नीगोल, अग्नी गोलाचा बनतो ज्वालामुखी, हाच ज्वालामुखी घेऊन जाऊ इच्छितो, अन्याय करणारे,भ्रष्टाचारी,गुंड,माफिया,बलात्कारी, आतंकवादी यांच्या समुहामध्ये आणि ब्रम्हाडाची निर्मिती ज्या शक्तिशाली स्फोटाने झाली तितक्याच ताकतीने तो ज्वालामुखी फोडू इच्छितो, भस्म होउदेंत सगळे भाडखाऊ यांच्याबरोबर मी देखील भस्म होउदे कारण त्या स्फोटानंतर होणाऱ्या नवनिर्मितीचे सुख असेल मला, माहितीय मला एकटा नाही लढू शकणार इतक्या हरामी

जागली स्पंदने नवी नवी

रातराणी ·
काव्यरस
आमची प्रेरणा: स्पंदन, सांजवेळ, हृदय, अवचित, मन, मोहरणे वगैरे शब्द इकडून तिकडे गुंफले की आजकाल मराठी रोमँटिक गाणं तयार होतं. बावरे प्रेम हे या पंचनाम्यात समीरसूर यांनी आधुनिक गीत लेखकांवर असे ताशेरे ओढलेले पाहून अंमळ डचमळून आले. त्याचा निषेध म्हणून लगोलग एक गीत लिहून काढले.

नाते

ज्योति अळवणी ·
लेखनविषय:
काव्यरस
शब्दांच्या पलीकडचे जे नाते जुळले होते आदी असे न अंत तयाला ते कालातीत होते जुळले म्हणून होते म्हणू की होते म्हणून जुळले? प्रवाह होते नाते की ते अथांग सागर होते? पृथ्वीच्या गर्भातील अंकुर आकाशी भिडणारे पाखुर फुलातील मकरंद असे की प्रेमातील एक युगुल? ते आहे जोवर अर्थ जीवना जरी असे ते पलीकडले नाते जुळता शब्द थिटे अन् भावनाच खरी मज भासे! -------------

झाकलेले सत्य

माहीराज ·
लेखनविषय:
निर्दयी रुपे दिसती निर्दोष वासरेे सत्य सारे झाकलेले सारेच भास रे पाप सारे झाकुनी दर्शनी साधुच सारे झाकल्या चेहर्यावरती मुखवटे हासरे ।। गोर्या वस्ञांमागे काळीच कारस्थाने शेंदुर थापुनी देती धोकेच प्रामुख्याने सार्यांचा विश्वास आंधळा,                  आंधळीच भक्ती येथेच विस्तारते क्रुर अंधकार शक्ती ।। श्रद्धा असावी परी अंधश्रद्धा नसावी परमेश्वराची वस्ती माणसात असावी माणसाला माणुसकी हिच जात दिसावी चांडाळ ढोंगीपणाला कधी न फसावी..।। तेहत्तिस कोटी देव रुपे असे या भुवरी तरी खोट्या मुर्खांची का जादु सर्वांवरी सोडा तो अ

रिमझिम रिमझिम

सुधीरन ·
लेखनविषय:
काव्यरस
रिमझिम रिमझिम पाऊसधारा न्हाऊनी निघाला आसमंत सारा बेधुंद अशा या क्षणी साथ तुझी हवी साजणी ओले ओले वृक्ष अन वेली पानांवरून टपटपते पाणी त्यात आठवली तुझी कहाणी ओलावली मग डोळ्यांची पापणी खळखळत वाहणा-या या नद्या मिळतात सागराला सा-या का न मग होई आपले मिलन प्रश्न पडे हा फार गहण भरारत वाहणारे हे वारे आले अंगावर शहारे दुःखाने मी कळवळतो हृदयाच्या वेदनेने विव्हळतो चिंब चिंब झाले माझे तन दुःखाने भिजले माझे मन आसवांचा आला आहे पूर सापडेना आयुष्याचा सूर

मी बी काय तरी लिहीन म्हणतो : औरंगाबाद तडका. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनविषय:
काव्यरस
(प्रेरणा) मूळ कवीची क्षमा मागून. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. पांढर्‍या कागदावर काळे शब्द पाहीन म्हणतो. मीबी काही तरी लिहिन म्हणतो. कवितेला रास्त प्रतिसाद भेटले काय, न भेटले काय कवीला उपासमारीत जगायची सवयच हाय तरीबी मी आपलं जमवून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहीन म्हणतो.

कवी हूँ मैं

स्वामी संकेतानंद ·
लेखनविषय:
"कवींनी धुमाकूळ घातलाय निव्वळ उच्छाद जिकडेतिकडे ब्लॉगचा कट्टा ,फेसबुकची भिंत ते ट्विटरची टाइमलाईन कवीच कवी सापडतात इकडेतिकडे चोहीकडे एक जागा मोकळी सोडली नाही.. गझला काय, चारोळ्या काय अरे दीर्घकाव्य लिहून उप्पर से हायकू कायकू लिखनेका बाबा? 'कवी इलो' ची हाकाटी ऐकू आली की पळत सुटतात सगळे सैरावैरा कवींना दिलंय आपण मोकळे रान आपले व्हाट्सऍप खुले सोडले दिली आपली व्यासपीठं आंदण.. व्यासा, तू पण कवीच होतास ना रे? आता यावर एकच उपाय उरलाय......" वरच्यासारखं कुणी परत लिहताना दिसलं तर त्याला पार उद्ध्वस्त करायचे.. शीघ्रकवितांचे धरण फोडून मुक्तछंदांचा महापूर आणून घरात त्याच्या सोडायचे शेरोशायरींचे झु