Skip to main content

कथा

बडबड

Published on बुधवार, 12/09/2012
"ए हळू रे!" "काय हळू? अशीच मजा येते!" "म्हणून काय इतकी फास्ट चालवायची?" "नाही तर काय? ही काय बैलगाडी आहे का?" "ही बैलगाडी नाहीये... मात्र तू बैल आहेस हे नक्की!" "आणि तू माझी गाय" "पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!" "ब्वॉर्र! राह्यलं! पण जरा अजून जवळ सरक ना. घट्ट पकडून बस ना." "नक्को... आधीच तू सारखे ब्रेक मारतो आहेस ते काय कळत नाहीये का मला?" "हा हा हा" "जरा हळू रे... खूप स्पीड वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... वळणावर तरी हळू कर ना. प्लीज!" "काही नाही होत गं... माझा कंट्रोल.................

आधी बसू मग बोलू.

Published on सोमवार, 10/09/2012
“बसणे” या शब्दाचे तसे वैकल्पिक आणि व्यावहारिक अभिप्रेत अर्थ बरेच आहेत. जसे “गाडीवर बसणे”, “खुर्चीवर बसणे”, “सकाळी सकाळी १५ मिनिटे एकांतवासात बसणे” इत्यादी इत्यादी. या सर्व प्रचलित अर्थांबरोबरच “बसणे” या शब्दाला एक स्पेशल अर्थ आहे. या “बसण्यात” सगळंच येतं, मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, कर्ता, कर्म, क्रियापद या सगळ्यांच्या व्याख्या या शब्दाला तंतोतंत लागू होतात. अगदी “उभयान्वयी” अव्ययाला “आडवे” करण्याची ताकद आहे या “बसण्या” मध्ये. असा हा “बसणे” शब्द विश्वव्यापक आहे. खरं तर ही एक साधना आहे, पण त्या साठी तुम्ही साधक असण्याची अट अजिबात नाही.

पीस

Published on शुक्रवार, 07/09/2012
मी प्रवाह कागडिया... सध्या मी एम. एल. ए असल्या मुळे तुम्हाला माझं बोलणं खरं वाटणार नाही. पण काही माणसाचं अजब असतात, जीवनात असल्या व्यक्तीं पेक्षा कितीही जास्त यश प्राप्त केलं, तरी तुम्हाला तुमच सर्व यश बेकार वाटतं आणि त्या व्यक्ति प्रती तुमच आकर्षण किवां कदाचित इर्षा वाढतच असते. माझं बोलणं नाहीना कळाल? जो पर्यंत तुम्ही माझ्या मित्र सुज्ञाला नाही भेटणार, तुम्हाला माझी गोष्ट नाही कळणार... ... आज चौकातून जात असताना, मी माझी 'एस्टीम' गाडी सूज्ञाचा चाळी समोर थांबवली.. तेव्हा उन्हाळ्याचे दिवस, दुपारी चारचा सुमार होता.

अंगणातल्या चिमण्या

लेखक सस्नेह
Published on बुधवार, 05/09/2012
खरं म्हणजे एक दिवसासाठी बेळगाव ते मुंबई असा प्रवास करायचे सुचित्राला अगदी जीवावर आले होते. नणंदेच्या सासूच्या भाचीचं लग्न. पण सासू सासरे नेमके चार धाम यात्रेला गेलेले. माहेरचं कुणी आलं नाही तर नणंदेचा रुसवा फुगवा काढायचं अवघड झालंच असतं, शिवाय सासूबाई परत आल्यावर त्यांचे टोमणे खावे लागले असते ते निराळेच. म्हणून तिने बेत केला, आदल्या दिवशी रात्री पुण्यात असलेल्या मावसबहिणीकडे, प्रियांकाकडे मुक्काम करायचा अन खूप दिवसांच्या तटलेल्या गप्पागोष्टी करून घ्यायच्या. अन मग दुसरे दिवशी सकाळी लवकर मुंबईसाठी निघायचं . साडेबाराचा मुहूर्त. अकरापर्यंत सहज पोचता येईल.