आटपाट नगर होतं. तिथे एक साधू राहात होता. साधूला लोकांचं आयुष्य सुखकर करण्याची फार तळमळ होती. त्यामुळे राजासुद्धा त्या साधूचा भक्त झालेला होता. त्या साधूचं एक प्रसिद्ध वाक्य होतं 'जय साध्वाभास!' साधु म्हणजे चांगला आणि आभास म्हणजे आभासच, दुसरा काही अर्थ नाही. ह्या त्याच्या प्रसिद्ध वाक्याचं विश्लेषण करणारी काही पुस्तकेही काहींनी लिहिली होती.
असो, तर एक दिवस त्या साधूकडे एक बाई आपलं गार्हाणं घेऊन गेली. "साधुमहाराज, गेली २-३ वर्षं माझे पाय खूप दुखतात हो. तुम्ही काहीही करा आणि हे दुखणं थांबवा."
साधूने तिच्याकडे एकवार पाहिलं. आणि मनातल्या मनात म्हणाला, 'अरेच्या, हिचे पाय तर दिसतच नाहियेत.