Skip to main content

कथा

गाडीतल्या गप्पा

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 27/11/2012 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी जरा लवकरच म्हणजे २:४५ ला चक्क हाफ डे घेऊन निघालो. विचार केलं ३:३० च्या आसपास कुठली तरी फास्ट लोकल मिळेल. आशेला नेहेमीच अपेक्षांचे पंख असतात नाही का? ऑफिस लोअर परळ येथे असल्याने दादरच्या गर्दीचा ससेमिरा चुकवण्यासाठी भायखळापर्यंत जाणे परवडते. बरं, भायखळ्याला गेलं की गाडीत चढायला मिळणार हे नक्की. ती शाश्वती दादरला उभे असणारे टीसी देखील देऊ शकणार नाहीत. बऱ्यापैकी वेळ असल्या मुळे रमत गमत भायखळा स्टेशन वर पोचलो. नवरात्रीचे दिवस, रिकामा प्लाटफॉर्म, त्यामानाने खुपच कमी गर्दी होती. पुरुषांच्या प्रथम वर्गाच्या डब्याच्या इथे तर आम्ही मोजून २-३ जण पण स्त्रियांच्या डब्याजवळ गर्दी फार होती.

हझारो ख्वाहिशे ऐसी...३

लेखक इष्टुर फाकडा यांनी शनिवार, 24/11/2012 05:58 या दिवशी प्रकाशित केले.
भाग एक : http://www.misalpav.com/node/23033 भाग दोन : http://www.misalpav.com/node/23154 नर आणि मादी या हिशोबात विचार करायचं ठरवलं तर आपलं माणूस कोण असतं? ते जावूदे, पण मला एक सांगा कि, हि कथा ज्यांना आवडतिये/ आवडली आहे, त्या प्रत्येकाची एक कथा असेल... त्या प्रत्येकाची एक तार असेल, भूतकाळातली. कुठल्यातरी एका तानेवर या कथेतली एक एक ओळ समेवर येतेय आणि कोणाकोणाचे सूर जुळून जाताहेत. ती तुमची तान आहे, तिचा ठेका हे तुमच्या आठवणीतलं तुमच्यापुरत गाणं.

मंगला

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 19/11/2012 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
मंगला “अग तू बस आता बाहेर. इथली आवरा आवरी जवळ जवळ झालीच आहे. मंगलला बाकीचे सांगून मीही येते. मग बसू निवांत गप्पा मारीत.” पूजाने विशाखाला म्हटले. कालच तिची नणंद विशाखा, विनयसोबत दोन-तिन दिवसासाठी आले होते. दुपारची जेवणे नुकतीच आटोपली होती. चिपळूणमधले ऐन हिवाळ्यातले दिवस. बाहेर हिरवळीवर उन्हं खात बसण्यात वेगळीच मजा येणार होती. हॉलमधे पुष्कर आणि विनयच्या जुन्या आठवणी रंगात आलेल्या होत्या. विशाखाला बाहेर पाठवून पूजाने निरीनिपटी केली. मंगलाला ओटा स्वच्छ करायला सांगून पूजा हॉलमधे आली. थोडा वेळ गप्पांमधे मस्त गेला. “बाहेर उन्हात बसायचे कां?” पूजाने विचारले.

डॉन

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 13/11/2012 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
दुबईच्या आलिशान हॉटेलच्या स्विमिंग पुलाच्या कठड्या वर बसून सिगारेट चे झुरके घेत तो बसला होता .संध्याकाळचा लालभडक सूर्य जसजसा अस्ताला जात होता ,तसतसा त्याला आपला २५ वर्षापूर्वीचा भूतकाळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर दिसू लागला ..... हैदराबाद मधल्या झोपडपट्टीतील ती छोटीशी खोली .पप्पा आणि मम्मी दिवसभर कामाच्या शोधात दिवसभर वणवण भटकत होते ,घरात दोन वेळच्या जेवणाची सुद्धा मुश्कील होती .तो आणि छोटी बहिण सुरीली तिथेच मातीच्या ढिगार्यात खेळत होते .तेवढ्यात तिथे एक गाडी आली .गाडीतून ३-४ माणसे उतरली आणि त्यातल्या एका गॉगलवाल्याने त्याला एक चॉकलेट दिले .दिवसभर भुकेला असल्याने त्याने पटकन ते खाल्ले

कुंठीत...!!!

लेखक शैलेंद्रसिंह यांनी सोमवार, 12/11/2012 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीतुन येणारे कवडसे आता प्रखर किरणं बनुन आता डोळ्यांना जाचु लागले...डोकं जाम झालं होतं...पण आता तिथे पडुन राहणं शक्यच नव्हतं...खिडकीशेजारी झोपायची सवय, रात्रभर येणाऱ्या गार वाऱ्याच्या झुळका आणि रात्री कितीही वाजेपर्यंत धिंगाणा घातला तरी सकाळी ९ वाजता उठवणारी सुर्यकिरणं. पुण्यातली रेव्होसॉफ़्ट जॉईन केल्यापासुनच असा दिनक्रम होता...गेली पाच वर्ष असंच सुरु होतं. दिवसभर ऑफ़िसमधे मरमर काम...मग रात्री मित्र-मैत्रीणींबबरोबर पब-डिस्क...घरी किती वाजता परत यायचे याची शुद्ध असायचीच कुठे? पुण्यात आल्या आल्याच स्वत:च फ़्लॅट बुक केला होता..कंपनी विनाव्याजी कर्ज देत होती. पझेशन मिळाल्यापासुन एकटीच रहायची सवय.

नामाचिये बळे

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 08/11/2012 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
जेवल्यानंतर खरेतर आता पुन्हा शेतात जायचा कंटाळा आला होता.दिवसभर शेतातून नदीवर फेऱ्या घालून मी भयंकर थकला होतो .वीजमंडळाला दिवसभरात भरपूर शिव्या घातल्या होत्या. का नाही शिव्या घालणार , नदी ते शेत दीड किलोमीटर अंतर पंप चालू करून आलो नि पाटाने शेतात पाणी आले नि एखादा वाफा झाला कि लगेच लाईट जायची मग पुन्हा नदीवर जावे लागे. परत पंप चालू करून आलो कि पुन्हा तेच नुसता वैताग आणला होता ह्या लाईट वाल्यांनी शेजारच्या एम आई डी सीत थोडी सुद्धा लाईट जात नव्हती. आणि बाकी गावांनी आठ आठ तास लोड शेडींग, लोड शेडींग मध्ये लाईट अजिबातच नसते पण इतर वेळीही सारखी ये जा चालू असते.

माझ्या लग्नाची एक गोष्ट...

लेखक ह भ प यांनी गुरुवार, 01/11/2012 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनाच्या कोणत्याही पुर्वानुभवाशिवाय लिहितोय. पण लग्न ठरत असलेल्या एका तरुणाच्या मनातील विचारांचं प्रतिबिंब उमटवण्याचा प्रयत्न करतोय. (फार पुर्वी आतंरजालावर एके ठिकाणी प्रकाशित केला होता..)या लेखामध्ये प्रकट केलेल्या घटना व विचारांशी लेखक सहमत असेलच असे नाही.. शिवाय संपुर्ण काल्पनिक.. अन कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहित बहुदा..

माझ्या लग्नाची एक गोष्ट...

साधारण २७ व्या वर्षी करायचं ठरवलं होतं.. दीड वर्षं अगोदर होतंय.. पण मुली बघायला सुरुवात झाली होती. मागच्या वर्षी एप्रील मध्येच.. मी घरापासून लांब राहतो.. चांगलाच लांब.. रेलवेनं घरी यायचं म्हटलं तरी २४ तास लागतातच लागतात.