मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जीवनमान

कातरवेळ...

नि३ ·
उन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत भर उन्हात पाउस घेऊन आभाळ मनात दाटत तरी सुदधा पावल चालत राह्तात मन चालत नाही घामाशीवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही. इतक्यात कुठुन एक ढग सुर्यासमोर येतो इतक्यात कुठुन एक ढग सुर्यासमोर येतो ऊन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो .

क्रांती एका क्षणाची

देवदत्त ·
२००५ च्या दिवाळीच्या नंतरचे दिवस. दक्षिण रेल्वेचा एक डबा. आमच्या समोर दरवाज्यापासून तिसर्‍या कंपार्टमेंट मध्ये ते ४ मित्र पत्ते कुटत, गाणी गात प्रवासाची मजा घेत चालले होते. बदाम सात, रमी, झब्बू जे आठवतील ते पत्त्यांचे खेळ चालले होते. आजूबाजूचे ही ३/४ जण त्यांना सामिल झाले. मस्त गट बनला होता त्यांचा. कार्यालयातील गंमतीजमती, विनोद सांगण्यात जो तो वरचढ व्हायच्या प्रयत्नात. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर उद्या पुन्हा कामावर रूजू व्हायचे म्हणून थोडा कंटाळाही आलेला दिसत होता त्यांच्या बोलण्यात. तरी आता परतीच्या प्रवासात घरून आणलेल्या दिवाळीच्या फराळावर मध्ये मध्ये हात मारणे चालू होते.

फिशपॉन्ड

शितल ·
कॉलेज मध्ये असताना आपल्यावर काही फिशपॉन्ड पडले असतील, तर काही आपण इतरा॑वर टाकले असतील, तर काही असेच आपल्या मित्र- मैत्रिणी॑वर पडले असतील तर ते आपण सा॑गु एकमेका॑ना.

कॅलिडोस्कोप...

स्वाती राजेश ·
विजभाऊंनी धमालच्या लग्नाची तयारी सुरू केली. त्यातील एक एक पात्रे डोळ्यासमोरून तरळून गेली. इथे मिसळपाव वर काही सदस्यच एकमेकांना प्रत्यक्ष ओळखतात. पण काही नुसतीच कल्पना करतात. कोण कसा असेल? त्याच्या लिखाणावरून, दिलेल्या प्रतिक्रीयेवरून आपण त्याची प्रतिमा डोळ्यासमोर आणतो. त्यातील एक गंमत म्हणजे त्यांची मि.पा. वर असलेली नावे. काय एक-एक भन्नाट आहेत. त्यावरून सुद्धा मनात एक त्याची छबी उमटते...कि हा असा असेल, ही अशी असेल.... तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल ना? मग लिहा ना? कृपया, कुणालाही दुखवण्याचा हेतु नाही.

अपयशाचे व्यवस्थापन

विकास ·
माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचे व्हार्टन इंडीया इ़कॉनॉमिक फोरम मध्ये भाषण झाले. (२२ मार्च २००८) ते सर्वच वाचण्यासारखे आहे. पण त्यातील खालील भाग मला विरोपातून मिळाला. आवडल्यामुळे त्याचे स्वैर भाषांतर करून येथे देत आहे: प्रश्नः आपण सांगू शकाल का की नेतृत्वाने अपयशाचे व्यवस्थापन कसे करायचे असते ते? डॉ. कलामः मी तुम्हाला माझ्याच अनुभवावर आधारीत याचे उत्तर देतो. १९७३ साली मी इस्रोचा एसएलव्ही-३ प्रकल्पाचा डायरेक्टर झालो.

सारे प्रवासी गाडीचे

भोचक ·
परशुरामची झोप मोडू नये म्हणून भुंग्याने पार मांडी फोडली तरी कर्णाने हु की चू केले नव्हते, असे म्हणतात. तद्वतच मध्य प्रदेश नामे राज्यात सार्वजनिक प्रवास करण्यासाठी कमीतकमी एवढी तरी सहनशीलता हवीच. सहनशीलतेची परीक्षा वा कसोटी पाहणारे प्रसंग आपल्या आयुष्यात अधून मधून येत असतील, पण या बाबतीत आपल्या लोकांना अधिक मजबूत करणेसाठी मध्य प्रदेश सरकारने कायमस्वरूपी सोय केली आहे, ती वाहतुकीच्या खासगीकरणाच्या रूपाने. आपल्याकडे 'यष्टी'च्या खासगीकरणाची आरोळी आली की सगळे कर्मचारी एकत्र येऊन शड्डू ठोकून उभे रहातात.

नावात काय नाही?

श्रावण मोडक ·
काही कामानिमित्त परवा एका स्नेह्यांच्या घरी फोन केला. त्यांच्या कन्येनं - ओजसनं - फोन घेतला. 'मोडक बोलतोय. आई आहे?' 'थांबा हं. देते.' असं म्हणत तिनं आईकडं फोन दिला. त्यांनी फोन घेतला तेव्हा पहिलंच वाक्य होतं, 'ओजस म्हणतेय की, यांचं नाव इतकं सुंदर असून हे मोडक असं का सांगतात?' 'बऱ्याच वर्षांपासून ती एक सवय बसली आहे. काही केल्या जात नाही...' मी उत्तर देऊन मोकळा झालो. हा अनुभव काही पहिलाच नव्हता. याआधीही एकदा असा अनुभव आला होता. त्यावेळी मी एका लोकसंघटनेसोबत जोडून घेतलं होतं.

काही संवाद

ॐकार ·
आजानुकर्ण यांच्याशी गप्पा मारता मारता असे काही कल्पनारम्य संवाद सुचले. संवाद कल्पनेतले(च) आहेत. काही साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा, न आढळल्यास सुदैव! संवाद १ ( वेळ : एकाची सकाळ, एकाची संध्याकाळ माध्यम : जीटॉक-चॅट स्थळ : नसत्या चौकश्या करू नका. ) १: नमस्कार २: नमस्कार १: नविन काय लिहिले? २: काही नाही. वेळच नाही मिळत हल्ली. १: अच्छा. काल त्या पाककृतीवर तुमचा प्रतिसाद वाचला. २: अं? हो हो. १: पण त्यात तुम्ही कविता छान झाली आहे असं लिहिलयं! २: असं काय? बहुदा झोपेत दिला प्रतिसाद. कवितेलाच द्यायचा होता खरा. १: हेहेहे , प्रतिसाद झोपेतही देता पण लिहायला वेळ नाही!