मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुठली खिडकी? कितवा मजला?

ॐकार ·

विसोबा खेचर 08/02/2008 - 17:21
रिक्तहस्त मी अलिप्त आणि एकभुक्त मी विषय, वंचना, व्यसनांपासून पूर्ण मुक्त मी मीच देव, मी दानव अन माझाच भक्त मी झोपायाला जमीन, अंबर पांघरायला कसली खिडकी! कसला मजला! वा ओंकारा, क्या बात है! वरील ओळी आवडल्या... तात्या.

नंदन 14/02/2008 - 19:09
कविता आवडली. शब्दांनी धरलेल्या खाटा आणि शेवटचे कडवे खासच. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय 14/02/2008 - 19:34
बाकी सर्व कडवी इतकी घट्ट बांधलेली आहेत, की शेवटचे कडवे कवीने मुद्दामून सैल सोडले आहे (चुकून नव्हे) असे वाटते. पण का? परतपरत प्रयत्न करून मी घसरून असेच वाचतो : रिक्तहस्त मी एकभुक्त मी विषय- वंचना- व्यसनमुक्त मी देव, दानवहि, आणि भक्त मी पाठी भू, नभ पांघरायाला कसली खिडकी! कसला मजला! पण बाकी कडवी तालबद्ध रचणारा ॐकार हे कडवेही त्याच तालात सहज बसवू शकला असता. मग ते जसे आहे तसे बसवण्यात काही विशेष काव्यमय दृष्टी आहे काय?

In reply to by धनंजय

ॐकार 19/02/2008 - 17:56
पहिल्या ३ कडव्यांत लय साधल्याने कविता ओघवती होते. शेवटच्या कडव्यात त्याला लगाम घातला आहे. शेवटचे कडवे हे पहिल्या तीन कडव्यांशी विसंगती दर्शवते. पहिले कडवे - कॅन्सर अथव तत्सम व्याधीने त्रस्त झालेल्या रुग्णाशी संबंधित. दुसरे कडवे - जगण्यातला साधेपणा हरवून बसलेल्या प्रवृत्तीचे द्योतक. तिसरे कडवे - तर्जनिनासिकान्याय करणार्‍याचे वर्णन. चौथ्या कडव्यात फारकत घेऊन विषय, वंचना, व्यसन (पहिली ३ कडवी ) यापासून लांब असणार्‍या; देव, दानव, भक्ती अशा संकल्पनांत न रमणार्‍या ; पैसा, भूक आणि भोग यांनी न डळमळणार्‍या आणि विश्वात सर्वत्र संचार करणार्‍या प्रवृत्तीचे निवेदन आहे. ते वाचताना आपण पहिल्या तीन कडव्यात काय वाचले याचा परत विचार करावा हा लय बदलण्यामागचा हेतू. 'कसली खिडकी, कसला मजला' यातून प्रकट होणारा निष्काळजीपणा जरी नेहमीचा असला तरी वर्णन केलेली वृत्ती आढळणे कठीण!

In reply to by ॐकार

विसोबा खेचर 19/02/2008 - 18:02
वा ओंकारा! ते वाचताना आपण पहिल्या तीन कडव्यात काय वाचले याचा परत विचार करावा हा लय बदलण्यामागचा हेतू. खुलासा लै भारी केला आहेस बाबा..! आता पुन्हा एक डाव तुझ्या खुलाश्याबरहुकूम कविता वाचून पाहतो.. तात्या.

विसोबा खेचर 08/02/2008 - 17:21
रिक्तहस्त मी अलिप्त आणि एकभुक्त मी विषय, वंचना, व्यसनांपासून पूर्ण मुक्त मी मीच देव, मी दानव अन माझाच भक्त मी झोपायाला जमीन, अंबर पांघरायला कसली खिडकी! कसला मजला! वा ओंकारा, क्या बात है! वरील ओळी आवडल्या... तात्या.

नंदन 14/02/2008 - 19:09
कविता आवडली. शब्दांनी धरलेल्या खाटा आणि शेवटचे कडवे खासच. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय 14/02/2008 - 19:34
बाकी सर्व कडवी इतकी घट्ट बांधलेली आहेत, की शेवटचे कडवे कवीने मुद्दामून सैल सोडले आहे (चुकून नव्हे) असे वाटते. पण का? परतपरत प्रयत्न करून मी घसरून असेच वाचतो : रिक्तहस्त मी एकभुक्त मी विषय- वंचना- व्यसनमुक्त मी देव, दानवहि, आणि भक्त मी पाठी भू, नभ पांघरायाला कसली खिडकी! कसला मजला! पण बाकी कडवी तालबद्ध रचणारा ॐकार हे कडवेही त्याच तालात सहज बसवू शकला असता. मग ते जसे आहे तसे बसवण्यात काही विशेष काव्यमय दृष्टी आहे काय?

In reply to by धनंजय

ॐकार 19/02/2008 - 17:56
पहिल्या ३ कडव्यांत लय साधल्याने कविता ओघवती होते. शेवटच्या कडव्यात त्याला लगाम घातला आहे. शेवटचे कडवे हे पहिल्या तीन कडव्यांशी विसंगती दर्शवते. पहिले कडवे - कॅन्सर अथव तत्सम व्याधीने त्रस्त झालेल्या रुग्णाशी संबंधित. दुसरे कडवे - जगण्यातला साधेपणा हरवून बसलेल्या प्रवृत्तीचे द्योतक. तिसरे कडवे - तर्जनिनासिकान्याय करणार्‍याचे वर्णन. चौथ्या कडव्यात फारकत घेऊन विषय, वंचना, व्यसन (पहिली ३ कडवी ) यापासून लांब असणार्‍या; देव, दानव, भक्ती अशा संकल्पनांत न रमणार्‍या ; पैसा, भूक आणि भोग यांनी न डळमळणार्‍या आणि विश्वात सर्वत्र संचार करणार्‍या प्रवृत्तीचे निवेदन आहे. ते वाचताना आपण पहिल्या तीन कडव्यात काय वाचले याचा परत विचार करावा हा लय बदलण्यामागचा हेतू. 'कसली खिडकी, कसला मजला' यातून प्रकट होणारा निष्काळजीपणा जरी नेहमीचा असला तरी वर्णन केलेली वृत्ती आढळणे कठीण!

In reply to by ॐकार

विसोबा खेचर 19/02/2008 - 18:02
वा ओंकारा! ते वाचताना आपण पहिल्या तीन कडव्यात काय वाचले याचा परत विचार करावा हा लय बदलण्यामागचा हेतू. खुलासा लै भारी केला आहेस बाबा..! आता पुन्हा एक डाव तुझ्या खुलाश्याबरहुकूम कविता वाचून पाहतो.. तात्या.
कुठली खिडकी? कितवा मजला? निळ्या पांढर्‍या भिंती दिसल्या बावरलेल्या नजरा वळल्या शब्दांनीही खाटा धरल्या प्रश्न तेवढा एक राहिला कुठली खिडकी? कितवा मजला? मित्र,सोयरे सगळे जमले नव्या घरी येताना दिसले बंद लिफ्ट पाहून म्हणाले किती पायर्‍या चढावयाला? कुठली खिडकी? कितवा मजला? मध्यरात्रीचा प्रहर नेमका हेरून गेलो तसा बेरका व्यवहारी मी मदन नेटका पैसे मोजत खांद्यावरती हात टाकला कुठली खिडकी? कितवा मजला? रिक्तहस्त मी अलिप्त आणि एकभुक्त मी विषय, वंचना, व्यसनांपासून पूर्ण मुक्त मी मीच देव, मी दानव अन माझाच भक्त मी झोपायाला जमीन, अंबर पांघरायला कसली खिडकी! कसला मजला! -ॐकार

नातेसंबंध लाख मोलाचे - सचिन

बापु देवकर ·

ले़ख छानच आहे.... आत्ता ऑस्ट्रेलिया दौर्यात टेस्ट मॅचेस मध्ये पुन्हा पूर्वीचाच आक्रमक सचिन पहायला मिळाला , फार बरे वाटले... मेल्बोर्न पहिली इनिंग पाहिल्यावरच (६२) असे वाटले होते की यावेळी साहेबांचा पवित्रा निराळा आहे...मेल्बोर्न दुसर्या इनिंग मध्ये त्याने पुन्हा ब्रेट ली वर आक्रमणाचा प्रयत्न केला आणि मग आउट झाला...मग सिडनी आणि ऍडिलेड मध्ये सुद्धा अप्रतिम शतके पाहायला मिळाली... ...गेल्या वर्षी पर्यंत दुखापतींनी वैतागलेला धीमा सचिन पाहता आम्ही प्रचंड दु़।खी झालो होतो....आणि ऑस्ट्रेलिया दौर्यात दौर्यात सचिन खेळला तर खरे, असे मानत होतो...पण आम्हास साहेबांनी अप्रतिम खेळ दाखवला, आणि खुश करून सोडले...... .......लगे रहो सचिनभाई........ ( २० -२० च्या जमान्यात टेस्ट क्रिकेट हेच बेष्ट मानणारा ) ( जुन्या आक्रमक सचिनचा चाहता) सतलज _भडकमकर

ले़ख छानच आहे.... आत्ता ऑस्ट्रेलिया दौर्यात टेस्ट मॅचेस मध्ये पुन्हा पूर्वीचाच आक्रमक सचिन पहायला मिळाला , फार बरे वाटले... मेल्बोर्न पहिली इनिंग पाहिल्यावरच (६२) असे वाटले होते की यावेळी साहेबांचा पवित्रा निराळा आहे...मेल्बोर्न दुसर्या इनिंग मध्ये त्याने पुन्हा ब्रेट ली वर आक्रमणाचा प्रयत्न केला आणि मग आउट झाला...मग सिडनी आणि ऍडिलेड मध्ये सुद्धा अप्रतिम शतके पाहायला मिळाली... ...गेल्या वर्षी पर्यंत दुखापतींनी वैतागलेला धीमा सचिन पाहता आम्ही प्रचंड दु़।खी झालो होतो....आणि ऑस्ट्रेलिया दौर्यात दौर्यात सचिन खेळला तर खरे, असे मानत होतो...पण आम्हास साहेबांनी अप्रतिम खेळ दाखवला, आणि खुश करून सोडले...... .......लगे रहो सचिनभाई........ ( २० -२० च्या जमान्यात टेस्ट क्रिकेट हेच बेष्ट मानणारा ) ( जुन्या आक्रमक सचिनचा चाहता) सतलज _भडकमकर
यशाच्या शिखरावर असलेला सचिन जेव्हा नातेसंबंधांवर बोलायला लागतो तेव्हा त्याच्या तोंडातून पहिलं वाक्‍य बाहेर पडतं, "ज्या यशाबद्दल मला श्रेय दिलं जातं हे यश माझ्या एकट्याचं नाही.' फार कमी वेळा सचिन क्रिकेट सोडून इतर विषयांवर बोलतो. या विषयावर मात्र तो भरभरून बोलला. ....... कोणत्याही मुलाचं सर्वांत मूलभूत नातं असतं ते आई-वडिलांबरोबरचं. निःसंकोचपणे मी सांगू शकतो, की माझ्या आयुष्यात सर्वांत जास्त प्रभाव कोणाचा असेल, तर तो माझ्या वडिलांचा. माझे वडील रमेश तेंडुलकर कमालीचे शांत होते. त्यांचे विचार प्रगल्भ असायचे. त्यांना कोणत्या गोष्टीची भुलावण नव्हती. पैशाचा किंवा कशाचाच त्यांना अजिबात लोभ नव्हता.

माझी नवी मैत्रेण

सर्वसाक्षी ·

ऋषिकेश 23/01/2008 - 00:36
फार छान! आम्हाला बॉ शेवटपर्यंट चाई येन् मोठी वाटली होती.. हा हा ! एकदम गंडलो.. मजा आली . बाकी छान वर्णन व त्या निमित्ताने येणारे स्थळ डोळ्यापुढे फोटोशिवाय उभे राहिले. अवांतरः ह्या चित्रा मागच्या टेबलवर सगळे झाकून ठेवले आहे. तिथे अशीच पद्धत आहे की फोटोपुरतं? बाकी लेखनशैली (नेहमीप्रमाणे) ग्रेटच :) -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सर्वसाक्षी 23/01/2008 - 16:44
धन्यवाद ॠषिकेश, मागची झाक्-पाक अशासाठी की ज्या मेजावर लोक बसतील त्यावेळीच आच्छादन काढाचे. आणखी एक चांगला प्रकार म्हणजे जर आपण खुर्चीवर काही सामान वा कोट वगैरे ठेवले तर ताबडतोब त्या वस्तू सकट खूर्चीला एक गडद कापडाची खोळ आणून घालतात ज्यायोगे वस्तू काही सांडून खराब होत नाही व वेगळ्या रंगाच्या फुगीर आच्छादनमुळे आपली वस्तू घ्यायचे लक्षात राहते. खरेतर अशा मोठ्या दालनात अनेक मेजांची रचना करण्यापेक्षा बर्‍याच चांगल्या उपाहारगृहांमध्ये गोल मेज, वर सरकती तबकडी, शीतकपाट, दूरचित्रवाणीसंच यानी सुसज्ज अशा अनेक स्वतंत्र खोल्या असतात. अगदी ५-६ ते १२-१५ पर्यंत माणसे बसू शकतील अशा आकाराच्या खोल्या असतात व प्रत्येक खोलीतच लगतचे प्रसाधनगृह देखिल असते. मात्र खाद्य्पदार्थ प्रदर्शित करण्याची पद्धत फारच आकर्षक असते. मत्स्य व जलचर प्रेमींना तर पर्वणी असते, सांगाल तो जीव पेटीतून फर्माईश करणार्‍याच्या देखत जीवंत काढुन नेला जातो व हवा तसा बनविला जातो.

In reply to by सर्वसाक्षी

ऋषिकेश 23/01/2008 - 19:30
मत्स्य व जलचर प्रेमींना तर पर्वणी असते, सांगाल तो जीव पेटीतून फर्माईश करणार्‍याच्या देखत जीवंत काढुन नेला जातो व हवा तसा बनविला जातो. हे वाचून विषेश आनंद जाहला :).. माहितीबद्दल आभार

In reply to by ऋषिकेश

लई भारी हाये. चीन म्हनल आमच्या डोळ्यासामनी हे फेंगशुईच म्हनजे काय? अस येत पघा. आन त्या गल्लासात काय हाय? पानिय कि काय समजाना? प्रकाश घाटपांडे

सुनील 23/01/2008 - 00:47
एकदम ऍन्टी-क्लायमॅक्स!!! मैत्रीण म्हटल्यावर उत्सुकता अधिकच चाळवली आणि निघाली ती ही गोड, निरागस मैत्रीण! लेख उत्तम! असेच चीन भेटीवर अजून लिखाण येऊदेत! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज 23/01/2008 - 07:56
मैत्रीण कोण असेल याचा अंदाज आला होता पण तरी देखील वाचायला छान मजा आली. मागे तुमचा "चहा व चहाचे चषक" विषयी लेख वाचल्याचे स्मरते. तुमच्या प्रवासविषयक लेखांची एक चांगला संग्रह होऊ शकेल. कृपया अजुन लिहावे.

विसोबा खेचर 23/01/2008 - 08:19
साक्षिदेवा, शेवट क्लासच केला आहेस, मजा आली! :) आणि निघाली ती ही गोड, निरागस मैत्रीण! सुनीलरावांसारखं मीही हेच म्हणतो! सुंदर, दिलखुलास लेख! साक्षिदेवा, तू आता ठाणेकर राहिला नसून बराचसा चिनीच झाला आहेस! :) असो, मिसळपाववर तुझं मनापासून स्वागत. पुढच्या लेखांची वाट पाहात आहे... आपला, (गाववाला) तात्या.

प्राजु 23/01/2008 - 08:30
हे म्हणजे... एकदम सिक्सरच मारलात... मस्त लेख. फसले मी... बाकी मैत्रिण एकदम गोड आहे... - प्राजु

In reply to by विसुनाना

केशवसुमार 24/01/2008 - 16:38
साक्षीशेठ, उत्तम लेख.. मधे मधे येणारे चीनी शब्द/नावे जरा मनातल्या मनात उच्चारुन वाचायला त्रास झाला पण झकास लेख.. बरेच दिवसांनी आपले लिखाण वाचायला मिळाल्याचा आनंद झाला. मध्यंतरी एकदमच जालावरून गायब होता.. बाकी ते मालक वर्गाबद्दल एकदम सहमत..( आम्ही जुमानत नाही ते सोडा) पुढचे लेख लवकर लवकर येऊदेत.. केशवसुमार

सर्वसाक्षी 23/01/2008 - 16:54
धकाधकीच्या आयुष्यात असे विरंगुळ्याचे क्षणही येतात. आपल्याला आवडले हे वाचून बरे वाटले, धन्यवाद. या कथेचा प्रयोग घरी परत येताच प्रथम पत्नीवर व मग एकदा सासुरवाडी गेलो असता केला होता. सुरुवातीचे मैत्रीण प्रकरण ऐकताच सौ. च्या मामांनी ताबडतोब तिला हाक मारुन विचारले की या मैत्रीणी वगैरे तुला कशा चालतात? मग आम्ही दोघे खो खो हसू लागलो व सौ. ने मामांना चाई येनचे वय सांगताच मामा समजून चुकले की भाची व भाचे जावई यांना आपल्याला 'मामा' बनविले आहे:)) हा लेख आमचे परमस्नेही व मिसळपंथी मा. तात्यामहाराज यांचे आग्रहास्तव काल खास लिहुन काढला, न पेक्षा गेल्या अनेक महिन्यात काहीही लेखन घडले नव्हते. (दुष्ट मालक वर्ग चार दमड्यांच्या बदल्यात हली फार काम करून घेतो, त्यातून वेळ असलाच तर नसते उद्योग असतात). असो. तात्यासकट सर्वांचे पुन्हा आभार. असाच लोभ असूद्या! आपला स्नेहांकित साक्षी

In reply to by सर्वसाक्षी

विसोबा खेचर 23/01/2008 - 17:12
हा लेख आमचे परमस्नेही व मिसळपंथी मा. तात्यामहाराज यांचे आग्रहास्तव काल खास लिहुन काढला, न पेक्षा गेल्या अनेक महिन्यात काहीही लेखन घडले नव्हते. साक्षीदेवा, माझ्या विनंतीला मान देऊन तू लिहिलेस याचे बरे वाटले. यापुढेही रोजच्या कामकाजाच्या रगाड्यातून मिपाकरता दोन घटका वेळ काढत जा आणि असंच इथे चांगलंचुंगलं लिहीत रहा हीच तुला गाववाला म्हणून आग्रहाची विनंती... आपला, (मामलेदारची मिसळप्रेमी गाववाला) तात्या. अवांतर - एकदा केव्हातरी सवडीने वेळ काढ. दोघं मामलेदाराला जाऊ आणि यथास्थित मिसळ हाणू! :)

आमची पण फसगत झाली. लेख फारच छान लिहिला आहे. वर्णन डोळ्यासमोर उभे राहते. तुमची मैत्रिण फारच छान आहे.

सिरुसेरि 04/01/2016 - 08:50
मध्यंतरी व्हॉटसअ‍ॅपवर एका छोट्या चिनी मुलीचा गाणे म्हणतानाचा २,३ मिनीटाचा व्हिडीओ खुप फिरत होता. त्यामध्ये हि मुलगी स्टेजवर येऊन धिटपणे गाणे म्ह्णते , मधेच थोडा नाच करते , चहा पिण्याची नक्कल करते असे काहिसे होते . भाषा , शब्द कळत नसूनही ते गाणे लक्षात राहते .

ऋषिकेश 23/01/2008 - 00:36
फार छान! आम्हाला बॉ शेवटपर्यंट चाई येन् मोठी वाटली होती.. हा हा ! एकदम गंडलो.. मजा आली . बाकी छान वर्णन व त्या निमित्ताने येणारे स्थळ डोळ्यापुढे फोटोशिवाय उभे राहिले. अवांतरः ह्या चित्रा मागच्या टेबलवर सगळे झाकून ठेवले आहे. तिथे अशीच पद्धत आहे की फोटोपुरतं? बाकी लेखनशैली (नेहमीप्रमाणे) ग्रेटच :) -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सर्वसाक्षी 23/01/2008 - 16:44
धन्यवाद ॠषिकेश, मागची झाक्-पाक अशासाठी की ज्या मेजावर लोक बसतील त्यावेळीच आच्छादन काढाचे. आणखी एक चांगला प्रकार म्हणजे जर आपण खुर्चीवर काही सामान वा कोट वगैरे ठेवले तर ताबडतोब त्या वस्तू सकट खूर्चीला एक गडद कापडाची खोळ आणून घालतात ज्यायोगे वस्तू काही सांडून खराब होत नाही व वेगळ्या रंगाच्या फुगीर आच्छादनमुळे आपली वस्तू घ्यायचे लक्षात राहते. खरेतर अशा मोठ्या दालनात अनेक मेजांची रचना करण्यापेक्षा बर्‍याच चांगल्या उपाहारगृहांमध्ये गोल मेज, वर सरकती तबकडी, शीतकपाट, दूरचित्रवाणीसंच यानी सुसज्ज अशा अनेक स्वतंत्र खोल्या असतात. अगदी ५-६ ते १२-१५ पर्यंत माणसे बसू शकतील अशा आकाराच्या खोल्या असतात व प्रत्येक खोलीतच लगतचे प्रसाधनगृह देखिल असते. मात्र खाद्य्पदार्थ प्रदर्शित करण्याची पद्धत फारच आकर्षक असते. मत्स्य व जलचर प्रेमींना तर पर्वणी असते, सांगाल तो जीव पेटीतून फर्माईश करणार्‍याच्या देखत जीवंत काढुन नेला जातो व हवा तसा बनविला जातो.

In reply to by सर्वसाक्षी

ऋषिकेश 23/01/2008 - 19:30
मत्स्य व जलचर प्रेमींना तर पर्वणी असते, सांगाल तो जीव पेटीतून फर्माईश करणार्‍याच्या देखत जीवंत काढुन नेला जातो व हवा तसा बनविला जातो. हे वाचून विषेश आनंद जाहला :).. माहितीबद्दल आभार

In reply to by ऋषिकेश

लई भारी हाये. चीन म्हनल आमच्या डोळ्यासामनी हे फेंगशुईच म्हनजे काय? अस येत पघा. आन त्या गल्लासात काय हाय? पानिय कि काय समजाना? प्रकाश घाटपांडे

सुनील 23/01/2008 - 00:47
एकदम ऍन्टी-क्लायमॅक्स!!! मैत्रीण म्हटल्यावर उत्सुकता अधिकच चाळवली आणि निघाली ती ही गोड, निरागस मैत्रीण! लेख उत्तम! असेच चीन भेटीवर अजून लिखाण येऊदेत! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज 23/01/2008 - 07:56
मैत्रीण कोण असेल याचा अंदाज आला होता पण तरी देखील वाचायला छान मजा आली. मागे तुमचा "चहा व चहाचे चषक" विषयी लेख वाचल्याचे स्मरते. तुमच्या प्रवासविषयक लेखांची एक चांगला संग्रह होऊ शकेल. कृपया अजुन लिहावे.

विसोबा खेचर 23/01/2008 - 08:19
साक्षिदेवा, शेवट क्लासच केला आहेस, मजा आली! :) आणि निघाली ती ही गोड, निरागस मैत्रीण! सुनीलरावांसारखं मीही हेच म्हणतो! सुंदर, दिलखुलास लेख! साक्षिदेवा, तू आता ठाणेकर राहिला नसून बराचसा चिनीच झाला आहेस! :) असो, मिसळपाववर तुझं मनापासून स्वागत. पुढच्या लेखांची वाट पाहात आहे... आपला, (गाववाला) तात्या.

प्राजु 23/01/2008 - 08:30
हे म्हणजे... एकदम सिक्सरच मारलात... मस्त लेख. फसले मी... बाकी मैत्रिण एकदम गोड आहे... - प्राजु

In reply to by विसुनाना

केशवसुमार 24/01/2008 - 16:38
साक्षीशेठ, उत्तम लेख.. मधे मधे येणारे चीनी शब्द/नावे जरा मनातल्या मनात उच्चारुन वाचायला त्रास झाला पण झकास लेख.. बरेच दिवसांनी आपले लिखाण वाचायला मिळाल्याचा आनंद झाला. मध्यंतरी एकदमच जालावरून गायब होता.. बाकी ते मालक वर्गाबद्दल एकदम सहमत..( आम्ही जुमानत नाही ते सोडा) पुढचे लेख लवकर लवकर येऊदेत.. केशवसुमार

सर्वसाक्षी 23/01/2008 - 16:54
धकाधकीच्या आयुष्यात असे विरंगुळ्याचे क्षणही येतात. आपल्याला आवडले हे वाचून बरे वाटले, धन्यवाद. या कथेचा प्रयोग घरी परत येताच प्रथम पत्नीवर व मग एकदा सासुरवाडी गेलो असता केला होता. सुरुवातीचे मैत्रीण प्रकरण ऐकताच सौ. च्या मामांनी ताबडतोब तिला हाक मारुन विचारले की या मैत्रीणी वगैरे तुला कशा चालतात? मग आम्ही दोघे खो खो हसू लागलो व सौ. ने मामांना चाई येनचे वय सांगताच मामा समजून चुकले की भाची व भाचे जावई यांना आपल्याला 'मामा' बनविले आहे:)) हा लेख आमचे परमस्नेही व मिसळपंथी मा. तात्यामहाराज यांचे आग्रहास्तव काल खास लिहुन काढला, न पेक्षा गेल्या अनेक महिन्यात काहीही लेखन घडले नव्हते. (दुष्ट मालक वर्ग चार दमड्यांच्या बदल्यात हली फार काम करून घेतो, त्यातून वेळ असलाच तर नसते उद्योग असतात). असो. तात्यासकट सर्वांचे पुन्हा आभार. असाच लोभ असूद्या! आपला स्नेहांकित साक्षी

In reply to by सर्वसाक्षी

विसोबा खेचर 23/01/2008 - 17:12
हा लेख आमचे परमस्नेही व मिसळपंथी मा. तात्यामहाराज यांचे आग्रहास्तव काल खास लिहुन काढला, न पेक्षा गेल्या अनेक महिन्यात काहीही लेखन घडले नव्हते. साक्षीदेवा, माझ्या विनंतीला मान देऊन तू लिहिलेस याचे बरे वाटले. यापुढेही रोजच्या कामकाजाच्या रगाड्यातून मिपाकरता दोन घटका वेळ काढत जा आणि असंच इथे चांगलंचुंगलं लिहीत रहा हीच तुला गाववाला म्हणून आग्रहाची विनंती... आपला, (मामलेदारची मिसळप्रेमी गाववाला) तात्या. अवांतर - एकदा केव्हातरी सवडीने वेळ काढ. दोघं मामलेदाराला जाऊ आणि यथास्थित मिसळ हाणू! :)

आमची पण फसगत झाली. लेख फारच छान लिहिला आहे. वर्णन डोळ्यासमोर उभे राहते. तुमची मैत्रिण फारच छान आहे.

सिरुसेरि 04/01/2016 - 08:50
मध्यंतरी व्हॉटसअ‍ॅपवर एका छोट्या चिनी मुलीचा गाणे म्हणतानाचा २,३ मिनीटाचा व्हिडीओ खुप फिरत होता. त्यामध्ये हि मुलगी स्टेजवर येऊन धिटपणे गाणे म्ह्णते , मधेच थोडा नाच करते , चहा पिण्याची नक्कल करते असे काहिसे होते . भाषा , शब्द कळत नसूनही ते गाणे लक्षात राहते .
गजर झाला आणि झोपमोड झाली. मस्त गुबगुबित बिछान्यात रज‌ईत गुरफटलेला देह बाहेर पडायला राजी नव्हता. पाठोपाठ दूरध्वनी किणकीणू लागला आणि उठणे भाग पडले. दहाचे उड्डाण म्हणजे न‌ऊला हजेरी, म्हणजे साधारण आठला बाहेर पडणे आले. म्हणजे सातला उठलेले बरे. जरा आळसावायचे, एक चहा, जरा टंगळमंगळ, पुन्हा चहा, मग दाढी, तुषारस्नान, मग सामानाचा ताळेबंद एवढे सगळे जमवयला तास तरी हवाच. आठ दिवसाच्या दौर्‍यात पाच गावे पालथी घालायची तर ’विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर’ अशी स्थिती. रोज नवे गाव, नवे हॉटेल, रोज सामान उघडा आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा बांधा. चालायचेच!

तुम्ही काय कराल....?

स्वाती राजेश ·

सुनील 19/01/2008 - 00:26
सकाळी फर्मास चहा बनवून घेईन आणि मग एखादे छानसे पुस्तक घेऊन वाचेन. नंतर महाजालावर थोडी टिचका-टिचकी करेन. दुपारच्या जेवणासाठी एखादी फर्स्ट्-क्लास पाककृती बनवून फस्त करेन. त्यांनंतर वामकुक्षी साठी अर्धा तास म्हणून पडेन आणि दोन्-एक तासांनी उठेन. संध्याकाळी एक फेरफटका मारून आल्यावर, रात्रीच्या जेवणासाठी पुन्हा एखादी डिश बनवेन. मग त्या डिशला साजेशी वारूणी बरोबर घेऊन त्या डिशचा आस्वाद घेईन. शेवटी, टीव्ही वर एखादा डोक्याला ताप न देणारा कार्यक्रम बघत झोपून जाईन. (स्वच्छंदी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर 19/01/2008 - 00:28
तुम्हाला कुणी हे कर, ते कर असे म्हणणार नाही, काही काम सांगणार नाही अशावेळी तुम्ही काय कराल? सकाळी निवांतपणे उठेन. भरपेट नाष्टापाणी झाल्यावर झकासपैकी तानपुरा लावून तोडी किंवा रामकली किंवा कोमल रिषभ आसावरी ची मैफल जमवेन.. त्यानंतर मस्तपैकी थंड पाण्याने अंघोळ व नंतर ताज्या मासळीचं गरमागरम भरपेट जेवण. नंतर झकाससं तंबाखूपान व त्यानंतर गोविंदाचा एखादा मारामारी असलेला मसाला हिंदी चित्रपट! मग जरा तासभर झोप काढून मित्रमंडळींना जमवून मुलतानी पासून अगदी मारव्यापुरिया पर्यंतची मैफल जमवेन. मैफल आटपली की पुन्हा एकदा थंडगार पाण्याने अंघोळ, नंतर जरा दिवाबत्ती वगैरे करून रामरक्षा आणि थोडासा माफक पर्वचा! मग संध्याकाळी थोडंसं उशिरा, आवडत्या स्त्री सोबत सुखदु:खाच्या गप्पा मारत निवांतपणे दोन पेग विदेशी मद्य किंवा मग झक्कपैकी अत्तरबित्तर लावून,छानसे कपडे करून मुंबईतील एखाद्या कोठ्यावर विदेशी मद्याचे घुटके घेत घेत, सोबत हुक्का ओढत, जीव ओवाळून टाकावा अश्या एखाद्या तवायफेचं गाणं ऐकेन...! क्या बात है! साला दिवस असावा तर असा! खल्लास...:) आपला, (ऐय्याश!) तात्या.

ध्रुव 21/01/2008 - 12:39
एक दिवस सुट्टी आणि काहीही डोक्याला त्रास होणार नसेल तर... सकाळी सकाळी पहाटे उठुन मोटारसायकल काढायची. जवळच्या बॅगेमध्ये एक कॅमेरा, (पाण्याची) बाटली घ्यायची आणि जंगलाच्या दिशेने सुटायचे. पहाटे पहाटे कुठेतरी डेरा टाकुन मस्त फोटो काढायचे. मग साधारण दुपारी मिसळपावखायचा, मस्त गार गार पाणी पिउन ताणुन द्यायची. संध्याकाळी परत कुठल्यातरी टेकडीवर जाउन सुर्यास्त बघायचा, तिथेच तंबु टाकून मस्त रात्री तारे बघत बघत झोपायचे. बास..... दिवस असावा तर असा. डोक्याला त्रास नाही कोणाचाच.... , कशाचाच... :) -- ध्रुव

In reply to by ध्रुव

विसोबा खेचर 21/01/2008 - 12:42
ध्रुवा, तुझा दिवस आपल्याला आवडला, एकदम पसंद पडला. मस्त रंगवला आहेस.... साला, माझ्या कल्पनेतील दिवस कॅन्सल करून तुझ्यासोबत तुझ्या कल्पनेतल्या दिवसात एखाददा रमीन म्हणतो! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ध्रुव 21/01/2008 - 12:56
असे किती तरी दिवस मनात घर करुन आहेत. कोकणात जायचे, सकाळी समुद्रावर लोळायचे, मग अंघोळ करायची मस्त आमरस हाणायचा, दुपारी छान बाहेरच्या झोपाळ्यावर पडी टाकायची. काहीच करायचे नाही, नुसते बसायचे... :) अरे एक ना दोन.... किती आणि काय काय करु असे वाटते. पण लगेच लक्षात येते की हे करायचे असेल तर त्याला लागणारे कष्ट नको का करायला. आणि मग कामाला लागायचे. :) -- ध्रुव

धमाल मुलगा 21/01/2008 - 16:52
तात्या, एकदम गुलछबु आईडियाची कल्पना आहे हा॑! मी आपला मस्त सक्काळी सक्काळी गाडी काढून पुर॑दर पायथ्याला जाईन. त्यान॑तर पैलेझूट काम म्हणजे तिथली मिसळपाव (डबल तर्री आन् हिरव्या मिरच्या यक्श्ट्रा) चापून, सरळ गड चढायला सुरूवात करेन. निवा॑त हव॑ तिथे भटकून शेवटी केदारेश्वराच्या गारगार पि॑डीवर डोक॑ ठेऊन स्वतः गारगार होईन. आणि मग तिथेच बाहेर, डबा खायचा. कड्याच्या टोकाशी उभ॑ राहून स्वतःलाच हाका मारयच्या, अन् त्या॑चा एको (मराठी ?) ऐकून परत ओरडायच॑, शेवटी थकून गडमाथ्यावरच्या भन्नाट वा-यात आणि भवतालच्या ढगा॑त पडून रहायच॑...अगदी ह्या जगात आपणच फक्त एकटे असल्यासारख॑ !!! अ॑धार पडता-पडता घरी परत, वर मुजोरी करत आईला चहा-पोह्या॑ची आर्डर सोडून पुल. नाहीतर सु.शी. वाचत पडायच॑ !!!!!! मोबाईल बिबाईल ब॑द करून पार उशीखाली...चुकून केकाटलाच तरी कोणाला ऐकू नको जायला. आsss हा... स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच काय? मरुदे तो "PM" आन् बसूदे तो "Client" बो॑बलत. -(भटक्या) धमाल.

चतुरंग 22/01/2008 - 09:13
सकाळी सकाळी 'रुपाली'त २ प्लेट गरमागरम उप्पीट चेपणे, नंतर फक्कडसा चहा. घरी येऊन झकासपैकी आण्णांचे अभंग सोडायचे. मग बाकी आन्हिके आटपणे. नंतर निवांत वाचत, गाणी ऐकत बसणे. दुपारी छानसा वरण-भात-तूप-मीठ-लिंबू असा वाफाळता बेत! (च्यायला, तोंडाला पाणी सुटलं!) हलकीशी वामकुक्षी झाल्यावर डेक्कनला जाऊन इराण्याचा चहा (कॅफे सनराइ़ज, ते त्या चहात काय घालतात हे मला न उलगडलेलं एक कोडं आहे, आपला चहा कधीच तसा होत नाही!) मग तशीच स्वारी चांगल्या पुस्तकाच्या दुकानात. भरपूर पुस्तके चाळणे, मनाजोगी असली तर विकत घेणे. नंतर मित्रांना जमवून डेरा टाकणे. मनसोक्त गप्पा झाल्यावर नवीन कुठल्या हॉटेलात धाड मारायची ते ठरवून हल्ला बोल. भरपेट जेवण, नंतर छानसं पान. मग पुन्हा एकदा गप्पांचा अड्डा. जाम झोप यायला लागली की मगच घरी. (आ हा हा....क्या बात है - कधी जमेल असं!!) किंवा - सकाळी सकाळी - बॅकपॅक, कॅमेरा, पाणी, गॉगल, दुर्बीण - गाडी खडकवासल्याकडे. तिथला जलाशय बघून तसाच सिंहगड पायथा. मि.पा.चापून गडावर स्वारी. जराशी धुक्याची सकाळ असेल तर गडावर अप्रतीम दृश्य दिसतं. (मागं एकदा भर पावसाळ्यात गेलो होतो तेव्हा लांबून पाऊस येताना बघितला होता - ते दृश्य चकित करणारं असतं - ५-१० मैलावरुन पाऊस असा सरकत-सरकत आपल्यापाशी येतो आणि बघताबघता आपल्याला कवेत घेतो. फारच भन्नाट!) संध्याकाळच्या सुमारास घरी - अशा ठिकाणी जाऊन आलं की बाकी शहरी गोष्टी तुच्छ वाटतात त्यामुळे घरी. निवांत आमटी भात चापून पुलंची व्यक्तिचित्रे ऐकत निद्रादेवीच्या आधीन! स्वाती तुझ्या ह्या एका कल्पनेमुळे माझी ही मानसिक सफर तरी पूर्ण झाली - शतशः धन्यवाद! चतुरंग

स्वयम्भू 22/01/2008 - 22:23
मझे मला हवे तसे दीवस मी भरपुर जगलोय. पण पुन्हा सन्धी मीळाल्यास ह्यात्ला इथे नमूद करतोय तो एक दीवस मला पुन्हा जगय्ला आवडेल. भल्या पहाटे ऊठाय्च आणी बाईक काढून माझ्या सर्वात आवडत्या रोड वर नीघाय्च. हा रोड म्हनजे जुना मुम्बई - पुणे महामार्ग. अप्रतीम रस्ता आहे हो. आणी वीक डेज ना तर ह्या रस्त्यावर चीट्पखरूही नसतं. चहुकडे हीरवा नीसर्ग, झकास वेडी वाकडी वळणं, मस्तं रस्ता. अशी मजा येते की सन्गता सोय नही. मुम्बई - पुणे महामार्गाला लागायच्या आधी अवर्जून करय्ची गोष्ट म्हणजे पनवेल ला दत्त स्नेक्स इथे चरणे. इथली तरी मारलेली मीसळ खाउन जीव त्रुप्त झाला (जो कधी होत नाहीच) की मग त्यावर अजुन १-२ वडा पाव आणी सबूदाण्याची खीचडी चापयची म्हणजे लोनावळा येइ पर्यन्त भूक लागत नही. पोटोबा भरला की मग त्या वर चहा आणी सीगारेट म्हणजे ब्रह्मानन्दी टाळीच. मग प्रवसाला सुरुवात कराय्ची. उगाच वेगात जाय्च नही. ५०-६० च्या वेगात, नीसर्गाच सौन्द्र्य डोळ्यात साठवत साठवत प्रवास कराय्चा. जर फार लवकर नीघाला असाल तर सुर्यदेव अवतरताना बघायला मीळतील. वारा चेहेर्यावर घेत घेत लोणावळ्याला पोचाय्च. तीथे जास्त वेळ दवडाय्चा नाही. उभ्या उभ्याच चोकोलेट फज चापाय्च, थोडा वाटण्यासाथी वीकत घ्यय्च नी परत फीराय्च. परतीचा प्रवास मत्र न थम्बता कराय्चा. (अश्यानी दुपार्च्या झोपाय्च्या वेळे पर्यन्त घरी पोचता येत.) सधाराण मुम्बई ला पोचे पर्तन्त १२ वजलेले असतात. त्या नन्तर तडक कुलाबा मधल्या केफे मोन्डेगार मध्ये जाय्च, एक झक्कस गारेगार बीयर घशाखली उतरवाय्ची. अत्मा त्रुप्त झाला की मग जेवणा साठी वळाय्च बेलर्ड पीअर मधल्या केफे ब्रीटानीया कडे. इथल्या सर्खा अन्डा मसाला आणी केरेमल कस्डर्ड जगात कुठेही मीळत नही. इथे चापून झाल की मग तड्क घरि पोचय्च. (सधारण सडे चार वाजलेले असतात) आणी हो, वाटेवर ग्रान्ट रोड ला मेरवान मधून मावा केक पार्सल घ्यायला वीसरू नका. घरी पोचल की मग सरळ तणून द्यय्ची. सात ला वगेरे उठाय्च. कट्टयावर जाय्च नी परत याय्च. घरी आल की आई च्या मागे लगून तीला भात, कान्द्याची आमटी, बटट्याची सुकी भाजी, कान्दा भजी नी त्या सोबत तकातले पोह्याचे पापड असा बेत कराय्ला लवाय्चा. आणी ह्या सगळ्याचा यथेच्छ समाचार घेउन मग शेवटी नीद्रा देवी ची आराधना सुरु कराय्ची. असा दीवस मी लवकरच पुन्हा एक्दा जगेन. आपला, स्वयंभू

केशवराव 28/01/2008 - 17:19
स्वाती, ' मला पंख असते तर.....' टाईप कल्पना रम्य निबंध लिहील्यागत लिहीत नाही. महिन्यातून १ दिवस या साठी रिक्त ठेवतो. भल्या सकाळी [५.३०-६.००] 'कॅलीबर क्रोमा' [हमारा बजाज] काढायची , किक मारली कि १०० -१२५ कि.मी. रपेट. [ वय वर्षे ६० ] अलीबागहुन रायगड, लोणावळा,कर्जत,शिवथर घळ ,मुरूड असे भटकायचे. कुणी बरोबर आले तर ठिक नाहितर अकेला! [पुर्वी आमच्या बाईसाहेब नक्की यायच्या ,आता तिला नाही जमत.] बरोबर वॉकमन; सतार, सरोद, बासरी च्या केसेटस . पाण्याची बाटली, कॅमेरा, बायनॉ. बस! वेगवेगळ्या ठिकाणची जेवणे, मिसळ पाव, बटाटे वडे, कांद्याची भजी ई. झोडायचे. मुरूडला गेलो तर मस्त ताडी / माडी आणि शहाळ्याचे पाणी प्यायचे. खुप संगीत ऐकायचे .[ आनि हो.. मोबाईल बंद .] संध्याकाळी परत. दुसर्‍या दिवशीच्या कामासाठी सज्ज !

In reply to by केशवराव

गिरिजा 31/05/2008 - 18:09
छानच..
वेगवेगळ्या ठिकाणची जेवणे, मिसळ पाव, बटाटे वडे, कांद्याची भजी ई.
आणि
शहाळ्याचे पाणी प्यायचे. खुप संगीत ऐकायचे .[ आनि हो.. मोबाईल बंद .]
तर सहीच्चे!! -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

प्राजु 29/01/2008 - 01:14
कोकणांत समुद्र दिसेल अशा ठीकाणी घर बांधायचं स्वप्न आहे माझं. आजूबाजूला १-२ आंबा, नारळ, काजू.. इ. (हे जर पूर्ण झाले असेल तर) मी सकाळी लवकर उठून तडक कोकणांत जाईन ( बरोबर कोणी नको, नवरा सुद्धा..!). माझी दोन्ही कुत्री आणि मांजर सोबत घेईन नक्की. त्यांच्यासोबत .. मनसोक्त समुद्रावर हिन्डेन. वाचायला भरपूर पुस्तके, ऐकायला सुंदर गाणी. आणि प्रत्येक वेळी फुल मग भरून चहा.. मग दुपारी, तिथेच कोकणातली फणसाची भाजी, तांदूळाची भाकरी, ताक, कोकमचं सरबत. आणि त्या जाड्या उकड्या तांदळाचा भात, कुळथाचं पिठलं, नाचणीचा पापड, किंवा भाजलेली सालपापडी. वा.. वा... क्या बात है. संध्याकाळी, चिकन किंवा माशाचं जेवण. माझ्यासोबत माझं मांजर आणि कुत्री यांचीही चैन. रात्री अंगणात बाजल्यावर चांदणं पहात निवांत झोप. काय हवं अजून??? स्वाती, मरताना यमराजाने जरी मला शेवटची इच्छा विचारली तरी मी त्याच्याकडे असाच एक दिवस मागून घेईन. - (कोकणी) प्राजु

In reply to by प्राजु

ध्रुव 29/01/2008 - 12:07
मरताना यमराजाने जरी मला शेवटची इच्छा विचारली तरी मी त्याच्याकडे असाच एक दिवस मागून घेईन. अगं, पण याची वाट बघण्यापेक्षा काहीतरी (वेळ) प्लॅन करून आधीच आपल्या इच्छा पुर्ण करुयात :) -- ध्रुव

किशोरी 29/01/2008 - 13:16
मस्त सकाळी आवरुन पॅराग्लायडींग,वॉटर-स्पोर्टस असतील तिथे जाऊन आकाशात उडायच,पाण्यात खेळायच धमाल करायची मग दुपारी मित्रपरिवाराबरोबर थालीपीठ,मसालेभात अस अस्सल मराठी जेवण वेळ मिळालाच तर एखाद्या डान्स क्लासला जाऊन नवीन डान्स प्रकार शिकायचा मग एखाद्या बोटीवर जायच,छान २-३ तास एकटेच बोटीवर मस्त गाणी ऐकत निसर्गाचा आस्वाद घ्यायचा मन अगदी शांत होऊन जाईल,दिवसभर मुक्त जगायच कशाचीही पर्वा न करता (दुसरया दिवशी काम..नको) एक दिवस जरा कमी पडतो आहे,स्वातीजी अजुन जरा एक-दोन दिवस वाढवा ना!!!!

इनोबा म्हणे 29/01/2008 - 15:41
डोंगर दर्‍यांमधे मी जास्त रमतो. कारण तिथे एकांत जास्त मिळतो.... माझी इच्छा आहे जगातल्या कोणत्यातरी एका कोपर्‍यात जिथे माणूस नावाचा प्राणी शोधून ही सापडायचा नाही अशा ठिकाणी रहावे. डोंगर दर्‍यांमधे,झाडा झूडपांमधे अगदी नैसर्गीक जिवन जगावे. समाजाचे किचकट नियम नको आणि प्रपंचातली ओढाताण नको. मी आणि फक्त मीच... मनसोक्त उनाडक्या कराव्या... पक्ष्यांचा कलकलाट, झाडांचे सळसळणे आणि नदीच्या खळखळाटातले संगीत मनसोक्त ऐकावे...आणि हवे तेव्हा,हवे तिथे ताणून द्यावी. (रानरेडा) -इनोबा

नि३ 31/05/2008 - 14:42
तो दीवस.....मला माझ्या गावी ..माझ्या घरी घालवायला आवडेल त्या दीवशी मी.. सकाळी ५.०० वाजता उठेल ..आईची देवघरात पुजा सुरु झालेली असणार त्या माऊलीचे ते थोडे देवमंत्र ऐकुन .. थंड-गरम मीश्रीत पाण्याने आंघोळ करुण ताजेतवाने होईल..नंतर आईच्या हातचे गरमागरम पराठे आणी पोळ्यांच। चुरा त्यावर एक ईलायची ,अद्रक आणी नीव्वळ दुधाची अशी एक पेलाभर चाय असा नाष्टा करुन आजोंबासोबत शेतीवीषयक गप्पा करत मराठी लोकमत पेपर वाचत बसायचे.. तेवढ्यात माझे खास मीत्र अज्या(खोंडीन),सतीश(बाबा),उम्या,अभी(कानपुरी),गोलु(ढ्क्कण) हातात बॅट आणी टेनीस बॉल घेऊन तयार अरे नितिन चल लवकर यार मॅच चा टाईम झाला ....अरे आलो चलो... त्या वीशाल टीम बरोबर मॅच ना आपली आज त्यांना कोनत्याही हालतीत धुळ चारवायची बघ ....मस्त २-३ तास मॅच झाली की आईच्या हातचे माझे आवड्ते जेवण ..गरमागरम रोडगे ..मीसळ दाळ ..लींबु ..कोथींबीर .पापड ..लोणचे आणी गुलाब जामुण आहाहा......... नंतर ( झोपायचे छे.. माझ्या त्या आवड्त्या एका दीवसातला एक्..एक क्षण मह्त्वाचा त्यात माझे मौल्यवाण ३-४ तास झोपेत वाया घालवायचे ??कदापी नाही) सु.शीं च एखाद मी न वाचलेल कींवा जाई अथवा दुनियादारी हे पुस्तक वाचत बसायचे.... संध्याकाळी ५ च्या दरम्यान मोटारसायकल बाहेर काढावी आणी मस्त निसर्गाचा आनंद घेत शेतात पोचावे ...संपुर्ण शेतात गच्च भरुन आलेली संत्र्याची झाडे बघत पुर्ण शेतात एक चक्कर मारावी ....... ७.०० -७.३० वाजता बाजारात जावे ... तेथे ठरल्याप्रमाणे एक -एक मित्र जमा होत राहील तोपर्यंत असलेल्यांबरोबर एक चहा मारायचा साधारण ८.०० वाजता सर्व जमा झाले की बाईक्स घेऊन नीघाली स्वारी गावाबाहेरच्या ढाब्यावर .... रेसींग करत ...गाड्या पळवायच्या ताकदीने .... ढाब्यावर गप्पा ,चर्चा ,जोक्स(नॉन व्हेज )नुसती धमाल , ऑर्डर ... १० कींगफीशर , २ ओल्ड मंक ,२ बॅगपायपर ,४ सोबत मसाला पापड ,चणे,भजे,खारा.... काजु करी ,दाल तड्का,कोल्हापुरी करी,पनीर बटर मसाला,पालक पनीर,नान ,तंदुर रोटी.... जेवन झाले की एक चमन चटनी पान ,मीठा पान............. आनी नंतर ...एक छानशी ...मंद वेगात मोटरसायकल वरन थोडादुर्.ट्रीप..तेथुन परत फिरून ...थेट घरी बीछ्यानात............... ह्म्म्म्म्म ---नितिन. (पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)

मन 31/05/2008 - 16:03
मस्त एका आडरानातल्या शांत्-प्रसन्न मंदिरात येणारे अज्ञात बासरीचे सूर ऐकत होइन भेभान. मग होइन एक मांजर, जाउन पुन्हा एकदा आईला छळणार, दुधा-दह्याची भांडी उपडी करणार. ती मला पकडायला धावणार (खरोखरचं मांजर समजुन) आणि अचानक मूळ रुपात प्रकट होउन धमाल उडवुन देणार. मग मी होइन अदृश्य आणि जाइन बॉसच्या घरी, शिंचा तो सदैव खार खाउन का असतो, ते शोधीन. ह्याच्या पर्सनल लाइफ मध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे ते शोधीन. मग होइन मी एक पोपट् हिरवेगार पंख, लालचुटुक ओठ असलेला पोपट. मुक्त, स्वच्छंद पोपट्. अजुन कधीही पिंजर्‍यात न आलेला पोपट. उंचावरुन उडाताना, माणसं छोटी छोटी दिसताना नक्की वाटतं कसं ते पाहिन. एखाद्या उंच दरिच्या मधोमध स्वैर उड्ण्याची मजा घेइन. अल्गद अधांतरी तरंगत राहेन कित्येक वेळ. मग हळुच घुसेन मा. अण्णांच्या(पं भीमसेन ह्यांच्या) घरात. एकांतात करत असलेला त्यांचा सराव नक्की असतो कसा, ते ऐकुन कान तृप्त करुन घेइन. जाता जाता, अदृष्य रुपानं थेट मैदानात उतरुन ऐन बहरात असलेला सचिन कशी फटकेअबाजी करतो, ते थेट मैदानात उतरुन पाहिन. अगदि त्याच्या बाजुला उभं राहुन! आणि मग जाइन मी माझ्या ग्यानबा नाय तर तुकोबा कडं . तल्लिन होणं कशाला म्हणतात, त्याची अनुभुती घेइन. तल्ल्लिन होइन्.आणि होउन जाइन लुप्त. अरेच्चा! दिवस कसला, आयुष्यच संपलं कि ह्या इच्छात! अरेच्चा! दिवस कसला, आयुष्यच पुर्ण झालं कि ह्या इच्छात! बस्स.......... फार हावरट नाही.इतकच हवय. आपलाच, मनोबा

विसोबा खेचर 31/05/2008 - 16:24
मग हळुच घुसेन मा. अण्णांच्या(पं भीमसेन ह्यांच्या) घरात. एकांतात करत असलेला त्यांचा सराव नक्की असतो कसा, ते ऐकुन कान तृप्त करुन घेइन. वा! सुंदर...!

मदनबाण 31/05/2008 - 16:58
तल्लिन होणं कशाला म्हणतात, त्याची अनुभुती घेइन. तल्ल्लिन होइन्.आणि होउन जाइन लुप्त. व्वा हे फार आवडल..... (तल्लिन होण्यास आतुर) मदनबाण.....

शितल 31/05/2008 - 20:03
माझ्या जवळच्या मैत्रीणि बरोबर कुणकेश्वरला जाईन तीच्याशी मस्त गप्पा टप्पा, स्॑दीप खरे या॑ची गाणी सतत कानाला सुखावतील अशी व्यवस्था करून समुद्र किनार्‍यावर पहाटेच जाईन आणि मनसोक्त लाटा पहात बसेन,मला लाटा॑चा आवाज खुप आवडतो. आणि तेथुन जवळच असलेल्या शिव म्॑दीराच्या घ॑टेचा निनाद ऐकत वाळु तुन शिप॑ले गोळा करत दुपार पर्यत राहीन, परत घरी येऊन मस्त आ॑बा, फणस, चुलीवर भाजलेले काजु आणि गरम गरम ता॑दळाचे उकडीचे मोदक खाईन आणि परत समुद्र किनार्‍यावर अगदी सुर्य मावळल्या न॑तर ही चा॑दणे दिसेस पर्यत राहीन.

गणा मास्तर 01/06/2008 - 09:00
मी आपला मस्त सक्काळी सक्काळी गाडी काढून पुर॑दर पायथ्याला जाईन. त्यान॑तर पैलेझूट काम म्हणजे तिथली मिसळपाव (डबल तर्री आन् हिरव्या मिरच्या यक्श्ट्रा) चापून, सरळ गड चढायला सुरूवात करेन. निवा॑त हव॑ तिथे भटकून शेवटी केदारेश्वराच्या गारगार पि॑डीवर डोक॑ ठेऊन स्वतः गारगार होईन. आणि मग तिथेच बाहेर, डबा खायचा. कड्याच्या टोकाशी उभ॑ राहून स्वतःलाच हाका मारयच्या, अन् त्या॑चा एको (मराठी ?) ऐकून परत ओरडायच॑, शेवटी थकून गडमाथ्यावरच्या भन्नाट वा-यात आणि भवतालच्या ढगा॑त पडून रहायच॑...अगदी ह्या जगात आपणच फक्त एकटे असल्यासारख॑ !!! अ॑धार पडता-पडता घरी परत, वर मुजोरी करत आईला चहा-पोह्या॑ची आर्डर सोडून पुल. नाहीतर सु.शी. वाचत पडायच॑ !!!!!! मोबाईल बिबाईल ब॑द करून पार उशीखाली...चुकून केकाटलाच तरी कोणाला ऐकू नको जायला. आयला माझ्या मनातले लिहिलय. माचीवरुन बोंबा ठोकल्या की वज्रगड उर्फ रुद्रमाळावरून मस्त प्रतिध्वनी ऐकू येतो!!! पावसाळा असेल तर आणखीनच झकास. जाताना कात्रज घाटातुन जायचे आणि येताना दिवे घाटातुन यायचे.

ऋचा 02/06/2008 - 10:37
बाईक काढायची पाण्याची बाटली घ्यायची आणि कोणतही ठीकाण न ठरवता नुसतं भटकत रहायचं.... भुक लागली की खायच आणि पुढे जायचं

सुनील 19/01/2008 - 00:26
सकाळी फर्मास चहा बनवून घेईन आणि मग एखादे छानसे पुस्तक घेऊन वाचेन. नंतर महाजालावर थोडी टिचका-टिचकी करेन. दुपारच्या जेवणासाठी एखादी फर्स्ट्-क्लास पाककृती बनवून फस्त करेन. त्यांनंतर वामकुक्षी साठी अर्धा तास म्हणून पडेन आणि दोन्-एक तासांनी उठेन. संध्याकाळी एक फेरफटका मारून आल्यावर, रात्रीच्या जेवणासाठी पुन्हा एखादी डिश बनवेन. मग त्या डिशला साजेशी वारूणी बरोबर घेऊन त्या डिशचा आस्वाद घेईन. शेवटी, टीव्ही वर एखादा डोक्याला ताप न देणारा कार्यक्रम बघत झोपून जाईन. (स्वच्छंदी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर 19/01/2008 - 00:28
तुम्हाला कुणी हे कर, ते कर असे म्हणणार नाही, काही काम सांगणार नाही अशावेळी तुम्ही काय कराल? सकाळी निवांतपणे उठेन. भरपेट नाष्टापाणी झाल्यावर झकासपैकी तानपुरा लावून तोडी किंवा रामकली किंवा कोमल रिषभ आसावरी ची मैफल जमवेन.. त्यानंतर मस्तपैकी थंड पाण्याने अंघोळ व नंतर ताज्या मासळीचं गरमागरम भरपेट जेवण. नंतर झकाससं तंबाखूपान व त्यानंतर गोविंदाचा एखादा मारामारी असलेला मसाला हिंदी चित्रपट! मग जरा तासभर झोप काढून मित्रमंडळींना जमवून मुलतानी पासून अगदी मारव्यापुरिया पर्यंतची मैफल जमवेन. मैफल आटपली की पुन्हा एकदा थंडगार पाण्याने अंघोळ, नंतर जरा दिवाबत्ती वगैरे करून रामरक्षा आणि थोडासा माफक पर्वचा! मग संध्याकाळी थोडंसं उशिरा, आवडत्या स्त्री सोबत सुखदु:खाच्या गप्पा मारत निवांतपणे दोन पेग विदेशी मद्य किंवा मग झक्कपैकी अत्तरबित्तर लावून,छानसे कपडे करून मुंबईतील एखाद्या कोठ्यावर विदेशी मद्याचे घुटके घेत घेत, सोबत हुक्का ओढत, जीव ओवाळून टाकावा अश्या एखाद्या तवायफेचं गाणं ऐकेन...! क्या बात है! साला दिवस असावा तर असा! खल्लास...:) आपला, (ऐय्याश!) तात्या.

ध्रुव 21/01/2008 - 12:39
एक दिवस सुट्टी आणि काहीही डोक्याला त्रास होणार नसेल तर... सकाळी सकाळी पहाटे उठुन मोटारसायकल काढायची. जवळच्या बॅगेमध्ये एक कॅमेरा, (पाण्याची) बाटली घ्यायची आणि जंगलाच्या दिशेने सुटायचे. पहाटे पहाटे कुठेतरी डेरा टाकुन मस्त फोटो काढायचे. मग साधारण दुपारी मिसळपावखायचा, मस्त गार गार पाणी पिउन ताणुन द्यायची. संध्याकाळी परत कुठल्यातरी टेकडीवर जाउन सुर्यास्त बघायचा, तिथेच तंबु टाकून मस्त रात्री तारे बघत बघत झोपायचे. बास..... दिवस असावा तर असा. डोक्याला त्रास नाही कोणाचाच.... , कशाचाच... :) -- ध्रुव

In reply to by ध्रुव

विसोबा खेचर 21/01/2008 - 12:42
ध्रुवा, तुझा दिवस आपल्याला आवडला, एकदम पसंद पडला. मस्त रंगवला आहेस.... साला, माझ्या कल्पनेतील दिवस कॅन्सल करून तुझ्यासोबत तुझ्या कल्पनेतल्या दिवसात एखाददा रमीन म्हणतो! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ध्रुव 21/01/2008 - 12:56
असे किती तरी दिवस मनात घर करुन आहेत. कोकणात जायचे, सकाळी समुद्रावर लोळायचे, मग अंघोळ करायची मस्त आमरस हाणायचा, दुपारी छान बाहेरच्या झोपाळ्यावर पडी टाकायची. काहीच करायचे नाही, नुसते बसायचे... :) अरे एक ना दोन.... किती आणि काय काय करु असे वाटते. पण लगेच लक्षात येते की हे करायचे असेल तर त्याला लागणारे कष्ट नको का करायला. आणि मग कामाला लागायचे. :) -- ध्रुव

धमाल मुलगा 21/01/2008 - 16:52
तात्या, एकदम गुलछबु आईडियाची कल्पना आहे हा॑! मी आपला मस्त सक्काळी सक्काळी गाडी काढून पुर॑दर पायथ्याला जाईन. त्यान॑तर पैलेझूट काम म्हणजे तिथली मिसळपाव (डबल तर्री आन् हिरव्या मिरच्या यक्श्ट्रा) चापून, सरळ गड चढायला सुरूवात करेन. निवा॑त हव॑ तिथे भटकून शेवटी केदारेश्वराच्या गारगार पि॑डीवर डोक॑ ठेऊन स्वतः गारगार होईन. आणि मग तिथेच बाहेर, डबा खायचा. कड्याच्या टोकाशी उभ॑ राहून स्वतःलाच हाका मारयच्या, अन् त्या॑चा एको (मराठी ?) ऐकून परत ओरडायच॑, शेवटी थकून गडमाथ्यावरच्या भन्नाट वा-यात आणि भवतालच्या ढगा॑त पडून रहायच॑...अगदी ह्या जगात आपणच फक्त एकटे असल्यासारख॑ !!! अ॑धार पडता-पडता घरी परत, वर मुजोरी करत आईला चहा-पोह्या॑ची आर्डर सोडून पुल. नाहीतर सु.शी. वाचत पडायच॑ !!!!!! मोबाईल बिबाईल ब॑द करून पार उशीखाली...चुकून केकाटलाच तरी कोणाला ऐकू नको जायला. आsss हा... स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच काय? मरुदे तो "PM" आन् बसूदे तो "Client" बो॑बलत. -(भटक्या) धमाल.

चतुरंग 22/01/2008 - 09:13
सकाळी सकाळी 'रुपाली'त २ प्लेट गरमागरम उप्पीट चेपणे, नंतर फक्कडसा चहा. घरी येऊन झकासपैकी आण्णांचे अभंग सोडायचे. मग बाकी आन्हिके आटपणे. नंतर निवांत वाचत, गाणी ऐकत बसणे. दुपारी छानसा वरण-भात-तूप-मीठ-लिंबू असा वाफाळता बेत! (च्यायला, तोंडाला पाणी सुटलं!) हलकीशी वामकुक्षी झाल्यावर डेक्कनला जाऊन इराण्याचा चहा (कॅफे सनराइ़ज, ते त्या चहात काय घालतात हे मला न उलगडलेलं एक कोडं आहे, आपला चहा कधीच तसा होत नाही!) मग तशीच स्वारी चांगल्या पुस्तकाच्या दुकानात. भरपूर पुस्तके चाळणे, मनाजोगी असली तर विकत घेणे. नंतर मित्रांना जमवून डेरा टाकणे. मनसोक्त गप्पा झाल्यावर नवीन कुठल्या हॉटेलात धाड मारायची ते ठरवून हल्ला बोल. भरपेट जेवण, नंतर छानसं पान. मग पुन्हा एकदा गप्पांचा अड्डा. जाम झोप यायला लागली की मगच घरी. (आ हा हा....क्या बात है - कधी जमेल असं!!) किंवा - सकाळी सकाळी - बॅकपॅक, कॅमेरा, पाणी, गॉगल, दुर्बीण - गाडी खडकवासल्याकडे. तिथला जलाशय बघून तसाच सिंहगड पायथा. मि.पा.चापून गडावर स्वारी. जराशी धुक्याची सकाळ असेल तर गडावर अप्रतीम दृश्य दिसतं. (मागं एकदा भर पावसाळ्यात गेलो होतो तेव्हा लांबून पाऊस येताना बघितला होता - ते दृश्य चकित करणारं असतं - ५-१० मैलावरुन पाऊस असा सरकत-सरकत आपल्यापाशी येतो आणि बघताबघता आपल्याला कवेत घेतो. फारच भन्नाट!) संध्याकाळच्या सुमारास घरी - अशा ठिकाणी जाऊन आलं की बाकी शहरी गोष्टी तुच्छ वाटतात त्यामुळे घरी. निवांत आमटी भात चापून पुलंची व्यक्तिचित्रे ऐकत निद्रादेवीच्या आधीन! स्वाती तुझ्या ह्या एका कल्पनेमुळे माझी ही मानसिक सफर तरी पूर्ण झाली - शतशः धन्यवाद! चतुरंग

स्वयम्भू 22/01/2008 - 22:23
मझे मला हवे तसे दीवस मी भरपुर जगलोय. पण पुन्हा सन्धी मीळाल्यास ह्यात्ला इथे नमूद करतोय तो एक दीवस मला पुन्हा जगय्ला आवडेल. भल्या पहाटे ऊठाय्च आणी बाईक काढून माझ्या सर्वात आवडत्या रोड वर नीघाय्च. हा रोड म्हनजे जुना मुम्बई - पुणे महामार्ग. अप्रतीम रस्ता आहे हो. आणी वीक डेज ना तर ह्या रस्त्यावर चीट्पखरूही नसतं. चहुकडे हीरवा नीसर्ग, झकास वेडी वाकडी वळणं, मस्तं रस्ता. अशी मजा येते की सन्गता सोय नही. मुम्बई - पुणे महामार्गाला लागायच्या आधी अवर्जून करय्ची गोष्ट म्हणजे पनवेल ला दत्त स्नेक्स इथे चरणे. इथली तरी मारलेली मीसळ खाउन जीव त्रुप्त झाला (जो कधी होत नाहीच) की मग त्यावर अजुन १-२ वडा पाव आणी सबूदाण्याची खीचडी चापयची म्हणजे लोनावळा येइ पर्यन्त भूक लागत नही. पोटोबा भरला की मग त्या वर चहा आणी सीगारेट म्हणजे ब्रह्मानन्दी टाळीच. मग प्रवसाला सुरुवात कराय्ची. उगाच वेगात जाय्च नही. ५०-६० च्या वेगात, नीसर्गाच सौन्द्र्य डोळ्यात साठवत साठवत प्रवास कराय्चा. जर फार लवकर नीघाला असाल तर सुर्यदेव अवतरताना बघायला मीळतील. वारा चेहेर्यावर घेत घेत लोणावळ्याला पोचाय्च. तीथे जास्त वेळ दवडाय्चा नाही. उभ्या उभ्याच चोकोलेट फज चापाय्च, थोडा वाटण्यासाथी वीकत घ्यय्च नी परत फीराय्च. परतीचा प्रवास मत्र न थम्बता कराय्चा. (अश्यानी दुपार्च्या झोपाय्च्या वेळे पर्यन्त घरी पोचता येत.) सधाराण मुम्बई ला पोचे पर्तन्त १२ वजलेले असतात. त्या नन्तर तडक कुलाबा मधल्या केफे मोन्डेगार मध्ये जाय्च, एक झक्कस गारेगार बीयर घशाखली उतरवाय्ची. अत्मा त्रुप्त झाला की मग जेवणा साठी वळाय्च बेलर्ड पीअर मधल्या केफे ब्रीटानीया कडे. इथल्या सर्खा अन्डा मसाला आणी केरेमल कस्डर्ड जगात कुठेही मीळत नही. इथे चापून झाल की मग तड्क घरि पोचय्च. (सधारण सडे चार वाजलेले असतात) आणी हो, वाटेवर ग्रान्ट रोड ला मेरवान मधून मावा केक पार्सल घ्यायला वीसरू नका. घरी पोचल की मग सरळ तणून द्यय्ची. सात ला वगेरे उठाय्च. कट्टयावर जाय्च नी परत याय्च. घरी आल की आई च्या मागे लगून तीला भात, कान्द्याची आमटी, बटट्याची सुकी भाजी, कान्दा भजी नी त्या सोबत तकातले पोह्याचे पापड असा बेत कराय्ला लवाय्चा. आणी ह्या सगळ्याचा यथेच्छ समाचार घेउन मग शेवटी नीद्रा देवी ची आराधना सुरु कराय्ची. असा दीवस मी लवकरच पुन्हा एक्दा जगेन. आपला, स्वयंभू

केशवराव 28/01/2008 - 17:19
स्वाती, ' मला पंख असते तर.....' टाईप कल्पना रम्य निबंध लिहील्यागत लिहीत नाही. महिन्यातून १ दिवस या साठी रिक्त ठेवतो. भल्या सकाळी [५.३०-६.००] 'कॅलीबर क्रोमा' [हमारा बजाज] काढायची , किक मारली कि १०० -१२५ कि.मी. रपेट. [ वय वर्षे ६० ] अलीबागहुन रायगड, लोणावळा,कर्जत,शिवथर घळ ,मुरूड असे भटकायचे. कुणी बरोबर आले तर ठिक नाहितर अकेला! [पुर्वी आमच्या बाईसाहेब नक्की यायच्या ,आता तिला नाही जमत.] बरोबर वॉकमन; सतार, सरोद, बासरी च्या केसेटस . पाण्याची बाटली, कॅमेरा, बायनॉ. बस! वेगवेगळ्या ठिकाणची जेवणे, मिसळ पाव, बटाटे वडे, कांद्याची भजी ई. झोडायचे. मुरूडला गेलो तर मस्त ताडी / माडी आणि शहाळ्याचे पाणी प्यायचे. खुप संगीत ऐकायचे .[ आनि हो.. मोबाईल बंद .] संध्याकाळी परत. दुसर्‍या दिवशीच्या कामासाठी सज्ज !

In reply to by केशवराव

गिरिजा 31/05/2008 - 18:09
छानच..
वेगवेगळ्या ठिकाणची जेवणे, मिसळ पाव, बटाटे वडे, कांद्याची भजी ई.
आणि
शहाळ्याचे पाणी प्यायचे. खुप संगीत ऐकायचे .[ आनि हो.. मोबाईल बंद .]
तर सहीच्चे!! -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

प्राजु 29/01/2008 - 01:14
कोकणांत समुद्र दिसेल अशा ठीकाणी घर बांधायचं स्वप्न आहे माझं. आजूबाजूला १-२ आंबा, नारळ, काजू.. इ. (हे जर पूर्ण झाले असेल तर) मी सकाळी लवकर उठून तडक कोकणांत जाईन ( बरोबर कोणी नको, नवरा सुद्धा..!). माझी दोन्ही कुत्री आणि मांजर सोबत घेईन नक्की. त्यांच्यासोबत .. मनसोक्त समुद्रावर हिन्डेन. वाचायला भरपूर पुस्तके, ऐकायला सुंदर गाणी. आणि प्रत्येक वेळी फुल मग भरून चहा.. मग दुपारी, तिथेच कोकणातली फणसाची भाजी, तांदूळाची भाकरी, ताक, कोकमचं सरबत. आणि त्या जाड्या उकड्या तांदळाचा भात, कुळथाचं पिठलं, नाचणीचा पापड, किंवा भाजलेली सालपापडी. वा.. वा... क्या बात है. संध्याकाळी, चिकन किंवा माशाचं जेवण. माझ्यासोबत माझं मांजर आणि कुत्री यांचीही चैन. रात्री अंगणात बाजल्यावर चांदणं पहात निवांत झोप. काय हवं अजून??? स्वाती, मरताना यमराजाने जरी मला शेवटची इच्छा विचारली तरी मी त्याच्याकडे असाच एक दिवस मागून घेईन. - (कोकणी) प्राजु

In reply to by प्राजु

ध्रुव 29/01/2008 - 12:07
मरताना यमराजाने जरी मला शेवटची इच्छा विचारली तरी मी त्याच्याकडे असाच एक दिवस मागून घेईन. अगं, पण याची वाट बघण्यापेक्षा काहीतरी (वेळ) प्लॅन करून आधीच आपल्या इच्छा पुर्ण करुयात :) -- ध्रुव

किशोरी 29/01/2008 - 13:16
मस्त सकाळी आवरुन पॅराग्लायडींग,वॉटर-स्पोर्टस असतील तिथे जाऊन आकाशात उडायच,पाण्यात खेळायच धमाल करायची मग दुपारी मित्रपरिवाराबरोबर थालीपीठ,मसालेभात अस अस्सल मराठी जेवण वेळ मिळालाच तर एखाद्या डान्स क्लासला जाऊन नवीन डान्स प्रकार शिकायचा मग एखाद्या बोटीवर जायच,छान २-३ तास एकटेच बोटीवर मस्त गाणी ऐकत निसर्गाचा आस्वाद घ्यायचा मन अगदी शांत होऊन जाईल,दिवसभर मुक्त जगायच कशाचीही पर्वा न करता (दुसरया दिवशी काम..नको) एक दिवस जरा कमी पडतो आहे,स्वातीजी अजुन जरा एक-दोन दिवस वाढवा ना!!!!

इनोबा म्हणे 29/01/2008 - 15:41
डोंगर दर्‍यांमधे मी जास्त रमतो. कारण तिथे एकांत जास्त मिळतो.... माझी इच्छा आहे जगातल्या कोणत्यातरी एका कोपर्‍यात जिथे माणूस नावाचा प्राणी शोधून ही सापडायचा नाही अशा ठिकाणी रहावे. डोंगर दर्‍यांमधे,झाडा झूडपांमधे अगदी नैसर्गीक जिवन जगावे. समाजाचे किचकट नियम नको आणि प्रपंचातली ओढाताण नको. मी आणि फक्त मीच... मनसोक्त उनाडक्या कराव्या... पक्ष्यांचा कलकलाट, झाडांचे सळसळणे आणि नदीच्या खळखळाटातले संगीत मनसोक्त ऐकावे...आणि हवे तेव्हा,हवे तिथे ताणून द्यावी. (रानरेडा) -इनोबा

नि३ 31/05/2008 - 14:42
तो दीवस.....मला माझ्या गावी ..माझ्या घरी घालवायला आवडेल त्या दीवशी मी.. सकाळी ५.०० वाजता उठेल ..आईची देवघरात पुजा सुरु झालेली असणार त्या माऊलीचे ते थोडे देवमंत्र ऐकुन .. थंड-गरम मीश्रीत पाण्याने आंघोळ करुण ताजेतवाने होईल..नंतर आईच्या हातचे गरमागरम पराठे आणी पोळ्यांच। चुरा त्यावर एक ईलायची ,अद्रक आणी नीव्वळ दुधाची अशी एक पेलाभर चाय असा नाष्टा करुन आजोंबासोबत शेतीवीषयक गप्पा करत मराठी लोकमत पेपर वाचत बसायचे.. तेवढ्यात माझे खास मीत्र अज्या(खोंडीन),सतीश(बाबा),उम्या,अभी(कानपुरी),गोलु(ढ्क्कण) हातात बॅट आणी टेनीस बॉल घेऊन तयार अरे नितिन चल लवकर यार मॅच चा टाईम झाला ....अरे आलो चलो... त्या वीशाल टीम बरोबर मॅच ना आपली आज त्यांना कोनत्याही हालतीत धुळ चारवायची बघ ....मस्त २-३ तास मॅच झाली की आईच्या हातचे माझे आवड्ते जेवण ..गरमागरम रोडगे ..मीसळ दाळ ..लींबु ..कोथींबीर .पापड ..लोणचे आणी गुलाब जामुण आहाहा......... नंतर ( झोपायचे छे.. माझ्या त्या आवड्त्या एका दीवसातला एक्..एक क्षण मह्त्वाचा त्यात माझे मौल्यवाण ३-४ तास झोपेत वाया घालवायचे ??कदापी नाही) सु.शीं च एखाद मी न वाचलेल कींवा जाई अथवा दुनियादारी हे पुस्तक वाचत बसायचे.... संध्याकाळी ५ च्या दरम्यान मोटारसायकल बाहेर काढावी आणी मस्त निसर्गाचा आनंद घेत शेतात पोचावे ...संपुर्ण शेतात गच्च भरुन आलेली संत्र्याची झाडे बघत पुर्ण शेतात एक चक्कर मारावी ....... ७.०० -७.३० वाजता बाजारात जावे ... तेथे ठरल्याप्रमाणे एक -एक मित्र जमा होत राहील तोपर्यंत असलेल्यांबरोबर एक चहा मारायचा साधारण ८.०० वाजता सर्व जमा झाले की बाईक्स घेऊन नीघाली स्वारी गावाबाहेरच्या ढाब्यावर .... रेसींग करत ...गाड्या पळवायच्या ताकदीने .... ढाब्यावर गप्पा ,चर्चा ,जोक्स(नॉन व्हेज )नुसती धमाल , ऑर्डर ... १० कींगफीशर , २ ओल्ड मंक ,२ बॅगपायपर ,४ सोबत मसाला पापड ,चणे,भजे,खारा.... काजु करी ,दाल तड्का,कोल्हापुरी करी,पनीर बटर मसाला,पालक पनीर,नान ,तंदुर रोटी.... जेवन झाले की एक चमन चटनी पान ,मीठा पान............. आनी नंतर ...एक छानशी ...मंद वेगात मोटरसायकल वरन थोडादुर्.ट्रीप..तेथुन परत फिरून ...थेट घरी बीछ्यानात............... ह्म्म्म्म्म ---नितिन. (पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)

मन 31/05/2008 - 16:03
मस्त एका आडरानातल्या शांत्-प्रसन्न मंदिरात येणारे अज्ञात बासरीचे सूर ऐकत होइन भेभान. मग होइन एक मांजर, जाउन पुन्हा एकदा आईला छळणार, दुधा-दह्याची भांडी उपडी करणार. ती मला पकडायला धावणार (खरोखरचं मांजर समजुन) आणि अचानक मूळ रुपात प्रकट होउन धमाल उडवुन देणार. मग मी होइन अदृश्य आणि जाइन बॉसच्या घरी, शिंचा तो सदैव खार खाउन का असतो, ते शोधीन. ह्याच्या पर्सनल लाइफ मध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे ते शोधीन. मग होइन मी एक पोपट् हिरवेगार पंख, लालचुटुक ओठ असलेला पोपट. मुक्त, स्वच्छंद पोपट्. अजुन कधीही पिंजर्‍यात न आलेला पोपट. उंचावरुन उडाताना, माणसं छोटी छोटी दिसताना नक्की वाटतं कसं ते पाहिन. एखाद्या उंच दरिच्या मधोमध स्वैर उड्ण्याची मजा घेइन. अल्गद अधांतरी तरंगत राहेन कित्येक वेळ. मग हळुच घुसेन मा. अण्णांच्या(पं भीमसेन ह्यांच्या) घरात. एकांतात करत असलेला त्यांचा सराव नक्की असतो कसा, ते ऐकुन कान तृप्त करुन घेइन. जाता जाता, अदृष्य रुपानं थेट मैदानात उतरुन ऐन बहरात असलेला सचिन कशी फटकेअबाजी करतो, ते थेट मैदानात उतरुन पाहिन. अगदि त्याच्या बाजुला उभं राहुन! आणि मग जाइन मी माझ्या ग्यानबा नाय तर तुकोबा कडं . तल्लिन होणं कशाला म्हणतात, त्याची अनुभुती घेइन. तल्ल्लिन होइन्.आणि होउन जाइन लुप्त. अरेच्चा! दिवस कसला, आयुष्यच संपलं कि ह्या इच्छात! अरेच्चा! दिवस कसला, आयुष्यच पुर्ण झालं कि ह्या इच्छात! बस्स.......... फार हावरट नाही.इतकच हवय. आपलाच, मनोबा

विसोबा खेचर 31/05/2008 - 16:24
मग हळुच घुसेन मा. अण्णांच्या(पं भीमसेन ह्यांच्या) घरात. एकांतात करत असलेला त्यांचा सराव नक्की असतो कसा, ते ऐकुन कान तृप्त करुन घेइन. वा! सुंदर...!

मदनबाण 31/05/2008 - 16:58
तल्लिन होणं कशाला म्हणतात, त्याची अनुभुती घेइन. तल्ल्लिन होइन्.आणि होउन जाइन लुप्त. व्वा हे फार आवडल..... (तल्लिन होण्यास आतुर) मदनबाण.....

शितल 31/05/2008 - 20:03
माझ्या जवळच्या मैत्रीणि बरोबर कुणकेश्वरला जाईन तीच्याशी मस्त गप्पा टप्पा, स्॑दीप खरे या॑ची गाणी सतत कानाला सुखावतील अशी व्यवस्था करून समुद्र किनार्‍यावर पहाटेच जाईन आणि मनसोक्त लाटा पहात बसेन,मला लाटा॑चा आवाज खुप आवडतो. आणि तेथुन जवळच असलेल्या शिव म्॑दीराच्या घ॑टेचा निनाद ऐकत वाळु तुन शिप॑ले गोळा करत दुपार पर्यत राहीन, परत घरी येऊन मस्त आ॑बा, फणस, चुलीवर भाजलेले काजु आणि गरम गरम ता॑दळाचे उकडीचे मोदक खाईन आणि परत समुद्र किनार्‍यावर अगदी सुर्य मावळल्या न॑तर ही चा॑दणे दिसेस पर्यत राहीन.

गणा मास्तर 01/06/2008 - 09:00
मी आपला मस्त सक्काळी सक्काळी गाडी काढून पुर॑दर पायथ्याला जाईन. त्यान॑तर पैलेझूट काम म्हणजे तिथली मिसळपाव (डबल तर्री आन् हिरव्या मिरच्या यक्श्ट्रा) चापून, सरळ गड चढायला सुरूवात करेन. निवा॑त हव॑ तिथे भटकून शेवटी केदारेश्वराच्या गारगार पि॑डीवर डोक॑ ठेऊन स्वतः गारगार होईन. आणि मग तिथेच बाहेर, डबा खायचा. कड्याच्या टोकाशी उभ॑ राहून स्वतःलाच हाका मारयच्या, अन् त्या॑चा एको (मराठी ?) ऐकून परत ओरडायच॑, शेवटी थकून गडमाथ्यावरच्या भन्नाट वा-यात आणि भवतालच्या ढगा॑त पडून रहायच॑...अगदी ह्या जगात आपणच फक्त एकटे असल्यासारख॑ !!! अ॑धार पडता-पडता घरी परत, वर मुजोरी करत आईला चहा-पोह्या॑ची आर्डर सोडून पुल. नाहीतर सु.शी. वाचत पडायच॑ !!!!!! मोबाईल बिबाईल ब॑द करून पार उशीखाली...चुकून केकाटलाच तरी कोणाला ऐकू नको जायला. आयला माझ्या मनातले लिहिलय. माचीवरुन बोंबा ठोकल्या की वज्रगड उर्फ रुद्रमाळावरून मस्त प्रतिध्वनी ऐकू येतो!!! पावसाळा असेल तर आणखीनच झकास. जाताना कात्रज घाटातुन जायचे आणि येताना दिवे घाटातुन यायचे.

ऋचा 02/06/2008 - 10:37
बाईक काढायची पाण्याची बाटली घ्यायची आणि कोणतही ठीकाण न ठरवता नुसतं भटकत रहायचं.... भुक लागली की खायच आणि पुढे जायचं
पेशवे बाजीराव तिसरे यांच्या "एकांत"कवितेवरून मनात एक विचार आला. खरेच माणसाला या धक्काधक्कीच्या जीवनात एक दिवस दिला आणि त्याला सांगितले तुला काही हवे ते तू कर... हा दिवस तुझा एकट्याचा. तुम्हाला कुणी हे कर, ते कर असे म्हणणार नाही, काही काम सांगणार नाही अशावेळी तुम्ही काय कराल? तुमची राहिलेली कामे, इच्छा पुर्ण कराल? कि एकांत पणाचा कंटाळा येईल? मला अशावेळी वॉकमन मधून (इतरांना त्रास होऊ नये म्हणून) कोणत्याही प्रकारचे संगीत ऐकायला आवडेल.

माझ्याकडेही कार आहे?

देवदत्त ·

मुक्तसुनीत 15/01/2008 - 01:23
तंत्रज्ञानामुळे एखादी गोष्ट पूर्वी ज्याना परवडत नव्हती त्याना परवडायला लागली , म्हणून तुमचा त्या गोष्टीतला आनंद कमी का व कसा होतो हे कोडे काही मला उलगडले नाही. तुम्हाला "माझी गाडी आहे" असे म्हणावेसे वाटते आणि आपल्या स्वतःच्या गाडीचा आनंद घ्यावासा वाटतो यात काहीच गैर नाही. पण केवळ तीच गाडी रिक्षावाल्याना परवडते म्हणून "धक्का बसत" असेल तर तुमच्या मानसिकतेकडे एकदा तुम्ही फिरून पहायला हवे ; नाही का ? मोबाईल, कार या गोष्टी सर्वसामान्याना सहज उपलब्ध होतात याचा अर्थच "टेक्नॉलॉजी ऍट वर्क" असा आहे. पण ही तर केवळ अगदी छोटीशी सुरवात आहे. खरा विकास तेव्हा होईल जेव्हा पायाभूत सुविधा सर्वाना सहज मिळतील; परवडतील. तशा त्या मिळायला लागल्या तर आपल्या स्वतःच्या "स्टेटस्"बद्द्ल तुम्हाला असुरक्षित वाटेल काय ?

देवदत्त 15/01/2008 - 01:59
तुमच्या मानसिकतेकडे एकदा तुम्ही फिरून पहायला हवे ; नाही का ? सहमत. मला असे वाटले म्हणुनच मी इथे लिहिले. आणखी एखाद्याचे मत कळेल. :) माझा आनंद कमी झाला असे नाही. मला गाडी घ्यावीशी वाटेल तेव्हा मी नक्कीच घेईन. बहुधा इंडिका किंवा नॅनोच घेईन. माझे म्हणणे असे नाही की ती रिक्षावाल्यांना परवडायला नको. तो मस्त फायदाच आहे. आधी ही टॅक्सी होत्या त्या प्रिमिअर पद्मिनीच्या होत्या. आताही आहेत. पण म्हणून कोणी त्या खाजगी वापरात घेणे बंद नाही केले. मलाही तसे नाही वाटले. मी हे लिहिले त्याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट नेहमीची झाली तर मग त्यात काही खास वाटत नाही. टेक्नॉलोजी चा फायदा मी ही भरपूर घेतोच. मला त्यात आनंदच वाटतो. (ह्यावर मी वेगळा लेख लिहिणारच आहे). फक्त आपण जे म्हणतो ना अरे ही गोष्ट तर काय आता सर्वांकडेच आहे त्यातला हा प्रकार आहे. :) तरी जरी बहुतेकांकडे कार आल्या आहेत तरी अजून ही कार घेणे हे बहुतेकांकरीता स्वप्नच आहे. ह्यातून मला वाटत नाही की मी काही वाईट किंवा विचित्र लिहिले आहे. असो, आपली प्रतिक्रिया ही बरोबरच आहे. फक्त मला हलक्या मानसिकतेचा न समजावे ही आशा. ;)

In reply to by देवदत्त

इनोबा म्हणे 15/01/2008 - 03:28
देवा! अगदी बरोबर बोललास ...आपल्याकडे लोकांना अशा सवयी आहेत हे खरे... मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा!तिळगुळ घ्या,गोड गोड लिहा... (डायबेटीस झाला तरी चालेल) -इनोबा

मुक्तसुनीत 15/01/2008 - 03:47
तुमच्या स्पष्टीकरणाकरिता धन्यवाद. माझा आक्षेप केवळ आपल्या सर्वांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेतील काही विसंगतींबद्द्ल होता. तुमचे लिखाण वाईट किंवा विचित्र आहे असे मी म्हण्टले नाही. व्यक्तिश: तुमची मानसिकता "हलकी" आहे असेसुद्धा मी कुठे सूचित केले नाही. धन्यवाद.

In reply to by मुक्तसुनीत

देवदत्त 15/01/2008 - 09:55
ही ही गैरसमज नाही आहे. मला माहीत आहे की ह्यातून काही विसंगती आढळते. हे विचार माझे म्हणून लगेच नाही आलेत. जे काही आधी ऐकले व अनुभवातून पाहिले त्याचे हे एक रूप. :)

नंदन 15/01/2008 - 08:59
म्हणजे तुम्ही एकदा लाईफबोटवर आलात की इतरांनी येऊन तिथे गर्दी करु नये असे वाटणे (किंवा तसा प्रयत्न करणे). कुठल्याही गोष्टीप्रमाणेच जर हिचा अतिरेक झाला तर ती विकृतीत जमा होते हे जरी खरं असल; तरी आपलं 'पेशल स्टेटस'/वेगळेपणा कमी होणं याची बोच कुठेतरी माणसाला लागते हेही खरं. 'आजकाल जो उठतो तो ____' अशा स्वरुपाची वाक्यं (गाळलेल्या जागांत - डॉक्टर बनतो असं डॉक्टरांनी म्हणणं, अमेरिकेला येतो असं अनिवासी भारतीयांनी म्हणणं, सिंगापूर फिरून येतो असं दहा-वीस वर्षांपूर्वी तो दौरा करून आलेल्याने म्हणणं) याच गोष्टीची निदर्शक आहेत. अर्थात, यातून अशा वृत्तीचं समर्थन करावं किंवा प्रोत्साहन द्यावं हा हेतू नाही, पण 'फ्लेश इज वीक' असल्यानं मुक्तसुनीतांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या विचारप्रक्रियेत अशा विसंगती कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असतातच.तुम्ही या लेखांतून जशी ती प्रामाणिकपणे समोर मांडली ते कौतुकास्पद आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

देवदत्त 15/01/2008 - 15:23
यातून अशा वृत्तीचं समर्थन करावं किंवा प्रोत्साहन द्यावं हा हेतू नाही. समर्थन किंवा विरोध करण्याचा माझाही हेतू नाही. "आजकाल जो उठतो तो ____" ही ही... अहो मोबाईल ही त्याच वर्गात मोडला गेला आता.

विसोबा खेचर 15/01/2008 - 09:04
पण आज सकाळी सामना मध्ये बातमी वाचली की रिक्षा आणि नॅनो च्या किंमतीत, मायलेज मध्ये फारसा फरक नसल्याने व नॅनोमध्ये रिक्षापेक्षा जास्त जागा असल्याने रिक्षा संघटना टाटा नॅनो प्रवासी वाहतूकीस वापरण्याची परवानगी मिळण्याची मागणी करणार आहेत. मस्त कल्पना आहे...:) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नंदन 15/01/2008 - 09:06
असं झालं तर 'टाटा करुन आलो'चा अर्थ बदलेल की ;) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

या प्रवृत्तीचे वर्णन पु.ल. सुंदर करतात.. हल्ली काय पट्टेवाले सुधा कॉलेजात जातात.... हे ते वाक्य... पण काही म्हणा लो़कहो या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक गोष्टि शक्य झाल्या आहेत. तसेच भारताची धावती अर्थव्यवस्था अनेक लोकाना परदेशात जायची संधी देत आहे.. त्यामुळे पूर्वी मध्यमवर्गीय माणसाला अशक्य वाटणार्‍या लॅपटॉप आणि इतर अनेक गोष्टी आता घेणे शक्य झाले आहे.. अमेरीकेत या गोष्टी स्वस्त मीळतात ना... -(अमेरीकेत आलेले)पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

शिल्पा ब 23/07/2010 - 23:29
(अमेरीकेत आलेले)पुण्याचे पेशवे आपण अमेरिकेत आल्याची दाखल घेतली आहे. बाकि अमेरीकेत कुठे? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

स्वयम्भू 15/01/2008 - 15:39
तुम्हाला गाडी आवडली असेल तर घेउन टाका. ती गाडी भाडे-तत्वावर वापरली जाते का ह्याचा वीचार नका करू अन्यथा पन्चाईत होइल. कारण परदेशात टोयोटा कोरोल्ला पासुन ते मर्सीडीज बेन्झ पर्यन्त सगळ्या गाड्या टैक्सी म्हणून वापरल्या जातात. अहो चक्क वीमाने सुद्धा भाड्याने मीळतात, तीथे नॅनो चे काय घेउन बसलात. गाडी आवडली असेल तर घेउन टाका नी सहकुटुम्ब धमाल करा. आपला, स्वयंभू

In reply to by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

देवदत्त 15/01/2008 - 15:54
अहो, गाडी घ्यायची आहेच. त्या बातमीने गाडी घेण्याच्या इच्छेवर परिणाम होणार नाही. मी फक्त एक विचार लिहून दाखवला. नाही तर मला जगणे ही सोडावे लागेल. काय ते सर्वांसारखे जगणे म्हणून ;) (मी लेखाला सुरूवात केली होती ती अवांतर विचार म्हणून. तरीही त्यात गंभीरता आली. )

आपण जसं भाजीवाल्याकडून भाजी घेतल्यावर उरलेल्या पैशातून २-४ लिंब घेतो, तसचं आता ग्राहक टाटा सफारी वगैरे गाडी घेतल्यावर उरलेल्या पैश्यातून २-४ नॅनो विकत घेतील.

In reply to by चतुरंग

अभिज्ञ 24/07/2010 - 09:10
हे वाचायचे राहूनच गेले होते. एक से एक कार्टून्स आहेत. कार मधून भिक मागताना दाखवणारे कार्टून उच्च. अभिज्ञ.

आता यच्चयावत सगळ्या कार बनवणार्‍या कंपन्याना स्वस्त कार बनवण्याचे वेध लागतील. आपल्याकडे रस्त्यांची अवस्था पाहिल्यास, भविष्यातीला रस्तेजामला आतापासुन तयार व्हावे लागेल. संजय अभ्यंकर

सर्किट 16/01/2008 - 02:55
रिक्षावाल्यांनी नॅनो घेतली, तर तुम्ही रिक्षा घ्या ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मुक्तसुनीत 16/01/2008 - 04:15
अँथनी गोन्साल्विस च्या भाषेत ! "आपुन एक मारा , लेकिन साला सॉलिड मारा ना !" ;-)

In reply to by चित्रा

आमोद शिंदे 24/07/2010 - 10:14
पुण्यात बर्‍याच पेन्शनर काकांनी नॅनो घेतली आहे. सेवा निवृत्तीनंतर फंडातले पैसे मोजून एक नॅनो आणि त्यावर ड्रायवर असा मस्त बेत पुण्यातील काकांनी केलेला दिसतो.

हे वाचून मनात आले, जर ती परवानगी मिळाली तर जरी एखाद्याला स्वत:कडे कार असण्याची कामना पूरी होईल, पण वरील उदाहरणांप्रमाणे त्याच्या (माझ्याही) तथाकथित कार असण्याच्या गर्वाला त्याने धक्का जरूर बसेल. कार असावी अशी इच्छा असणे आणि ती पूर्ण करणे हे ठीक आहे. पण कार असणे यात गर्व वाटण्यासारखे काय आहे? कार घेणे हे एखादे महान कार्य तर नाहीये ना?

In reply to by अप्पा जोगळेकर

मितभाषी 24/07/2010 - 11:07
कार घेणे हे एखादे महान कार्य तर नाहीये ना? » >>>>> गाडीतील अ‍ॅशट्रे भरे पर्यंत गाडी बदलनार्‍या धनाढ्य लोकासाठी नसेलही पण एखाद्या सर्वसामान्य माणसासाठी तर स्वःतची चारचाकी घेणे निश्चितच आनन्दाची बाब असणार.

In reply to by मितभाषी

गाडीतील अ‍ॅशट्रे भरे पर्यंत गाडी बदलनार्‍या धनाढ्य लोकासाठी नसेलही पण एखाद्या सर्वसामान्य माणसासाठी तर स्वःतची चारचाकी घेणे निश्चितच आनन्दाची बाब असणार. +१. सहमत आहे. मी असं म्हटलं की त्यात गर्व वाटावा असं काही नाहीये. एखाद्याला चांगली सॅलरी मिळत असेल तर तीसुद्धा आनंदाचीच बाब आहे. अभिमानाची नव्हे. चांगली सॅलरी म्हणजे उच्च कोटीचे कर्तृत्व नव्हे.

In reply to by अप्पा जोगळेकर

मितभाषी 24/07/2010 - 12:16
तुमच्या दृष्टीने नसेलही. व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचे जिवनातील चैनीचे, गरजेचे, सुखाचे, स्टेट्स सिम्बॉलचे आडाखे वेगळे असु शकतात.

पाषाणभेद 24/07/2010 - 11:06
नैनो (तेच ते हो हिंदी भाषिक... निट उच्चारही करता येत नाही त्यांना... सुरेश ला सुरेस म्हणतात....शंकरला संकर म्हणतात....काय संकर करतात शंकरच जाणे...) तर नैनो .... आपली नॅनो म्हणायचं हो मला... आपलीच म्हणायची... कारण तिचा जन्म आपल्या पुण्यातच झाला ना? आता सासरी म्हणजे गुजरात मध्ये गेली म्हणून काय झाले? तर नॅनो ही कार आपल्याला काही परवडणार नाही. आपण तर बुवा मस्त रिक्षा घेणार. अहो नैनोमध्ये (ऐ गपे... मराठी शिकवू का?) सॉरी अहो नॅनोमध्ये किती माणसं बसतात? सांगा सांगा.. ४ च ना? म्हणजे १+३ ना? १ म्हणजे डायवर अन बाकी ३. बळजबरी केली तर १+४ चं पासिंग मिळेल तिला. आता आमची रिक्षा बघा. डायवर त्याच्या दोन्ही बाजूंना दोन जणं. हि झाली त्रिमुर्ती. म्हणजे आपले साक्षात दत्तगुरूच हो. मधला रिक्षावाला हा साक्षात महेश म्हणजे संकर म्हणजे शंकर हो. या रिक्शावाल्याचा स्वभाव अन शंकरभगवान यांचा स्वभाव एकदम खटकू. नगास नग. कधी काय होईल सांगता येत नाही. कधी हात दाखवून वळेल तर कधी तिसरा डोळा मारेल.. आपलं उघडेल.. भस्म हो साक्षात भस्म. जळून राखुंडी. कधी गांजा/ भांग पिलेले डोळे तर कधी सोमरस प्राशन. असो. तर रिक्षात पुढे ३ जण.. ग्रामिण भागात ५ जण. आता पुढे मोजा. मागे ४ जण बसतीलच. व्हा पुढेमागे. बसा खेटून. किती झाले? ७ की ९? अहो शहरी भागात ७. ग्रामिण भागात ९. पुढे मोजा. बच्चेकंपनी असेल तर मागे बाल्कनीत २ जण. सामानसुमान पायाशी. एखादी बॅग पुढे किक च्या हँडल जवळ. (काय कॉम्बीनेशन आहे. किक पायाची अन हँडल हाताचे.) नै.नॅनो अन रिक्षाचा अ‍ॅव्हरेज सारखाच. स्पिडही सारखाच. रिक्षात वेळीअवेळी पेट्रोलचा डोस देवून रॉकेलही चालू शकते. रिक्षा हवेशीर आहे. दार खिडकी नाही. खा अन पचाक. खा अन पचाक. खा अन पचाक. अरे बस कर बाबा. पार्किंग ला जागा कमी लागते. टर्नींग रेडीयस कमी. गल्लीबोळात जाता येते. रिक्षात लाखभर पैसे मळक्या पिशवीत ठेवले तर कुत्रेही हुंगत नाही. अन मुख्य म्हणजे ती पण आपल्या पुणे-३५ मध्येच तयार होते. बॉडी दणकट आहे. सरळ अंगावर घालता येते. गॅरेजचा खर्च कमी येतो. अ‍ॅक्शीलेटर वायर २५ रुपयात भेटते. आहे का तुमच्या नै..नॅनोचा पार्ट स्वस्त? टेप मस्त धकधक लावता येतो. झंकार नाय तर टकारा सर्कीट टाकल तर शकिराही नाचेल. वका वका. काही शक? मातीच्या मडक्यात नुसते स्पिकर ठेवा महाराज. घुंगरूही ऐकू येतील. रिक्षा चालवत असल्याने बाकीचे वाहनधारक सहसा नादी लागत नाही. लागलाच तर आवाज चढवता येतो. परमिट घेतले तर डबल बिजनेसही करता येतो. रिक्षाच्या हुडवर जाहिरात करता येते. आता तुम्ही सांगा त्या नै...नॅनोमध्ये आहेत काय एवढ्या सुविधा? अहो पोरीदेखील म्हणतात, "मला रिक्षावाला नवरा पायजे...मला रिक्षावाला नवरा पायजे..." म्हणून म्हणतो आम्ही तर एक्स्पोर्ट होणारी रिक्षाच घेणार. - पाभे (रिक्षावाला) The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by पाषाणभेद

बेभान 24/07/2010 - 21:06
|आता आमची रिक्षा बघा. डायवर त्याच्या दोन्ही बाजूंना दोन जणं. हि झाली त्रिमुर्ती. म्हणजे आपले साक्षात दत्तगुरूच हो. मधला रिक्षावाला हा साक्षात महेश म्हणजे संकर म्हणजे शंकर हो. ब्रम्हा, विष्णु महेश या त्रिमुर्तीची आत्तापर्यंत पुजा करीत आलो आहे. पण मध्ये महेशाचा-शंकराचा(संकराचा) अवतार असलेली..विठ्ठला पांडुरंगा, घोड्यावरच्या देवा..आणखी काय काय पहायला लावणार आहेस रे..

अशोक पतिल 25/07/2010 - 10:34
पण आज सकाळी सामना मध्ये बातमी वाचली की रिक्षा आणि नॅनो च्या किंमतीत, मायलेज मध्ये फारसा फरक नसल्याने व नॅनोमध्ये रिक्षापेक्षा जास्त जागा असल्याने रिक्षा संघटना टाटा नॅनो प्रवासी वाहतूकीस वापरण्याची परवानगी मिळण्याची मागणी करणार आहेत खर सागु नॅनो ही एक कन्वरटेड रिक्षाच आहे, कार नाहीच .

देवदत्त 28/07/2010 - 10:31
साधारण अडीच वर्षांनी हा धागा वर आल्यावर त्यावर त्याच जोमाने प्रतिक्रिया पाहून बरे वाटले ;) धन्यवाद.,,, बाकी मी नॅनो तर नाही घेतली. पण नुकतीच 'शेव्रोले स्पार्क' गाडी घेतली. :)

मुक्तसुनीत 15/01/2008 - 01:23
तंत्रज्ञानामुळे एखादी गोष्ट पूर्वी ज्याना परवडत नव्हती त्याना परवडायला लागली , म्हणून तुमचा त्या गोष्टीतला आनंद कमी का व कसा होतो हे कोडे काही मला उलगडले नाही. तुम्हाला "माझी गाडी आहे" असे म्हणावेसे वाटते आणि आपल्या स्वतःच्या गाडीचा आनंद घ्यावासा वाटतो यात काहीच गैर नाही. पण केवळ तीच गाडी रिक्षावाल्याना परवडते म्हणून "धक्का बसत" असेल तर तुमच्या मानसिकतेकडे एकदा तुम्ही फिरून पहायला हवे ; नाही का ? मोबाईल, कार या गोष्टी सर्वसामान्याना सहज उपलब्ध होतात याचा अर्थच "टेक्नॉलॉजी ऍट वर्क" असा आहे. पण ही तर केवळ अगदी छोटीशी सुरवात आहे. खरा विकास तेव्हा होईल जेव्हा पायाभूत सुविधा सर्वाना सहज मिळतील; परवडतील. तशा त्या मिळायला लागल्या तर आपल्या स्वतःच्या "स्टेटस्"बद्द्ल तुम्हाला असुरक्षित वाटेल काय ?

देवदत्त 15/01/2008 - 01:59
तुमच्या मानसिकतेकडे एकदा तुम्ही फिरून पहायला हवे ; नाही का ? सहमत. मला असे वाटले म्हणुनच मी इथे लिहिले. आणखी एखाद्याचे मत कळेल. :) माझा आनंद कमी झाला असे नाही. मला गाडी घ्यावीशी वाटेल तेव्हा मी नक्कीच घेईन. बहुधा इंडिका किंवा नॅनोच घेईन. माझे म्हणणे असे नाही की ती रिक्षावाल्यांना परवडायला नको. तो मस्त फायदाच आहे. आधी ही टॅक्सी होत्या त्या प्रिमिअर पद्मिनीच्या होत्या. आताही आहेत. पण म्हणून कोणी त्या खाजगी वापरात घेणे बंद नाही केले. मलाही तसे नाही वाटले. मी हे लिहिले त्याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट नेहमीची झाली तर मग त्यात काही खास वाटत नाही. टेक्नॉलोजी चा फायदा मी ही भरपूर घेतोच. मला त्यात आनंदच वाटतो. (ह्यावर मी वेगळा लेख लिहिणारच आहे). फक्त आपण जे म्हणतो ना अरे ही गोष्ट तर काय आता सर्वांकडेच आहे त्यातला हा प्रकार आहे. :) तरी जरी बहुतेकांकडे कार आल्या आहेत तरी अजून ही कार घेणे हे बहुतेकांकरीता स्वप्नच आहे. ह्यातून मला वाटत नाही की मी काही वाईट किंवा विचित्र लिहिले आहे. असो, आपली प्रतिक्रिया ही बरोबरच आहे. फक्त मला हलक्या मानसिकतेचा न समजावे ही आशा. ;)

In reply to by देवदत्त

इनोबा म्हणे 15/01/2008 - 03:28
देवा! अगदी बरोबर बोललास ...आपल्याकडे लोकांना अशा सवयी आहेत हे खरे... मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा!तिळगुळ घ्या,गोड गोड लिहा... (डायबेटीस झाला तरी चालेल) -इनोबा

मुक्तसुनीत 15/01/2008 - 03:47
तुमच्या स्पष्टीकरणाकरिता धन्यवाद. माझा आक्षेप केवळ आपल्या सर्वांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेतील काही विसंगतींबद्द्ल होता. तुमचे लिखाण वाईट किंवा विचित्र आहे असे मी म्हण्टले नाही. व्यक्तिश: तुमची मानसिकता "हलकी" आहे असेसुद्धा मी कुठे सूचित केले नाही. धन्यवाद.

In reply to by मुक्तसुनीत

देवदत्त 15/01/2008 - 09:55
ही ही गैरसमज नाही आहे. मला माहीत आहे की ह्यातून काही विसंगती आढळते. हे विचार माझे म्हणून लगेच नाही आलेत. जे काही आधी ऐकले व अनुभवातून पाहिले त्याचे हे एक रूप. :)

नंदन 15/01/2008 - 08:59
म्हणजे तुम्ही एकदा लाईफबोटवर आलात की इतरांनी येऊन तिथे गर्दी करु नये असे वाटणे (किंवा तसा प्रयत्न करणे). कुठल्याही गोष्टीप्रमाणेच जर हिचा अतिरेक झाला तर ती विकृतीत जमा होते हे जरी खरं असल; तरी आपलं 'पेशल स्टेटस'/वेगळेपणा कमी होणं याची बोच कुठेतरी माणसाला लागते हेही खरं. 'आजकाल जो उठतो तो ____' अशा स्वरुपाची वाक्यं (गाळलेल्या जागांत - डॉक्टर बनतो असं डॉक्टरांनी म्हणणं, अमेरिकेला येतो असं अनिवासी भारतीयांनी म्हणणं, सिंगापूर फिरून येतो असं दहा-वीस वर्षांपूर्वी तो दौरा करून आलेल्याने म्हणणं) याच गोष्टीची निदर्शक आहेत. अर्थात, यातून अशा वृत्तीचं समर्थन करावं किंवा प्रोत्साहन द्यावं हा हेतू नाही, पण 'फ्लेश इज वीक' असल्यानं मुक्तसुनीतांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या विचारप्रक्रियेत अशा विसंगती कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असतातच.तुम्ही या लेखांतून जशी ती प्रामाणिकपणे समोर मांडली ते कौतुकास्पद आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

देवदत्त 15/01/2008 - 15:23
यातून अशा वृत्तीचं समर्थन करावं किंवा प्रोत्साहन द्यावं हा हेतू नाही. समर्थन किंवा विरोध करण्याचा माझाही हेतू नाही. "आजकाल जो उठतो तो ____" ही ही... अहो मोबाईल ही त्याच वर्गात मोडला गेला आता.

विसोबा खेचर 15/01/2008 - 09:04
पण आज सकाळी सामना मध्ये बातमी वाचली की रिक्षा आणि नॅनो च्या किंमतीत, मायलेज मध्ये फारसा फरक नसल्याने व नॅनोमध्ये रिक्षापेक्षा जास्त जागा असल्याने रिक्षा संघटना टाटा नॅनो प्रवासी वाहतूकीस वापरण्याची परवानगी मिळण्याची मागणी करणार आहेत. मस्त कल्पना आहे...:) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नंदन 15/01/2008 - 09:06
असं झालं तर 'टाटा करुन आलो'चा अर्थ बदलेल की ;) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

या प्रवृत्तीचे वर्णन पु.ल. सुंदर करतात.. हल्ली काय पट्टेवाले सुधा कॉलेजात जातात.... हे ते वाक्य... पण काही म्हणा लो़कहो या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक गोष्टि शक्य झाल्या आहेत. तसेच भारताची धावती अर्थव्यवस्था अनेक लोकाना परदेशात जायची संधी देत आहे.. त्यामुळे पूर्वी मध्यमवर्गीय माणसाला अशक्य वाटणार्‍या लॅपटॉप आणि इतर अनेक गोष्टी आता घेणे शक्य झाले आहे.. अमेरीकेत या गोष्टी स्वस्त मीळतात ना... -(अमेरीकेत आलेले)पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

शिल्पा ब 23/07/2010 - 23:29
(अमेरीकेत आलेले)पुण्याचे पेशवे आपण अमेरिकेत आल्याची दाखल घेतली आहे. बाकि अमेरीकेत कुठे? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

स्वयम्भू 15/01/2008 - 15:39
तुम्हाला गाडी आवडली असेल तर घेउन टाका. ती गाडी भाडे-तत्वावर वापरली जाते का ह्याचा वीचार नका करू अन्यथा पन्चाईत होइल. कारण परदेशात टोयोटा कोरोल्ला पासुन ते मर्सीडीज बेन्झ पर्यन्त सगळ्या गाड्या टैक्सी म्हणून वापरल्या जातात. अहो चक्क वीमाने सुद्धा भाड्याने मीळतात, तीथे नॅनो चे काय घेउन बसलात. गाडी आवडली असेल तर घेउन टाका नी सहकुटुम्ब धमाल करा. आपला, स्वयंभू

In reply to by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

देवदत्त 15/01/2008 - 15:54
अहो, गाडी घ्यायची आहेच. त्या बातमीने गाडी घेण्याच्या इच्छेवर परिणाम होणार नाही. मी फक्त एक विचार लिहून दाखवला. नाही तर मला जगणे ही सोडावे लागेल. काय ते सर्वांसारखे जगणे म्हणून ;) (मी लेखाला सुरूवात केली होती ती अवांतर विचार म्हणून. तरीही त्यात गंभीरता आली. )

आपण जसं भाजीवाल्याकडून भाजी घेतल्यावर उरलेल्या पैशातून २-४ लिंब घेतो, तसचं आता ग्राहक टाटा सफारी वगैरे गाडी घेतल्यावर उरलेल्या पैश्यातून २-४ नॅनो विकत घेतील.

In reply to by चतुरंग

अभिज्ञ 24/07/2010 - 09:10
हे वाचायचे राहूनच गेले होते. एक से एक कार्टून्स आहेत. कार मधून भिक मागताना दाखवणारे कार्टून उच्च. अभिज्ञ.

आता यच्चयावत सगळ्या कार बनवणार्‍या कंपन्याना स्वस्त कार बनवण्याचे वेध लागतील. आपल्याकडे रस्त्यांची अवस्था पाहिल्यास, भविष्यातीला रस्तेजामला आतापासुन तयार व्हावे लागेल. संजय अभ्यंकर

सर्किट 16/01/2008 - 02:55
रिक्षावाल्यांनी नॅनो घेतली, तर तुम्ही रिक्षा घ्या ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मुक्तसुनीत 16/01/2008 - 04:15
अँथनी गोन्साल्विस च्या भाषेत ! "आपुन एक मारा , लेकिन साला सॉलिड मारा ना !" ;-)

In reply to by चित्रा

आमोद शिंदे 24/07/2010 - 10:14
पुण्यात बर्‍याच पेन्शनर काकांनी नॅनो घेतली आहे. सेवा निवृत्तीनंतर फंडातले पैसे मोजून एक नॅनो आणि त्यावर ड्रायवर असा मस्त बेत पुण्यातील काकांनी केलेला दिसतो.

हे वाचून मनात आले, जर ती परवानगी मिळाली तर जरी एखाद्याला स्वत:कडे कार असण्याची कामना पूरी होईल, पण वरील उदाहरणांप्रमाणे त्याच्या (माझ्याही) तथाकथित कार असण्याच्या गर्वाला त्याने धक्का जरूर बसेल. कार असावी अशी इच्छा असणे आणि ती पूर्ण करणे हे ठीक आहे. पण कार असणे यात गर्व वाटण्यासारखे काय आहे? कार घेणे हे एखादे महान कार्य तर नाहीये ना?

In reply to by अप्पा जोगळेकर

मितभाषी 24/07/2010 - 11:07
कार घेणे हे एखादे महान कार्य तर नाहीये ना? » >>>>> गाडीतील अ‍ॅशट्रे भरे पर्यंत गाडी बदलनार्‍या धनाढ्य लोकासाठी नसेलही पण एखाद्या सर्वसामान्य माणसासाठी तर स्वःतची चारचाकी घेणे निश्चितच आनन्दाची बाब असणार.

In reply to by मितभाषी

गाडीतील अ‍ॅशट्रे भरे पर्यंत गाडी बदलनार्‍या धनाढ्य लोकासाठी नसेलही पण एखाद्या सर्वसामान्य माणसासाठी तर स्वःतची चारचाकी घेणे निश्चितच आनन्दाची बाब असणार. +१. सहमत आहे. मी असं म्हटलं की त्यात गर्व वाटावा असं काही नाहीये. एखाद्याला चांगली सॅलरी मिळत असेल तर तीसुद्धा आनंदाचीच बाब आहे. अभिमानाची नव्हे. चांगली सॅलरी म्हणजे उच्च कोटीचे कर्तृत्व नव्हे.

In reply to by अप्पा जोगळेकर

मितभाषी 24/07/2010 - 12:16
तुमच्या दृष्टीने नसेलही. व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचे जिवनातील चैनीचे, गरजेचे, सुखाचे, स्टेट्स सिम्बॉलचे आडाखे वेगळे असु शकतात.

पाषाणभेद 24/07/2010 - 11:06
नैनो (तेच ते हो हिंदी भाषिक... निट उच्चारही करता येत नाही त्यांना... सुरेश ला सुरेस म्हणतात....शंकरला संकर म्हणतात....काय संकर करतात शंकरच जाणे...) तर नैनो .... आपली नॅनो म्हणायचं हो मला... आपलीच म्हणायची... कारण तिचा जन्म आपल्या पुण्यातच झाला ना? आता सासरी म्हणजे गुजरात मध्ये गेली म्हणून काय झाले? तर नॅनो ही कार आपल्याला काही परवडणार नाही. आपण तर बुवा मस्त रिक्षा घेणार. अहो नैनोमध्ये (ऐ गपे... मराठी शिकवू का?) सॉरी अहो नॅनोमध्ये किती माणसं बसतात? सांगा सांगा.. ४ च ना? म्हणजे १+३ ना? १ म्हणजे डायवर अन बाकी ३. बळजबरी केली तर १+४ चं पासिंग मिळेल तिला. आता आमची रिक्षा बघा. डायवर त्याच्या दोन्ही बाजूंना दोन जणं. हि झाली त्रिमुर्ती. म्हणजे आपले साक्षात दत्तगुरूच हो. मधला रिक्षावाला हा साक्षात महेश म्हणजे संकर म्हणजे शंकर हो. या रिक्शावाल्याचा स्वभाव अन शंकरभगवान यांचा स्वभाव एकदम खटकू. नगास नग. कधी काय होईल सांगता येत नाही. कधी हात दाखवून वळेल तर कधी तिसरा डोळा मारेल.. आपलं उघडेल.. भस्म हो साक्षात भस्म. जळून राखुंडी. कधी गांजा/ भांग पिलेले डोळे तर कधी सोमरस प्राशन. असो. तर रिक्षात पुढे ३ जण.. ग्रामिण भागात ५ जण. आता पुढे मोजा. मागे ४ जण बसतीलच. व्हा पुढेमागे. बसा खेटून. किती झाले? ७ की ९? अहो शहरी भागात ७. ग्रामिण भागात ९. पुढे मोजा. बच्चेकंपनी असेल तर मागे बाल्कनीत २ जण. सामानसुमान पायाशी. एखादी बॅग पुढे किक च्या हँडल जवळ. (काय कॉम्बीनेशन आहे. किक पायाची अन हँडल हाताचे.) नै.नॅनो अन रिक्षाचा अ‍ॅव्हरेज सारखाच. स्पिडही सारखाच. रिक्षात वेळीअवेळी पेट्रोलचा डोस देवून रॉकेलही चालू शकते. रिक्षा हवेशीर आहे. दार खिडकी नाही. खा अन पचाक. खा अन पचाक. खा अन पचाक. अरे बस कर बाबा. पार्किंग ला जागा कमी लागते. टर्नींग रेडीयस कमी. गल्लीबोळात जाता येते. रिक्षात लाखभर पैसे मळक्या पिशवीत ठेवले तर कुत्रेही हुंगत नाही. अन मुख्य म्हणजे ती पण आपल्या पुणे-३५ मध्येच तयार होते. बॉडी दणकट आहे. सरळ अंगावर घालता येते. गॅरेजचा खर्च कमी येतो. अ‍ॅक्शीलेटर वायर २५ रुपयात भेटते. आहे का तुमच्या नै..नॅनोचा पार्ट स्वस्त? टेप मस्त धकधक लावता येतो. झंकार नाय तर टकारा सर्कीट टाकल तर शकिराही नाचेल. वका वका. काही शक? मातीच्या मडक्यात नुसते स्पिकर ठेवा महाराज. घुंगरूही ऐकू येतील. रिक्षा चालवत असल्याने बाकीचे वाहनधारक सहसा नादी लागत नाही. लागलाच तर आवाज चढवता येतो. परमिट घेतले तर डबल बिजनेसही करता येतो. रिक्षाच्या हुडवर जाहिरात करता येते. आता तुम्ही सांगा त्या नै...नॅनोमध्ये आहेत काय एवढ्या सुविधा? अहो पोरीदेखील म्हणतात, "मला रिक्षावाला नवरा पायजे...मला रिक्षावाला नवरा पायजे..." म्हणून म्हणतो आम्ही तर एक्स्पोर्ट होणारी रिक्षाच घेणार. - पाभे (रिक्षावाला) The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by पाषाणभेद

बेभान 24/07/2010 - 21:06
|आता आमची रिक्षा बघा. डायवर त्याच्या दोन्ही बाजूंना दोन जणं. हि झाली त्रिमुर्ती. म्हणजे आपले साक्षात दत्तगुरूच हो. मधला रिक्षावाला हा साक्षात महेश म्हणजे संकर म्हणजे शंकर हो. ब्रम्हा, विष्णु महेश या त्रिमुर्तीची आत्तापर्यंत पुजा करीत आलो आहे. पण मध्ये महेशाचा-शंकराचा(संकराचा) अवतार असलेली..विठ्ठला पांडुरंगा, घोड्यावरच्या देवा..आणखी काय काय पहायला लावणार आहेस रे..

अशोक पतिल 25/07/2010 - 10:34
पण आज सकाळी सामना मध्ये बातमी वाचली की रिक्षा आणि नॅनो च्या किंमतीत, मायलेज मध्ये फारसा फरक नसल्याने व नॅनोमध्ये रिक्षापेक्षा जास्त जागा असल्याने रिक्षा संघटना टाटा नॅनो प्रवासी वाहतूकीस वापरण्याची परवानगी मिळण्याची मागणी करणार आहेत खर सागु नॅनो ही एक कन्वरटेड रिक्षाच आहे, कार नाहीच .

देवदत्त 28/07/2010 - 10:31
साधारण अडीच वर्षांनी हा धागा वर आल्यावर त्यावर त्याच जोमाने प्रतिक्रिया पाहून बरे वाटले ;) धन्यवाद.,,, बाकी मी नॅनो तर नाही घेतली. पण नुकतीच 'शेव्रोले स्पार्क' गाडी घेतली. :)
काही वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने इंडिका बाजारात आणली. ती गाडी मारूती ८००, सँट्रो प्रमाणे तुफान चालली की नाही हे आठवत नाही. परंतु इंडिकाही भरपूर लोकांच्या पसंतीस पडली. मी काही जास्त गाड्या अनुभवल्या आहेत असे नाही परंतु मलाही इंडिकाच आवडतेय. कोणती गाडी घेणार विचारले तर मी प्रथम इंडिकाच म्हणतो. त्याच्या कामगिरीचा एक पैलू असाही आहे, की इंडीकाने जी इंडीकॅब आणली तिचा भाड्याने गाडी देणारे, आजकालच्या कंपन्यांमध्ये असलेली कॅब सर्विस, टॅक्सी सर्विस ह्यांनी जास्त वापर सुरू केला.

आयसीसी चे नवे नियम :

छोटा डॉन ·

९. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजी दरम्यान जर चेंडू बॅटच्या ५ इंच जवळून गेला आणि यष्टीमागे क्षेत्ररक्षकाच्या ५ मिटर परिघात गेला तर तो फलंदाज बाद समजण्यात येईल. १०. चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाच्या कोणत्याही अवयवास स्पर्श करून गेल्यास सदरहू फलंदाज बाद समजण्यात येईल. वरील नियमांमध्ये काही वाद निर्माण झाल्यास ते 'रिकी' च्या विशेष न्यायालयात सोडविले जातील. हुकुमावरून, (सर'पंच') छोटी टिंगी

एक 18/01/2008 - 05:01
१. प्रतिस्पर्धी गोलंदाजाचा चेंडू मधल्या यष्टीवर खालून ३ इंचावर बसला आणि यष्टी उडाली नाही तरच ऑस्टेलियन फलंदाज बाद असे घोषित करता येईल. जर यष्टी उडाली तर फलंदाज बाद असणार नाही आणि उडालेली यष्टी परत लावण्यात येणार नाही. २. प्रतिस्पर्धी क्षेत्ररक्षकाने ऑस्टेलियन फलंदाजाचा झेल हा "सावधान" स्थितीमधे उभे राहून आणि हातांची ग्रिप "गोल्फ च्या ग्रिप" सारखी ठेवून घेतला पाहिजे. "गोल्फची ग्रिप" माहित नाही हा युक्तिवाद मान्य केला जाणार नाही. गोल्फची ग्रिप : उजव्या हाताची करंगळी डाव्या हाताच्या अनामिका आणि मध्यमा यात गुंतवून केलेली पकड.

९. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजी दरम्यान जर चेंडू बॅटच्या ५ इंच जवळून गेला आणि यष्टीमागे क्षेत्ररक्षकाच्या ५ मिटर परिघात गेला तर तो फलंदाज बाद समजण्यात येईल. १०. चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाच्या कोणत्याही अवयवास स्पर्श करून गेल्यास सदरहू फलंदाज बाद समजण्यात येईल. वरील नियमांमध्ये काही वाद निर्माण झाल्यास ते 'रिकी' च्या विशेष न्यायालयात सोडविले जातील. हुकुमावरून, (सर'पंच') छोटी टिंगी

एक 18/01/2008 - 05:01
१. प्रतिस्पर्धी गोलंदाजाचा चेंडू मधल्या यष्टीवर खालून ३ इंचावर बसला आणि यष्टी उडाली नाही तरच ऑस्टेलियन फलंदाज बाद असे घोषित करता येईल. जर यष्टी उडाली तर फलंदाज बाद असणार नाही आणि उडालेली यष्टी परत लावण्यात येणार नाही. २. प्रतिस्पर्धी क्षेत्ररक्षकाने ऑस्टेलियन फलंदाजाचा झेल हा "सावधान" स्थितीमधे उभे राहून आणि हातांची ग्रिप "गोल्फ च्या ग्रिप" सारखी ठेवून घेतला पाहिजे. "गोल्फची ग्रिप" माहित नाही हा युक्तिवाद मान्य केला जाणार नाही. गोल्फची ग्रिप : उजव्या हाताची करंगळी डाव्या हाताच्या अनामिका आणि मध्यमा यात गुंतवून केलेली पकड.
आधीच जाहीर करतो की "आलेल्या फॉरवर्डेड मेलमधून साभार" परवाच्या सिडनी टेस्ट नंतर आयसीसी ला सूचवलेले काही नवे नियम : १. यानंतर पुढे कुठल्याही ऑस्ट्रेलियाचया मॅचसाठी रिकी पाँटिंग [ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान, हाडाचा व ज्याच्या प्रामाणिकपणावर कोणिही शंका घेऊ शकत नाही, असा क्रिकेटचा सितारा ] याला कायदेशिररित्या चौथा पंच म्हणून मान्यता देण्यात यावी. या नव्या कायद्याप्रमाणे चौथ्या अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आधीच्या निर्णयामध्ये सुध्धा बदल करण्याचा त्याला अधिकार राहिल.

ज्योतिषांकडे जातांना.....ज्योतिषांकडे गेल्यावर

धोंडोपंत ·

धोंडोपंत 03/01/2008 - 14:16
ह्या लेखाची लिंक येथे वेगळा विषय म्हणून दिली असती, तर जास्त संयुक्तिक झाले असते. मूळ लेखाशी विसंगत विचारांची लिंक देणे हे फारसे प्रगल्भतेचे लक्षण नव्हे. प्रत्येकाने आपले विचार बाळगावेत आणि त्यानुसार जगावे. पण इतरांच्या विचारात अनाठायी हस्तक्षेप करून आपण म्हणतो तेच खरे ही वृत्ती असमर्थनीय ठरते. अशा पद्धतीचा उसना विवेक (borrowed wisdom) फारसा प्रकाश पाडू शकत नाही. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

इनोबा म्हणे 03/01/2008 - 14:48
पंतांच्या मताशी मी सहमत आहे. विकी नावाच्या ज्ञानकोशाबद्दल माहित होते,पण अज्ञानकोशाची आज पहिल्यांदाच माहिती मिळाली,याबद्दल आपले आभार्. आपल्या अज्ञानाचे आणखी प्रदर्शन करू नये ही विनंती.

विकि 03/01/2008 - 15:30
विसंगत लेख कसा . जसा तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार तसा आम्हाला पण आहे. हा विनायक कोण मला अज्ञानी म्हणणारा. आपला कॉ.विकि

In reply to by विकि

इनोबा म्हणे 03/01/2008 - 16:20
आम्ही कोण म्हणूनी काय पूसता.... तुझी चूक तुला दाखवण्यासाठी केलेला एक छोटासा खटाटोप. तुला मत मांडण्याचा अधिकार नक्कीच आहे,पण दुसर्‍याचे मत खोडून स्वतःचे मत मांडण्याचा मात्र नाही.

In reply to by इनोबा म्हणे

विकि 03/01/2008 - 16:27
पण मी तुझे मत थोडी खोडून काढले. मी फक्त त्या लेखावर दै. लोकसत्ताची लींक जोडली. आपला कॉ.विकि

In reply to by विकि

धोंडोपंत 03/01/2008 - 18:11
विकि महाशय, मत मांडण्याचा अधिकार तुम्हालाही आहेच. त्याबद्दल दुमत नाहीच. फक्त तुम्ही एक वेगळा विषय म्हणून तो मांडला असतात तर चांगले झाले असते. मूळ लेखाच्या विषयाच्या विरुद्ध तत्वाचे प्रतिपादन करणारे लेखन स्वतंत्र लेख म्हणून प्रसिद्ध करावेत असा आंतरजालावरील संकेत आहे. त्यात तुम्ही " त्या ऐवजी हे वाचा' असे शीर्षकात लिहिले आहे, हे लोकशाही मूल्यात बसत नाही. कारण लोकांनी काय वाचावे हे ठरविण्याचा अधिकार तुम्हाला नाही. त्यासाठी तुम्ही स्वतंत्र लेखन करून तुमचे विचार मांडा. ज्यांना ते पटतील ते प्रतिसाद देतील. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर 03/01/2008 - 15:50
वा पंत... आपण अतिशय मुद्देसूद लेख लिहिला आहे. एकंदरीतच या विषयाबद्दल लोकांचे निरनिराळे सम-गैरसमज फार पूर्वापार आहेत. आपल्या अश्या लेखांमुळे हे चित्र बरेच स्पष्ट होईल याची खात्री वाटते! असो.. सिद्धी आणि प्रसिद्धी या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. हे वाक्य फार आवडले, फार गहन अर्थ या वाक्यात दडलेला आहे असे आम्हाला वाटते! आपला, (ग्रहतार्‍यांतला) तात्या.

In reply to by डेंजर डॉन

छोटा डॉन 04/01/2008 - 08:30
च्यायला आमचंच भविष्य अवघड दिसाय लागलय !!! दिवसेंदिवस आमच्या प्रतिस्पर्धी गँग वाढतच चालल्या आहेत.... धोंडोपंत दादा, बधा आमच्यावर शनी वक्री आहे का? असेल तर लगेच शांती करून टाकू.... कसे???? छोटा डॉन [आमची कोठेही शखा नाही ]

In reply to by छोटा डॉन

धोंडोपंत 04/01/2008 - 14:01
छोटे डॉन महाशय, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे तशी तुमच्या क्षेत्रातही वाढतेय. स्पर्धेला सामोरे जा. शनीची काळजी करू नका. काळजी मंगळाची करा, तो तुमच्या मारामार्‍या आणि घातपाताच्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि सध्या मिथुनेत वक्री आहे. ३१ जानेवारीपर्यंत सामंजस्याने घ्या. मांडवली करण्याकडे कल ठेवा. आपला, (सल्लागार) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मनीष पाठक 03/01/2008 - 17:15
पंतकाका, खरच छान लेख. पुढे कोणत्याही ज्योतिर्विदांकडे जाताना तुम्ही नमुद केलेल्या गोष्टी जरुर लक्षात ठेवेल. (ज्योतिष प्रेमी ) मनीष पाठक

धोंडोपंतांचे आणि आमचे ग्रह जुळतात बरं का? जरी ज्योतिष विषयक विचारांत मतभिन्नता असली तरी . आमचे पुस्तक "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... प्रश्नोत्तरातून सुसंवाद " हे http://mr.upakram.org/tracker/582 या ठिकाणी लेखमाला या स्वरुपात चालू आहे. मला जेष्ठ ज्योतिषी श्री .श्री. भटांचे " ज्योतिषांपासून सावधान " या ग्रहांकित मधल्या जुन्या लेखाची आठवण झाली. काही ज्योतिषातील अपप्रवृत्तींमुळे ज्योतिषशास्त्र बदनाम झाले आहे. ज्योतिषि व जातक यांच्यातील संबंधाबाबत आमचे मनोगत http://mr.upakram.org/node/777 येथे वाचा. धोंडोपंत चालू द्यात. आम्ही आपले वाचक तर आहोतच. व्यक्ती म्हणुन आपली सामाजिक संवेदनाशिलता आम्हि जाणुन आहोत. ( मूलत: ज्योतिषप्रेमी व धोंडोपंतांचा मित्र) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना 03/01/2008 - 19:02
घाटपांडेसाहेबांची प्रतिक्रिया वाचून मजा वाटली. अशासाठी की मूलतः ज्योतिष नाकारणारे धोंडोपंत आता ज्योतिर्विद झाले आणि मूलतः ज्योतिषविद्येत पारंगत असलेले घाटपांडे ज्योतिषचिकित्सक आणि विरोधक बनले. दोन मित्रांचा हा धृवांकडून धृवांकडे विरोधी दिशांचा प्रवास विस्मयकारक आहे. आमच्यासारख्या अनभिज्ञाला मात्र कोणाचा पक्ष खरा हा संभ्रम अधिकच भ्रमित करत रहातो. :)

In reply to by विसुनाना

दोन मित्रांचा हा धृवांकडून धृवांकडे विरोधी दिशांचा प्रवास विस्मयकारक आहे. आमच्यासारख्या अनभिज्ञाला मात्र कोणाचा पक्ष खरा हा संभ्रम अधिकच भ्रमित करत रहातो. :) धोंडोपंत आणि आमी यांत खालील साम्य आहेत १) ज्योतिष या विषयावर प्रेम २) ज्योतिष हे या ना त्या स्वरुपात टिकणारच. अज्ञाताचा शोध ही मानवी प्रवृत्ति आहे. यावर एकमत ३) ज्योतिषातील अपप्रवृत्तींना आता सुज्ञ ज्योतिषांनीच पायबंद घातला पाहिजे यावर एकमत. ४) ज्योतिष हे त्रिस्कंधात्मक आहे. सिद्धांत, संहिता आणि होरा. यातील पहिले दोन भागावर सहमती होरा अर्थात फलज्योतिष यावर मतभिन्नता असुन परस्परांविषयी आदर. ५) मतभिन्नता ही विषय समृद्धच करत असते यावर एकमत ६) ज्योतिषाव्यतिरिक्त अन्य विषयांवर समरुपता धोंडोपंत, एखादी कविता टाका, दोन ध्रुवावर दोघे आपण .... अशी काहीतरी (धोंडोपंतांच्या ब्लॉगचे सौंदर्य आवडणारा) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

धोंडोपंत 04/01/2008 - 14:04
धोंडोपंत आणि आमी यांत खालील साम्य आहेत १) ज्योतिष या विषयावर प्रेम २) ज्योतिष हे या ना त्या स्वरुपात टिकणारच. अज्ञाताचा शोध ही मानवी प्रवृत्ति आहे. यावर एकमत ३) ज्योतिषातील अपप्रवृत्तींना आता सुज्ञ ज्योतिषांनीच पायबंद घातला पाहिजे यावर एकमत. ४) ज्योतिष हे त्रिस्कंधात्मक आहे. सिद्धांत, संहिता आणि होरा. यातील पहिले दोन भागावर सहमती होरा अर्थात फलज्योतिष यावर मतभिन्नता असुन परस्परांविषयी आदर. ५) मतभिन्नता ही विषय समृद्धच करत असते यावर एकमत ६) ज्योतिषाव्यतिरिक्त अन्य विषयांवर समरुपता प्रकाशराव, आपल्याशी शंभर टक्के सहमत. आपला, (स्नेही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

पंत, ज्योतिषांकडे जातांना.....ज्योतिषांकडे गेल्यावर हा लेख आवडला !! आमचा ज्योतिष या विषयावर विश्वास नाही. पण आम्ही आमची कुंडली अनेकदा अनेकांना दाखवल्या आहेत हेही सांगण्यास संकोच वाटत नाही. कधी-कधी मार्गदर्शन होते असे वाटते आणि कधी तरी ते थोतांडही वाटते. पण, आपण ज्या पद्धतीने या विषयाची चिकित्सका करता ते आम्हाला आवडते, अजून याविषयीचे असेच मार्गदर्शनात्मक लेख येऊ द्या !!! बाकी ज्योतिषाकडे गेल्यावर बरेच विचारायचे विसरुन जाणे. तिथे गेल्यावर दुसरेच प्रश्न विचारणे. कोणाचा तरी अनुभव ऐकत बसणे. सही !!!! आपला. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (धोंडोपंताचा स्नेही )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत 04/01/2008 - 14:42
आमचा ज्योतिष या विषयावर विश्वास नाही. पण आम्ही आमची कुंडली अनेकदा अनेकांना दाखवल्या आहेत हेही सांगण्यास संकोच वाटत नाही. कधी-कधी मार्गदर्शन होते असे वाटते आणि कधी तरी ते थोतांडही वाटते. प्राध्यापक साहेब, आपले म्हणणे खरे आहे. यात शास्त्राची चूक नसून ते वापरणार्‍यांची आहे. कुठलीतरी दोन चार पुस्तके वाचून स्वतःला ज्योतिषी म्हणवणार्‍यांची संख्या समाजात लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे केवळ परंपरेनुसार घराण्यात चालत आले आहे, म्हणून या विषयात असलेले लोकही अनेक आहेत. खरे म्हणजे कोणतेही शास्त्र सखोलपणे अभ्यासायचे असेल तरच त्यात उतरावे. उगीच वरवर काहीतरी वाचून लोकांच्या आयुष्यावर भाष्य करू नये. त्यामुळे समाजाची दिशाभूल होते आणि लोकांचा शास्त्रावरील विश्वासही उडतो. ह्या (अप)प्रवृत्तींपासून लोकांना वाचवून "हे दूध... हे पाणी" दाखवून देण्याची नीरक्षीरविवेकी भूमिका आम्ही स्विकारली आहे. आणि त्यास "फळे रसाळ गोमटी" आल्याचे आम्ही पहातो आहोत. अनेकदा आम्ही केलेल्या लेखनामुळे आम्हांला काही जणांचा रोष स्विकारावा लागतो. कारण आमच्या लेखनातून अनेकांच्या व्यावसायिक हितसंबंधाना धक्का बसतो. पण समाजाने अधिक चौकसपणे ह्या विषयाकडे पाहावे, यासाठी काही आहुती आम्हांला देणे भाग आहे. आम्ही एका अत्यंत विख्यात ज्योतिषांकडे गेलो असतांना तेथे आलेल्या एका ताईंच्या हातावर त्या ज्योतिषांनी संरक्षक(?) गंडा बांधला आणि त्यांच्याकडून अडीचशे रूपये घेतले. आलेल्या जातकाला ज्योतिषाने गंडा बांधावा, असे शास्त्रात कुठेही म्हटलेले नाही. पण इतका मोठा नावाजलेला माणूस हे करतो, याचा समाजावर परिणाम असा होतो की, हेच शास्त्र असले पाहिजे असे लोकांना वाटते आणि त्यामुळेच शास्त्र बदनाम होते. जसे लघुशंकेला बसल्यावर लोक कानाला जानवे लावतात. या गोष्टीला शास्त्रीय आधार काहीही नाही. पूर्वीच्या काळी पुरूषदेखील बसून लघवी करायचे. असे म्हणतात की, काशीला एका मठाचे प्रमुख लघुशंकेसाठी बसले असतांना तिथे त्यांचे जानवे मुताने भिजले. तेव्हापासून ते जानवे भिजू नये म्हणून ते कानाला लावायला लागले. हे जेव्हा इतर लोकांनी पाहिले तेव्हा ते ही यांचे अनुकरण करायला लागले. काशी हे त्याकाळी विश्वविद्यापीठ समजलं जायचं. काशीतले ब्राह्मण जे करतात, ते खरे शास्त्र असा समज सर्वत्र असल्यामुळे पुढे "लघुशंकेला बसतांना जानवे कानाला अडकवायचे असते" ही गोष्ट शास्त्र म्हणून स्विकारली गेली. त्याची चिकित्सा झाली नाही. आणि आता मुंबईच्या बॉम्बे हाऊस या टाटांच्या कार्यालयीन इमारतीत आम्ही काही कामासाठी गेलो असतांना, तिथे मुतारीत उभे राहून लघुशंका करतांनाही कानाला जानवे अडकवणारे लोक आम्ही पाहिले . हे टाळण्यासाठी खरे काय आणि खोटे काय याचा शोध घेत राहिले पाहिजे. त्याच दिशेने आमचा प्रवास सुरू आहे. आपला, (सत्यशोधक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विजुभाऊ 09/10/2013 - 19:45
जानव्याची अडचन होते तर मग जानवे घालावेच कशाला? जानवे मुंज वगैरेंसारख्या निरुपयोगी कालबाह्य प्रथा आपण कशाला जपतो अजूनही?

In reply to by विजुभाऊ

नेहेमी प्रमाणेच , प्रश्नांची उत्तरे आहे ... पण सांगितल्यावर अ‍ॅप्लाय करणार असाल तर सांगतो ... इथे चर्चा ज्योतिष विषयावर चालली आहे , ज्योतिष ही काही ब्राह्मण समाजाची प्रॉपर्टी नाही ...माझ्या ओळखीतले कित्येक ज्योतिषी अब्राह्मण आहेत ... तेव्हा ज्योतिष विषयावर चाललेली इतकी छान चाललीली चर्चा भट्कवु नये ही नम्र विनंती :)

व्यंकट 03/01/2008 - 21:47
धोंडोपंतांचे ब्लॉग्ज आणि लेख मॅग्नेट आहेत, ते केवळ मार्गदर्शनच करित नाहीत तर एक कुतुहल आणि आकर्षण निर्माण करतात. अश्या कुतुहलात्मक ओढीतून झालेला अभ्यास फारा फलादायी असतो असा आमुचा अनुभव आहे. (धोंडोपंताचा दूरचा) -एकलव्य

विजय.पाटील 04/01/2008 - 06:09
पंत लेख आवडला पण थोडासे जाहिरातवजा लेखन झाले आहे ते टाळायला हवे होते. तुम्ही दिलेली वेळ कशी पाळता (टाईम मॅनेजमेंट कसे करता), काँप्युटर वगैरे आधुनिक उपकरणे कशी वापरता वगैरे उल्लेख मला तरी तुमच्या दुकानाची जाहिरात करणारे वाटले. अर्थात जाहिरात करणे ह्यात अयोग्य काहीच नाही खरं तर मराठी माणूस त्यातच कमी पडतो. त्यामूळे लेख उत्तम जमला आहे हे नक्की. पुढील कारकिर्दीस शुभेच्छा!

In reply to by विजय.पाटील

विसोबा खेचर 04/01/2008 - 06:19
पंतांच्या लेखात वेळ पाळणे, आधुनिक उपकरणे वापरणे हे उल्लेख जरूर आलेले आहेत, परंतु ते लेखाच्या ओघात आलेले आहेत आणि लेखाच्या दृष्टीने ते मुद्दे महत्वाचे असावेत म्हणूनच आलेले आहेत/असावेत. आम्ही पंतांना खूप जवळून ओळखतो आणि त्यामुळेच सदर लेखन पंतांनी कुठलीही जाहिरातबाजी करण्याकरता निश्चितच केलेले नाही असे खात्रीलायक म्हणू शकतो! असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विजय.पाटील 04/01/2008 - 06:32
बरोबर आहे तात्या. 'टाईम मॅनेजमेंट','आधुनिक तंत्रज्ञान' वगैरे उल्लेख जरूरी आहेत पण त्यावर पंतांची ते स्वत: ह्या गोष्टी कश्या अवलंबतात ह्यावरची टीप्पणी अनावश्यक आहे. जर ही जाहिरात नाही म्हणता तर मग ती आत्मस्तुती ठरेल जी अजुनच घातक कारण 'आत्मस्तुती करे तो एक...' म्हणूनच म्हणतो जाहिरात करणे ह्यात चूक काहीच नाही. त्याकडे लगेच 'जाहिरतबाजी' असे तुच्छतेने पाहू नये. त्यामूळेच आमच्या पोष्टचा शेवट देखिल आम्ही 'लेख उत्तम जमला आहे हे नक्की'. असाच केला आहे. त्याकडे आवर्जून लक्ष द्यावे.

In reply to by विजय.पाटील

विसोबा खेचर 04/01/2008 - 07:00
पण त्यावर पंतांची ते स्वत: ह्या गोष्टी कश्या अवलंबतात ह्यावरची टीप्पणी अनावश्यक आहे. का बरं अनावश्यक आहे? 'आधी केले मग सांगितले' यात गैर ते काय?? जर ही जाहिरात नाही म्हणता तर मग ती आत्मस्तुती ठरेल जी अजुनच घातक कारण 'आत्मस्तुती करे तो एक... असहमत आहे! उदा, मी जेव्हा समभाग बाजारावर एखादा लेख लिहितो तेव्हा समभाग खरेदीविक्री संदर्भात मी स्वत: कुठली पद्धत अवलंबतो, कसे निर्णय घेतो, इत्यादी गोष्टी लिहिल्यास ते जाहिरातपर किंवा आत्मस्तुतीपर लेखन ठरत नसून, उलटपक्षी याच गोष्टी माझा लेख अधिक परिपूर्ण बनवतात! त्याकडे लगेच 'जाहिरतबाजी' असे तुच्छतेने पाहू नये. मी पाहात नाहीच आहे परंतु आपल्याच प्रतिसादातून तशी तुच्छता जाणवते आहे, तसेच 'जाहिरात', 'आत्मस्तुती' वगैरे शब्दच्छलही दिसतो आहे!! असो.. प्रत्येकाने कुठला चष्मा लावून या लेखनाकडे पाहायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, तसाच तो आपलाही आहे! मला या विषयासंदर्भात पुढे काहीच लिहायचे नाही.... तात्या.

In reply to by विजय.पाटील

धोंडोपंत 04/01/2008 - 15:06
पंत लेख आवडला पण थोडासे जाहिरातवजा लेखन झाले आहे ते टाळायला हवे होते. तुम्ही दिलेली वेळ कशी पाळता (टाईम मॅनेजमेंट कसे करता), काँप्युटर वगैरे आधुनिक उपकरणे कशी वापरता वगैरे उल्लेख मला तरी तुमच्या दुकानाची जाहिरात करणारे वाटले. अभिप्रायाबद्दल धन्यवाद, आपल्याला यात जाहिरात वाटली हे आमचे दुर्दैव. खरे तर आम्ही आमची कार्यशैली सांगितली आहे. स्वतःच्या कार्यप्रणालीबद्दल बोलणे ही जाहिरात नसते, असे आम्हाला वाटते. आणि जाहिरात करण्याची आवश्यकता आम्हाला कधी भासली नाही. जाहिरात अशा लोकांना करावी लागते ज्यांच्याकडे काम नसते. आज परिस्थिती अशी आहे की, आम्हांला अनेकांच्या पत्रिका बघणेही शक्य होत नाही. केवळ भेटीच्या माध्यमातून नव्हे तर आमचे ई विश्वातील ब्लॉगवाचक, विविध समुदायांवर आम्हाला ओळखणारे लोक, ऑर्कूट, याहू सारख्या व्यासपीठांवर झालेल्या मित्रमैत्रीणीं, त्यांचे नातेवाईक अशा अनेकांच्या कुंडल्या, इमेलच्या आणि गुगलच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्‍यातून आमच्या मेलबॉक्समध्ये रोज येत असतात . या मिसळपाववरही असे लोक आहेत की ज्यांना आमचे मार्गदर्शन हवे आहे पण वेळेअभावी अजून ते शक्य झालेले नाही. जसजसे जमेल तसतसे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही जरूर देतोच पण पृच्छकांची संख्या आणि आमच्याकडे उपलब्ध असलेला वेळ यांचे गणित काही केल्या जमत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे जाहिराती करण्याची आम्हांला आवश्यकता नाही हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि नम्रपणे सांगतो. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे तर "नाही घाटावे लागतं, एक शित कळे भात" धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

छान लेख्....विशेषत: डोक्टर आणि पेशण्ट असे साम्य दाखवल्यामुळे विषय लवकर मनात पोचतो......भविष्यात या माहितीचा वेळ पडल्यास खूप उपयोग होईल्.....धन्यवाद....

आप्पा 04/10/2013 - 15:03
आपले सर्व जुने लेख वाचले. आपण परत या विषयावर लेखन सुरु करावे असे वाटते. विचार कराव.

आप्पा 04/10/2013 - 15:04
आपले सर्व जुने लेख वाचले. आपण परत या विषयावर लेखन सुरु करावे असे वाटते. विचार कराव.

In reply to by आप्पा

आदूबाळ 05/10/2013 - 12:05
असं मलाही वाटतं. पण तो एक इतिहास आहे आणि धोंडोपंत परत लिहिण्याची शक्यता धूसर आहे. www.dhondopant.blogspot.com इथे त्यांचं लेखन वाचायला मिळेल...

विजुभाऊ 05/10/2013 - 11:26
गेल्या आठवड्यात आम्ही एका गृहस्थांची पत्रिका बघत असतांना
बहुतेक वेळेस या लेखक महाशयानी स्वतःचा उल्लेख "आम्ही" असा केलेला आहे . हा स्वतःविषयीचा अती आदर आहे की अनेक वचन आहे हे स्पष्ट होत नाहिय्ये

In reply to by अनिरुद्ध प

उपाशी बोका 06/10/2013 - 21:53
राजा, संपादक आणि वेडा हे लोक 'आम्ही' हा शब्द अधिकाराने वापरू शकतात, असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. कदाचित संपादक या नात्याने धोंडोपंत असे लिहित असतील.

चित्रगुप्त 07/10/2013 - 01:37
स्वतःसाठी 'आम्ही' हा शब्द वापरणे हे त्या काळातील बोलण्याच्या पद्धतीचा अवशेष असावा, जेंव्हा एकंदरीतच आदरार्थी संबोधने फार वापरली जात. उदा. पत्नीस 'अहो' म्हणणे, पतीस 'इकडली स्वारी' म्हणणे, स्वतःच्या मुलांचा उल्लेखही 'बाळासाहेब' अक्कासाहेब' असा करणे, अन्य लोकांचा उल्लेख धोंडोपंत, शंकरराव, जोशीसाहेब, घारूअण्णा, बंडूतात्या, वसंतअप्पा इ. करणे. लेखन करताना स्वतःचा उल्लेख 'आम्ही' असा केल्याने जरा भारदस्त वाटते, आपल्या विधानाला जरा वजन येते (असे आम्हास वाटते) ज्योतिषविद्येबद्दल 'विद्या' हा अतिशय चपखल आणि समर्पक शब्द असताना ज्योतिष हे 'शास्त्र' आहे की नाही, (काहींच्या मते अमेरिकेतील अमूक जर्नलाने जर 'शास्त्र' म्हणून मान्यता दिली, तरच तो विषय शास्त्र या संज्ञेस पात्र होतो वगैरे) अश्या प्रकारची चर्चा बरीच वाचायला मिळते, परंतु समतोल दृष्टीकोणातून केलेले विवेचन क्वचितच आढळते. या लेखमालेतून असे समतोल लेखन वाचायला मिळेल, ही आशा. आम्ही (वा कुणीतरी) आमच्या गतजीवनातील पाच-दहा अगदी ठळक घटना केंव्हा घडून आल्या होत्या, तसेच अन्य काही प्रश्न आमची पत्रिका तपासून सांगावे, अशी विनंती जर प्रस्तुत धागालेखकास केली, आणि त्यांनी तसे करून सांगितलेली माहिती अगदी बरोबर निघाली, तर खरोखर वाचकांचे समाधान होईल, असे वाटते. ... याविषयी धागाकर्त्याचे काय मत आहे ?

In reply to by चित्रगुप्त

लेखन करताना स्वतःचा उल्लेख 'आम्ही' असा केल्याने जरा भारदस्त वाटते, आपल्या विधानाला जरा वजन येते (असे आम्हास वाटते) असे आमचेही मत आहे ;)

In reply to by चित्रगुप्त

विजुभाऊ 08/10/2013 - 16:05
बर्रूब्बर . ला रीव्हे गाउचे म्हणजे नदीचा डावा किनारा ( कोणीकडून डावा हे विचारू नये) पॅरीसच्या या भागात चित्रकार, सम्गीतकार रहायचे. जगप्रसिद्ध हस्तसामुद्रीक "किरो " हा सुद्धा फ्रेन्चच होता. पॅलेस्टाईन फेम गाझा पट्टी देखील लेफ्ट बॅन्क मधेच येते. पॅलेस्टाईन वर हल्ला करताना इस्राईल ने कधीच ज्योतिषाचा सल्ला घेतला नाही. त्यामुळेच की काय त्याना स्वतःचे आस्तित्व टिकवून नवे राष्ट्र बळकट करण्यात यश आले आहे. राष्ट बळकट असले की वाट्टेल त्याला हात दाखवता येतो. म्हणून्च हा हा हा "ला उगाच:

दादा कोंडके 08/10/2013 - 10:32
ज्योतिषांकडे जातांना.....ज्योतिषांकडे गेल्यावर
ज्योतिषांकडे जाताना जोडे घेउन जावेत. आणि ज्योतिषांकडे गेल्यावर.. हॅ हॅ हॅ... :D

समोरच्याला, सध्या काय वाट्टेल ती परिस्थिती असो "तुमचा भविष्यकाळ सुखाचा आहे" हे पटवून देतात! आणि स्वतःचा हेतू साध्य करतात.

सुहासदवन 08/10/2013 - 13:33
ज्योतिषांकडे जातांना
मुळात ज्योतिषाकडे जावेच कशाला? स्वतःचा लहानपणीचा काळ आपल्यालाच धड आठवत नाही तर मग ज्योतिष्याला काय आपला मागचा जन्म आणि प्रारब्ध आठवणार? स्वतः ह्या जन्मात केलेली चांगली वाईट कर्मे ओळखा आणि त्याची जी काय फळे मिळणार आहेत ती स्वतः भोगायला तयार राहा.
ज्योतिषांकडे गेल्यावर
- गप्प राहावे. ज्योतिषी आणि पत्रिका ह्या दोघांनाच बोलू द्यावे. मी स्वतः नावाजलेले ज्योतिषी कसे धादांत खोटे बोलतात हे पाहायला माझी स्वतःची खरी पत्रिका घेऊन गेलो. पण मी माझी असलेली परिस्थिती न सांगता वेगळेच काहीतरी सांगितले आणि मग ज्योतिषी देखील कसा माझ्या बरोबर त्या खोट्या गोष्टीत रंगून मला काय काय उपाय सांगत होता ते सुज्ञास सांगणे न लगे. जर खरच माझ्या पत्रिकेत त्याला माझे आयुष्य दिसत असते तर निदान एकदा तरी मला सांगायला हवे होते ठामपणे की तुम्ही जे बोलत आहात त्यावर माझा विश्वास बसत नाही. डॉक्टरची, कोर्टाची आणि ज्योतिष्याची पायरी चढू नये.

In reply to by सुहासदवन

मी स्वतः नावाजलेले ज्योतिषी कसे धादांत खोटे बोलतात हे पाहायला माझी स्वतःची खरी पत्रिका घेऊन गेलो. पण मी माझी असलेली परिस्थिती न सांगता वेगळेच काहीतरी सांगितले आणि मग ज्योतिषी देखील कसा माझ्या बरोबर त्या खोट्या गोष्टीत रंगून मला काय काय उपाय सांगत होता ते सुज्ञास सांगणे न लगे." मी पण एका डॉक्टर कडे गेलो आणि मला होत नसलेले त्रास त्याला आई हुई करत सांगितले..त्याने पण मी सांगत असलेल्या लक्षणांवरून काही उपाय सांगितले...औषध दिले ...मी काहीच औषध उपाय नं करता बर झालो... पण त्या तज्ञ डॉक्टरला हे कळलेच नही कि मला मुळातच काही होत नाहीये... सुज्ञास सांगणे नलगे..

टिंगल करता काय ज्योतिषाची? आयुष्यात एखादा झटका बसेल ना मग समजेल. तेव्हा ज्योतिषाची, देवाची, आठवण येईल. जेव्हा सगळ काही सुरळीत असत तेव्हा ही असली थेर सुचतात.इतर वेळेला ज्योतिषाची टिंगल करणारे मागल्या दाराने ज्योतिष बघतात आयुष्यात कधी ना कधी! बघा तुमच विज्ञान उपयोगाला येतय का तेव्हा!.............,,,,, (जिज्ञासूंनी अजून भर घालावी)

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुहासदवन 09/10/2013 - 09:38
आयुष्यात एखादा झटका बसेल ना मग समजेल. तेव्हा ज्योतिषाची, देवाची, आठवण येईल.
अजिबात नाही. एखादा झटका बसला तर हजारो इतर उपाय आहेत ना करायला, ज्योतिष आणि देव देव करायचे सोडून. आम्ही स्वतः समर्थ (गैरसमज नसावा) आहोत आमच्या समस्यांची काळजी वाहायला. उगाच देवाला कशाला त्रास? त्याला राहू दे न मस्तपैकी.
इतर वेळेला ज्योतिषाची टिंगल करणारे मागल्या दाराने ज्योतिष बघतात आयुष्यात कधी ना कधी!
हे मात्र बरोबर. कधी कधी जेव्हा एखादा शनिवार रविवार काहीच मनोरंजनाचे साधन नसते तेव्हा एखाद्या मित्राला घेऊन जोतीष्याकडे जायचे आणि मग धमाल फुल टू टाईमपास.
बघा तुमच विज्ञान उपयोगाला येतय का तेव्हा!.............,,,,,
त्या पेक्षा तुम्हीच आजच्या सुधारलेल्या जोतिष्यांना सांगा ना आमच्या विज्ञानाने निर्माण केलेले संगणक आणि इतर प्रणाली वापरू नका म्हणून. बघूया काय होतंय ते. चमत्कार आणि साक्षात्कार हे फक्त टीवी आणि पुस्तकातच होतात प्रत्यक्षात नाही ह्यावर ठाम विश्वास असणारा

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे 09/10/2013 - 09:46
हे मात्र पटले नाही घाटपांडे साहेब , मी स्वतः आयुष्यात बर्याच उतार चढावातून गेलो आहे (आपल्या भाषेत झटका) ज्यात करियर पासून जीव(रोगामुळे) हे दावणीवर लावलेले होते तरीही कधी ज्योतिषाकडे जावे असे मला वाटले नाही किंवा मी कोणत्याही देवाला पाण्यात ठेवणे अथवा नवस बोलणे असे केले नाही . त्यात ज्योतिषाचा किंवा विज्ञानाचा भाग नाही. हा केवळ मानसिकतेचा भाग आहे. ज्यावेळी माणूस एखाद्या संकटातून जात असतो तेंव्हा त्याला मानसिक आधाराची गरज असते. यावेळेस जो कोणी मानसिक आधार देईल तो माणूस त्यावेळी महत्त्वाचा ठरतो. सुदैवाने माझ्या अशा संकटांच्या वेळेस माझे वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून मला अशा वेळेस सुद्धा ज्योतिषांकडे जावे असे वाटले नाही. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"हे श्री स्वामी समर्थांचे वाक्य त्यांच्या शिष्यांना असेच आत्मिक बल देत असतात असे ऐकले आहे. आपण संकटाच्या वेळेस आपल्या मुलांच्या मागे असे खंबीरपणे उभे राहिलो तर त्यांना दुसर्या आधाराची गरज वाटणार नाही. माझ्या जन्माच्या वेळेस पत्रिकेत लिहून ठेवलेले भविष्य जवळ जवळ नव्वद टक्के खरे झाले आहे परंतु मला अजूनही ज्योतिषांकडे जावेसे वाटत नाही. एवढेच आहे कि मी स्वतः ज्योतिष हि विद्या आहे हे मानतो पण अजून ते विज्ञान आहे असे मानण्यास तयार नाही. बाकी लोकानी आपला विचार आपण करावा

In reply to by सुबोध खरे

सुहासदवन 09/10/2013 - 10:14
मला प्रत्यक्ष कोणतीही व्यक्ती आणि जोतिष ह्याबद्दल वैयक्तिक आकस नाही. पण ज्योतिष हा निव्वळ ठोकताळा आहे हे वारंवार माहीत होऊन देखील आपल्या समाजातील लोकांचा त्यावर असणारा विश्वास कमी होत नाही ह्याबद्दल खरंच खेद वाटतो.
माझ्या जन्माच्या वेळेस पत्रिकेत लिहून ठेवलेले भविष्य जवळ जवळ नव्वद टक्के खरे झाले आहे.
माफ करा, राग मानू नका पण अशी टक्केवारीतील खरी होणारी भविष्ये प्रत्येकाच्या पत्रिकेत असतात आणि ती खरी होतात देखील कारण ती जेनेरिक वाक्ये असतात स्पेसीफिक नव्हे. माझ्याही पत्रिकेतील बहुतेक वाक्ये खरी आहेत पण तीच वाक्ये थोडी बहुत करून इतर दुसऱ्या व्यक्तीच्या पत्रिकेत देखील आहेत. वाटल्यास तपासून पहा.

In reply to by सुहासदवन

दादा कोंडके 09/10/2013 - 11:15
सहमत. उच्चशिक्षीत लोकं जेंव्हा असं म्हणतात तेंव्हा विषाद वाटतो. ज्योतिषावर किंवा देव-देवादीकांवर विश्वास असंण्यामागचं कारण, संस्कार असतात. लहानपणी वातावरण, आई-वडील आणि इतर जेष्ठ मंडळींमुळे असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. त्यांना काही अनुभव-अनुभुती आलेले असतात, नंतर थोडं कळायलागल्यावर आणि विवेक आल्यावरदेखिल त्यांच्यावरील प्रेम-आपुलकीमुळे ही डोक्यावर बसलेली भुतं सहजासहजी उतरत नाहीत.

In reply to by सुहासदवन

अनिरुद्ध प 09/10/2013 - 13:08
तपासुन पाहिल्यावर असे आढळले कि जे काही जेनेरिक म्हणुन लिहिले गेले आहे ते माझ्या बाबतित तरी २०% सुद्धा बरोबर नाही आले आहे,म्हणजेच आपला ९०% चा दावा माझ्या बाबतित तरी खोटा ठरला आहे,आता तुम्ही म्हणाल अपवाद आहे,कारण वैज्ञानिक भाषेत सुद्धा अपवादा शिवाय नियम सिद्ध होत नाही असे म्हणतात.

बॅटमॅन 09/10/2013 - 12:44
सर्वश्री सुबोध खरेजी, सुहासवदनजी आणि दादा कोंडकेजी: घाटपांडेकाकांचा प्रतिसाद उपरोधिक होता. टोनवरून अन त्यांच्या आधीच्या लेखांवरूनच समजतंय की ते.

विजुभाऊ 09/10/2013 - 13:05
खरे आहे घाटपांडे काका. आम्ही जे सांगतो ती गोष्ट खरी. आम्ही काही वेळा ज्याम्च्या थेट सम्बन्ध नाही त्याला समजू नये मात्र समजणाराना इशारा मिळावा अशा भाषेत सांगतो हे असे करायला ऋषी मुनीनी वैदीकानी सांगितले आहे. अगदी पाश्चात्य दाखले घ्यायचे तरी घ्या . ऋषी निरुत्तर दमनस ( नॉस्ट्रेडेमस भारतात या नावाने वावरायचा असे म्हणतात. तज्ञांच्या मते हे समकालीन ऋषी असावेत असे एक दुमत आहे. आपण त्या वादात सध्या पडायला नको ) यानी देखील असेच सांगितले आहे्एच बघाना एकविसाव्या शतकातील युद्धा बद्दल त्यानी लिहून ठेवले आहे पाण्याखालून आग ओकली जाईल. हवेतून झेप घेईल विजयी होईल तो जेंव्हा कणाना संदेश मिळेल. सूर्य जमिनीवर येईल किती स्पष्ट शब्दात ऋषी निरुत्तर दमनस यानी अणू युद्ध आणि अणू पाणबुडीबद्दल सांगितलेले आहे इतके स्पष्ट सांगुनेही ज्यांच्या ताच्याशी थेट संबन्ध नाही अशा इतरेजनाना यातून बोध मिळणार नाही मात्र समजणाराला इशारा मिळेल. जगाचा अंत कसा होईल यावर ऋषी निरुत्तर दमनस म्हणतात. आकाशातून वर्षाव होईल. ढग फुटून जातील तप्त धरती शुक्र मंगळाची युति लांडगा अस्वलाला मारेल. उंट जिराफा च्या घरी जाईल वायू तापेल पाण्याखाली. मासे उडून जातील. आम्ही याचे विष्लेषण केले आहे. मात्र तेदेखील अस्पष्ट ठेव असे द्रष्ट्याने सांगितले आहे. म्हणून त्याच्याच भाषेत म्हणजे ज्याचा संबन्ध नाही त्याला कळणार नाही असे ठेवले आहे. आम्ही जे साम्गतो तेंव्हा असेच साम्गतो

मदनबाण 09/10/2013 - 13:52
ऋषी निरुत्तर दमनस ( नॉस्ट्रेडेमस भारतात या नावाने वावरायचा असे म्हणतात. तज्ञांच्या मते हे समकालीन ऋषी असावेत असे एक दुमत आहे. आपण त्या वादात सध्या पडायला नको ) ह्म्म... मला स्मरते आहे की ट्वीन टॉवरवर विमान कोसळण्याच्या बरेच वर्ष आधी मी नॉस्ट्रेडेमस वर आधारीत एक चित्रपट बघीतला होता, मला वाटत त्यात ट्वीन टॉवर सारखे टॉवर पडताना दाखवले होते. ज्या वेळी ९/११ झाले तेव्हा तो चित्रपट मला आठवला होता. बहुतेक चित्रपटाचे नाव होते :- The Man Who Saw Tomorrow जाता जाता :-आता सहज म्हणुन जालावर या बाबत शोधाशोध केली तर जसे मला वाटले होते,तसेन ज्या ज्या लोकांनी हा चित्रपट ही घटना घडण्याच्या बर्‍याच आधी काळ पाहिला होता त्यांच्या मनात सुद्धा ही घटना घडल्यावर हाच चित्रपट आला{नॉस्ट्रेडेम}) आला.

सुबोध खरे 09/10/2013 - 13:55
साहेब, माझ्या जन्माच्या वेळेस त्या ज्योतीषानी लिहून ठेवलेले आहे कि मेडिकल मध्ये करियर मिळेल. मुलगा लष्करात जाईल आणि मोठ्या हुद्द्यावर चढेल पण हे सर्व सोडून येईल.मी लष्करात देशभक्ती साठी गेलो नाही. माझा मुंबईच्या मेडिकल कॉलेजचा प्रवेश केवळ २ गुणांनी हुकला आणि प्रवेश परीक्षेतून केवळ आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. यानंतर मी नौदलात कमांडर या हुद्द्यापर्यंत( जोईंट कमिशनरची पातळी) चढलो आणि काही कारणास्तव मी ते सर्व सोडून दिले. आता हे इतके सर्व जर "लिहिले" आहे तर त्याला ठोकताळा कसे म्हणावे.जमले तर माझी जुनी पत्रिका अपलोड करायची तयारी आहे. यात मुलगा भरपूर शकेल भरपूर पैसे मिळवेल डोक्याला मार लागेल किंवा पचनाची तक्रार असेल अशी गोल गोल वाक्यरचना आहे असे नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे माझी फक्त जन्मतारीख सांगून पुण्यातील एका ज्योतिषाने( जुवेकर नावाचे आणि विश्रामबाग वाड्याच्या आसपास कुठेतरी होते असे आठवते). आपला पाण्याशी संपर्क आहे आणि पंधरा ते सतरा वर्षे सरकारी नोकरी असेल असे सांगितले हे सुद्धा मी नौदलात भरती होणार आहे यातील अवाक्षर न सांगता. मी कॉलेजात शिकतो आहे एवढेच त्यांना सांगितले होते. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे सरकारी(किंवा लष्करी) नोकरी हि पत्रिकेत लिहिलेली आहे.(मी शुद्ध मराठी बोलत होतो म्हणून लष्कराबद्दल बोलायला ते चाचरत असावेत) या ज्योतिषाकडे मी मित्राच्या बरोबर गेलो होतो आणि माझे पैसे सुद्धा त्यानेच भरले. ( माझा तेंव्हा सुद्धा ज्योतिष हे शास्त्र आहे यावर विश्वास नव्हता आणि आजही नाही). मी त्याच्या बरोबर गेलो होतो ते केवळ त्याला मराठी येत नव्हते म्हणून. एखाद्या ज्योतिषाला असे खरच आहे काय हे तपासायचे असेल तर मी माझी जन्मतारीख वेळ आणि स्थळ सांगण्यास तयार आहे. मला त्यांच्या भविष्यात रस नाही. फक्त केवळ आपण (तथाकथित) सुशिक्षित आहोत आणि आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही म्हणून ते थोतांड आहे असे मानण्याची माझी अजून तरी तयारी नाही. फक्त ती एका विद्या आहे शास्त्र नाही असे मला वाटते. आणि जोवर ते शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही तोवर त्याच्या वाटयाला जायची माझी तयारी नाही.

In reply to by सुबोध खरे

गंमतीची गोष्ट म्हणजे माझी फक्त जन्मतारीख सांगून पुण्यातील एका ज्योतिषाने( जुवेकर नावाचे आणि विश्रामबाग वाड्याच्या आसपास कुठेतरी होते असे आठवते). आपला पाण्याशी संपर्क आहे आणि पंधरा ते सतरा वर्षे सरकारी नोकरी असेल असे सांगितले हे सुद्धा मी नौदलात भरती होणार आहे यातील अवाक्षर न सांगता. मी कॉलेजात शिकतो आहे एवढेच त्यांना सांगितले होते. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे सरकारी(किंवा लष्करी) नोकरी हि पत्रिकेत लिहिलेली आहे.
एक शंका आहे कि फक्त जन्मतारीख सांगून पत्रिका तयार होत नाही. त्या ज्योतिषाने सरकारी नोकरी पत्रिकेत लिजिलेली आहे असे सांगितले. मग त्याने कशाच्या आधारे हे सांगितले? सांगितलेले भाकित खरे आले याबद्दल दुमत नाही. मला असे वाटते की त्याने हे अंतंस्फुर्तीने सांगितले असावे. ही अंतस्फुर्ती मानसशास्त्राशी संबंधीत आहे. खर येणे हा योगायोगाचा भाग असू शकतो.
फक्त केवळ आपण (तथाकथित) सुशिक्षित आहोत आणि आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही म्हणून ते थोतांड आहे असे मानण्याची माझी अजून तरी तयारी नाही. फक्त ती एका विद्या आहे शास्त्र नाही असे मला वाटते. आणि जोवर ते शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही तोवर त्याच्या वाटयाला जायची माझी तयारी नाही.
या मताचा आदर आहे.मला आपली भूमिका मान्य आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रगुप्त 20/10/2013 - 20:19
ही अंतस्फुर्ती मानसशास्त्राशी संबंधीत आहे.
या 'अंतस्फुर्ती' लाच पतंजली 'प्रत्यक्ष ज्ञान' म्हणतात, असे वाटते. यालाच 'इंद्रियातीत बोध' असेही म्हणू शकतो. भविष्य जाणून घेणे हे या बोधातून शक्य आहेसे दिसते. 'चित्तवृत्तीं'चा लोप झाल्यावर हा बोध निखळपणे प्रकटतो, वगैरे पतंजलींच्या योगसूत्रातून सांगितलेले आहे. मी काही काळ केलेल्या लंबकाच्या प्रयोगातून सहजपणे भविष्य जाणू शकलो होतो, परंतु त्यामागचे नेमके कार्यकारण कळले नाही. तेवढी लायकी वा साधना नाही असेच म्हटले पाहिजे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे 21/10/2013 - 11:01
फक्त जन्म तारीख नव्हे तर बरोबर जन्म वेळ आणि जन्म् ठिकाण सांगितले होते.वडिलांच्या मित्राच्या रुग्णालयात जन्म झाल्याने वेळ पण अचूक ठाऊक आहे तपशील कमी टंकल्याबद्दल माफ करा. (दोन्ही ज्योतिषानि जवळ जवळ त्याच गोष्टी सांगितल्या. का आणि कसे ते माहित नाही. तरीही आजही मी ज्योतिष शास्त्राकडे आणि ज्योतिषांकडे संशयानेच पाहतो.कारण ते शास्त्र आहे असे शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होत नाही तोवर असेल. कदाचित आधुनिक(?) शिक्षणाचा प्रभाव असावा.

१)पुणे विद्यापीठाने केलेल्या डबल ब्लाईड टेस्ट मधे असे निदर्शनास आले आहे की ज्योतिषाला शास्त्र म्हणता येईल असा स्टाँग स्टॅतिस्तिकल इव्हिडन्स ( भक्कम सांखिकीय पुरावा ) नाही . त्यामुळे सायंटीफिकली हा विषय संपलेला आहे . २) आता लॉजिकली , समजा ज्योतिष खरे आहे असे मानले , क्ष माणसाचे कोनत्या एका विषिष्ठ घटने बाबत , भ०(क्ष) हे भविष्य प्रेडिक्ट केले तर क्ष त्यात हस्तक्षेप करुन ते बदलु शकेल मग जे बदलल्यावर घडेल त्याचे प्रेडिक्शन भ१(क्ष) असे असेल , पण परत क्ष त्यात हस्तक्षेप करुन ते बदलु शकेल मग जे बदलल्यावर घडेल त्याचे प्रेडिक्शन भ२(क्ष) .... मग भ३(क्ष) ...भ४(क्ष)... भ५(क्ष) असे हे इन्फायनाईट रेग्रेस होईल जस्ट लाईक Turtles All the Way Down. सो लॉजिकली ही जोतिष शास्त्र असु शकत नाही .( इथे मनुष्य , कर्तृत्वाने भविष्यात बदल घडवु शकतो , हे गृहीत धरले आहे which requires proof ... but lets lets discuss it some other time ) ३) सायकॉलॉगिकली , ज्योतिष हे एक प्रकारचे "कंडिशनिंग" असावे (क्लासिकल कंडिशनिंग सारखे) सोप्या शब्दात ... क्ष ग्रह य स्थानात असला की झ परिणाम होतात हे कोणी तरी आधी सांगुन ठेवल्या मुळे माणुस त्यासाठी कंडीशन्ड होतो पुर्वी एका ऋषींनी मांजर पाळली होती , ती यज्ञात सारखी मधे मधे करायची लोकांचे चित्त विचलीत व्ह्यायचे , मग गुरुजींनी यज्ञा आधी ती मांजर एका खांबाला बांधायला सुरुवात केली मग यज्ञ व्यवस्थित पार पडु लागले ... पण मांजर खांबाला बांधल्याने यज्ञ व्यवस्थित पार पडतो असे कंदीशनिंग झाल्याने ती मांजर मेल्यावर शिष्य लोक दुसर्‍या कडची मांजर आणुन यज्ञा आधी आवर्जुन त्या खांबाला बांधु लागले ज्योतिषही असाच काहीसा प्रकार असावा ...ह्यावर एकदा अभ्यास केला पाहिजे ...मस्त पी एच डी विषय होवु शकतो हा :) अवांतर : पंत , जरा सांगता काहो आमच्या पत्रिकेत ज्योतिष शिकण्याचा योग कधी आहे ते ? ...हा घ्या आकडा ७३ !

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 09/10/2013 - 14:42
भक्कम सांख्यिकीय पुरावा नाहीच!!!! पण वर मजा अशी, की कुणीही वर्तवलेले भविष्य गंडल्यास शास्त्र गंडलंय असं कोणीही सांगत नाही...फक्त तो विशिष्ट ज्योतिषी गंडला असे सांगतात आणि वर तार्किकतेचा दावा करतात. तथाकथित शास्त्रवाद्यांचे हे मोठेच तार्किक वर्तन बरे!!!!

In reply to by बॅटमॅन

अगदी सेम सेम अर्ग्युमेंट !! जेव्हा श्रीमदाद्यशंकराचार्य विविध वादविवादांमध्ये बौध्द मताचे खंडन करायचे तेव्हा बौध्द भिक्कु हेच लॉजिक वापरायचे "मति दौर्बल्यंमेतत , न मत दौर्बल्यं ||" पण आचार्यांनी ह्या विधानाचे ही तार्किक दृष्या खंडन केले आहे ... (line of arguments आत्ता आठवत नाहीये , घरी आलो की बघुन पेस्ट करतो ) आपण हीच तार्किक विधाने देवुन ह्या दाव्याचे खंडन करु शकतो !!

In reply to by बॅटमॅन

दादा कोंडके 09/10/2013 - 16:01
वर इथं म्हटल्याप्रमाणे,
प्रश्नकुंडली मांडताना पहिला सगळ्यात महत्वाचा नियम असा कि प्रश्न कर्त्याच्या मनात त्या प्रश्नाबाबत तळमळ हवी . उगीचच टाइम पास म्हणून किंवा ज्योतिषाची टर उडवण्यासाठी म्हणून विचारलेला नसावा
म्हणजे बोलतीच बंद. दुसरा नियम असाही करावा की भविष्य खरं ठरलं नाहितर स्वतःचच नशीब खोटं आणि भविष्यकळून घ्यायचाच योग नसल्याचं मान्य करायला हवं.

क्रेझी 09/10/2013 - 15:16
कोणताही ज्योतिषी हल्ली कॉम्प्युटर वापरून पत्रिका बनवून देतो. पण जर ते सॉफ्टवेअर लिहीणा-याने काही चुक केली असेल तर ती पत्रिका १००% बरोबर असेल का?

In reply to by क्रेझी

विजुभाऊ 09/10/2013 - 19:23
कोणताही ज्योतिषी हल्ली कॉम्प्युटर वापरून पत्रिका बनवून देतो. पण जर ते सॉफ्टवेअर लिहीणा-याने काही चुक केली असेल तर ती पत्रिका १००% बरोबर असेल का?
अर्रर्रर्र्र.......... तुम्ही आणखी एक नवी सबब शोधून दिलीत की. खोटे ठरले तर दोष प्रोग्रामर चा. खरे ठरले तर श्रेय ज्योतिषाला

In reply to by क्रेझी

अनिरुद्ध प 10/10/2013 - 11:49
ती असलीच तरिही ज्याचा विद्येचा सखोल अभ्यास असेल तो ती पत्रिका स्वता नव्याने बनवुन ताडु शकतो,काही जण असेही ऐकलेले आहेत जर आपण एखद्या व्यक्तिचे प्रकाशचित्र आणि कुन्डली दिलीत तर ते प्रकाशचित्र पाहुन सान्गतात कि ती कुन्डली त्या व्यक्तीची आहे किवा नाही.

विटेकर 09/10/2013 - 15:31
भविष्य पहाणे हा मानसिकतेचाच भाग आहे. ज्यामुळे संकट काळात मनाला उभारी येते ते करायला काय हरकत आहे? प्रत्यक्ष संकटापेक्षा संकटाच्या कल्पनेने मनुष्य अर्धमेला होतो. आणि संकट आल्या वाटेने निघून ही जाते पण त्याकाळात जी मानसिक हानी होते त्यावर भविष्याचा सल्ला उपयोगी पडू शकतो. अमूक काळानंतर संकट संपणार आहे हा दिलासा फार मोठा असतो ! आणि सल्लाच तो , तो काय डॉक्टरांचा चुकत नाही काय ? ज्योतिषाकडे जाताना आपण एका सल्लागाराकडे जात आहोत एव्ढेच ध्यानात ठेवावे. आपल्या संचितामुळे आपल्या वाट्याला भाग्य येत असते त्यात ब्र्ह्मदेवाचा बाप देखील बदल करु शकत नाही. फक्त ते भोगताना कमी त्रास व्हावा , भोगून संपून जावे अशांसाठीच उपाय योजना करता येऊ शकते, भाग्य बदलता येऊ शकत नाही यांवर माझा ठाम विष्वास आहे. आणि मग जे बदलता येत नाही ते जाणून घ्यावे का ? हा ज्याच्या त्याच्या मान्सिकतेचा प्रश्न आहे.

In reply to by विटेकर

बॅटमॅन 09/10/2013 - 15:46
ज्योतिषी भाग्य बदलू शकतो असा बहुतांश ज्योतिषांचाही दावा असतो किंवा कसे याबद्दल साशंक आहे. तूर्तास मुख्य वाद हा कुंडलीत बघून खरे भविष्य कळते की नाही हाच आहे.

In reply to by बॅटमॅन

विटेकर 09/10/2013 - 16:26
नसेना का खरे भविष्य ! डॉक्टर महाशयांचे निदान चुकत नाही का? आणि सेकंड ओपिनियन घ्या ना ! प्रत्येक विद्येच्या आणि व्यवसायाच्या मर्यादा आहेत. वैमानिक/चालक योग्य तर्हेने विमान/वाहन चालवून आपल्याला विविक्षित स्थळी पोहोचवेल अशा विश्वासानेच आपण विमानात/ वाहनात बसतो ना ? पण कधी कधी चूक होते ना ? मग ज्योतिषानेच परिपूर्ण असावे असा आपला आग्रह का ?

In reply to by विटेकर

बॅटमॅन 09/10/2013 - 16:46
अतिशय हास्यास्पद तुलना. डॉक्टरकी आणि वैमानिक शास्त्र (प्राचीन नव्हे आणि अर्वाचीन) यांतही चुका होतात. पण शास्त्राचा बेस पक्का आहे. जे ठोकताळे आहेत ते निव्वळ प्युअर चान्सपेक्षा जास्त आहेत किंवा नाहीत यांच्या अतिशय काटेकोर चाचण्या घेतल्या जातात. एखादे नवीन औषध बाजारात आणायचे तर प्रयोग केले जातात, विमानाचा पार्ट डिझाईन करताना कितीतरी चाचण्या घेऊन मगच तो योग्य तिथे जोडला जातो. एक लक्षात घ्या, शास्त्र म्हंजे १००% अ‍ॅक्युरसी असे नसते. पण चुका झाल्या तरी बेस पक्का ही ग्यारंटी सततच्या प्रयोगांतूनच मिळते. सातत्याने प्रयोग करून, एखाददुसरे प्रचल बदलून काय निष्कर्ष होतात त्यांच्या आधारे हे सगळे ठरवले जाते. ज्योतिषात असे काय आहे? पुणे विद्यापीठाने अशी चाचणी घेतली तेव्हा संख्याशास्त्राच्या आधारे ज्योतिषांचे दावे फोल ठरले. नियमाला अपवाद सापडल्यामुळे नियम रद्दबातल होतोच असे नाही, परंतु त्यासाठी अनेकविध संख्याशास्त्रीय चाचण्या आहेत, काय-स्क्वेअर टेस्ट, टी-टेस्ट, झेड-टेस्ट, फिशर्स कोरिलेशन टेस्ट, इ.इ. यांपैकी कुठल्या चाचणीत ज्योतिषाला आजपर्यंत बसवले गेले आहे? चार टाळकी जुन्या काळापासून सांगत आलीत म्हणून दावा करणे यापलीकडे ज्योतिषात काय रिगरस पार्ट आहे हे सांगता आले तर बरे. कुणाला इच्छा आहे त्याने अवश्य ह्या फ्रॉडच्या मागे लागावे. मुद्दा इतकाच आहे, की या लोकांचे दावे धडपणी पडताळायला हे लोकच तयार नसतात-पितळ उघडे पडण्याच्या भीतीमुळे. आणि जिथे दावा पडताळायचा चान्स मिळतो, तिथे पितळ झक्कत उघडे पडतेच!!! जरा शोधले तर रामदास वैग्रे संतांनीही या पाखंडाला शिव्याच घातलेल्या दिसून येतील.

माझा ह्या विषयावर पुष्कळ गोंधळ झालेला आहेच.. त्यामुळे मी ज्योतिष खरे की खोटे ह्या फंदात पडत नाही..पण.. धोंडोपंतांच्या ब्लॉग वर अनेकदा असे लेख असतात ज्यात ते नेमकी तारीख/ ठिकाण सांगतात. इथे "घरात तुम्ही सगळ्यांच कराल पण कुण्णी कुण्णी तुमचा विचार करत नाही" टाईप भविष्य नाहीये. कधी परदेशात जाईन - अमुक तारीख इतकं ठोस सांगितल्याच दिसतं.. हे कसं काय?

In reply to by पिलीयन रायडर

बाळ सप्रे 09/10/2013 - 17:30
इतकं ठोस सांगितल्याच दिसत असेल तर त्यांनी पुणे विद्यापीठ / अंनिसचं चॅले़ज स्वीकारायला हव होतं असं नाही का वाटत? असे बरेच दावे घटना घडून गेल्यावर हमखास ऐकु येतात.. तसेच चुकलेल्या भविष्याविषयीमात्र सोयीस्कररीत्या मौन बाळगले जाते..

In reply to by बाळ सप्रे

त्या बद्दल काही माहित नाही... माझा प्रश्न इतकाच आहे की ढोबळ भविष्य सांगणारे पाहीले आहेत. पण पंतांच्या ब्लॉगवर तर प्रश्नाचे एकच एक उत्तर (जसे की अमुक तारीख) आणि त्या उत्तरापर्यंत ते कसे पोहोचले ह्याचे विवेचन असते. ज्यांना पत्रिका कळते ते लोक वाचुन सांगतिल की ते विवेचन कितपत बरोबर असते. पण जर कुणी गणित सोडवल्या सारखं भविष्य सांगत असेल आणि जेनरिक उत्तरा ऐवजी स्पेसिफिक उत्तर देत असेल तर त्यांच्या पद्धतीचा अभ्यास करता येईल का? तुम्ही एकदा ब्लॉग पहा.. विवेचन जे मी म्हणत आहे ते असे करतात ते.. नमुन्या दाखलः- http://dhondopant.blogspot.in/2013/09/blog-post.html

In reply to by पिलीयन रायडर

बाळ सप्रे 09/10/2013 - 19:33
ब्लॉग वाचला.. एकतर घटना घडुन गेल्यावरचा दावा आहे.. पुढे.. स्पेसिफिक उत्तर आणि विवेचन असले तरी विवेचनाच्या मूळाशी गेल्यास "रवि आश्लेषात गेल्यावर २-३ दिवसात घटना घडेल" अशी कार्यकारणभावरहीत विधानेच आहेत.. वरच्या शब्द्दांच्या बुडबुड्यांना भुलून लोकांना वाटतं "वा ! काय विवेचन आहे!!" पण त्या वैभवच्या परदेशी जाण्याचा आणि सूर्याच्या त्या नक्शत्रात जाण्याचा काय संबंय?? याचं विवेचन कुठाय?? एखादा सॉफ्टवेअर मध्ये काम करणारा , व्हिसा असणारा माणूस जो बरेच दिवस परदेशी जायला "ड्यू" आहे.. त्याला "लवकरच जाशील" असे सांगितल्यास उत्तर बरोबर येण्याची शक्यता जास्त हे समजण्यासाठी ज्योतिष जाणण्याची (??) गरज नसून फक्त कॉमन सेन्स असला तरी पुरतो ..

In reply to by बाळ सप्रे

बरोबर.. साधारण अंदाज बघुन.. परिस्थिती पाहुन ज्योतीष सांगता येईल असं मलाही वाटतं.. मला कुतुहल फक्त "४-५ ऑगस्ट ला जाशील" हे सांगुन मग तो वैभव खरच ५ ऑगस्टला गेला ह्या गोष्टीचं वाटतं.. आणि अशा बर्‍याच घटना ते लिहीतात. म्हणुन ज्यांना इथे पत्रिका कळते त्या व्यक्तीने सांगावे की इतके अचुक काही सांगणे कसे शक्य आहे? मुळात ज्योतीषाच्या विरोधात सगळेच लिहीत आहे. इथे कुणी शास्त्रशुद्ध आणि संयमित भाषेत पत्रिकेमधल्या ह्या गणितांविषयी सांगेल काय? धोंडोपंत लिहीतील अशी मला मुळीच आशा नाही..

In reply to by पिलीयन रायडर

सुहासदवन 10/10/2013 - 11:24
जातकाने त्याला विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना अशी एखादी हिंट दिली जाण्याची दाट शक्यता आहे. बहुतेक वेळा आपल्या प्रश्नांची उत्तरे आपणच नकळत देत असतो हीच तर खरी ट्रिक असते प्रश्नांची.

धोंडोपंत 03/01/2008 - 14:16
ह्या लेखाची लिंक येथे वेगळा विषय म्हणून दिली असती, तर जास्त संयुक्तिक झाले असते. मूळ लेखाशी विसंगत विचारांची लिंक देणे हे फारसे प्रगल्भतेचे लक्षण नव्हे. प्रत्येकाने आपले विचार बाळगावेत आणि त्यानुसार जगावे. पण इतरांच्या विचारात अनाठायी हस्तक्षेप करून आपण म्हणतो तेच खरे ही वृत्ती असमर्थनीय ठरते. अशा पद्धतीचा उसना विवेक (borrowed wisdom) फारसा प्रकाश पाडू शकत नाही. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

इनोबा म्हणे 03/01/2008 - 14:48
पंतांच्या मताशी मी सहमत आहे. विकी नावाच्या ज्ञानकोशाबद्दल माहित होते,पण अज्ञानकोशाची आज पहिल्यांदाच माहिती मिळाली,याबद्दल आपले आभार्. आपल्या अज्ञानाचे आणखी प्रदर्शन करू नये ही विनंती.

विकि 03/01/2008 - 15:30
विसंगत लेख कसा . जसा तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार तसा आम्हाला पण आहे. हा विनायक कोण मला अज्ञानी म्हणणारा. आपला कॉ.विकि

In reply to by विकि

इनोबा म्हणे 03/01/2008 - 16:20
आम्ही कोण म्हणूनी काय पूसता.... तुझी चूक तुला दाखवण्यासाठी केलेला एक छोटासा खटाटोप. तुला मत मांडण्याचा अधिकार नक्कीच आहे,पण दुसर्‍याचे मत खोडून स्वतःचे मत मांडण्याचा मात्र नाही.

In reply to by इनोबा म्हणे

विकि 03/01/2008 - 16:27
पण मी तुझे मत थोडी खोडून काढले. मी फक्त त्या लेखावर दै. लोकसत्ताची लींक जोडली. आपला कॉ.विकि

In reply to by विकि

धोंडोपंत 03/01/2008 - 18:11
विकि महाशय, मत मांडण्याचा अधिकार तुम्हालाही आहेच. त्याबद्दल दुमत नाहीच. फक्त तुम्ही एक वेगळा विषय म्हणून तो मांडला असतात तर चांगले झाले असते. मूळ लेखाच्या विषयाच्या विरुद्ध तत्वाचे प्रतिपादन करणारे लेखन स्वतंत्र लेख म्हणून प्रसिद्ध करावेत असा आंतरजालावरील संकेत आहे. त्यात तुम्ही " त्या ऐवजी हे वाचा' असे शीर्षकात लिहिले आहे, हे लोकशाही मूल्यात बसत नाही. कारण लोकांनी काय वाचावे हे ठरविण्याचा अधिकार तुम्हाला नाही. त्यासाठी तुम्ही स्वतंत्र लेखन करून तुमचे विचार मांडा. ज्यांना ते पटतील ते प्रतिसाद देतील. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर 03/01/2008 - 15:50
वा पंत... आपण अतिशय मुद्देसूद लेख लिहिला आहे. एकंदरीतच या विषयाबद्दल लोकांचे निरनिराळे सम-गैरसमज फार पूर्वापार आहेत. आपल्या अश्या लेखांमुळे हे चित्र बरेच स्पष्ट होईल याची खात्री वाटते! असो.. सिद्धी आणि प्रसिद्धी या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. हे वाक्य फार आवडले, फार गहन अर्थ या वाक्यात दडलेला आहे असे आम्हाला वाटते! आपला, (ग्रहतार्‍यांतला) तात्या.

In reply to by डेंजर डॉन

छोटा डॉन 04/01/2008 - 08:30
च्यायला आमचंच भविष्य अवघड दिसाय लागलय !!! दिवसेंदिवस आमच्या प्रतिस्पर्धी गँग वाढतच चालल्या आहेत.... धोंडोपंत दादा, बधा आमच्यावर शनी वक्री आहे का? असेल तर लगेच शांती करून टाकू.... कसे???? छोटा डॉन [आमची कोठेही शखा नाही ]

In reply to by छोटा डॉन

धोंडोपंत 04/01/2008 - 14:01
छोटे डॉन महाशय, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे तशी तुमच्या क्षेत्रातही वाढतेय. स्पर्धेला सामोरे जा. शनीची काळजी करू नका. काळजी मंगळाची करा, तो तुमच्या मारामार्‍या आणि घातपाताच्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि सध्या मिथुनेत वक्री आहे. ३१ जानेवारीपर्यंत सामंजस्याने घ्या. मांडवली करण्याकडे कल ठेवा. आपला, (सल्लागार) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मनीष पाठक 03/01/2008 - 17:15
पंतकाका, खरच छान लेख. पुढे कोणत्याही ज्योतिर्विदांकडे जाताना तुम्ही नमुद केलेल्या गोष्टी जरुर लक्षात ठेवेल. (ज्योतिष प्रेमी ) मनीष पाठक

धोंडोपंतांचे आणि आमचे ग्रह जुळतात बरं का? जरी ज्योतिष विषयक विचारांत मतभिन्नता असली तरी . आमचे पुस्तक "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... प्रश्नोत्तरातून सुसंवाद " हे http://mr.upakram.org/tracker/582 या ठिकाणी लेखमाला या स्वरुपात चालू आहे. मला जेष्ठ ज्योतिषी श्री .श्री. भटांचे " ज्योतिषांपासून सावधान " या ग्रहांकित मधल्या जुन्या लेखाची आठवण झाली. काही ज्योतिषातील अपप्रवृत्तींमुळे ज्योतिषशास्त्र बदनाम झाले आहे. ज्योतिषि व जातक यांच्यातील संबंधाबाबत आमचे मनोगत http://mr.upakram.org/node/777 येथे वाचा. धोंडोपंत चालू द्यात. आम्ही आपले वाचक तर आहोतच. व्यक्ती म्हणुन आपली सामाजिक संवेदनाशिलता आम्हि जाणुन आहोत. ( मूलत: ज्योतिषप्रेमी व धोंडोपंतांचा मित्र) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना 03/01/2008 - 19:02
घाटपांडेसाहेबांची प्रतिक्रिया वाचून मजा वाटली. अशासाठी की मूलतः ज्योतिष नाकारणारे धोंडोपंत आता ज्योतिर्विद झाले आणि मूलतः ज्योतिषविद्येत पारंगत असलेले घाटपांडे ज्योतिषचिकित्सक आणि विरोधक बनले. दोन मित्रांचा हा धृवांकडून धृवांकडे विरोधी दिशांचा प्रवास विस्मयकारक आहे. आमच्यासारख्या अनभिज्ञाला मात्र कोणाचा पक्ष खरा हा संभ्रम अधिकच भ्रमित करत रहातो. :)

In reply to by विसुनाना

दोन मित्रांचा हा धृवांकडून धृवांकडे विरोधी दिशांचा प्रवास विस्मयकारक आहे. आमच्यासारख्या अनभिज्ञाला मात्र कोणाचा पक्ष खरा हा संभ्रम अधिकच भ्रमित करत रहातो. :) धोंडोपंत आणि आमी यांत खालील साम्य आहेत १) ज्योतिष या विषयावर प्रेम २) ज्योतिष हे या ना त्या स्वरुपात टिकणारच. अज्ञाताचा शोध ही मानवी प्रवृत्ति आहे. यावर एकमत ३) ज्योतिषातील अपप्रवृत्तींना आता सुज्ञ ज्योतिषांनीच पायबंद घातला पाहिजे यावर एकमत. ४) ज्योतिष हे त्रिस्कंधात्मक आहे. सिद्धांत, संहिता आणि होरा. यातील पहिले दोन भागावर सहमती होरा अर्थात फलज्योतिष यावर मतभिन्नता असुन परस्परांविषयी आदर. ५) मतभिन्नता ही विषय समृद्धच करत असते यावर एकमत ६) ज्योतिषाव्यतिरिक्त अन्य विषयांवर समरुपता धोंडोपंत, एखादी कविता टाका, दोन ध्रुवावर दोघे आपण .... अशी काहीतरी (धोंडोपंतांच्या ब्लॉगचे सौंदर्य आवडणारा) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

धोंडोपंत 04/01/2008 - 14:04
धोंडोपंत आणि आमी यांत खालील साम्य आहेत १) ज्योतिष या विषयावर प्रेम २) ज्योतिष हे या ना त्या स्वरुपात टिकणारच. अज्ञाताचा शोध ही मानवी प्रवृत्ति आहे. यावर एकमत ३) ज्योतिषातील अपप्रवृत्तींना आता सुज्ञ ज्योतिषांनीच पायबंद घातला पाहिजे यावर एकमत. ४) ज्योतिष हे त्रिस्कंधात्मक आहे. सिद्धांत, संहिता आणि होरा. यातील पहिले दोन भागावर सहमती होरा अर्थात फलज्योतिष यावर मतभिन्नता असुन परस्परांविषयी आदर. ५) मतभिन्नता ही विषय समृद्धच करत असते यावर एकमत ६) ज्योतिषाव्यतिरिक्त अन्य विषयांवर समरुपता प्रकाशराव, आपल्याशी शंभर टक्के सहमत. आपला, (स्नेही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

पंत, ज्योतिषांकडे जातांना.....ज्योतिषांकडे गेल्यावर हा लेख आवडला !! आमचा ज्योतिष या विषयावर विश्वास नाही. पण आम्ही आमची कुंडली अनेकदा अनेकांना दाखवल्या आहेत हेही सांगण्यास संकोच वाटत नाही. कधी-कधी मार्गदर्शन होते असे वाटते आणि कधी तरी ते थोतांडही वाटते. पण, आपण ज्या पद्धतीने या विषयाची चिकित्सका करता ते आम्हाला आवडते, अजून याविषयीचे असेच मार्गदर्शनात्मक लेख येऊ द्या !!! बाकी ज्योतिषाकडे गेल्यावर बरेच विचारायचे विसरुन जाणे. तिथे गेल्यावर दुसरेच प्रश्न विचारणे. कोणाचा तरी अनुभव ऐकत बसणे. सही !!!! आपला. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (धोंडोपंताचा स्नेही )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत 04/01/2008 - 14:42
आमचा ज्योतिष या विषयावर विश्वास नाही. पण आम्ही आमची कुंडली अनेकदा अनेकांना दाखवल्या आहेत हेही सांगण्यास संकोच वाटत नाही. कधी-कधी मार्गदर्शन होते असे वाटते आणि कधी तरी ते थोतांडही वाटते. प्राध्यापक साहेब, आपले म्हणणे खरे आहे. यात शास्त्राची चूक नसून ते वापरणार्‍यांची आहे. कुठलीतरी दोन चार पुस्तके वाचून स्वतःला ज्योतिषी म्हणवणार्‍यांची संख्या समाजात लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे केवळ परंपरेनुसार घराण्यात चालत आले आहे, म्हणून या विषयात असलेले लोकही अनेक आहेत. खरे म्हणजे कोणतेही शास्त्र सखोलपणे अभ्यासायचे असेल तरच त्यात उतरावे. उगीच वरवर काहीतरी वाचून लोकांच्या आयुष्यावर भाष्य करू नये. त्यामुळे समाजाची दिशाभूल होते आणि लोकांचा शास्त्रावरील विश्वासही उडतो. ह्या (अप)प्रवृत्तींपासून लोकांना वाचवून "हे दूध... हे पाणी" दाखवून देण्याची नीरक्षीरविवेकी भूमिका आम्ही स्विकारली आहे. आणि त्यास "फळे रसाळ गोमटी" आल्याचे आम्ही पहातो आहोत. अनेकदा आम्ही केलेल्या लेखनामुळे आम्हांला काही जणांचा रोष स्विकारावा लागतो. कारण आमच्या लेखनातून अनेकांच्या व्यावसायिक हितसंबंधाना धक्का बसतो. पण समाजाने अधिक चौकसपणे ह्या विषयाकडे पाहावे, यासाठी काही आहुती आम्हांला देणे भाग आहे. आम्ही एका अत्यंत विख्यात ज्योतिषांकडे गेलो असतांना तेथे आलेल्या एका ताईंच्या हातावर त्या ज्योतिषांनी संरक्षक(?) गंडा बांधला आणि त्यांच्याकडून अडीचशे रूपये घेतले. आलेल्या जातकाला ज्योतिषाने गंडा बांधावा, असे शास्त्रात कुठेही म्हटलेले नाही. पण इतका मोठा नावाजलेला माणूस हे करतो, याचा समाजावर परिणाम असा होतो की, हेच शास्त्र असले पाहिजे असे लोकांना वाटते आणि त्यामुळेच शास्त्र बदनाम होते. जसे लघुशंकेला बसल्यावर लोक कानाला जानवे लावतात. या गोष्टीला शास्त्रीय आधार काहीही नाही. पूर्वीच्या काळी पुरूषदेखील बसून लघवी करायचे. असे म्हणतात की, काशीला एका मठाचे प्रमुख लघुशंकेसाठी बसले असतांना तिथे त्यांचे जानवे मुताने भिजले. तेव्हापासून ते जानवे भिजू नये म्हणून ते कानाला लावायला लागले. हे जेव्हा इतर लोकांनी पाहिले तेव्हा ते ही यांचे अनुकरण करायला लागले. काशी हे त्याकाळी विश्वविद्यापीठ समजलं जायचं. काशीतले ब्राह्मण जे करतात, ते खरे शास्त्र असा समज सर्वत्र असल्यामुळे पुढे "लघुशंकेला बसतांना जानवे कानाला अडकवायचे असते" ही गोष्ट शास्त्र म्हणून स्विकारली गेली. त्याची चिकित्सा झाली नाही. आणि आता मुंबईच्या बॉम्बे हाऊस या टाटांच्या कार्यालयीन इमारतीत आम्ही काही कामासाठी गेलो असतांना, तिथे मुतारीत उभे राहून लघुशंका करतांनाही कानाला जानवे अडकवणारे लोक आम्ही पाहिले . हे टाळण्यासाठी खरे काय आणि खोटे काय याचा शोध घेत राहिले पाहिजे. त्याच दिशेने आमचा प्रवास सुरू आहे. आपला, (सत्यशोधक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विजुभाऊ 09/10/2013 - 19:45
जानव्याची अडचन होते तर मग जानवे घालावेच कशाला? जानवे मुंज वगैरेंसारख्या निरुपयोगी कालबाह्य प्रथा आपण कशाला जपतो अजूनही?

In reply to by विजुभाऊ

नेहेमी प्रमाणेच , प्रश्नांची उत्तरे आहे ... पण सांगितल्यावर अ‍ॅप्लाय करणार असाल तर सांगतो ... इथे चर्चा ज्योतिष विषयावर चालली आहे , ज्योतिष ही काही ब्राह्मण समाजाची प्रॉपर्टी नाही ...माझ्या ओळखीतले कित्येक ज्योतिषी अब्राह्मण आहेत ... तेव्हा ज्योतिष विषयावर चाललेली इतकी छान चाललीली चर्चा भट्कवु नये ही नम्र विनंती :)

व्यंकट 03/01/2008 - 21:47
धोंडोपंतांचे ब्लॉग्ज आणि लेख मॅग्नेट आहेत, ते केवळ मार्गदर्शनच करित नाहीत तर एक कुतुहल आणि आकर्षण निर्माण करतात. अश्या कुतुहलात्मक ओढीतून झालेला अभ्यास फारा फलादायी असतो असा आमुचा अनुभव आहे. (धोंडोपंताचा दूरचा) -एकलव्य

विजय.पाटील 04/01/2008 - 06:09
पंत लेख आवडला पण थोडासे जाहिरातवजा लेखन झाले आहे ते टाळायला हवे होते. तुम्ही दिलेली वेळ कशी पाळता (टाईम मॅनेजमेंट कसे करता), काँप्युटर वगैरे आधुनिक उपकरणे कशी वापरता वगैरे उल्लेख मला तरी तुमच्या दुकानाची जाहिरात करणारे वाटले. अर्थात जाहिरात करणे ह्यात अयोग्य काहीच नाही खरं तर मराठी माणूस त्यातच कमी पडतो. त्यामूळे लेख उत्तम जमला आहे हे नक्की. पुढील कारकिर्दीस शुभेच्छा!

In reply to by विजय.पाटील

विसोबा खेचर 04/01/2008 - 06:19
पंतांच्या लेखात वेळ पाळणे, आधुनिक उपकरणे वापरणे हे उल्लेख जरूर आलेले आहेत, परंतु ते लेखाच्या ओघात आलेले आहेत आणि लेखाच्या दृष्टीने ते मुद्दे महत्वाचे असावेत म्हणूनच आलेले आहेत/असावेत. आम्ही पंतांना खूप जवळून ओळखतो आणि त्यामुळेच सदर लेखन पंतांनी कुठलीही जाहिरातबाजी करण्याकरता निश्चितच केलेले नाही असे खात्रीलायक म्हणू शकतो! असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विजय.पाटील 04/01/2008 - 06:32
बरोबर आहे तात्या. 'टाईम मॅनेजमेंट','आधुनिक तंत्रज्ञान' वगैरे उल्लेख जरूरी आहेत पण त्यावर पंतांची ते स्वत: ह्या गोष्टी कश्या अवलंबतात ह्यावरची टीप्पणी अनावश्यक आहे. जर ही जाहिरात नाही म्हणता तर मग ती आत्मस्तुती ठरेल जी अजुनच घातक कारण 'आत्मस्तुती करे तो एक...' म्हणूनच म्हणतो जाहिरात करणे ह्यात चूक काहीच नाही. त्याकडे लगेच 'जाहिरतबाजी' असे तुच्छतेने पाहू नये. त्यामूळेच आमच्या पोष्टचा शेवट देखिल आम्ही 'लेख उत्तम जमला आहे हे नक्की'. असाच केला आहे. त्याकडे आवर्जून लक्ष द्यावे.

In reply to by विजय.पाटील

विसोबा खेचर 04/01/2008 - 07:00
पण त्यावर पंतांची ते स्वत: ह्या गोष्टी कश्या अवलंबतात ह्यावरची टीप्पणी अनावश्यक आहे. का बरं अनावश्यक आहे? 'आधी केले मग सांगितले' यात गैर ते काय?? जर ही जाहिरात नाही म्हणता तर मग ती आत्मस्तुती ठरेल जी अजुनच घातक कारण 'आत्मस्तुती करे तो एक... असहमत आहे! उदा, मी जेव्हा समभाग बाजारावर एखादा लेख लिहितो तेव्हा समभाग खरेदीविक्री संदर्भात मी स्वत: कुठली पद्धत अवलंबतो, कसे निर्णय घेतो, इत्यादी गोष्टी लिहिल्यास ते जाहिरातपर किंवा आत्मस्तुतीपर लेखन ठरत नसून, उलटपक्षी याच गोष्टी माझा लेख अधिक परिपूर्ण बनवतात! त्याकडे लगेच 'जाहिरतबाजी' असे तुच्छतेने पाहू नये. मी पाहात नाहीच आहे परंतु आपल्याच प्रतिसादातून तशी तुच्छता जाणवते आहे, तसेच 'जाहिरात', 'आत्मस्तुती' वगैरे शब्दच्छलही दिसतो आहे!! असो.. प्रत्येकाने कुठला चष्मा लावून या लेखनाकडे पाहायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, तसाच तो आपलाही आहे! मला या विषयासंदर्भात पुढे काहीच लिहायचे नाही.... तात्या.

In reply to by विजय.पाटील

धोंडोपंत 04/01/2008 - 15:06
पंत लेख आवडला पण थोडासे जाहिरातवजा लेखन झाले आहे ते टाळायला हवे होते. तुम्ही दिलेली वेळ कशी पाळता (टाईम मॅनेजमेंट कसे करता), काँप्युटर वगैरे आधुनिक उपकरणे कशी वापरता वगैरे उल्लेख मला तरी तुमच्या दुकानाची जाहिरात करणारे वाटले. अभिप्रायाबद्दल धन्यवाद, आपल्याला यात जाहिरात वाटली हे आमचे दुर्दैव. खरे तर आम्ही आमची कार्यशैली सांगितली आहे. स्वतःच्या कार्यप्रणालीबद्दल बोलणे ही जाहिरात नसते, असे आम्हाला वाटते. आणि जाहिरात करण्याची आवश्यकता आम्हाला कधी भासली नाही. जाहिरात अशा लोकांना करावी लागते ज्यांच्याकडे काम नसते. आज परिस्थिती अशी आहे की, आम्हांला अनेकांच्या पत्रिका बघणेही शक्य होत नाही. केवळ भेटीच्या माध्यमातून नव्हे तर आमचे ई विश्वातील ब्लॉगवाचक, विविध समुदायांवर आम्हाला ओळखणारे लोक, ऑर्कूट, याहू सारख्या व्यासपीठांवर झालेल्या मित्रमैत्रीणीं, त्यांचे नातेवाईक अशा अनेकांच्या कुंडल्या, इमेलच्या आणि गुगलच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्‍यातून आमच्या मेलबॉक्समध्ये रोज येत असतात . या मिसळपाववरही असे लोक आहेत की ज्यांना आमचे मार्गदर्शन हवे आहे पण वेळेअभावी अजून ते शक्य झालेले नाही. जसजसे जमेल तसतसे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही जरूर देतोच पण पृच्छकांची संख्या आणि आमच्याकडे उपलब्ध असलेला वेळ यांचे गणित काही केल्या जमत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे जाहिराती करण्याची आम्हांला आवश्यकता नाही हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि नम्रपणे सांगतो. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे तर "नाही घाटावे लागतं, एक शित कळे भात" धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

छान लेख्....विशेषत: डोक्टर आणि पेशण्ट असे साम्य दाखवल्यामुळे विषय लवकर मनात पोचतो......भविष्यात या माहितीचा वेळ पडल्यास खूप उपयोग होईल्.....धन्यवाद....

आप्पा 04/10/2013 - 15:03
आपले सर्व जुने लेख वाचले. आपण परत या विषयावर लेखन सुरु करावे असे वाटते. विचार कराव.

आप्पा 04/10/2013 - 15:04
आपले सर्व जुने लेख वाचले. आपण परत या विषयावर लेखन सुरु करावे असे वाटते. विचार कराव.

In reply to by आप्पा

आदूबाळ 05/10/2013 - 12:05
असं मलाही वाटतं. पण तो एक इतिहास आहे आणि धोंडोपंत परत लिहिण्याची शक्यता धूसर आहे. www.dhondopant.blogspot.com इथे त्यांचं लेखन वाचायला मिळेल...

विजुभाऊ 05/10/2013 - 11:26
गेल्या आठवड्यात आम्ही एका गृहस्थांची पत्रिका बघत असतांना
बहुतेक वेळेस या लेखक महाशयानी स्वतःचा उल्लेख "आम्ही" असा केलेला आहे . हा स्वतःविषयीचा अती आदर आहे की अनेक वचन आहे हे स्पष्ट होत नाहिय्ये

In reply to by अनिरुद्ध प

उपाशी बोका 06/10/2013 - 21:53
राजा, संपादक आणि वेडा हे लोक 'आम्ही' हा शब्द अधिकाराने वापरू शकतात, असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. कदाचित संपादक या नात्याने धोंडोपंत असे लिहित असतील.

चित्रगुप्त 07/10/2013 - 01:37
स्वतःसाठी 'आम्ही' हा शब्द वापरणे हे त्या काळातील बोलण्याच्या पद्धतीचा अवशेष असावा, जेंव्हा एकंदरीतच आदरार्थी संबोधने फार वापरली जात. उदा. पत्नीस 'अहो' म्हणणे, पतीस 'इकडली स्वारी' म्हणणे, स्वतःच्या मुलांचा उल्लेखही 'बाळासाहेब' अक्कासाहेब' असा करणे, अन्य लोकांचा उल्लेख धोंडोपंत, शंकरराव, जोशीसाहेब, घारूअण्णा, बंडूतात्या, वसंतअप्पा इ. करणे. लेखन करताना स्वतःचा उल्लेख 'आम्ही' असा केल्याने जरा भारदस्त वाटते, आपल्या विधानाला जरा वजन येते (असे आम्हास वाटते) ज्योतिषविद्येबद्दल 'विद्या' हा अतिशय चपखल आणि समर्पक शब्द असताना ज्योतिष हे 'शास्त्र' आहे की नाही, (काहींच्या मते अमेरिकेतील अमूक जर्नलाने जर 'शास्त्र' म्हणून मान्यता दिली, तरच तो विषय शास्त्र या संज्ञेस पात्र होतो वगैरे) अश्या प्रकारची चर्चा बरीच वाचायला मिळते, परंतु समतोल दृष्टीकोणातून केलेले विवेचन क्वचितच आढळते. या लेखमालेतून असे समतोल लेखन वाचायला मिळेल, ही आशा. आम्ही (वा कुणीतरी) आमच्या गतजीवनातील पाच-दहा अगदी ठळक घटना केंव्हा घडून आल्या होत्या, तसेच अन्य काही प्रश्न आमची पत्रिका तपासून सांगावे, अशी विनंती जर प्रस्तुत धागालेखकास केली, आणि त्यांनी तसे करून सांगितलेली माहिती अगदी बरोबर निघाली, तर खरोखर वाचकांचे समाधान होईल, असे वाटते. ... याविषयी धागाकर्त्याचे काय मत आहे ?

In reply to by चित्रगुप्त

लेखन करताना स्वतःचा उल्लेख 'आम्ही' असा केल्याने जरा भारदस्त वाटते, आपल्या विधानाला जरा वजन येते (असे आम्हास वाटते) असे आमचेही मत आहे ;)

In reply to by चित्रगुप्त

विजुभाऊ 08/10/2013 - 16:05
बर्रूब्बर . ला रीव्हे गाउचे म्हणजे नदीचा डावा किनारा ( कोणीकडून डावा हे विचारू नये) पॅरीसच्या या भागात चित्रकार, सम्गीतकार रहायचे. जगप्रसिद्ध हस्तसामुद्रीक "किरो " हा सुद्धा फ्रेन्चच होता. पॅलेस्टाईन फेम गाझा पट्टी देखील लेफ्ट बॅन्क मधेच येते. पॅलेस्टाईन वर हल्ला करताना इस्राईल ने कधीच ज्योतिषाचा सल्ला घेतला नाही. त्यामुळेच की काय त्याना स्वतःचे आस्तित्व टिकवून नवे राष्ट्र बळकट करण्यात यश आले आहे. राष्ट बळकट असले की वाट्टेल त्याला हात दाखवता येतो. म्हणून्च हा हा हा "ला उगाच:

दादा कोंडके 08/10/2013 - 10:32
ज्योतिषांकडे जातांना.....ज्योतिषांकडे गेल्यावर
ज्योतिषांकडे जाताना जोडे घेउन जावेत. आणि ज्योतिषांकडे गेल्यावर.. हॅ हॅ हॅ... :D

समोरच्याला, सध्या काय वाट्टेल ती परिस्थिती असो "तुमचा भविष्यकाळ सुखाचा आहे" हे पटवून देतात! आणि स्वतःचा हेतू साध्य करतात.

सुहासदवन 08/10/2013 - 13:33
ज्योतिषांकडे जातांना
मुळात ज्योतिषाकडे जावेच कशाला? स्वतःचा लहानपणीचा काळ आपल्यालाच धड आठवत नाही तर मग ज्योतिष्याला काय आपला मागचा जन्म आणि प्रारब्ध आठवणार? स्वतः ह्या जन्मात केलेली चांगली वाईट कर्मे ओळखा आणि त्याची जी काय फळे मिळणार आहेत ती स्वतः भोगायला तयार राहा.
ज्योतिषांकडे गेल्यावर
- गप्प राहावे. ज्योतिषी आणि पत्रिका ह्या दोघांनाच बोलू द्यावे. मी स्वतः नावाजलेले ज्योतिषी कसे धादांत खोटे बोलतात हे पाहायला माझी स्वतःची खरी पत्रिका घेऊन गेलो. पण मी माझी असलेली परिस्थिती न सांगता वेगळेच काहीतरी सांगितले आणि मग ज्योतिषी देखील कसा माझ्या बरोबर त्या खोट्या गोष्टीत रंगून मला काय काय उपाय सांगत होता ते सुज्ञास सांगणे न लगे. जर खरच माझ्या पत्रिकेत त्याला माझे आयुष्य दिसत असते तर निदान एकदा तरी मला सांगायला हवे होते ठामपणे की तुम्ही जे बोलत आहात त्यावर माझा विश्वास बसत नाही. डॉक्टरची, कोर्टाची आणि ज्योतिष्याची पायरी चढू नये.

In reply to by सुहासदवन

मी स्वतः नावाजलेले ज्योतिषी कसे धादांत खोटे बोलतात हे पाहायला माझी स्वतःची खरी पत्रिका घेऊन गेलो. पण मी माझी असलेली परिस्थिती न सांगता वेगळेच काहीतरी सांगितले आणि मग ज्योतिषी देखील कसा माझ्या बरोबर त्या खोट्या गोष्टीत रंगून मला काय काय उपाय सांगत होता ते सुज्ञास सांगणे न लगे." मी पण एका डॉक्टर कडे गेलो आणि मला होत नसलेले त्रास त्याला आई हुई करत सांगितले..त्याने पण मी सांगत असलेल्या लक्षणांवरून काही उपाय सांगितले...औषध दिले ...मी काहीच औषध उपाय नं करता बर झालो... पण त्या तज्ञ डॉक्टरला हे कळलेच नही कि मला मुळातच काही होत नाहीये... सुज्ञास सांगणे नलगे..

टिंगल करता काय ज्योतिषाची? आयुष्यात एखादा झटका बसेल ना मग समजेल. तेव्हा ज्योतिषाची, देवाची, आठवण येईल. जेव्हा सगळ काही सुरळीत असत तेव्हा ही असली थेर सुचतात.इतर वेळेला ज्योतिषाची टिंगल करणारे मागल्या दाराने ज्योतिष बघतात आयुष्यात कधी ना कधी! बघा तुमच विज्ञान उपयोगाला येतय का तेव्हा!.............,,,,, (जिज्ञासूंनी अजून भर घालावी)

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुहासदवन 09/10/2013 - 09:38
आयुष्यात एखादा झटका बसेल ना मग समजेल. तेव्हा ज्योतिषाची, देवाची, आठवण येईल.
अजिबात नाही. एखादा झटका बसला तर हजारो इतर उपाय आहेत ना करायला, ज्योतिष आणि देव देव करायचे सोडून. आम्ही स्वतः समर्थ (गैरसमज नसावा) आहोत आमच्या समस्यांची काळजी वाहायला. उगाच देवाला कशाला त्रास? त्याला राहू दे न मस्तपैकी.
इतर वेळेला ज्योतिषाची टिंगल करणारे मागल्या दाराने ज्योतिष बघतात आयुष्यात कधी ना कधी!
हे मात्र बरोबर. कधी कधी जेव्हा एखादा शनिवार रविवार काहीच मनोरंजनाचे साधन नसते तेव्हा एखाद्या मित्राला घेऊन जोतीष्याकडे जायचे आणि मग धमाल फुल टू टाईमपास.
बघा तुमच विज्ञान उपयोगाला येतय का तेव्हा!.............,,,,,
त्या पेक्षा तुम्हीच आजच्या सुधारलेल्या जोतिष्यांना सांगा ना आमच्या विज्ञानाने निर्माण केलेले संगणक आणि इतर प्रणाली वापरू नका म्हणून. बघूया काय होतंय ते. चमत्कार आणि साक्षात्कार हे फक्त टीवी आणि पुस्तकातच होतात प्रत्यक्षात नाही ह्यावर ठाम विश्वास असणारा

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे 09/10/2013 - 09:46
हे मात्र पटले नाही घाटपांडे साहेब , मी स्वतः आयुष्यात बर्याच उतार चढावातून गेलो आहे (आपल्या भाषेत झटका) ज्यात करियर पासून जीव(रोगामुळे) हे दावणीवर लावलेले होते तरीही कधी ज्योतिषाकडे जावे असे मला वाटले नाही किंवा मी कोणत्याही देवाला पाण्यात ठेवणे अथवा नवस बोलणे असे केले नाही . त्यात ज्योतिषाचा किंवा विज्ञानाचा भाग नाही. हा केवळ मानसिकतेचा भाग आहे. ज्यावेळी माणूस एखाद्या संकटातून जात असतो तेंव्हा त्याला मानसिक आधाराची गरज असते. यावेळेस जो कोणी मानसिक आधार देईल तो माणूस त्यावेळी महत्त्वाचा ठरतो. सुदैवाने माझ्या अशा संकटांच्या वेळेस माझे वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून मला अशा वेळेस सुद्धा ज्योतिषांकडे जावे असे वाटले नाही. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"हे श्री स्वामी समर्थांचे वाक्य त्यांच्या शिष्यांना असेच आत्मिक बल देत असतात असे ऐकले आहे. आपण संकटाच्या वेळेस आपल्या मुलांच्या मागे असे खंबीरपणे उभे राहिलो तर त्यांना दुसर्या आधाराची गरज वाटणार नाही. माझ्या जन्माच्या वेळेस पत्रिकेत लिहून ठेवलेले भविष्य जवळ जवळ नव्वद टक्के खरे झाले आहे परंतु मला अजूनही ज्योतिषांकडे जावेसे वाटत नाही. एवढेच आहे कि मी स्वतः ज्योतिष हि विद्या आहे हे मानतो पण अजून ते विज्ञान आहे असे मानण्यास तयार नाही. बाकी लोकानी आपला विचार आपण करावा

In reply to by सुबोध खरे

सुहासदवन 09/10/2013 - 10:14
मला प्रत्यक्ष कोणतीही व्यक्ती आणि जोतिष ह्याबद्दल वैयक्तिक आकस नाही. पण ज्योतिष हा निव्वळ ठोकताळा आहे हे वारंवार माहीत होऊन देखील आपल्या समाजातील लोकांचा त्यावर असणारा विश्वास कमी होत नाही ह्याबद्दल खरंच खेद वाटतो.
माझ्या जन्माच्या वेळेस पत्रिकेत लिहून ठेवलेले भविष्य जवळ जवळ नव्वद टक्के खरे झाले आहे.
माफ करा, राग मानू नका पण अशी टक्केवारीतील खरी होणारी भविष्ये प्रत्येकाच्या पत्रिकेत असतात आणि ती खरी होतात देखील कारण ती जेनेरिक वाक्ये असतात स्पेसीफिक नव्हे. माझ्याही पत्रिकेतील बहुतेक वाक्ये खरी आहेत पण तीच वाक्ये थोडी बहुत करून इतर दुसऱ्या व्यक्तीच्या पत्रिकेत देखील आहेत. वाटल्यास तपासून पहा.

In reply to by सुहासदवन

दादा कोंडके 09/10/2013 - 11:15
सहमत. उच्चशिक्षीत लोकं जेंव्हा असं म्हणतात तेंव्हा विषाद वाटतो. ज्योतिषावर किंवा देव-देवादीकांवर विश्वास असंण्यामागचं कारण, संस्कार असतात. लहानपणी वातावरण, आई-वडील आणि इतर जेष्ठ मंडळींमुळे असल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. त्यांना काही अनुभव-अनुभुती आलेले असतात, नंतर थोडं कळायलागल्यावर आणि विवेक आल्यावरदेखिल त्यांच्यावरील प्रेम-आपुलकीमुळे ही डोक्यावर बसलेली भुतं सहजासहजी उतरत नाहीत.

In reply to by सुहासदवन

अनिरुद्ध प 09/10/2013 - 13:08
तपासुन पाहिल्यावर असे आढळले कि जे काही जेनेरिक म्हणुन लिहिले गेले आहे ते माझ्या बाबतित तरी २०% सुद्धा बरोबर नाही आले आहे,म्हणजेच आपला ९०% चा दावा माझ्या बाबतित तरी खोटा ठरला आहे,आता तुम्ही म्हणाल अपवाद आहे,कारण वैज्ञानिक भाषेत सुद्धा अपवादा शिवाय नियम सिद्ध होत नाही असे म्हणतात.

बॅटमॅन 09/10/2013 - 12:44
सर्वश्री सुबोध खरेजी, सुहासवदनजी आणि दादा कोंडकेजी: घाटपांडेकाकांचा प्रतिसाद उपरोधिक होता. टोनवरून अन त्यांच्या आधीच्या लेखांवरूनच समजतंय की ते.

विजुभाऊ 09/10/2013 - 13:05
खरे आहे घाटपांडे काका. आम्ही जे सांगतो ती गोष्ट खरी. आम्ही काही वेळा ज्याम्च्या थेट सम्बन्ध नाही त्याला समजू नये मात्र समजणाराना इशारा मिळावा अशा भाषेत सांगतो हे असे करायला ऋषी मुनीनी वैदीकानी सांगितले आहे. अगदी पाश्चात्य दाखले घ्यायचे तरी घ्या . ऋषी निरुत्तर दमनस ( नॉस्ट्रेडेमस भारतात या नावाने वावरायचा असे म्हणतात. तज्ञांच्या मते हे समकालीन ऋषी असावेत असे एक दुमत आहे. आपण त्या वादात सध्या पडायला नको ) यानी देखील असेच सांगितले आहे्एच बघाना एकविसाव्या शतकातील युद्धा बद्दल त्यानी लिहून ठेवले आहे पाण्याखालून आग ओकली जाईल. हवेतून झेप घेईल विजयी होईल तो जेंव्हा कणाना संदेश मिळेल. सूर्य जमिनीवर येईल किती स्पष्ट शब्दात ऋषी निरुत्तर दमनस यानी अणू युद्ध आणि अणू पाणबुडीबद्दल सांगितलेले आहे इतके स्पष्ट सांगुनेही ज्यांच्या ताच्याशी थेट संबन्ध नाही अशा इतरेजनाना यातून बोध मिळणार नाही मात्र समजणाराला इशारा मिळेल. जगाचा अंत कसा होईल यावर ऋषी निरुत्तर दमनस म्हणतात. आकाशातून वर्षाव होईल. ढग फुटून जातील तप्त धरती शुक्र मंगळाची युति लांडगा अस्वलाला मारेल. उंट जिराफा च्या घरी जाईल वायू तापेल पाण्याखाली. मासे उडून जातील. आम्ही याचे विष्लेषण केले आहे. मात्र तेदेखील अस्पष्ट ठेव असे द्रष्ट्याने सांगितले आहे. म्हणून त्याच्याच भाषेत म्हणजे ज्याचा संबन्ध नाही त्याला कळणार नाही असे ठेवले आहे. आम्ही जे साम्गतो तेंव्हा असेच साम्गतो

मदनबाण 09/10/2013 - 13:52
ऋषी निरुत्तर दमनस ( नॉस्ट्रेडेमस भारतात या नावाने वावरायचा असे म्हणतात. तज्ञांच्या मते हे समकालीन ऋषी असावेत असे एक दुमत आहे. आपण त्या वादात सध्या पडायला नको ) ह्म्म... मला स्मरते आहे की ट्वीन टॉवरवर विमान कोसळण्याच्या बरेच वर्ष आधी मी नॉस्ट्रेडेमस वर आधारीत एक चित्रपट बघीतला होता, मला वाटत त्यात ट्वीन टॉवर सारखे टॉवर पडताना दाखवले होते. ज्या वेळी ९/११ झाले तेव्हा तो चित्रपट मला आठवला होता. बहुतेक चित्रपटाचे नाव होते :- The Man Who Saw Tomorrow जाता जाता :-आता सहज म्हणुन जालावर या बाबत शोधाशोध केली तर जसे मला वाटले होते,तसेन ज्या ज्या लोकांनी हा चित्रपट ही घटना घडण्याच्या बर्‍याच आधी काळ पाहिला होता त्यांच्या मनात सुद्धा ही घटना घडल्यावर हाच चित्रपट आला{नॉस्ट्रेडेम}) आला.

सुबोध खरे 09/10/2013 - 13:55
साहेब, माझ्या जन्माच्या वेळेस त्या ज्योतीषानी लिहून ठेवलेले आहे कि मेडिकल मध्ये करियर मिळेल. मुलगा लष्करात जाईल आणि मोठ्या हुद्द्यावर चढेल पण हे सर्व सोडून येईल.मी लष्करात देशभक्ती साठी गेलो नाही. माझा मुंबईच्या मेडिकल कॉलेजचा प्रवेश केवळ २ गुणांनी हुकला आणि प्रवेश परीक्षेतून केवळ आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. यानंतर मी नौदलात कमांडर या हुद्द्यापर्यंत( जोईंट कमिशनरची पातळी) चढलो आणि काही कारणास्तव मी ते सर्व सोडून दिले. आता हे इतके सर्व जर "लिहिले" आहे तर त्याला ठोकताळा कसे म्हणावे.जमले तर माझी जुनी पत्रिका अपलोड करायची तयारी आहे. यात मुलगा भरपूर शकेल भरपूर पैसे मिळवेल डोक्याला मार लागेल किंवा पचनाची तक्रार असेल अशी गोल गोल वाक्यरचना आहे असे नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे माझी फक्त जन्मतारीख सांगून पुण्यातील एका ज्योतिषाने( जुवेकर नावाचे आणि विश्रामबाग वाड्याच्या आसपास कुठेतरी होते असे आठवते). आपला पाण्याशी संपर्क आहे आणि पंधरा ते सतरा वर्षे सरकारी नोकरी असेल असे सांगितले हे सुद्धा मी नौदलात भरती होणार आहे यातील अवाक्षर न सांगता. मी कॉलेजात शिकतो आहे एवढेच त्यांना सांगितले होते. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे सरकारी(किंवा लष्करी) नोकरी हि पत्रिकेत लिहिलेली आहे.(मी शुद्ध मराठी बोलत होतो म्हणून लष्कराबद्दल बोलायला ते चाचरत असावेत) या ज्योतिषाकडे मी मित्राच्या बरोबर गेलो होतो आणि माझे पैसे सुद्धा त्यानेच भरले. ( माझा तेंव्हा सुद्धा ज्योतिष हे शास्त्र आहे यावर विश्वास नव्हता आणि आजही नाही). मी त्याच्या बरोबर गेलो होतो ते केवळ त्याला मराठी येत नव्हते म्हणून. एखाद्या ज्योतिषाला असे खरच आहे काय हे तपासायचे असेल तर मी माझी जन्मतारीख वेळ आणि स्थळ सांगण्यास तयार आहे. मला त्यांच्या भविष्यात रस नाही. फक्त केवळ आपण (तथाकथित) सुशिक्षित आहोत आणि आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही म्हणून ते थोतांड आहे असे मानण्याची माझी अजून तरी तयारी नाही. फक्त ती एका विद्या आहे शास्त्र नाही असे मला वाटते. आणि जोवर ते शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही तोवर त्याच्या वाटयाला जायची माझी तयारी नाही.

In reply to by सुबोध खरे

गंमतीची गोष्ट म्हणजे माझी फक्त जन्मतारीख सांगून पुण्यातील एका ज्योतिषाने( जुवेकर नावाचे आणि विश्रामबाग वाड्याच्या आसपास कुठेतरी होते असे आठवते). आपला पाण्याशी संपर्क आहे आणि पंधरा ते सतरा वर्षे सरकारी नोकरी असेल असे सांगितले हे सुद्धा मी नौदलात भरती होणार आहे यातील अवाक्षर न सांगता. मी कॉलेजात शिकतो आहे एवढेच त्यांना सांगितले होते. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे सरकारी(किंवा लष्करी) नोकरी हि पत्रिकेत लिहिलेली आहे.
एक शंका आहे कि फक्त जन्मतारीख सांगून पत्रिका तयार होत नाही. त्या ज्योतिषाने सरकारी नोकरी पत्रिकेत लिजिलेली आहे असे सांगितले. मग त्याने कशाच्या आधारे हे सांगितले? सांगितलेले भाकित खरे आले याबद्दल दुमत नाही. मला असे वाटते की त्याने हे अंतंस्फुर्तीने सांगितले असावे. ही अंतस्फुर्ती मानसशास्त्राशी संबंधीत आहे. खर येणे हा योगायोगाचा भाग असू शकतो.
फक्त केवळ आपण (तथाकथित) सुशिक्षित आहोत आणि आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही म्हणून ते थोतांड आहे असे मानण्याची माझी अजून तरी तयारी नाही. फक्त ती एका विद्या आहे शास्त्र नाही असे मला वाटते. आणि जोवर ते शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही तोवर त्याच्या वाटयाला जायची माझी तयारी नाही.
या मताचा आदर आहे.मला आपली भूमिका मान्य आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रगुप्त 20/10/2013 - 20:19
ही अंतस्फुर्ती मानसशास्त्राशी संबंधीत आहे.
या 'अंतस्फुर्ती' लाच पतंजली 'प्रत्यक्ष ज्ञान' म्हणतात, असे वाटते. यालाच 'इंद्रियातीत बोध' असेही म्हणू शकतो. भविष्य जाणून घेणे हे या बोधातून शक्य आहेसे दिसते. 'चित्तवृत्तीं'चा लोप झाल्यावर हा बोध निखळपणे प्रकटतो, वगैरे पतंजलींच्या योगसूत्रातून सांगितलेले आहे. मी काही काळ केलेल्या लंबकाच्या प्रयोगातून सहजपणे भविष्य जाणू शकलो होतो, परंतु त्यामागचे नेमके कार्यकारण कळले नाही. तेवढी लायकी वा साधना नाही असेच म्हटले पाहिजे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुबोध खरे 21/10/2013 - 11:01
फक्त जन्म तारीख नव्हे तर बरोबर जन्म वेळ आणि जन्म् ठिकाण सांगितले होते.वडिलांच्या मित्राच्या रुग्णालयात जन्म झाल्याने वेळ पण अचूक ठाऊक आहे तपशील कमी टंकल्याबद्दल माफ करा. (दोन्ही ज्योतिषानि जवळ जवळ त्याच गोष्टी सांगितल्या. का आणि कसे ते माहित नाही. तरीही आजही मी ज्योतिष शास्त्राकडे आणि ज्योतिषांकडे संशयानेच पाहतो.कारण ते शास्त्र आहे असे शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होत नाही तोवर असेल. कदाचित आधुनिक(?) शिक्षणाचा प्रभाव असावा.

१)पुणे विद्यापीठाने केलेल्या डबल ब्लाईड टेस्ट मधे असे निदर्शनास आले आहे की ज्योतिषाला शास्त्र म्हणता येईल असा स्टाँग स्टॅतिस्तिकल इव्हिडन्स ( भक्कम सांखिकीय पुरावा ) नाही . त्यामुळे सायंटीफिकली हा विषय संपलेला आहे . २) आता लॉजिकली , समजा ज्योतिष खरे आहे असे मानले , क्ष माणसाचे कोनत्या एका विषिष्ठ घटने बाबत , भ०(क्ष) हे भविष्य प्रेडिक्ट केले तर क्ष त्यात हस्तक्षेप करुन ते बदलु शकेल मग जे बदलल्यावर घडेल त्याचे प्रेडिक्शन भ१(क्ष) असे असेल , पण परत क्ष त्यात हस्तक्षेप करुन ते बदलु शकेल मग जे बदलल्यावर घडेल त्याचे प्रेडिक्शन भ२(क्ष) .... मग भ३(क्ष) ...भ४(क्ष)... भ५(क्ष) असे हे इन्फायनाईट रेग्रेस होईल जस्ट लाईक Turtles All the Way Down. सो लॉजिकली ही जोतिष शास्त्र असु शकत नाही .( इथे मनुष्य , कर्तृत्वाने भविष्यात बदल घडवु शकतो , हे गृहीत धरले आहे which requires proof ... but lets lets discuss it some other time ) ३) सायकॉलॉगिकली , ज्योतिष हे एक प्रकारचे "कंडिशनिंग" असावे (क्लासिकल कंडिशनिंग सारखे) सोप्या शब्दात ... क्ष ग्रह य स्थानात असला की झ परिणाम होतात हे कोणी तरी आधी सांगुन ठेवल्या मुळे माणुस त्यासाठी कंडीशन्ड होतो पुर्वी एका ऋषींनी मांजर पाळली होती , ती यज्ञात सारखी मधे मधे करायची लोकांचे चित्त विचलीत व्ह्यायचे , मग गुरुजींनी यज्ञा आधी ती मांजर एका खांबाला बांधायला सुरुवात केली मग यज्ञ व्यवस्थित पार पडु लागले ... पण मांजर खांबाला बांधल्याने यज्ञ व्यवस्थित पार पडतो असे कंदीशनिंग झाल्याने ती मांजर मेल्यावर शिष्य लोक दुसर्‍या कडची मांजर आणुन यज्ञा आधी आवर्जुन त्या खांबाला बांधु लागले ज्योतिषही असाच काहीसा प्रकार असावा ...ह्यावर एकदा अभ्यास केला पाहिजे ...मस्त पी एच डी विषय होवु शकतो हा :) अवांतर : पंत , जरा सांगता काहो आमच्या पत्रिकेत ज्योतिष शिकण्याचा योग कधी आहे ते ? ...हा घ्या आकडा ७३ !

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 09/10/2013 - 14:42
भक्कम सांख्यिकीय पुरावा नाहीच!!!! पण वर मजा अशी, की कुणीही वर्तवलेले भविष्य गंडल्यास शास्त्र गंडलंय असं कोणीही सांगत नाही...फक्त तो विशिष्ट ज्योतिषी गंडला असे सांगतात आणि वर तार्किकतेचा दावा करतात. तथाकथित शास्त्रवाद्यांचे हे मोठेच तार्किक वर्तन बरे!!!!

In reply to by बॅटमॅन

अगदी सेम सेम अर्ग्युमेंट !! जेव्हा श्रीमदाद्यशंकराचार्य विविध वादविवादांमध्ये बौध्द मताचे खंडन करायचे तेव्हा बौध्द भिक्कु हेच लॉजिक वापरायचे "मति दौर्बल्यंमेतत , न मत दौर्बल्यं ||" पण आचार्यांनी ह्या विधानाचे ही तार्किक दृष्या खंडन केले आहे ... (line of arguments आत्ता आठवत नाहीये , घरी आलो की बघुन पेस्ट करतो ) आपण हीच तार्किक विधाने देवुन ह्या दाव्याचे खंडन करु शकतो !!

In reply to by बॅटमॅन

दादा कोंडके 09/10/2013 - 16:01
वर इथं म्हटल्याप्रमाणे,
प्रश्नकुंडली मांडताना पहिला सगळ्यात महत्वाचा नियम असा कि प्रश्न कर्त्याच्या मनात त्या प्रश्नाबाबत तळमळ हवी . उगीचच टाइम पास म्हणून किंवा ज्योतिषाची टर उडवण्यासाठी म्हणून विचारलेला नसावा
म्हणजे बोलतीच बंद. दुसरा नियम असाही करावा की भविष्य खरं ठरलं नाहितर स्वतःचच नशीब खोटं आणि भविष्यकळून घ्यायचाच योग नसल्याचं मान्य करायला हवं.

क्रेझी 09/10/2013 - 15:16
कोणताही ज्योतिषी हल्ली कॉम्प्युटर वापरून पत्रिका बनवून देतो. पण जर ते सॉफ्टवेअर लिहीणा-याने काही चुक केली असेल तर ती पत्रिका १००% बरोबर असेल का?

In reply to by क्रेझी

विजुभाऊ 09/10/2013 - 19:23
कोणताही ज्योतिषी हल्ली कॉम्प्युटर वापरून पत्रिका बनवून देतो. पण जर ते सॉफ्टवेअर लिहीणा-याने काही चुक केली असेल तर ती पत्रिका १००% बरोबर असेल का?
अर्रर्रर्र्र.......... तुम्ही आणखी एक नवी सबब शोधून दिलीत की. खोटे ठरले तर दोष प्रोग्रामर चा. खरे ठरले तर श्रेय ज्योतिषाला

In reply to by क्रेझी

अनिरुद्ध प 10/10/2013 - 11:49
ती असलीच तरिही ज्याचा विद्येचा सखोल अभ्यास असेल तो ती पत्रिका स्वता नव्याने बनवुन ताडु शकतो,काही जण असेही ऐकलेले आहेत जर आपण एखद्या व्यक्तिचे प्रकाशचित्र आणि कुन्डली दिलीत तर ते प्रकाशचित्र पाहुन सान्गतात कि ती कुन्डली त्या व्यक्तीची आहे किवा नाही.

विटेकर 09/10/2013 - 15:31
भविष्य पहाणे हा मानसिकतेचाच भाग आहे. ज्यामुळे संकट काळात मनाला उभारी येते ते करायला काय हरकत आहे? प्रत्यक्ष संकटापेक्षा संकटाच्या कल्पनेने मनुष्य अर्धमेला होतो. आणि संकट आल्या वाटेने निघून ही जाते पण त्याकाळात जी मानसिक हानी होते त्यावर भविष्याचा सल्ला उपयोगी पडू शकतो. अमूक काळानंतर संकट संपणार आहे हा दिलासा फार मोठा असतो ! आणि सल्लाच तो , तो काय डॉक्टरांचा चुकत नाही काय ? ज्योतिषाकडे जाताना आपण एका सल्लागाराकडे जात आहोत एव्ढेच ध्यानात ठेवावे. आपल्या संचितामुळे आपल्या वाट्याला भाग्य येत असते त्यात ब्र्ह्मदेवाचा बाप देखील बदल करु शकत नाही. फक्त ते भोगताना कमी त्रास व्हावा , भोगून संपून जावे अशांसाठीच उपाय योजना करता येऊ शकते, भाग्य बदलता येऊ शकत नाही यांवर माझा ठाम विष्वास आहे. आणि मग जे बदलता येत नाही ते जाणून घ्यावे का ? हा ज्याच्या त्याच्या मान्सिकतेचा प्रश्न आहे.

In reply to by विटेकर

बॅटमॅन 09/10/2013 - 15:46
ज्योतिषी भाग्य बदलू शकतो असा बहुतांश ज्योतिषांचाही दावा असतो किंवा कसे याबद्दल साशंक आहे. तूर्तास मुख्य वाद हा कुंडलीत बघून खरे भविष्य कळते की नाही हाच आहे.

In reply to by बॅटमॅन

विटेकर 09/10/2013 - 16:26
नसेना का खरे भविष्य ! डॉक्टर महाशयांचे निदान चुकत नाही का? आणि सेकंड ओपिनियन घ्या ना ! प्रत्येक विद्येच्या आणि व्यवसायाच्या मर्यादा आहेत. वैमानिक/चालक योग्य तर्हेने विमान/वाहन चालवून आपल्याला विविक्षित स्थळी पोहोचवेल अशा विश्वासानेच आपण विमानात/ वाहनात बसतो ना ? पण कधी कधी चूक होते ना ? मग ज्योतिषानेच परिपूर्ण असावे असा आपला आग्रह का ?

In reply to by विटेकर

बॅटमॅन 09/10/2013 - 16:46
अतिशय हास्यास्पद तुलना. डॉक्टरकी आणि वैमानिक शास्त्र (प्राचीन नव्हे आणि अर्वाचीन) यांतही चुका होतात. पण शास्त्राचा बेस पक्का आहे. जे ठोकताळे आहेत ते निव्वळ प्युअर चान्सपेक्षा जास्त आहेत किंवा नाहीत यांच्या अतिशय काटेकोर चाचण्या घेतल्या जातात. एखादे नवीन औषध बाजारात आणायचे तर प्रयोग केले जातात, विमानाचा पार्ट डिझाईन करताना कितीतरी चाचण्या घेऊन मगच तो योग्य तिथे जोडला जातो. एक लक्षात घ्या, शास्त्र म्हंजे १००% अ‍ॅक्युरसी असे नसते. पण चुका झाल्या तरी बेस पक्का ही ग्यारंटी सततच्या प्रयोगांतूनच मिळते. सातत्याने प्रयोग करून, एखाददुसरे प्रचल बदलून काय निष्कर्ष होतात त्यांच्या आधारे हे सगळे ठरवले जाते. ज्योतिषात असे काय आहे? पुणे विद्यापीठाने अशी चाचणी घेतली तेव्हा संख्याशास्त्राच्या आधारे ज्योतिषांचे दावे फोल ठरले. नियमाला अपवाद सापडल्यामुळे नियम रद्दबातल होतोच असे नाही, परंतु त्यासाठी अनेकविध संख्याशास्त्रीय चाचण्या आहेत, काय-स्क्वेअर टेस्ट, टी-टेस्ट, झेड-टेस्ट, फिशर्स कोरिलेशन टेस्ट, इ.इ. यांपैकी कुठल्या चाचणीत ज्योतिषाला आजपर्यंत बसवले गेले आहे? चार टाळकी जुन्या काळापासून सांगत आलीत म्हणून दावा करणे यापलीकडे ज्योतिषात काय रिगरस पार्ट आहे हे सांगता आले तर बरे. कुणाला इच्छा आहे त्याने अवश्य ह्या फ्रॉडच्या मागे लागावे. मुद्दा इतकाच आहे, की या लोकांचे दावे धडपणी पडताळायला हे लोकच तयार नसतात-पितळ उघडे पडण्याच्या भीतीमुळे. आणि जिथे दावा पडताळायचा चान्स मिळतो, तिथे पितळ झक्कत उघडे पडतेच!!! जरा शोधले तर रामदास वैग्रे संतांनीही या पाखंडाला शिव्याच घातलेल्या दिसून येतील.

माझा ह्या विषयावर पुष्कळ गोंधळ झालेला आहेच.. त्यामुळे मी ज्योतिष खरे की खोटे ह्या फंदात पडत नाही..पण.. धोंडोपंतांच्या ब्लॉग वर अनेकदा असे लेख असतात ज्यात ते नेमकी तारीख/ ठिकाण सांगतात. इथे "घरात तुम्ही सगळ्यांच कराल पण कुण्णी कुण्णी तुमचा विचार करत नाही" टाईप भविष्य नाहीये. कधी परदेशात जाईन - अमुक तारीख इतकं ठोस सांगितल्याच दिसतं.. हे कसं काय?

In reply to by पिलीयन रायडर

बाळ सप्रे 09/10/2013 - 17:30
इतकं ठोस सांगितल्याच दिसत असेल तर त्यांनी पुणे विद्यापीठ / अंनिसचं चॅले़ज स्वीकारायला हव होतं असं नाही का वाटत? असे बरेच दावे घटना घडून गेल्यावर हमखास ऐकु येतात.. तसेच चुकलेल्या भविष्याविषयीमात्र सोयीस्कररीत्या मौन बाळगले जाते..

In reply to by बाळ सप्रे

त्या बद्दल काही माहित नाही... माझा प्रश्न इतकाच आहे की ढोबळ भविष्य सांगणारे पाहीले आहेत. पण पंतांच्या ब्लॉगवर तर प्रश्नाचे एकच एक उत्तर (जसे की अमुक तारीख) आणि त्या उत्तरापर्यंत ते कसे पोहोचले ह्याचे विवेचन असते. ज्यांना पत्रिका कळते ते लोक वाचुन सांगतिल की ते विवेचन कितपत बरोबर असते. पण जर कुणी गणित सोडवल्या सारखं भविष्य सांगत असेल आणि जेनरिक उत्तरा ऐवजी स्पेसिफिक उत्तर देत असेल तर त्यांच्या पद्धतीचा अभ्यास करता येईल का? तुम्ही एकदा ब्लॉग पहा.. विवेचन जे मी म्हणत आहे ते असे करतात ते.. नमुन्या दाखलः- http://dhondopant.blogspot.in/2013/09/blog-post.html

In reply to by पिलीयन रायडर

बाळ सप्रे 09/10/2013 - 19:33
ब्लॉग वाचला.. एकतर घटना घडुन गेल्यावरचा दावा आहे.. पुढे.. स्पेसिफिक उत्तर आणि विवेचन असले तरी विवेचनाच्या मूळाशी गेल्यास "रवि आश्लेषात गेल्यावर २-३ दिवसात घटना घडेल" अशी कार्यकारणभावरहीत विधानेच आहेत.. वरच्या शब्द्दांच्या बुडबुड्यांना भुलून लोकांना वाटतं "वा ! काय विवेचन आहे!!" पण त्या वैभवच्या परदेशी जाण्याचा आणि सूर्याच्या त्या नक्शत्रात जाण्याचा काय संबंय?? याचं विवेचन कुठाय?? एखादा सॉफ्टवेअर मध्ये काम करणारा , व्हिसा असणारा माणूस जो बरेच दिवस परदेशी जायला "ड्यू" आहे.. त्याला "लवकरच जाशील" असे सांगितल्यास उत्तर बरोबर येण्याची शक्यता जास्त हे समजण्यासाठी ज्योतिष जाणण्याची (??) गरज नसून फक्त कॉमन सेन्स असला तरी पुरतो ..

In reply to by बाळ सप्रे

बरोबर.. साधारण अंदाज बघुन.. परिस्थिती पाहुन ज्योतीष सांगता येईल असं मलाही वाटतं.. मला कुतुहल फक्त "४-५ ऑगस्ट ला जाशील" हे सांगुन मग तो वैभव खरच ५ ऑगस्टला गेला ह्या गोष्टीचं वाटतं.. आणि अशा बर्‍याच घटना ते लिहीतात. म्हणुन ज्यांना इथे पत्रिका कळते त्या व्यक्तीने सांगावे की इतके अचुक काही सांगणे कसे शक्य आहे? मुळात ज्योतीषाच्या विरोधात सगळेच लिहीत आहे. इथे कुणी शास्त्रशुद्ध आणि संयमित भाषेत पत्रिकेमधल्या ह्या गणितांविषयी सांगेल काय? धोंडोपंत लिहीतील अशी मला मुळीच आशा नाही..

In reply to by पिलीयन रायडर

सुहासदवन 10/10/2013 - 11:24
जातकाने त्याला विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना अशी एखादी हिंट दिली जाण्याची दाट शक्यता आहे. बहुतेक वेळा आपल्या प्रश्नांची उत्तरे आपणच नकळत देत असतो हीच तर खरी ट्रिक असते प्रश्नांची.
लोकहो, आम्ही विविध विषयांवर आम्ही लेखन करीत आहोत. ज्योतिष हा त्यातील सर्वात महत्वाचा विषय. या विषयाकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती समाजात वृद्धिंगत व्हावी आणि त्यायोगे या शास्त्रातील अनेक महत्वाच्या गोष्टींपासून वाचकांचा फायदा व्हावा, ही एकमेव अपेक्षा ठेवून हा लेखनप्रपंच आम्ही करीत आहोत. आज, याच विषयावर, ज्योतिषांकडे जातांना कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत याबद्दल सांगतो. साधारणपणे ज्योतिषांकडे माणूस जातो, तेव्हा त्याच्या काही समस्या असतात. जसे डॉक्टरांकडे जाणार्‍या माणसाला काही आजार सतावत असतो, तसेच ज्योतिषांकडे जाणार्‍या माणसाला जीवनाच्या विविध अंगात काही समस्या भेडसावत असतात.

नुतन वर्षाभिनंदन (काही नववर्ष अवतरणे)

ऋषिकेश ·

भाषांतर आवडले. "नूतनवर्षाभिनंदन!!.... हे पाहा आपल्या चुका सुधारण्यासाठी अजून एक नवे वर्ष मिळाले आहे ..... दरवर्षीप्रमाणेच" हे वाक्य छान आहे.

"नूतनवर्षाभिनंदन!!.... हे पाहा आपल्या चुका सुधारण्यासाठी अजून एक नवे वर्ष मिळाले आहे ..... दरवर्षीप्रमाणेच" आम्हालाही हेच वाक्य आवडले !!!

भाषांतर आवडले. "नूतनवर्षाभिनंदन!!.... हे पाहा आपल्या चुका सुधारण्यासाठी अजून एक नवे वर्ष मिळाले आहे ..... दरवर्षीप्रमाणेच" हे वाक्य छान आहे.

"नूतनवर्षाभिनंदन!!.... हे पाहा आपल्या चुका सुधारण्यासाठी अजून एक नवे वर्ष मिळाले आहे ..... दरवर्षीप्रमाणेच" आम्हालाही हेच वाक्य आवडले !!!

नवीन वर्षा संबंधी काही अवतरणे वाचनात आली त्यांचे मुक्त भाषांतरः

"तारुण्य म्हणजे नव्यावर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर जागणे, आणि प्रौढत्व म्हणजे रात्रभर जागे राहावे लागणे"

"एक हितदर्शी (ऑप्टिमिस्ट) नवीन वर्षाची रात्र पुढील वर्षाचं स्वागत करण्यासाठी जागतो आणि अहितदर्शी (पेसिमिस्ट) जुने वर्ष गेल्याची खात्री करायला"

"अनेकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतात... त्यांना जुन्या सवयी नव्याने चालू करायच्या असतात ना!"

गाण्यांशी निगडीत आठवणी

देवदत्त ·

विसोबा खेचर 31/12/2007 - 02:07
देवदत्तराव, तुमचा लेख छान आहे आणि सांगितलेल्या आठवणीही छान आहेत! तुमच्या आठवणींशी निगडीत अशी काही गाणी आहेत का? हो, अगदी भरपूर आठवणी आहेत! 'सालस' ही आमची एकेकाळची प्रेयसी! तिचं-आमचं जमत असतानाची गोष्ट. भर पावसाळ्यात हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी (सांगून विश्वास बसणार नाही, परंतु होय, आता आम्ही अंमळ स्थूल आहोत परंतु कॉलेज जीवनात बर्‍यापैकी आकारात होतो, भरपूर व्यायामबियाम करायचो आणि तेव्हा मित्रमैत्रिणींच्या सोबत बरेचसे गडकिल्ले चढलो-उतरलो आहोत!) पावसाळी कुंद वातवरणात गरमगरम चाय पितांना वॉकमनवर लावलेलं 'दिवाना हुआ बादल' हे गाणं आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केलं होतं! आम्हा दोघांना जरा निवांतपणा मिळावा म्हणून एका झोपडीवजा आडोश्याला आमच्या इतर मित्रमंडळींनी आम्हाला दोघांना जरा चहा पिण्याकरता (!) मोकळं सोडलं होतं! तेव्हा त्या रसरशीत पोरीचा आम्ही हळूच एक मुकाही घेतला होता! साला आयुष्यातला पहिलावहिला मुका! आणि त्याच्याशी निगडीत 'दिवाना हुआ बादल' हे गाणं! अब क्या बताऊ आपको देवदत्तराव! जाने दो....! कालांतरानं नशीबाची दानं आमच्या बाजूने पडली नाहीत आणि सालस आम्हाला दुरावली! अगदी कायमची... परंतु आजही 'दिवाना हुआ बादल' हे गाणं लागलं की आम्ही जेव्हा 'दिवाना हुआ तात्या' या वयाचे होतो तेव्हाचे दिवस आठवतात! :) अवांतर - सालसची आणि आमची प्रेमकहाणी आम्ही मनोगतावर लिहायला घेतली होती आणि तिला मनोगती मंडळींचा अक्षरश: अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता! कालांतराने मनोगत सुटलं आणि सालसची कहाणी लेखनातही अधूरीच राहिली! आता पुन्हा ती कहाणी कुठेच लिहिणं होणार नाही. मनोगताशिवाय आम्ही ती इतरत्र कुठेही लिहू शकत नाही/लिहिणार नाही! आपली इच्छा असल्यास ती अधुरी कहाणी इथे वाचा! (हे लेखन आमच्या ब्लॉगावर ड्राफ्ट स्वरुपात सेव्ह केले होते ते आज अचानक निमित्त मिळालं म्हणून प्रकाशित करत आहे!) देवदत्तराव, अजूनही अशी अनेक गाणी आहेत ज्यांच्यासोबत आमच्या सुखदु:खाच्या अनेक आठवणी कायमच्या जोडल्या गेलेल्या आहेत! असो... छ्या! देवदत्तराव, वर्षाअखेरीस तुम्ही सालसची आठवण करून द्यायला नको होतीत! चुकलंच तुमचं!.... आपला, (दिवाना आणि हळवा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, तुमच्या सालसला तुम्हीच काय पण आम्ही पण विसरणार नाही. पुढच्या भागांची सगळेच वाट बघत होते. पण.... जाऊ द्या झालं... पण एक विनंति आहे, पुढचे भाग येऊ द्या. बर्‍याच दिवसात तुमचे काही नविन नाही. बिपिन.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 01/01/2008 - 14:46
तात्या, आपली आठवण लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुमची ती कहाणी मी वाचेन लवकरच. छ्या! देवदत्तराव, वर्षाअखेरीस तुम्ही सालसची आठवण करून द्यायला नको होतीत! चुकलंच तुमचं!.... उम्म्म... थोडं फार चुकलंच. :) पण वर्ष अखेरीस चालेल हो. नवीन वर्षात पुढे मग विसरून जायचं. ;)

तशी आवडलेली, वेड लावलेली गाणी बरीच आहेत... पण सर्वात जुनी आठवण... मी ५-६ वर्षांचा असेन. आमच्या शेजारी एक डॉक्टर राहतात. त्यांच्या कडे त्या वेळी एक 'रेडिओग्राम' होता (म्हणजे त्या वेळचा २-ईन-१. त्याच्यात एका बाजूला रेकॉर्ड प्लेयर असायचा आणि एका बाजूला रेडिओ). त्या तबकडीवर ऐकलेले पहिले गाणे... 'अनाडी' मधले नूतन आणि राज कपूर वर चित्रित झालेले 'वोह चाँद खिला, ये तारे हसीं...' हे गाणे. विशेषतः त्यातला 'अकॉर्डियन' चा पीस. अंगावर काटा आल्याचीही तीच पहिली आठवण. तिथेच आणि त्याच वयात ऐकलेले दुसरे गाणे, पं. भीमसेन जोशींचे 'मन हे राम रंगी रंगले..' हे भजन. आजतागायत तो आवाज विसरू शकलेलो नाही. हे दोन्ही प्रसंग माझ्या आठवणीत स्पष्ट कोरलेले आहेत. आजही नुसते डोळे मिटले तरी ते दोन्ही प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात. फोटोग्राफिक मेमरी म्हणतात तसे. http://www.youtube.com/watch?v=DCKCUkXBS44 बिपिन.

देवदत्त 01/01/2008 - 14:53
गेले कित्येक महिने असला लेख लिहायचे मनात होते. निदान स्वतःच्या आठवणींकरीताही. आताच विविध भारती वर ऐकले की त्यांनी ३ जानेवारीच्या कार्यक्रमात श्रोत्यांना त्यांच्या गाण्याशी जोडलेल्या आठवणी सांगण्यास विचारले आहे. एकाच वेळी दोन्हींकडून हे व्हावे हा योगायोग म्हणावा का? (नाहीऽऽऽऽऽऽ.. मी त्यांची कल्पना चोरलेली नाही. नाहीऽऽऽऽऽऽ.. :D )

प्रमोद देव 01/01/2008 - 21:01
गाण्यांच्या आठवणी किंवा असे म्हणा "आठवणीतील गाणी" असा एक कार्यक्रम गेले वर्षभर मी आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर(आधीची मुंबई 'ब') ऐकत आलोय. १)शाळेत आमच्या वर्गात एक नवी मुलगी आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासाला तिला बाईंनी गाणे म्हणायला सांगितले. तिने म्हटलेले गाणे माझेही आवडते होते. मात्र मी ते कधीच म्हणत नसे कारण ते माणिक वर्मांनी गायलेले असल्यामुळे साहजिकच ते एका स्त्रीचे गाणे आहे असे मी समजत असे. असो. तर गंमत ही की तिने नेमके तेच गाणे गायले. त्याचे शब्द होते "क्षणभर उघड नयन देवा" आणि हे ऐकताच सगळ्या वर्गाने माझ्याकडे हसत हसत माझ्याकडे दृष्टी वळवली. त्यावेळी मी डोळे मिटून ते गाणे ऐकत होतो. :-) २) आमच्या घरी जेव्हा पहिला ट्रान्झिस्टर रेडिओ आणला तेव्हा तो सुरु केल्या केल्या जे पहिले गाणे लागले ते होते "सुलताना सुलताना काहे घबराना(असेच काहीसे होते.)". पुढचे आठवत नाही. ३)तेरी प्यारी प्यारी सुरतको बद्दलची आठवण इथे वाचा.

मुक्तसुनीत 02/01/2008 - 03:17
मला हा लेख आणि ही संकल्पनाच खूप आवडली. प्रत्येक गाण्याबरोबर एकेक आठवण ही आहेच. मग ते गाणे "बेदर्दी बालमा तुझको" असो किंवा "दर्द्-ए-डिस्को" असो. आपल्या जडणघडणीत , आयुष्याच्या प्रवासामध्ये ऐकलेल्या गाण्यांचा एक फार मोठा हिस्सा आहे. कणेकरांनी एके ठिकाणी म्हण्टले आहे , आमची पिढी रेशनच्या तांदूळांवर , डालडाच्या तूपावर आणि शंकर-जयकिशनच्या गाण्यांवर वाढली. तपशील बदलले तर प्रत्येकाचे हे वाक्य होईल. आजही कुणी आजोबा सैगलच्या आठवणीत रमतात, तलतच्या नावाने कुणाला हुंदका येतो आणि कुणाच्या नातवा-पणतवाचे (!) "शारुक् खान्" च्या "दर्दे डीस्को "शिवाय जेवण पूर्ण होत नाही. संगीताशिवाय आपण कधीच नव्हतो आणि नाही. अगदी मारकुट्या मास्तरांचे , तिरसट काकांचे , खाष्ट सासूचे "स्वतःचे" असे एखादे गाणे असतेच. वर्षांमागून वर्षे जातात , प्रस्तराचे एकमेकांवर जसे थर जमत जातात तसे , आपल्यावरूनसुद्धा काळानुसार बदलत्या संगीताचे थर जमतात. बेगान्या देशात आयुष्य काढताना , आप्तस्वकीयांपासून तात्पुरते किंवा कायमचे दूर असताना उब असते कधीकाळी ऐकलेल्या , प्रेम केलेल्या गाण्यांची. कितीतरी गाण्यांच्या कितीतरी आठवणी आहेत. कायकाय सांगायच्या ? एकेक गायक , एकेक संगीतकार , एकेक गीतकार खजिनेच्या खजिने ठेऊन काळाच्या पडद्याआड गेले आहेत. कितीतरी ख्याल गायकाना बैठकीत ऐकले , काही गझलनवाझांच्या मैफली अगदी काही फूटांवरून ऐकल्या. कितीतरी रात्री रंगल्या. कितीतरी प्रवास , कितीतरी गप्पा गाणी, गायक , संगीत, गीतकार , आणि त्यांची सृष्टी यांच्या सहवासात गेले आहेत. शेवटी, हरिवंशराय बच्चन यांचे आत्मचरित्राचे शीर्षक आठवते : "क्या भुलूं , क्या याद करूं ! "

मी एक गाण॑ शोधतो आहे लहानपणी छायागीतमध्ये ऐकलेल॑, त्यात किशोरकुमार आणि माला सिन्हा आहेत्.'आरारारारा तोड ना दिल बेकरार का..' असे काहीसेसे त्याचे शब्द होते.फार मस्त गाणे होते.त्यात शेवटी माला सिन्हा इतकी फाकडू लाजते की वाह! कोणीतरी प्लीज पिक्चरचे नाव सा॑गा.

मी ६वीत असेन तेव्हा. संध्या़काळी शाळेतून घरी आलो आणि गाणे रेडीओवर चालू होते 'छेडीती पानात बीन थेंब पावसाचे ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात' काहीही अर्थबोध झाला नाही. मग काही वर्षे गेली . मी कोकणात माझ्या गावी गेलो होतो. उन्हाळा होता. आणि वळवाची एक सर येऊन गेली व परत ऊन आले. आलेले ढग थोडे पुढे गेले. मी घरातून बाहेर आलो. आणि जे काही दृश्य दिसले त्याने मला वरील ओळींची अनूभूती दिली. आजूबाजूला गळणार्‍या थेंबांनी मला ''छेडीती पानात बीन'' म्हणजे नेमके काय याची अनुभूती दिली आणि त्यानंतर मी गाणे खरे रसिकतेने ऐकू लागलो. या घटनेला मी माझा पुनर्जन्म समजतो. कारण त्या घटनेने मला रसिकतेची देणगी दिली. पुण्याचे पेशवे

झंप्या 12/01/2008 - 07:23
दत्त्या, सही विषय रे!! मलापण सत्या मधले 'गोली मार भेजेमे' ऐकले की आमच्या गँगजी आठवण येते बघ! -सबका डॉन एक

यूं शरमाया. रुपारेल कॉलेज, मुंबई च्या वार्षिक सोहळ्यात फिशपाँडचा कार्यक्रम चालू होता. प्र. रा. वि. सोवनी सुप्रसिद्ध विद्नानलेखक आमचे आवडते प्रा तेव्हा अँकरिंग करीत. त्यांनी एका ब्यूटी क्वीनला रंगमंचावर बोलाविले. तिला फिशपाँड आला होता. ती रूपगर्विता ताबडतोब मंचावर गेली. मग प्रा. नी फिशपाँड गाऊन दाखविला. चांद सा मुखडा क्यूं शरमाया ....... अरे हट. तुझे एप्रिल फूल बनाया.

इनोबा म्हणे 14/01/2008 - 18:34
शाहिर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारीत "माझी मैना गावाकडं राह्यली,माझ्या जिवाची होतीया काह्यली" हे गाणे कोणाकडे आहे का?किंवा ते कुठे मिळेल?(अल्बमची माहीती वगैरे...

विसोबा खेचर 31/12/2007 - 02:07
देवदत्तराव, तुमचा लेख छान आहे आणि सांगितलेल्या आठवणीही छान आहेत! तुमच्या आठवणींशी निगडीत अशी काही गाणी आहेत का? हो, अगदी भरपूर आठवणी आहेत! 'सालस' ही आमची एकेकाळची प्रेयसी! तिचं-आमचं जमत असतानाची गोष्ट. भर पावसाळ्यात हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी (सांगून विश्वास बसणार नाही, परंतु होय, आता आम्ही अंमळ स्थूल आहोत परंतु कॉलेज जीवनात बर्‍यापैकी आकारात होतो, भरपूर व्यायामबियाम करायचो आणि तेव्हा मित्रमैत्रिणींच्या सोबत बरेचसे गडकिल्ले चढलो-उतरलो आहोत!) पावसाळी कुंद वातवरणात गरमगरम चाय पितांना वॉकमनवर लावलेलं 'दिवाना हुआ बादल' हे गाणं आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केलं होतं! आम्हा दोघांना जरा निवांतपणा मिळावा म्हणून एका झोपडीवजा आडोश्याला आमच्या इतर मित्रमंडळींनी आम्हाला दोघांना जरा चहा पिण्याकरता (!) मोकळं सोडलं होतं! तेव्हा त्या रसरशीत पोरीचा आम्ही हळूच एक मुकाही घेतला होता! साला आयुष्यातला पहिलावहिला मुका! आणि त्याच्याशी निगडीत 'दिवाना हुआ बादल' हे गाणं! अब क्या बताऊ आपको देवदत्तराव! जाने दो....! कालांतरानं नशीबाची दानं आमच्या बाजूने पडली नाहीत आणि सालस आम्हाला दुरावली! अगदी कायमची... परंतु आजही 'दिवाना हुआ बादल' हे गाणं लागलं की आम्ही जेव्हा 'दिवाना हुआ तात्या' या वयाचे होतो तेव्हाचे दिवस आठवतात! :) अवांतर - सालसची आणि आमची प्रेमकहाणी आम्ही मनोगतावर लिहायला घेतली होती आणि तिला मनोगती मंडळींचा अक्षरश: अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता! कालांतराने मनोगत सुटलं आणि सालसची कहाणी लेखनातही अधूरीच राहिली! आता पुन्हा ती कहाणी कुठेच लिहिणं होणार नाही. मनोगताशिवाय आम्ही ती इतरत्र कुठेही लिहू शकत नाही/लिहिणार नाही! आपली इच्छा असल्यास ती अधुरी कहाणी इथे वाचा! (हे लेखन आमच्या ब्लॉगावर ड्राफ्ट स्वरुपात सेव्ह केले होते ते आज अचानक निमित्त मिळालं म्हणून प्रकाशित करत आहे!) देवदत्तराव, अजूनही अशी अनेक गाणी आहेत ज्यांच्यासोबत आमच्या सुखदु:खाच्या अनेक आठवणी कायमच्या जोडल्या गेलेल्या आहेत! असो... छ्या! देवदत्तराव, वर्षाअखेरीस तुम्ही सालसची आठवण करून द्यायला नको होतीत! चुकलंच तुमचं!.... आपला, (दिवाना आणि हळवा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, तुमच्या सालसला तुम्हीच काय पण आम्ही पण विसरणार नाही. पुढच्या भागांची सगळेच वाट बघत होते. पण.... जाऊ द्या झालं... पण एक विनंति आहे, पुढचे भाग येऊ द्या. बर्‍याच दिवसात तुमचे काही नविन नाही. बिपिन.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 01/01/2008 - 14:46
तात्या, आपली आठवण लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुमची ती कहाणी मी वाचेन लवकरच. छ्या! देवदत्तराव, वर्षाअखेरीस तुम्ही सालसची आठवण करून द्यायला नको होतीत! चुकलंच तुमचं!.... उम्म्म... थोडं फार चुकलंच. :) पण वर्ष अखेरीस चालेल हो. नवीन वर्षात पुढे मग विसरून जायचं. ;)

तशी आवडलेली, वेड लावलेली गाणी बरीच आहेत... पण सर्वात जुनी आठवण... मी ५-६ वर्षांचा असेन. आमच्या शेजारी एक डॉक्टर राहतात. त्यांच्या कडे त्या वेळी एक 'रेडिओग्राम' होता (म्हणजे त्या वेळचा २-ईन-१. त्याच्यात एका बाजूला रेकॉर्ड प्लेयर असायचा आणि एका बाजूला रेडिओ). त्या तबकडीवर ऐकलेले पहिले गाणे... 'अनाडी' मधले नूतन आणि राज कपूर वर चित्रित झालेले 'वोह चाँद खिला, ये तारे हसीं...' हे गाणे. विशेषतः त्यातला 'अकॉर्डियन' चा पीस. अंगावर काटा आल्याचीही तीच पहिली आठवण. तिथेच आणि त्याच वयात ऐकलेले दुसरे गाणे, पं. भीमसेन जोशींचे 'मन हे राम रंगी रंगले..' हे भजन. आजतागायत तो आवाज विसरू शकलेलो नाही. हे दोन्ही प्रसंग माझ्या आठवणीत स्पष्ट कोरलेले आहेत. आजही नुसते डोळे मिटले तरी ते दोन्ही प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात. फोटोग्राफिक मेमरी म्हणतात तसे. http://www.youtube.com/watch?v=DCKCUkXBS44 बिपिन.

देवदत्त 01/01/2008 - 14:53
गेले कित्येक महिने असला लेख लिहायचे मनात होते. निदान स्वतःच्या आठवणींकरीताही. आताच विविध भारती वर ऐकले की त्यांनी ३ जानेवारीच्या कार्यक्रमात श्रोत्यांना त्यांच्या गाण्याशी जोडलेल्या आठवणी सांगण्यास विचारले आहे. एकाच वेळी दोन्हींकडून हे व्हावे हा योगायोग म्हणावा का? (नाहीऽऽऽऽऽऽ.. मी त्यांची कल्पना चोरलेली नाही. नाहीऽऽऽऽऽऽ.. :D )

प्रमोद देव 01/01/2008 - 21:01
गाण्यांच्या आठवणी किंवा असे म्हणा "आठवणीतील गाणी" असा एक कार्यक्रम गेले वर्षभर मी आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर(आधीची मुंबई 'ब') ऐकत आलोय. १)शाळेत आमच्या वर्गात एक नवी मुलगी आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तासाला तिला बाईंनी गाणे म्हणायला सांगितले. तिने म्हटलेले गाणे माझेही आवडते होते. मात्र मी ते कधीच म्हणत नसे कारण ते माणिक वर्मांनी गायलेले असल्यामुळे साहजिकच ते एका स्त्रीचे गाणे आहे असे मी समजत असे. असो. तर गंमत ही की तिने नेमके तेच गाणे गायले. त्याचे शब्द होते "क्षणभर उघड नयन देवा" आणि हे ऐकताच सगळ्या वर्गाने माझ्याकडे हसत हसत माझ्याकडे दृष्टी वळवली. त्यावेळी मी डोळे मिटून ते गाणे ऐकत होतो. :-) २) आमच्या घरी जेव्हा पहिला ट्रान्झिस्टर रेडिओ आणला तेव्हा तो सुरु केल्या केल्या जे पहिले गाणे लागले ते होते "सुलताना सुलताना काहे घबराना(असेच काहीसे होते.)". पुढचे आठवत नाही. ३)तेरी प्यारी प्यारी सुरतको बद्दलची आठवण इथे वाचा.

मुक्तसुनीत 02/01/2008 - 03:17
मला हा लेख आणि ही संकल्पनाच खूप आवडली. प्रत्येक गाण्याबरोबर एकेक आठवण ही आहेच. मग ते गाणे "बेदर्दी बालमा तुझको" असो किंवा "दर्द्-ए-डिस्को" असो. आपल्या जडणघडणीत , आयुष्याच्या प्रवासामध्ये ऐकलेल्या गाण्यांचा एक फार मोठा हिस्सा आहे. कणेकरांनी एके ठिकाणी म्हण्टले आहे , आमची पिढी रेशनच्या तांदूळांवर , डालडाच्या तूपावर आणि शंकर-जयकिशनच्या गाण्यांवर वाढली. तपशील बदलले तर प्रत्येकाचे हे वाक्य होईल. आजही कुणी आजोबा सैगलच्या आठवणीत रमतात, तलतच्या नावाने कुणाला हुंदका येतो आणि कुणाच्या नातवा-पणतवाचे (!) "शारुक् खान्" च्या "दर्दे डीस्को "शिवाय जेवण पूर्ण होत नाही. संगीताशिवाय आपण कधीच नव्हतो आणि नाही. अगदी मारकुट्या मास्तरांचे , तिरसट काकांचे , खाष्ट सासूचे "स्वतःचे" असे एखादे गाणे असतेच. वर्षांमागून वर्षे जातात , प्रस्तराचे एकमेकांवर जसे थर जमत जातात तसे , आपल्यावरूनसुद्धा काळानुसार बदलत्या संगीताचे थर जमतात. बेगान्या देशात आयुष्य काढताना , आप्तस्वकीयांपासून तात्पुरते किंवा कायमचे दूर असताना उब असते कधीकाळी ऐकलेल्या , प्रेम केलेल्या गाण्यांची. कितीतरी गाण्यांच्या कितीतरी आठवणी आहेत. कायकाय सांगायच्या ? एकेक गायक , एकेक संगीतकार , एकेक गीतकार खजिनेच्या खजिने ठेऊन काळाच्या पडद्याआड गेले आहेत. कितीतरी ख्याल गायकाना बैठकीत ऐकले , काही गझलनवाझांच्या मैफली अगदी काही फूटांवरून ऐकल्या. कितीतरी रात्री रंगल्या. कितीतरी प्रवास , कितीतरी गप्पा गाणी, गायक , संगीत, गीतकार , आणि त्यांची सृष्टी यांच्या सहवासात गेले आहेत. शेवटी, हरिवंशराय बच्चन यांचे आत्मचरित्राचे शीर्षक आठवते : "क्या भुलूं , क्या याद करूं ! "

मी एक गाण॑ शोधतो आहे लहानपणी छायागीतमध्ये ऐकलेल॑, त्यात किशोरकुमार आणि माला सिन्हा आहेत्.'आरारारारा तोड ना दिल बेकरार का..' असे काहीसेसे त्याचे शब्द होते.फार मस्त गाणे होते.त्यात शेवटी माला सिन्हा इतकी फाकडू लाजते की वाह! कोणीतरी प्लीज पिक्चरचे नाव सा॑गा.

मी ६वीत असेन तेव्हा. संध्या़काळी शाळेतून घरी आलो आणि गाणे रेडीओवर चालू होते 'छेडीती पानात बीन थेंब पावसाचे ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात' काहीही अर्थबोध झाला नाही. मग काही वर्षे गेली . मी कोकणात माझ्या गावी गेलो होतो. उन्हाळा होता. आणि वळवाची एक सर येऊन गेली व परत ऊन आले. आलेले ढग थोडे पुढे गेले. मी घरातून बाहेर आलो. आणि जे काही दृश्य दिसले त्याने मला वरील ओळींची अनूभूती दिली. आजूबाजूला गळणार्‍या थेंबांनी मला ''छेडीती पानात बीन'' म्हणजे नेमके काय याची अनुभूती दिली आणि त्यानंतर मी गाणे खरे रसिकतेने ऐकू लागलो. या घटनेला मी माझा पुनर्जन्म समजतो. कारण त्या घटनेने मला रसिकतेची देणगी दिली. पुण्याचे पेशवे

झंप्या 12/01/2008 - 07:23
दत्त्या, सही विषय रे!! मलापण सत्या मधले 'गोली मार भेजेमे' ऐकले की आमच्या गँगजी आठवण येते बघ! -सबका डॉन एक

यूं शरमाया. रुपारेल कॉलेज, मुंबई च्या वार्षिक सोहळ्यात फिशपाँडचा कार्यक्रम चालू होता. प्र. रा. वि. सोवनी सुप्रसिद्ध विद्नानलेखक आमचे आवडते प्रा तेव्हा अँकरिंग करीत. त्यांनी एका ब्यूटी क्वीनला रंगमंचावर बोलाविले. तिला फिशपाँड आला होता. ती रूपगर्विता ताबडतोब मंचावर गेली. मग प्रा. नी फिशपाँड गाऊन दाखविला. चांद सा मुखडा क्यूं शरमाया ....... अरे हट. तुझे एप्रिल फूल बनाया.

इनोबा म्हणे 14/01/2008 - 18:34
शाहिर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारीत "माझी मैना गावाकडं राह्यली,माझ्या जिवाची होतीया काह्यली" हे गाणे कोणाकडे आहे का?किंवा ते कुठे मिळेल?(अल्बमची माहीती वगैरे...
आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील... ख्वाब हो तुम या कोई हकीकत.. किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे.

लहान मुलांची आकलन क्षमता/शक्ती - २

देवदत्त ·

धनंजय 29/12/2007 - 20:35
:-) अवांतर : "डार्विनच्या सिद्धांतानुसार" ही क्षमता वाढत जाणार की नाही हे सांगता येत नाही. डार्विनचा सिद्धांत लागूच झाला तर या पुढील परिस्थितीत : जर (१) ही क्षमता आनुवांशिक असेल, आणि जर (२) ही क्षमता अधिक असलेले लोक अधिक प्रमाणात प्रौढत्वापर्यंत जाणारी मुले जन्मास घालतील तर ही क्षमता वाढत जाईल. (१) आणि (२) हे दोन्ही "जर" शंका करण्याजोगे आहेत.

धनंजय 29/12/2007 - 20:35
:-) अवांतर : "डार्विनच्या सिद्धांतानुसार" ही क्षमता वाढत जाणार की नाही हे सांगता येत नाही. डार्विनचा सिद्धांत लागूच झाला तर या पुढील परिस्थितीत : जर (१) ही क्षमता आनुवांशिक असेल, आणि जर (२) ही क्षमता अधिक असलेले लोक अधिक प्रमाणात प्रौढत्वापर्यंत जाणारी मुले जन्मास घालतील तर ही क्षमता वाढत जाईल. (१) आणि (२) हे दोन्ही "जर" शंका करण्याजोगे आहेत.
3