Skip to main content

जीवनमान

मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२

लेखक प्रास यांनी रविवार, 15/07/2012 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
॥ जालिंदरबाबा की जय ॥
जुन्या-जाणत्या, वृद्धानुभवी मिपाकरांच्या आशीर्वादाने आणि नव्या-जाणत्या, होतकरू-तरुण मिपाकरांच्या पुढाकाराने
मिसळपाव धर्म वाढवावा। अवघा हलकल्लोळ करावा॥
या इराद्याने यंदाचे 'मिसळपाव मान्सून संम्मेलन - २०१२' मुंबईच्या पश्चिम दृतगती मार्गावर आयोजित केलेले आहे.

मंदी आली का हो !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 15/07/2012 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवाची गोष्ट. आमचा एक मित्र आहे. नुकतेच त्याचे कॉलेज संपले. नोकरीच्या शोधात आहे. म्हणून त्याचा बायो डेटा एका परीचिताकडे पाठवला. हा परीचित एका बँकींग क्षेत्रासाठी आय टी सर्व्हिस देणार्‍या कंपनीत काम करतो. म्हणाला 'अहो चूकीच्या वेळेला आलात." मागील आठवड्यातच आमच्याकडे काही शे लोकांना नारळ दिला. आम्हालाही नोटीस मिळालीये. निरोप समारंभ ३ महिन्यांनी होणार आहे. म्हणून तो बायोडेटा घेऊन गेलो दुसर्‍या मित्राकडे. त्याचे कम्पनी जागतिक, त्यामुळे बेंचही जागतिक.

अनपेक्षित ..

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 13/07/2012 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
. काहीतरी चांगल पोस्ट करायला जातो, नेमकी एरर समोर येते आणि आपण काहीतरी करण्याआधीच पोस्ट अपडेट होते .. अनपेक्षित पेचातून सुटका ! पोस्टला कुणी लाईक केले आहे का पहातो, तो पोस्टला चार शेअर दिसतात .. अनपेक्षित आनंदाचा झटका ! रस्त्यातून जाताना पुढच्यास ठेच- म्हणून शहाणा व्हायला जातो, तर आपल्याला ठेचच लागत नाही तर आपण नेमके समोरच्या खड्ड्यात पडतो .. अनपेक्षित शहाणपणापणाला फटका ! वाहतुकीचा सिग्नल तोडून पुढचे दोघे भरधाव निघाले की, आपणही 'प्रयत्न' करायला जातो आणि नेमके 'त्या'च्या तावडीत सापडतो ..

अस्पृश्यता, आरक्षण आणि पुणे करार

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 13/07/2012 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या रविवारचा सत्यमेव जयतेचा भाग अस्पृश्यता ह्या सामाजिक विषयाला वाहिलेला होता. शहरी भागात राहणार्‍या बर्‍याच जणांसाठी त्यात दाखविलेल्या बर्‍याच गोष्टी कदाचित धक्कादायक असू शकतील. ह्या भागानंतर बर्‍याच मराठी संस्थळांवर ह्या अनुषंगाने चर्चा झडल्या. मिपावरही कोणाचा रे तू' ह्या शीर्षकाचा लेख आला आणि त्यावरच्या प्रतिसादांमधून एक चर्चासत्र झडले. त्या चर्चेत बहुतकरून सध्याच्या तरुण पिढीतले युवक युवती हिरीरीने सहभाग झाले होते. त्या गदारोळात चर्चा अपरिहार्यपणे 'आरक्षण' ह्या मुद्द्यावर येऊन थडकली.

नदी

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 12/07/2012 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक होती नदी. नाजुकशी चिमुकली, अवखळ. तारुण्याने मुसमुसलेली, सतत ताजीतवानी असलेली. सागराच्या ओढीने सतत धावतणारी. या अखंड धावण्याचा तिला कधी कंटाळा आला नाही. ना कधी ती दमली थकली. सतत वहात रहाणे हा जणु तिचा धर्मच होता आणि सागरा बरोबर एकरुप होणे हा तिचा ध्यास होता. निळ्याशार आभाळाने तिला कधी भुरळ घातली नाही कि आजूबाजूची हिरवीगार वनराई तिचा निच्श्रय कधी मोडू शकली नाही. खोल दरीत स्वतःला झोकुन देताना ती कधी कचरली नाही की मार्गात दगड धोंडे आले म्हणुन ती कधी अडली नाही. त्यांना एक सफाईदार गिरकी मारुन ती डौलात पुढे जात असे. अनेक लहान मोठे झरे, ओढे, तिच्या मधे येउन मिळत असत.

एक असामान्य पोलिस अधिकारी हरपला

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 08/07/2012 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
आज माजी पोलिस उपायुक्त श्री. अरविंद पटवर्धन यांच्या मृत्युची बातमी वाचली आणि ३०-३५ वर्षांपूर्वीच्या श्रीकांत सिनकर लिखित मुंबई सी आय डीच्या तपास-चातुर्यकथा डोळ्यापुढे साकारल्या. सिनकरांच्या आवड्त्या अधिकार्‍यांपैकी एक अधिकारी श्री. अरविंद पटवर्धन. सी आय डी मध्ये अधिकारी असूनही एका खोलीत साधेपणाने राहणारा, निस्पृह व गणवेशाच्या आत माणूस जपणारा आणि गुन्हेगारातही माणूस शोधणारा व त्याला पुन्हा माणसात आणायचा प्रयत्न करणारा हा असामन्य मनुष्य. पोलिस कारकिर्दीत पटवर्धन साहेब गाजले ते आर्थिक गुन्ह्यांचा महाकठिण़ तपासांसाठी.

( मित्रं...)

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 06/07/2012 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, ही आमची प्रेरणा म्हणा किंवा मनातल्या एका कप्प्याला लागलेला धक्का. गविंचे आभार. :) समजून घ्याल अशी मिपाकरांकडून अपेक्षा. ---------------------------------------------------------------------------------------------------------------- मी लहानपणापासून राजीखुषीने, विशेषतः आईबापांच्या राजीखुषीने आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता मैत्री करत आलो आहे. मित्रांच्या खांद्यावर हात ठेवून मी लहानपणी हिंडायचो. आम्ही एकमेकाशी कानात गुलुगुलु बोलत असायचो.. पण असं जास्त वेळ करता यायचं नाही.

ज्यूलीचे चौघडे

लेखक मन यांनी गुरुवार, 05/07/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
साल १९७५. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जन्मलेली पिढी ऐन तारुण्यावस्थेत आलेली. तरुण स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलेल्यांच्या डोक्यावर हलकीशी चंदेरी रेषा उमटू लागलेली. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व विचार, समाजमन मागे पडत चाललं तरी अजून पुसलं गेलं नव्हतं. शहरातल्या सर्वसाधारण महाविद्यालयात मुलींचा वावर थोडासा वाढू लागला असला तरी कुणीही अनोळखी भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलणे म्हणजे अजूनही "जगावेगळी" गोष्ट होती. पोरींशी डायरेक बोलणे हे फिल्मी हिरो नि रोडरोमियोलाच शोभते असा मध्यमवर्गाचा(आणि निम्नमध्यमवर्गाचा) समज. सर्वाधिक संख्येने ह्यांचीच मुले कॉलेजात जात्.श्रीमंतांची संख्या देशातच कमी.