Skip to main content

जीवनमान

(काऽऽय रेऽऽ देवाऽऽ)

लेखक रमताराम यांनी बुधवार, 25/07/2012 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
(कवि संदीप खरे यांची क्षमा मागून...) आता पुन्हा उपोषण होणार मग देश ढवळून निघणार मग बेदींना कंठ फुटणार मग मध्येच मोदी बोलणार मग जुनाच खेळ चालू होणार... काऽऽय रेऽऽ देवाऽऽ... मग जुन्या खेळात जुने खेळाडू पुन्हा एन्ट्री घेणार... मग सारीपाट मांडणार... मग मांडलेला सारीपाट काहींना पसंत नसणार... मग ते कुणीतरी ओरडणार मग अण्णा-मित्र असतील तर रडणार रामदेव बाबा असतील तर चिडणार मग नसतोच खेळलो तर बरं असं वाटणार आणि या सगळ्याशी आता प्रणवदांना काहीच घेण-देणं नसणार... काय रेऽऽ देऽऽवा मग त्याचवेळी लोकपाल विधेयकावर चर्चा चालू असणार... मग त्यात बेदी, केजरीवाल नि काँग्रेसचं कुणी असणार... मग त्याला अण्णांनी आप
काव्यरस

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 25/07/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आजचा दिवस कसा जाणार आहे किंवा आत्ता इथे आहोत, दिवस संपताना कुठे असणार आहोत वगैरे काहीच आपल्याला माहित नसतं. याचं अगदी शब्दशः प्रत्यंतर मला आलं, परवा, २२ जुलैला. दिवस सुरू झाला पुण्यात आणि अगदी अनपेक्षितपणे संपला मेंढ गावात, जितूच्या घरी. *** गेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'.

लाईफ हिस्टोग्राम

लेखक यशोधन वर्तक यांनी बुधवार, 25/07/2012 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
लाईफ हिस्टोग्राम " how much land does a man need “ . प्रसिद्ध रशियन विचारवंत लिओ टोलस्टोय याची एक कथा आहे . कथा सूत्र काहीसे असे आहे की एका माणसाला हे बक्षीस मिळते की तो पहाटेपासून संध्याकाळ पर्यंत जेव्हडे अंतर पायी काटू शकेल तेव्हढी जमीन त्याला मिळेल . तो माणूस भल्या पहाटे चालायला सुरुवात करतो , काही वेळानंतर त्याला आपला वेग कमी वाटू लागतो म्हणून तो पळू लागतो खूप धाप लागते तरी हावऱ्या सारखा पळतच राहतो . खूप पळाल्यावर त्याला प्रचंड धाप लागून खोकल येतो रक्ताची उलटी होवून तो मरण पावतो .

गणपुले काकू

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 24/07/2012 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
(जानेवारी २०१२ मध्ये हा लेख लिहिला होता. माझ्या आयुष्यात ज्या माऊलीने अमुलाग्र बदल घडवून आणला त्या गणपुले काकू यांच्या बद्दलच्या भावना या लेखात प्रकट केल्या आहेत.) काही दिवसांपूर्वी राहुलचा फोन आला होता. म्हणत होता सोमवार, १६ जानेवारी बद्दल कळलं ना??? फेसबुकवर मेल टाकलं आहे. काकूंचा वाढदिवस साजरा करायचा आहे, शुभमंगल हॉलमध्ये, संध्याकाळी ७ ते ९. जरूर ये.पण काकूंना काही बोलू नकोस, त्यांना हे सरप्राईज आहे. मी येतो म्हटलं आणि १६ ला संध्याकाळी कुठलही काम ठेवायचं नाही असं मनाशी पक्कं केलं.

पाकीट

लेखक चावटमेला यांनी रविवार, 22/07/2012 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
"मित्रा, ते फाटकं पाकीट कधी बदलतोयेस आता? " "काय रे , काय सिल्वर ज्युबिली साजरी करायलयंस का काय त्या पाकीटाची? " "काय, गिनीज बुकात नोंद करायची आहे का काय? " "तुझा वाढदिवस कधी आहे तेवढा सांग बाबा, आम्ही सगळे एक छानसं पाकीटच गिफ्ट देतो" "वाट मॅन, कुच अँटीक वालेट है क्या वो? " "काय, लक्की पाकीट वाटतं?" "अरे त्यातल्या पैशांचं सोड, तुझं लायसन्स, पॅन कार्ड, डेबिट कार्ड वगैरे त्यातून कधी पडलं तर केवढ्यात पडेल ते.

अरविंद गुप्ता टोयज.कॉम

लेखक सुकामेवा यांनी शनिवार, 21/07/2012 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एकदा फिरत असताना एका पुस्तकाच्या प्रदर्शनात गेलो होतो , तिथे माझ्या मुली करता करून पहा हे अरविंद गुप्तांचे पुस्तक घेतले , घरी आल्यावर पुस्तका बरोबर आलेली CD बघत आसताना त्यात त्यांच्या arvindguptatoys .com याचा ऊल्लेख दिसला म्हंटले पाहावे तरी जाऊन आजून काही मजेशीर खेळणी किंवा टाकाउतून टिकाऊ करण्याकरिता काही कल्पना मिळता आहेत का ते. तर पहिल्याच पानावर मराठी हिंदी व इंग्लिश पुस्तकांचा दुवा दिसला म्हणून जाऊन बघतो तर काय ही मोठी यादी होती.

सुट्टी आणि मी

लेखक आनंद भातखंडे यांनी शुक्रवार, 20/07/2012 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
[खालील लेख दुबई महारष्ट्र मंडळाच्या नवरंग या ई-मासिकात प्रकाशमान झाला आहे. तो इथे माझ्या मि.पा. मित्रांसाठी परत प्रकाशमान करत आहे ... चायला लेख आहे का बल्ब?? ;) ] मुलीची परीक्षा संपल्यावरचा पहिलाच शनिवार आणि मला सुट्टी. आठवड्याचे ५ दिवसच कामाचे असल्याने शनिवार रविवार मी निष्काम असतो. ओघाओघाने मुलीला पण ५ दिवसच शाळा असल्याने उरलेल्या दोन दिवसात आम्ही दोघे "धिंगाणा" घालण्या व्यतिरिक्त काहीही करत नाही असे माझ्या शिस्तप्रिय पत्नीला वाटते.

राजेश'जी खन्ना उर्फ 'आनन्द'ची कायमची एक्झिट....

लेखक मृगनयनी यांनी बुधवार, 18/07/2012 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलिवुडचे पहिले सुपरस्टार "राजेश'जी खन्ना" यांचे मुम्बईतील त्यांच्या राहत्या घरी (आशीर्वाद बंगला येथे) वयाच्या ७० व्या वर्षी नुकतेच दु:खद निधन झालेले आहे. कालच रात्री लीलावती हॉस्पिटलमधून त्यांना डिसचार्ज दिला गेला होता. आज सकाळपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झालेली होती. आज दुपारी १-४५ वाजता काका'ने "जिन्दगी'च्या सुहाना सफर"मधून कायमची एक्झिट घेतली.. :| सर्व पिढ्यांना आवडणार्‍या आपल्या लाडक्या काका'ला भावपूर्ण श्रद्धांजली... ~*~*~*~*~*~ ...

पाणीवाली बाई!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 18/07/2012 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
त्यावेळी गोरेगाव खरंच एक छोटंसं गाव होतं. गावातले बहुतेक लोक एकमेकांना ओळखायचे. पश्चिमेला ग्रामदैवत अंबाबाईचं देऊळ आहे. त्याला लागूनच, एका बाजूला अ. भि. गोरेगावकर शाळा आणि दुसर्‍या बाजूला केशव गोरे स्मारक ट्रस्टची इमारत. मंदिरात नेहमीच येणं जाणं असल्यामुळे केशव गोरे हे नाव अगदी ओळखीचं आणि आठवणीत फिट्ट बसलेलं. गोरेगाव त्यावेळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं. प. बा.