Skip to main content

जीवनमान

श्रीगणेश लेखमाला ४ : उपाहारगृह - एक सेवा व्यवसाय

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 21/09/2015 00:23 या दिवशी प्रकाशित केले.

उपाहारगृह - एक सेवा व्यवसाय.

तरुणपणी सर्वसामान्यांप्रमाणेच अनेक स्वप्ने पाहिली. म्हणजे अगदी लहानपणी रेल्वे इंजीन ड्रायव्हरपासून कळायला लागल्यावर विमानाचा पायलट ते सैन्यअधिकारी किंवा एअरफोर्स पायलट अशी विविध रोमांचकारी आणि कालसापेक्ष, प्रकृतीनुरूप सतत बदलणारी स्वप्ने पाहिली. पण नियती मला पाहून हसत होती. ती म्हणत होती, 'बेट्या, मला विसरतो आहेस. तुला मीच घडविणार आहे.' प्रथमवर्ष विज्ञानला कॉलेजला दांड्या मारून चित्रपट पाहणे आणि अभ्यासाकडे अक्षम्य दुर्लक्ष ह्याचा परिपाक म्हणून नापासचा शिक्का बसला. अर्थार्जनाची घाई आणि चालून आलेली संधी पकडून नोकरी सुरू केली.

श्रीगणेश लेखमाला ३: योगशिक्षक

लेखक लाल टोपी यांनी रविवार, 20/09/2015 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखमालेतील इतर लेखकांच्या व्यवसायाला असणारे वलय कदाचित योग शिक्षकाला नसेल; आपण भविष्यात योग शिक्षक बनावे अशी स्वप्नेही मुले किंवा त्यांचे पालक पाहत असतील असे वाटत नाही. मात्र या क्षेत्रात जवळपास २८ वर्षांहून अधिक काळ व्यतीत केल्यानंतर या क्षेत्रामध्ये स्वत:चे आणि इतरांचेही भविष्य घडवण्याची ताकद आहे आणि केलेल्या कामाचे समाधानही आहे असे नक्कीच वाटते.

कुछ अनमोल लोगो से रिश्ता रखता हूँ…

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 19/09/2015 05:25 या दिवशी प्रकाशित केले.
धाकट्या भावाने हरिवंशराय बच्चन यांची "कुछ अनमोल लोगोंसे रिश्ता रखता हूं" ही कविता पाठवली आणि कळवलं, 'दादा, मराठीत रुपांतर कर!'. प्रयत्न केलाय, त्याच्यासाठी, आणि मिपासाठी.

श्रीगणेश लेखमाला २: यंत्रोपवित

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 19/09/2015 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना माझे आई-बाबा मिपा वाचत नसले, तरीही सगळ्यात आधी त्यांचे आभार मानतो. कारण माझ्यावर त्यांनी कधीच तू अमुक एकच केलं पाहिजेस अशी सक्ती केली नाही. तुला वाटेल त्या गोष्टीमध्ये तुझं करिअर कर म्हणून त्यांनी मला मोकळीक दिली, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. "बाळा/बाळे, तू मोठी झालीस की कोण होणार?" असा प्रश्न साधारण वयाच्या पाचव्या वर्षीपासून न विचारलं गेलेलं बालक शोधून सापडायचं नाही बहुधा.

श्रीगणेश लेखमाला १: शिक्षणक्षेत्र

लेखक बोका-ए-आझम यांनी शुक्रवार, 18/09/2015 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी आज शिक्षणाच्या क्षेत्रात आहे, त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे 'माझ्या आईकडे सुट्टे पैसे नव्हते.' मला कोणीही जेव्हा कधी तू या क्षेत्रात कसा आणि कुठून आलास असं विचारतो, तेव्हा माझं हे ठरलेलं उत्तर आहे, आणि ते १०० टक्के खरं आहे. १ मे १९९६ या दिवशी जर माझ्या आईकडे सुट्टे पैसे असते, तर माझं संपूर्ण आयुष्य फार वेगळ्या मार्गाने गेलं असतं. माझी आई मुंबई महानगरपालिकेच्या स.गो.बर्वेनगर, घाटकोपर पश्चिम इथल्या शाळेत शिक्षिका होती आणि १ मे हा नेहमीप्रमाणे त्या शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस होता.

ती आणि मी (भयकथा)

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 17/09/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी: तिचं घर कसं भणंग. एकटं. मुख्य वाड्यापासुन जरासं दुर. तिचे म्हातारे आईबाप, थोरले भाऊ, त्यांच्या बायका पोरं वाड्यात राहायचे. ही बाहेरच्या खोलीत. एकटीच. बिनलग्नाची. रात्री जेवणानंतर घरामागच्या झाडीत मशेरी घासत फिरण्याची तिला विचित्र सवय होती. तिची आणि माझी पहीली भेट इथलीच. एका रात्री ती मला अशीच एकटी दिसली. जवळ जावुन मी तिची विचारपुस केली. घडाघडा बोलली. खरतरं मी तिच्यापुढे एक अनोळखी बाई होते. पण पहिल्या भेटीतच तिनं आयुष्यभराचं रडगाणं माझ्यासमोर सुरु केलं. माझ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत कितीतरी वेळ एकटीच बोलतच राहीली. थोडी चक्रमच वाटली. पण मला तिची दया आली.

हे काय कमी काय?

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 16/09/2015 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं! वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून घरी परततात माणसं, हे काय कमी काय? सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय? सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय? भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव! मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय? उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 16/09/2015 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद

एक पाकळी दुभंगलेली

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 16/09/2015 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
वटवृक्षाला बहर आला होता. लाल लाल कळ्यांचा गंध वातावरणात दरवळत होता. कित्येक भ्रमर त्या गंधाला हुंगत कळ्यांपर्यंत पोहोचायचे. शेवंता त्या वटवृक्षाखाली बसायची. जमीनीवर पडलेली एखादी कळी ऊचलायची. कधी डोक्यात सजवायची, कधी पुस्तकात ठेवायची, तर कधी त्याला खाऊनच टाकायची. एक म्हातारा शेजारच्या मंदिराच्या पायरीवर बसुन येणाऱ्या-जाणाऱ्याला चहा-पानाला पैसे मागायचा. शेवंता खेळत हुंदडत या म्हाताऱ्यापाशी यायची. म्हातारा तिला बिडी-काडी आणायला पैसे द्यायचा, तिच्या गोळ्या-बिस्किटांचा हिस्सा त्यात ठरलेला. म्हाताऱ्यानं तिला लळा लावलेला.

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.