Skip to main content

जीवनमान

खरेच आपण डिजिटल झालो आहोत?

लेखक राजू यांनी मंगळवार, 29/09/2015 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
साधरणपणे १० वर्षापुर्वी पर्यंत आपल्यातील बहुतेक जण व काही ठिकाणी आतासुध्दा काही जण सार्वजनिक शौचालय वापरत आहेत. तेंव्हा त्या शौचालयात काही कलाकृती व गावातील,आळीतील भानगडी,वाद एकतर्फी प्रेमाची जाहिरात वाचायला मिळत असे. एवढेच नाही त्या बातम्या अपडेट करणारे व त्या चविने वाचणारे,पाहणारे आज बहुसंख्येने व्हाट्स अप वर व उरले सूरलेले ईतर सोशल नेटवर्कवर आजही आहेत. खरेच या महाभागांमुळे आपण किती डिजिटल झालो आहोत हे समजते आहे. शांताबाय ....शांताबाय ....या फॉरवर्ड होणाऱ्या गाण्याला व इतर अश्लील क्लिप्स,नॉन-वेज जोक्स आणि फालतू फॉरवर्ड जोक्सला वैतागलेला एक त्रस्त सोशल साईट्स वापरकर्ता..... ( विशेष सूचन

मेपोल - एक आनंदोत्सव

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 29/09/2015 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, शीर्षक वाचून कुणी या धागा लेखास निवडणूक मतदान/राजकारणाचा विषय समजून उघडले तर तुर्तास तरी क्षमस्व :) पोल हा शब्द येथे खांब अथवा काठी या अर्थाने घ्यावयाचा आहे. मेपोल हा एक बर्‍याच युरोपीय देशांमधला १ मे ला ( अथवा पासून चालू) होणारा ख्रिश्चनपूर्व काळापासून चालत आलेला एक मोठा आनंदोत्सव आहे. ज्यात काठ्यांना सुशोभित करणे त्यांच्या भोवती सामुहीक फेरनृत्य, गाणी अथवा मिरवणूकींचा देशपरत्वे समावेश असू शकतो.

गोष्ट छोटी डोंगरा एवढी.....

लेखक राजू यांनी मंगळवार, 29/09/2015 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
असेच गप्पा टप्पा करायला चौकातल्या मित्रांमध्ये बसलो विषय असेच नेहमीचे दिल्ली पासून गल्ली पर्यंतचे होते. असेच बोलता बोलता वादग्रस्त विषय आला विषय तसा भरपूर बोलण्याचा असल्याने गरमागरम चर्चा सुरु झाली बोलता बोलता नेहमी प्रमाणे डावे, उजवे व तटस्थ असे गृप पडले.

क्षण

लेखक rutusara यांनी मंगळवार, 29/09/2015 02:54 या दिवशी प्रकाशित केले.
“सांगा कसं जगायचं ? कण्हत कण्हत…की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा !” पाडगावकरांची एक अत्यंत गोड कविता. पहिल्यांदा वाचली तेव्हा खूप आवडली. त्यानंतर प्रत्येक वेळेला त्याहून जास्तच आवडत गेली. खरंच किती सुंदर कल्पना आहे. गाणं म्हणत जगायचं ….प्रत्येक दिवस म्हणजे एक नवीन गाणं.. आणि त्या गाण्याला जिवंत करतो आपण, आपल्या आजूबाजूची माणसं आणि आपले अनुभव!

आपण नेमके कोण आहोत?

लेखक राजू यांनी सोमवार, 28/09/2015 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
असेच काही क्षण जगणे शिकवणारे.... नेहमी प्रमाणे भेटल्यावर नमस्कार करुन " अण्णा ५० रुपये दे रे " असे हक्काने चौधरी बोलला म्हणजे आज चौधरी एकदम जोरात आहे १० - १२ दिवस एकदम शांत असणारा चौधरी सकाळ पासूनच देशी लावून आहे हे लगेच समजून आले. चौधरी म्हणजे पिंपरी - चिंचवड मध्ये घंटागाडी कामगार हा गेले २० वर्ष कंत्राटी कामगार म्हणून काम करणारा असा इतर कामगारातला एक कामगार. कधीही ड्रेनेज, गटर तुंबले कि याला सांगायचे येऊन ते काम एक रुपया न मागता करुन जाणार.

रूपगर्विता

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 27/09/2015 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास चार वाजता एस. टी. भेटली. मधल्या शिटावर बसुन माझा प्रवास सुरू झाला. खिडकीतुन बाहेर बघत बसलो. कंटाळा आला. हेडफोन कानात घालुन मस्त ताणुन दिली. "फुल मांगुना बहार मांगु......" वाह! काय मस्त गाणं आहे अगदी तिनचं गायल्यासारखं. गाडीने वेग घेतला. हायवेवरचा वेग. तुफान. तासाभरानं एक गाव आलं. तिथ उतरायचचं होतं. कसलं हे गाव 'थिरडी'. अजुन इथनं आठ-दहा किलोमीटर लांब होतं म्हणे. एकतर संध्याकाळची वेळ. तिथं काही खायला भेटणं अवघडचं. एका गाड्यावर भुर्जी-पाव हाणली, डब्बल. एक पार्सल पण घेतली. मग टमटमनं निघालो 'थिरडी' कडं. महामार्गापासुन आत जाणारा गावठी रस्ता आता सुरु झाला.

बारकुले दिवस

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 27/09/2015 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
"ऊठ बाबा, चुलीतली राख घीऊन दात घास" जख्खड म्हातारी, आज्जी कुठली. "बग माजा कसा भिंगतुय!" सकाळपारी भोवरा फिरवायचा रोजचा पराक्रम. "आये, मी न्हाय जाणार साळंला" खाकी चड्डी पाढरा शर्ट. शेंबुड पुसणारा गबाळा अवतार. "चल रै भावड्या, कालची गणितं सोडवलीका?" दोन वेण्या घातलेली थोरली बहीण. गुडीगुडी. "तायं, मला गाभुळ्या चिच्चा दि की काढुन" वाटेतल्या झाडाकडे अंगुलीनिर्देश करत. "पाटीवर बदकाचे चित्र काढा" फळ्यावर छडी ठेवत मास्तरीण.

एका अनोळखी प्रदेशात - २

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 27/09/2015 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार पसरत चाललाय. निटसं दिसतही नाहीये. आणि मी फाट्यावर ऊभा ठाकलोय. एकटाच. हातातल्या बँगेत भुर्जीपावचं पार्सल घेऊन. एव्हाना त्या टपरीवल्याला काहीतरी बिनसल्याची चाहुल लागली.

श्रीगणेश लेखमाला १० : कंपनी सेक्रेटरी

लेखक मृत्युन्जय यांनी रविवार, 27/09/2015 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी वाणिज्य शाखेत पदवी घेणार, हे मी आठवी-नववीत असताना मला कळून चुकले होते आणि सी.एस. करणार हे अकरावीमध्येच कळले होते; त्याचे कारण माझे नियोजन खूप सुबद्ध होते आणि ध्येय खूप उत्तुंग होते आणि त्याच्याकडे मी खूप आधीपासून वाटचाल सुरू केली होती, असे लिहिण्याचा मला खूप मोह होतो आहे. पण प्रत्यक्षात तसे काही नव्हते. खरी गोष्ट अशी आहे की आठवी-नववीतच माझ्या गणितातले भ्रमांचे भोपळे फुटायला लागले (म्हणजे उत्तर पत्रिकेवर भोपळ्यांची संख्या लक्षणीय असायची) आणि पट्टीच्या साहाय्यानेसुद्धा एक सरळ रेष काढताना नाकी नऊ यायचे. त्यामुळे गणिताची गरज असणारे इंजीनियरिंग आम्ही आयुष्यातून वजा केले.

एका अनोळखी प्रदेशात

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 26/09/2015 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास चार वाजता एस. टी. भेटली. मधल्या शिटावर बसुन माझा प्रवास सुरू झाला. खिडकीतुन बाहेर बघत बसलो. कंटाळा आला. हेडफोन कानात घालुन मस्त ताणुन दिली. "फुल मांगुना बहार मांगु......" वाह! काय मस्त गाणं आहे अगदी तिनचं गायल्यासारखं. गाडीने वेग घेतला. हायवेवरचा वेग. तुफान. तासाभरानं एक गाव आलं. तिथ उतरायचचं होतं. कसलं हे गाव 'थिरडी'. अजुन इथनं आठ-दहा किलोमीटर लांब होतं म्हणे. एकतर संध्याकाळची वेळ. तिथं काही खायला भेटणं अवघडचं. एका गाड्यावर भुर्जी-पाव हाणली, डब्बल. एक पार्सल पण घेतली. मग टमटमनं निघालो 'थिरडी' कडं. महामार्गापासुन आत जाणारा गावठी रस्ता आता सुरु झाला.