मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

युगांतर - आरंभ अंताचा भाग १५

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राजमाता..... अशक्य आहे हे!" "तु ही जाणतोस हे किती गरजेचे आहे." भीष्माचार्य काहीच बोलेनात. "तुझ्या प्रतिज्ञेनुसार तू हस्तिनापूर राजगादीच रक्षण करणार आहेस. हो ना?" "होय राजमाता. शब्द आहे माझा." "पण कसे भीष्म? हस्तिनापुरची राजगादी अशी रिक्त ठेवून?"' "राजमाता...." "राजवंश संपला तर राज्य विखरून जाईल. चालून येणाऱ्या शत्रूला कळले, की राजगादीला कोणी वारस नाही, ती रिकामी आहे, तर शत्रूपुढे हे हस्तिनापुर किती काळ टिकेल? सैन्य एका राजाची आज्ञा ऐकते भीष्मा. प्रजा देखील. राजघराण्याची आज्ञा नाही. ऱाजा नसेल तर कसली राजगादी आणि कसली त्या राजगादीला सांभाळण्याची प्रतिज्ञा?

शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या काळातील झालेल्या शिक्षा किंवा चुकांबद्दल झालेली कान उघाडणी

srahul ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या काळातील झालेल्या शिक्षा किंवा चुकांबद्दल झालेली कान उघाडणी १)बाबाजी भिकाजी गुजर (आपण सारे त्याला इतिहासात “रांझ्याचा पाटील” म्हणून ओळखतो.) , विवाहीत स्त्री सह “बदअमल” केला म्हणून कोपरा पासून दोन्ही हात तोडले , गुडघ्या पासून दोन्ही पाय तोडले. “चौरंग “ केला...ही शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली तेव्हा त्यांचे वय अवघे १६ वर्षांच्या आसपास होते. २) छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान अथवा पंतप्रधान (पेशवे) शामराजपंत निळकंठ पद्मनाभी उर्फ रांझेकर यांनी एका प्रकरणात एकाचे कुलकर्णी पद जबरदस्तीने (आपल्या अधिकाराचा गैर वापर करून) आपल्या नावावर करून घेतले.

वाईच्या कृष्णाबाई उत्सवाची माहीती कायप्पावरुन साभार

जालिम लोशन ·
उत्सव बालपणीचा मीरा फाटक माझे बालपण वाईमध्ये गेले. वाई हे कृष्णाकाठी वसलेले तालुक्याचं गाव. गाव लहान असले तरी जुने आणि इतिहास असलेले. शाळेत ’माझे गाव’ निबंध लिहिताना कृष्णा नदी, नदीवरील घाट यांचा उल्लेख यायलाच पाहिजे असा बाईंचा आग्रह असायचा. पण तो का यायला पाहिजे हे मात्र खूप उशिरा कळले. मी जेव्हा प्रथम पुण्याला गेले आणि तिथली घाटाशिवाय ओकीबोकी दिसणारी नदी पाहिली तेव्हा कसेतरीच वाटले. मग कळाले, बहुतेक नद्यांना घाट नसतातच! म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप! पण फक्त घाट हेच काही आमच्या कृष्णेचे वैशिष्ट्य नाही, आणखीही काही आहेत.

युगांतर - आरंभ अंताचा भाग ४ व ५

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुर्वेला लाली शिंपडत पहाट हरित तृणांवर दवाचा वर्षाव करू लागली. पक्षांनी किलबिलाट सुरु केला आणि हस्तिनापुर नगराला जाग आली. महालात दास-दासींचा वावर चालू झाला. महाराज दास महराजांच्या कक्षेत फलाहार घेऊन गेला. पण महाराज तिथे होतेच कुठे? संपूर्ण रात्र अस्वस्थपणामुळे जागा राहिलेला शंतनू. तिचे रूप, डोळे, लाघवी हास्य त्याला बोलवत होते. तो तरी कसा थांबवू शकणार होता स्वतःला? शंतनूचा रथ नदीतटावर थांबला. सुर्यदेव अंबरात पसरलेल्या लाल रंगावर केशरी-पिवळ्या रंगाचे लेपन करत होते. नदी प्रवाहात त्याचे पडणारे प्रतिबिंब, हवेतला आल्हाददायक गारवा, अंबरातली केशरी रंगाची उधळण....

युगांतर - आरंभ अंताचा! भाग २ व ३

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वशिष्ठ मुनींच्या आश्रमात एकच गोंधळ माजला होता. त्यांची आवडती गाय नंदिनी नेहमीच्या स्थानी दिसत नसल्याने ऋषीमुनी हैराण झाले होते. रानात, डोंगरावर, नदीकाठी, झाडाजवळ, सर्वत्र परिचित ठिकाणी शोधणे व्यर्थ ठरले. नंदीनी कुठेच नव्हती. वशिष्ठ ऋषींच्या मनात कोलाहल माजला. शेवटी ते ध्यान लाऊन बसले. आपली दिव्य-दृष्टी जागी करत त्यांनी नंदिनीला शोधायला सुरवात केली... क्षणातच त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. नंदिनी हरवली नव्हतीच! वशिष्ठ ऋषींच गोधन खुद्द प्रभास नामक एका वसूनेच पळवून नेलं होतं. एव्हडच नव्हे!

युगांतर- आरंभ अंताचा!

मृणालिनी ·
अशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा! युगांतर- आरंभ अंताचा! महाभारत! ही कथा नक्की कोणाची? सत्यवतीच्या सिंहासन लालसेची ? की भीष्माचार्यांच्या महान प्रतिज्ञेची? शाप- उ:शापांची? की वरदानाची? धर्माच्या विजयाची? की अधर्माच्या पतनाची? ऱक्ताने माखलेल्या कुरुक्षेत्राची? की इंद्रप्रस्थाच्या अस्तित्वाची? ज्याने अगणित घावांतून रक्तधारांची वृष्टी.... भूमीवर होत असतानाही, पराक्रमांची पराकाष्ठा करत, रण गाजवलं त्याची?

मुत्सद्दी क्रांतिकारी - रंगो बापूजी गुप्ते

bhagwatblog ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या सर्वस्वाची आहूती दिली पण काळ ओघात त्यांची स्मृती इतिहासाच्या पटलावरून काहीशी पुसून गेली. अनेकांचे कार्य हे चमकत्या हिऱ्या प्रमाणे होते पण इतिहासाच्या पुस्तका मध्ये त्यांच्या स्मृती हरवून गेल्या आहेत. मी खूप दिवसापूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकातील प्रमुख ऐतिहासिक व्यक्तिरेखेचे नाव होते "रंगो बापूजी गुप्ते". पुस्तक वाचल्या नंतर त्यांच्या पासून मी खूपच प्रभावित झालो. स्वातंत्र्याच्या यज्ञात असंख्य व्यक्तींनी तण, मन आणि धनाने स्वत:ची आहूती दिली.

प्रेम कोडगे घेऊन फिरलो

खिलजि ·
लेखनविषय:
पुन्हा तेच अगम्य कोडे प्रेम कोडगे घेऊन फिरलो कुठे कुठे शोधले तुला सखे ? वैतागून हळूच पिवळा झालो तू नाही भेटली तरीही शोधली तुला अर्धांगिनीत भेट अधुरीच राहिली आपुली , शोधून पुरता अर्धा झालो अर्थ अनर्थ घेऊनि सारे गहिवर आला स्वप्नाचा माळ फुलांची सुकून गेली तरीही सुवास दरवळे प्रेमाचा {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

(काय करून आलो)

नाखु ·
वाचायला(च) गेलो, लिहून काय आलो? आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाजळून आलो .. ना अर्थ आशयाचा बोली.. लावून आलो . कावलेल्या समयी भडास काढून आलो .. होते कोण न कोण बघतोच मी कशाला ? बिना वातीचेच (मुद्दाम) कंदील लावून आलो ? धागे जरी भिकार डोके फिरवून आलो.. जाऊ मुळी न देता संधी साधून आलो . (जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)

जर्नी इस द रिवॉर्ड

महासंग्राम ·
लेखनप्रकार
जगातले काही शोध असे आहेत, ज्यामध्ये पूर्ण समाजाला बदलूंन टाकायची शक्ती असते. कम्प्युटरचा शोध या महत्वाच्या शोधांपैकीच एक. कम्प्युटर जेव्हा प्राथमिक अवस्थेत होते तेव्हा कोणी विचारही केला नसेल, कि येत्या काही दशकांत तुम्ही घरबसल्या दुसऱ्या खंडातल्या लोकांशी संवाद साधू शकाल, खिशात १००० गाणी ठेवून फिरू शकाल. खरं तर तेव्हा अशी कोणी कल्पना असती तर त्याला अगदी वेड्यात काढलं असतं, पण म्हणतात ना वेडी माणसंच इतिहास घडवू शकतात.