युगांतर - आरंभ अंताचा भाग १५
राजमाता..... अशक्य आहे हे!"
"तु ही जाणतोस हे किती गरजेचे आहे."
भीष्माचार्य काहीच बोलेनात.
"तुझ्या प्रतिज्ञेनुसार तू हस्तिनापूर राजगादीच रक्षण करणार आहेस. हो ना?"
"होय राजमाता. शब्द आहे माझा."
"पण कसे भीष्म? हस्तिनापुरची राजगादी अशी रिक्त ठेवून?"'
"राजमाता...."
"राजवंश संपला तर राज्य विखरून जाईल. चालून येणाऱ्या शत्रूला कळले, की राजगादीला कोणी वारस नाही, ती रिकामी आहे, तर शत्रूपुढे हे हस्तिनापुर किती काळ टिकेल? सैन्य एका राजाची आज्ञा ऐकते भीष्मा. प्रजा देखील. राजघराण्याची आज्ञा नाही. ऱाजा नसेल तर कसली राजगादी आणि कसली त्या राजगादीला सांभाळण्याची प्रतिज्ञा?
मिसळपाव