मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

आमार कोलकाता - भाग २

अनिंद्य ·
लेखनप्रकार
लेखमालेचा पहिला भाग येथे वाचता येईल :- http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुरशहा जफर, मंगल पांडे..... ही मंडळी म्हणजे १८५७ सालच्या उठावाचे नायक! इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा एत्तद्देशीयांनी एकत्र येऊन केलेला हा जोरकस-जबर प्रयत्न १८५७ साली झाला हे आपल्यापैकी बहुतेकांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. पण त्याआधी बरोबर १०० वर्षे म्हणजे १७५७ साली एक फार महत्वाची लढाई बंगालच्या भूमीवर घडली, ती म्हणजे प्लासीची पहिली लढाई.

आमार कोलकाता - भाग १

अनिंद्य ·
लेखनप्रकार
प्रास्ताविक आणि मनोगत :- 'शेजाऱ्याचा डामाडुमा' ह्या मी लिहिलेल्या सुदीर्घ लेखमालिकेला मिपाकरांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या 'बोनेदी बारीर पूजो' ह्या लेखात मी कोलकात्यातील जुन्या जमीनदार कुटुंबातील दुर्गापूजेबद्दल लिहिले, त्यालाही भरभरून कौतुक मिळाले.

शिंडलर्स लिस्ट

प्रमोद मदाल ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
संध्याकाळच्या वेळी एका उच्चभ्रू वस्तीतून कर्फ्यू मोडून फिरणारी लांबलचक, चकचकीत अॅडलर लिमोझिन गाडी सरकारी अधिकाऱ्यांना ओळखीची झाली होती. एका अलिशान हॉटेल समोर येवून थांबताच दारावरचा पहारेकरी अभिवादन करत पुढे येतो. आपला महागडा ओव्हरकोट व्यव्यस्थित करत साधारण पस्तीशीतला, उंच देखणा तरुण गाडीतून उतरतो. कोटावरचे सोनेरी स्वस्तिक चिंन्ह हाताने ठीक करून आत जातो. नेहमीप्रमाणे महागडे मद्य मागवतो, जवळच बसलेल्या सैनिकी अधिकाऱ्याकडे त्याचे काहीतरी महत्वाचे काम असते. त्या कामासाठी वाट्टेल तेवढे पैसे द्यायला तो तयार होता.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३६

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कुटीच्या दाराची हालचाल झाली. विदूरने आत प्रवेश केला तसे कृपाचार्य आणि द्रोणाचार्यांचे त्याच्याकडे लक्ष गेले. "प्रणाम, आत येण्याची परवानगी आहे?" "प्रणाम विदुर. आज तुम्ही या द्रोणाचार्याच्या कुटीत?" द्रोणांनी आश्चर्याने विचारले. "मनात प्रश्न होते काही." "तुम्हाला प्रश्न पडलेत, विदुर? खुद्द धर्मात्म्यास?" "मनाला कश्याचे बंधन असते, गुरु द्रोण? एका निमिषात असंख्य प्रश्न पडतात त्याला.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३४

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"प्रणाम द्रोणाचार्य." "प्रणाम. काय झाले कृपाचार्य? तुम्ही अस्वस्थ का दिसत आहात अजूनही?" "तुम्ही पाहिलेत ना काय झाले ते." "हो. पण तुम्ही का चिंतेत आहात?" "का नसेन, द्रोणाचार्य?" "कारण तुम्हाला वाटलेली भिती सत्यात उतरली नाही." "म्हणजे?" "दुर्योधन स्पर्धेत विजयी झाला नाही, कुलगुरु. तुम्ही तर आनंदी असायला हवे. चिंतीत नाही." द्रोणाचार्य हसत म्हणाले.a "तुम्ही मला चुकीचे समजत आहात द्रोणाचार्य. दुर्योधनाचा पराजय हस्तिनापुरचा एक आधारस्तंभ इतर आधारस्तंभांपेक्षा कमकुवत असल्याचे द्योतक आहे..... आणि मी कुठे हस्तिनापुरापेक्षा वेगळा आहे, गुरुवर?

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३३

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
युगांतर - आरंभ अंताचा भाग ३३ "आवाज अनोळखी आहे हा विदुर. कोण आहे तो वीर जो द्वंद्व करण्यास आव्हान देऊ इच्छितो.... ते ही अर्जुनाला?" धृतराष्ट्राच्या अंधारलेल्या नेत्रांपुढे एक आशेचा किरण जागृत होत होता..... 'एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीने अर्जुनाला हरवलं की ही स्पर्धा बाद ठरवून वेगळ्या स्पर्धेचे आयोजन ! मग दुर्योधनच्या राज्याभिषेकात अडथळा नाही.' धृतराष्ट्राला त्या वीराबद्दल उत्सुकता लागून होती.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३२

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग ३२ "काय झाले गुरु द्रोण?" "कृपाचार्य, तुम्ही?" "इतक्या रात्री तुम्ही जागे का ?" काय उत्तर द्यावं हे न सुचल्याने द्रोणाचार्यांनीच प्रतिप्रश्न केला, "तुम्ही या प्रहराला इथे?" "एक निर्णय घेतला गेलाय आज राज्यसभेत.... त्यामुळे जरा अस्वस्थ आहे." "कसला निर्णय?" "होणारे महाराज ठरवणार आहेत येत्या सप्ताहामध्ये." "त्यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे, कृपाचार्य? ही तर आनंदाची बाब आहे." "ते सर्वांचे युद्धकौशल्यावर मापन करणार आहेत गुरुवर!" "ह्मम. मग कोण निवडला जाण्याची भिती वाटते आपणास?" "आपल्या पासून काहीच लपून नाही.

युगांतर- आरंभ अंताचा भाग ३१

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आकाश महालात सुर्यमहाराजांचे गमन-आगमन होत राहिले. ना दुर्योधन बदलला, ना भीम आणि दुर्योधनाचे वैर. होणाऱ्या भांडणात मध्ये पडून न्यायाचे अमृत ओतत दोघांना शांत करण्याचे काम नित्यनियमाने करणारा युधिष्ठिरही बदलला नाही, आणि काहीही झालं की भीष्माचार्यांच्या कुशीत शिरणारा अर्जुनही नाही..... ते ना महालात बदलले ना गुरुकुलात! आचार्य द्रोणांचा अश्वत्थामाप्रती असलेला स्नेह पराकोटीचा होता. अश्वत्थामाच्या कपाळावरचा मधोमध असलेला पांढरा शुभ्र हिऱ्याचा खडा पाहून तो शिवशंकरांचा तिसरा नेत्र असल्याचा भास होत असे. सगळेच त्याचा आदर करायचे. शेवटी गुरुपुत्र होता तो.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३०

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भीमाला शुद्ध आली तेव्हा तो नागलोकी होता तेही सैनिकांच्या पहाऱ्यात. "महाराज, हा आम्हाला सापडला तेव्हा मृच्छीत होता. गुप्तचर वगैरे असेल म्हणून याला रक्षक नागांनी दंश केला तर हा शुद्धीत आला." "दंश केल्यावर शुद्धीत आला?" "हो, महाराज." "याचा अर्थ त्याने आधीच विष प्राशन केले होते." "नाही, मी तर खीर खाल्ली होती." भीम म्हणाला. 'चेहऱ्यावरचे तेज पाहून तो कुणी सामान्य तर वाटत नाही.' नाग महाराजांनी भीमला विचारलं, "कोण आहेस तू?" "मी कुंतीपुत्र भीम. भीष्माचार्यांचा पौत्र." "कुंती? हस्तिनापुरातून आला आहेस?" "हो." नागमहाराजांनी भीमाला जवळ घेतलं. "आजोळी स्वागत आहे तुझं." "आजोळ?" "हो. मी तुझा मातामह आहे.

आसिंधू

मृणालिनी ·
लेखनविषय:
काव्यरस
स्वार्थापायी त्यांनी देशाचे केले तुकडे नशिबी भूमातेच्या लिहिले केवळ दुखडे मानाचा तो भगवा.... नि हक्काची भूमाता आसिंधू अखंड आमुचा, आरक्त जाहला होता काळ्या मातीच्या पायी लाली रक्ताची होती.... ते दृष्य शवांचे होते, ती जमीन केशरी होती.... ना धीर सोडला आम्ही, ना त्यांनी केली पर्वा कष्ट उपसले कोणी, कोणाची झाली चर्चा! मातीत रुजवला त्यांनी पुन्हा नव्याने मत्सर पानोपानी लिहिले असत्य अधर्मी अक्षर! ना रंग आता तो आहे, ना गंध तिथे मातीला! नापाक अधर्मी हेतू नि कपट असे साथीला हातात कटोरा तरीही, धमकवती दुसऱ्याला अणू रेणूस धमकावे जणू लांघून मर्यादेला.... @मधुरा #14August