मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

युगांतर - आरंभ अंताचा भाग २९

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"महामहीम, एक दु:खद वार्ता आहे...." "बोल." "महामहीम, वनातून संदेश आला आहे." काहीतरी अघटित घडलेले असल्याचा अंदाज आला आणि भीष्माचार्य आसनावर रोवून बसले. आणि दसा कडे पाहू लागले. "पंडुंचे देहावसान झाले." "पंडु....." जोरात किंचाळून शेजारी उभी असलेली अंबालिका कोसळली. 'पिताश्री, चित्रांगद, विचित्रवीर्य..... आणि आता पंडु? हृदयाच्या निकटचे आप्तजन! हस्तिनापुरा, पाहतो आहेस ना हा नियतीचा खेळ? माझा शिष्य..... पंडु! या भीष्माला 'तातश्री' म्हणून मनापासून आदर देणारा....हस्तिनापुरच्या सीमा विस्तारत नेणारा......

धुरंधर

खिलजि ·
लेखनविषय:
पेटता पेटता विझलो कधी माझे मलाच कळले नाही दिला होता शब्द खरा पण काय ते नीट आठवलेच नाही या स्मृतीला कोण जाणे कुणाचा विखारी दंश झाला जो तो ओळखीचा असूनही इथे मलाच परका झाला कोणता हात धरू मी ? कोणता सोडून देऊ ? या हातांच्या विळख्यातच माझा नक्की कोणता ? तोच कळेनासा झाला समजत होतो धुरंधर स्वतःला पण या हळव्या हृदयाने घात केला मेंदूने बरेच समजावून पहिले त्यास पण हळूहळू तोही त्या हृदयात गेला इथेच घेतली समाधी मनाने इथेच माझा अंत झाला हाच तो विखारी दंश होता ज्याने धुरंधर परागंदा झाला {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

रॉबिन विलियम्स

महासंग्राम ·
लेखनविषय:
२०१४ ची ती सकाळ काहीशी भकासच होती, हॉलिवूडच्या माझ्या अत्यंत आवडत्या नटांपैकी एक असणाऱ्या रॉबिन विलियम्सला घेऊन गेलेली ती सकाळ होती. हॉलिवूड चे चित्रपट पहायचं वेड लागलं त्या काळात पहिल्या काही चित्रपटांत त्याचा 'गुड मॉर्निंग व्हिएतनाम' होता. आर्म्ड फोर्सेस रेडिओ मध्ये RJ म्हणून काम करणारा तो Goooooooood morning Vietnam! म्हणत सगळ्यांचा मूड फ्रेश करण्याची पद्धत जाम आवडून गेली होती. लगे रहो मुन्नाभाई मध्ये विद्या बालन ने ती हुबेहूब कॉपी केलीये.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग २६

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
युगांतर-आरंभ आंताचा! भाग २६ कंसाने आकाशाकडे बघत हातातला सोमरसाचा प्याला नाचवला. "बोल.... बोल आता.... तुझा मृत्यू जन्म घेतोय म्हणून....." जोरजोरात हसला , " या स्वतःच्या हाताने मृत्यूलाच मृत्यु देणारा एकमेव आहे हा कंस! सातही पुत्र यमसदनी धाडलेत मी. आणि आता आठव्यासाठी प्रतीक्षा कर." "महाराज, एक प्रश्न आहे...." "राजमंत्री.... काय विचारायचं आहे? आणि कोणाला ? याला?" कंसाने आभाळाकडे बोट दाखवत विचारलं. "नाही महाराज... तुम्हाला." "मग ठिक आहे. कारण तो प्रश्नांची उत्तरं नसतो देत." कंसाला नशा चढली होती. "महाराज, आठव्या पुत्रापासून भिती होती. मग आधीचे पुत्र का....?" कंसाने त्याच्या कडे पाहिलं.

युगांतर - आरंभ अंताचा भाग 23

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
युगांतर-आरंभ अंताचा भाग २३ हस्तिनापुरात आनंदाचे ढोल, नगारे वाजत होते. आपल्या अनूजाला पुत्र होणार ही वार्ता कळल्यावर धृतराष्ट्राने मिष्टान्न वाटले. सर्व नगरीत अन्न-वस्त्र वाटून भीष्मांनी पंडुकडेही मिष्टान्न पाठवले. "प्रणाम महाराज !" "शकुनी.... बोल." "महाराज, तुम्ही काय करताय हे?" "काय करताय म्हणजे? स्वागत करतोय! राजपरिवाराच्या नव्या सदस्याचे! आनंद साजरा करतोय मी शकुनी!" "पण कसला आनंद महाराज?" "अरे तू ऐकलं नाहीस? पंडुला पुत्रप्राप्ती....." "ते ऐकलं महाराज. म्हणूनच आश्चर्य वाटते आहे तुमच्या वागण्याचे!" "पण का? त्यात आश्चर्य वाटण्यासारखे आहे तरी काय?" "महाराज तुम्ही विसरता आहात.

सेकशन ३७० आणि संस्थानिकांचा तनखा काहि प्रश्न

हस्तर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वरवर पाहता दोनही वेगळे विषय ,एक तर देशभक्ती शी निगडित पण साम्य पण बरेच आहेत भारत स्वतन्त्र झाला तेव्हा ह्या दोन्ही अतिरिक्त सोयी मंजूर केल्या तनखा पण एकदा रद्दबातल करायचे विधेयक नामंजूर झाले पण नंतर मंजूर केले ३७० तर बऱ्याच वेळा चर्चा झाली आज गेले संस्थानिकांना तनखा मंजूर केला कारण त्यांनी संस्थाने विलीन केली व फक्त तिजोरीवर ओझे म्हणून रद्द केला केला माननीय इंदिराजी ह्यांकडून ह्या निमित्ताने पडलेले काही प्रश्न १) ज्या संस्थानिकांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला त्यांना पण तनखा का दिला जात होता ?

मितान्नीच्या राजवाड्याचा शोध ?

माहितगार ·
लेखनविषय:
मितान्नी साम्राज्य! कपोलकल्पित नव्हे तर पुरातत्वीय आधार असलेला इतिहास. काही वैदीक देवतांची नावे आणि काही संस्कृतशब्द थेट मध्यपुर्वेत आणि तेही ईस्वीपुर्व १५०० ते ईस्वीपुर्व १४०० च्या काळात, आजपासून सुमारे साडेतीन हजार वर्षांपुर्वी. मितान्नीच्या सम्राटांनी तो फारसा जतन नाही केला पण त्यांचा पत्रव्यवहार इजिप्त सहीत आजूबाजूच्या प्रतिस्पर्धी राजवटीतून सापडलेला. क्ले टेब्लेट म्हणजे मातीच्या पाटीवरील तेथील तत्कालीन भाषेतील क्युनीफोर्म लिपी स्वरुपात. हे राजे दुचाकी रथ म्हणजे आपण टांगा म्हणतो त्या प्रकाराचा युद्धोपयोगात प्रवीण असावेत.

युगांतर - आरंभ अंताचा भाग १९

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १९ हस्तिनापुरात पंडु स्वयंवर जिंकून कुंती सोबत आला. गुलाबपाकळ्यांच्या वर्षावात महालात त्यांनी प्रवेश केला. "तातश्री!" "महाराज पंडु! स्वागत आहे महाराणी कुंती" पंडु आणि कुंतीने भीष्मांना नमस्कार केला. "अनुज..." हास्य मुखाने धृतराष्ट्र आवाजाच्या दिशेने येत होता. पंडूने जाऊन त्याला मिठी मारली. "मला खात्री होती. तु स्वयंवर जिंकणार!" कुंतीने पुढे जाऊन नमस्कार केला. "आयुष्यमान भवं!" मागून गांधारी पुढे आली. "महाराज, तुमची भ्रातृजाया.... गांधारनरेश यांच्या कन्या, गांधारी." भीष्मांनी परिचय करून दिला. पंडुला आनंद झाला. पण गांधारीच्या डोळ्यांवरची पट्टी पाहून त्याला आश्चर्य वाटलं.

बॉलिवूडचे बाप

महासंग्राम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये अनेक नाती दाखवतात. मुलगा-आई यांच्या नात्यावर भरमसाठ चित्रपटात भाष्य केलंय, पण वडील -मुलगा/मुलगी यांचे नातं हळुवारपणे उलगडणारं चित्रपट फार कमी आहेत पण ज्या काही चित्रपटात हे नातं दाखवलं आहे ते अत्यंत तरल असं आहे. त्यापैकीच बाप-लेकाचं नातं उलगडणारे काही चित्रपट इथे देतोय मिपाकर अजून भर घालतीलच. १. गर्दीश (अमरीश पुरी- जॅकी श्रॉफ) प्रसिद्ध सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर गर्दीश ला हातातून निसटत जाणाऱ्या स्वप्नांची गोष्ट म्हणतो, अगदी खरय ते. गर्दीश माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे, ते यात दाखवलेल्या वडील आणि मुलाच्या हळुवार नात्यामुळे.

युगांतर आरंभ अंताचा! भाग १७

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
निपुत्रिक कुंतीभोजला शुरसेनाची दत्तक मिळालेली कन्या एक वरदानच होतं. तिच्या साऱ्या इच्छा पुर्ण करत, संस्कारांचे बाळकडूही तिला त्याने दिले होते. कुंती भोज राजाची लाडकी कन्या म्हणून त्याच्याच नावावरून सगळे तिला कुंती म्हणू लागले. राजमहालात खेळत बागडत ती मोठी होऊ लागली. एके दिवशी राजा कुंतीभोज चिंतेत बसलेले तिने पाहिले. "काय झालं पिताश्री?" "काही नाही, कुंती. अगं दुर्वासा ऋषींकरता एक सेवक पाठवयचा आहे." "का?" "ते तपश्चर्येला बसणार आहेत." "मग त्यात काय चिंताकारक आहे? पाठवून द्या." "त्यांनी तुझ्या करता विचारले आहे." "मी जाईन की मग." "खरचं जाशील? त्यांच्या कुटीत?