Skip to main content

इतिहास

"तू " अधिक " मी " किती ?

खिलजि यांनी या दिवशी प्रकाशित केले.
किती सोपा प्रश्न होता माझा "तू " अधिक " मी " किती ? तू उत्तर दिलेस "दोन" अंतर्मुख होऊनि शोधू लागलो आपण आहोत तरी कोण ? मला अपेक्षीत “एक " होते आपल्यात मुळी अंतरच नव्हते दोन देण्यामागे कारण काय होते? जर तू माझ्यात होतीस मग मी तुझ्यात का नव्हतो ? आणि मी तुझ्यात नव्हतो तर मी कुठे होतो ? गणित सोपे जरी वाटले दुरून अवघड झाले उत्तरावरून का दिलेस तू विचित्र उत्तर ? कुढत गेलो पुढे निरंतर जवळ घेतला मद्याचा प्याला शोधत गेलो मला स्वतःला {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

एक पुस्तक जगताना - 'कसाब आणि मी'

सटकाजी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक परिचय नाव : कसाब आणि मी लेखक : रमेश महाले (मुख्य तपास अधिकारी ) प्रकाशक : मेनका प्रकाशन Book_Cover समुद्रामार्गे मुंबईत मच्छिमार नगराजवळ 'ते' दहाजण उतरले आणि पुढचे साठ तास मुंबई रक्ताच्या थारोळ्यात न्हाऊन निघाली. संपूर्ण देश श्वास रोखून टीव्हीसमोर स्तब्ध उभा होता. नेमके किती अतिरेकी मुंबईत घुसलेत? कुठे कुठे हल्ले सुरु आहेत?

पहिले महायुद्ध, प्रकरण दुसरे, भाग २ बेल्जियमवरचा बलात्कार

आदित्य कोरडे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पहिले महायुद्ध, प्रकरण दुसरे, भाग २ बेल्जियमवरचा बलात्कार मागील भागात आपण श्लीफेन योजना आणि त्याद्वारे जर्मनीने बेल्जियमवर हल्ला का केला हे पहिले. आता आपण ह्या भागात बेल्जियमचा लढा आणि पुढे काय झाले ते पाहूयात Simple, Free Image and File Hosting at MediaFire तर ४ ऑगस्ट १९१४रोजी जर्मन सैन्याने बेल्जियमची हद्द ओलांडली.

सिंहगडाची अखेरची लढाई (भाग २)

मनो यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१८१७ सालच्या दसऱ्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. खडकी, येरवड्याच्या लढाईनंतर इंग्रजांनी पुणे घेतले, पण बाजीरावाने आपला खजिना आणि मौल्यवान वस्तू आधीच सिंहगड आणि रायगडावर हलवल्या होत्या. त्यामुळे २० फेब्रुवारी १८१८ या दिवशी साताऱ्याहून ब्रिटिश फौज सिंहगडच्या परिसरात पोचली. या फौजेने कुठे तोफा चढवल्या होत्या त्याचा एक नकाशा लढाईनंतर एका वर्षातच कर्नल व्हॅलेंटाईन ब्लॅकर याने एका पुस्तकात प्रकाशित केला.

सिंहगड

मनो यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागच्या चार-पाच वर्षात बऱ्याचदा असं वाटलं की सिंहगडाबद्दल लिहायला हवं. जुने कागद हुडकताना भरपूर नवे काही या गडाबद्दल सापडते, त्यातले जे काही अजूनही आठवते ते इकडे एक लेखात मांडतो आहे. लेख आवडला असेल तर प्रतिक्रियेत जरूर कळवा. पुढचा भाग - सिंहगडाची अखेरची लढाई आणि त्यानंतर ब्रिटिश काळातील एक अप्रकाशित जाहिरात टाकेन, जर उत्सुकता असेल तर ... सिंहगड म्हणले म्हणजे प्रथम आठवतात तानाजी मालुसरे आणि त्यांनी गाजवलेला पराक्रम. इथे अनेकदा शशिकांत ओक आणि इतरांनी त्याबद्दल लिहिण्याचा आग्रह केला होता, पण दुर्दैवाने तानाजीच्या पराक्रमाबद्दल फार थोडे अस्सल तपशील आपल्यापर्यंत पोहोचले आहेत.

एकच प्याला !!!

किल्लेदार यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
एकदा वाचण्यात आलं होतं की तुमचा आवडता मद्याचा प्याला तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडेफार सांगू शकतो... आणि मला एक जुना किस्सा आठवला. मित्राला खोकला झाला म्हणून त्याला घेऊन एकदा ब्रँडी आणायला वाईनशॉप मध्ये गेलो होतो. काउंटरवर ब्रँडी मागतांना, खुद्द गांधींनी केली नसती एवढी याची चुळबुळ चाललेली. बाटली घेऊन पैसे चुकते केल्यावर चेहऱ्यावर जमेल तितकी अजीजी आणून "हमे नशा नही करना है, दवा के लिये ले रहे है" असा डायलॉग जेव्हा त्याने दुकानदाराला मारला, तेव्हा मी मात्र स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. तस्मात...ब्रँडी हे जरा पापभिरू लोकांचं मद्य असावं.

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला?

shantanu Paranjpe यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Shivaji Maharaj रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला!

अच्छे चाचा कच्चे चाचा

सुधीर मुतालीक यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... " तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.

पहिले महायुद्ध! प्रकरण २ भाग १-बेल्जियमवरचा बलात्कार आणि श्लिफेन योजनेची अपरिहार्यता.

आदित्य कोरडे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पहिल्या महायुद्धाला तोंड कसे लागले ह्याचा संक्षिप्त इतिहास आपण पहिल्या प्रकरणात पहिला . ह्या युद्धात सगळ्यात आधी बळी गेले ते बेल्जियम हे चिमुकले राष्ट्र. ह्या बेल्जियम च्या तटस्थ राहण्याच्या हक्कावरूनच- त्या हक्काच्या जर्मनीने केलेल्या पायमल्लीमुळे हे युद्ध युरोपातील देशात लढले गेलेले एक छोटे मोठे युद्ध न राहता ते जागतिक महायुद्ध बनले. पहिले महायुद्ध प्रकरण दुसरे, भाग १ बेल्जियमवरचा बलात्कार आणि श्लिफेन योजनेची अपरिहार्यता. इतिहास काळात बेल्जियमचा भूभाग रोमन साम्राज्यात मोडत असे. त्यापूर्वी त्या भागाला गॉल असे संबोधले जाई.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

चित्रगुप्त यांनी या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.