"तू " अधिक " मी " किती ?
लेखनविषय:
किती सोपा प्रश्न होता माझा
"तू " अधिक " मी " किती ?
तू उत्तर दिलेस "दोन"
अंतर्मुख होऊनि शोधू लागलो
आपण आहोत तरी कोण ?
मला अपेक्षीत “एक " होते
आपल्यात मुळी अंतरच नव्हते
दोन देण्यामागे कारण काय होते?
जर तू माझ्यात होतीस
मग मी तुझ्यात का नव्हतो ?
आणि मी तुझ्यात नव्हतो
तर मी कुठे होतो ?
गणित सोपे जरी वाटले दुरून
अवघड झाले उत्तरावरून
का दिलेस तू विचित्र उत्तर ?
कुढत गेलो पुढे निरंतर
जवळ घेतला मद्याचा प्याला
शोधत गेलो मला स्वतःला
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
मिसळपाव
समुद्रामार्गे मुंबईत मच्छिमार नगराजवळ 'ते' दहाजण उतरले आणि पुढचे साठ तास मुंबई रक्ताच्या थारोळ्यात न्हाऊन निघाली. संपूर्ण देश श्वास रोखून टीव्हीसमोर स्तब्ध उभा होता. नेमके किती अतिरेकी मुंबईत घुसलेत? कुठे कुठे हल्ले सुरु आहेत?
रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला!