बोटावर शाईचा अजून रंग ओला
बोटावर शाईचा अजून रंग ओला
माझ्या पाठी त्याच आधी खंजीर तू खूपसला
दाविलेस डोळ्यांना स्वप्न एक भगवे
दारोदारी फिरशी आता लाज सोडून नागवे
नकळत तव द्वेष गाड्या जागृत मम झाला
विश्वासून तुझीयावर मते तूला दिली
राम भरत जोडी ही क्षणार्धात तुटली
कालियूगीन भरत कसा सत्तातूर झाला
आई भवानी रडली अन, शिवराय व्यथित झाले
नाव त्यांचे आज पार धुळीला मिळाले
आज तुझ्या कृत्याने जीव धन्य झाला
पैजारबुवा,
मिसळपाव
पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पंतप्रधान झालेच नसते तर? (पूर्वप्रकाशन “’मैफल’ ई-दिवाळी अंक-परिसंवाद)
लेखक: सुधीर काळे
भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान भारताचे सर्वात निकृष्ट पंतप्रधान?
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हां मी ५ वर्षाचा होतो. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळच्या पहिल्या १० वर्षांच्या खेळ व शाळेच्या अभ्यासाखेरीजच्या कुठल्याच घटना मला आठवत नाहींत. मला साधारणपणे १९५६-५७ पासूनच्या आठवणी आहेत.
चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता.
जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले.