Skip to main content

इतिहास

मकरसंक्रांतीच्या दिवशी सुचलेली एक कविता.....

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 15/01/2011 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली आली.... मकरसंक्रांत आली!... भोगीच्या दुसर्‍या दिवशी, किंक्रान्तीच्या आदल्या दिवशी... संक्रान्त आली! संक्रान्तीला फुलतो काटेरी हलवा! आसपासच्या बायकांना हळदीकुन्कवाला बोलवा.... हळदीकुंकू म्हटलं, की आठवते- काळ्यांची आशा आणि कुबलांची अलका... स्त्री-मुक्तीची चळवळ पूर्वी त्यांच्यापर्यंत कधी पोचलीच नाही का? :-? पण जेव्हा पोचली, तेव्हा मात्र खूपच उत्तेजित झाली अलका कुबल! उतरत्या वयातही नवर्‍याच्या कृपेने झाली ती- कडक चाय- "रेड लेबल" रेड वरून आठवलं "कलमाडी हाऊस" आणि झालं कॉमनवेल्थ बदनाम! "जितम्"जितम्" केलं दादांनी, कधी नव्हे तो कपाळावरच्या आठीला पडला आराम!

आमंत्रण सहलीचं

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 14/01/2011 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपावर आल्यानंतर काही दिवसातच माझ्या भुलेश्वरच्या सहलीचा व्रुतांत इथे टाकला होता, त्यावर ब-याच प्रतिसाद्कांनी या ठिकाणी जाण्यांत इंटरेस्ट दाखवला होता. काही मिपाकरां बरोबर खव मधुन चर्चा झाली होती, आज श्री. गणेशा बरोबर बोलुन १६.०१. २०११ रविवार रोजी सकाळी भुलेश्वरला जायचं ठरलं आहे. काही मिपाकरांना खव व व्यनितुन कळवलं आहे, तरी ही नविन मित्र मॅत्रिणि जोडायची हॉस भारी म्हणुन खुलं आमंत्रण देतो आहे. साधारण प्लॅन असा आहे, १६.०१.२०११ ला सकाळी पुण्यातुन १०च्या सुमारास निघुन भुलेश्वर येथे जाणे , अर्थात जाताना वाटेत काहीतरी खाणं होईलच.

व्याख्याच व्याख्या

लेखक स्पा यांनी मंगळवार, 11/01/2011 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का? अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर

दादाजीपंतांनी सिऊबास शहाणे केले

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 04/01/2011 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, लोकप्रभातील श्री. पांडूरंग बलकवडे यांचा खालील लेख जरूर वाचावा आणि इतरांस वाचण्यास प्रवृत्त करावे. ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजींनी जिजाऊंचा मातोश्री असा उल्लेख करून चोख उत्तर दिले आहे. लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! आपल्या पुढार्‍यांइतकी नीच माणसे या पृथ्वितलावर सापडणे नाही. जयंत कुलकर्णी.

स्वयंभू राजें शिवछत्रपतींना गुरुची गरजच नव्ह्ती.......

लेखक अमोल देशमुख यांनी शुक्रवार, 24/12/2010 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते, गेल्या हजार वर्षात असा राजा झाला नाही, पुढे होणार नाही, त्यांच्या गुरुविषयी आपण का बोलावे, त्यांचे व्य्क्तीमत्वच ईतके उत्तुंग होते की आपले विचारही त्यां उंचीर्यंत पोहोचत नाहीत, मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल, महाराष्ट्रातले काही लोक म्हणतात हे त्यांचे गुरु होते, काहींचे म्हणने आहे ते नाही हे होते, उगाच वाद वाढतो आहे, त्या वादाचे आता राजकारण होत आहे.

नायकिणीचा नाच

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 19/12/2010 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावच्या जत्रेच्या आदल्या रात्री ग्रामदैवताच्या अश्वाची सवाद्य मिरवणूक असते. रात्रभर ती गावाच्या चौकाचौकात रेंगाळून पहाटेच्या सुमारास देवाच्या डोंगरावर न्यायची असा प्रघात पडलेला किँवा पाडलेला आहे. या मिरवणूकीचे पूर्वीचे वैशिष्ट्य म्हणजे सोंगाच्या गाड्या असत. सुतारनेटावरची पुरुषमंडळी व पोरं विविध पौराणिक देखावे प्रत्यक्ष संवादातून, हुबेहूब वेशभुषेसह सादर करीत. ते पाहण्यासाठी अबालवृद्धांची रस्त्याकडेला गर्दी उसळायची. परंतु आता जमाना बदललाय... सोंगाच्या गाड्या कालबाह्य झाल्यात. त्यांच्या जागी नाचणाऱ्‍या नायकिणी आल्यात.