Skip to main content

इतिहास

भारतीय इतिहाससंशोधनाची सुरस कथा

लेखक ईश आपटे यांनी सोमवार, 28/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
थंडीचे दिवस होते.. तुम्हाला माहिती आहेच पुण्यातील थंडी कशी बोचरी असते ते...पण आता जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे तो थोडा ह्यापेक्षा ही अधिक बोचरा आहे... माझे प्रेरणास्थान व महान इतिहाससंशोधक व विचारवंत एम.आर.गुप्ता पुणेभेटीला आले होते. मी एम.ए. केल्यापासून मी त्यांचे विचार वाचत आहे...अगदी शास्त्रीय लेखन , भारताच्या इतिहासालेखनाला त्यांनी आपल्या नवीन दृष्टीने वेगळीच कलाटणी दिली... अर्थात तशी कलाटणी गेल्या शंभर वर्षापासूनच मिळाली आहे म्हणा..मॅक्सम्युल्लरने जे एकदा नियम ठरवले...ते आजतागायत अबाधित आहेत..(टिळक त्याला मोक्षमुल्लर म्हणत असत.

बर्मा फ्रंटवरून........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 27/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, माझ्या मराठालाईट इन्फंट्रीच्या आभ्यासादरम्यान हे एका सैनिकाने त्याच्या प्रेयसीला लिहीलेले पत्र सापडले. त्याचे भाषांतर केले आहे. सैनिकांची मनस्थिती यात बरीच समजून येते. हे पत्र बर्माहून लिहीले आहे. प्रियतमे, पंख असते तर तू उडत येथे आली असतीस असे सारखे म्हणतेस, पण खरंच तुला येथे यायला आवडेल का ? तुला आवडेल की नाही हे मला माहीत नाही पण तू येथे आलेले मला आवडणार नाही हे निश्चित. येथे येण्यात धोके आहेत, नाही असे नाही, पण याही पलीकडे काही कारणे आहेत. धोके तर आमच्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत.

अंताजीची बखर - ऐतिहासिक महत्त्वाची ऐतिहासिक कादंबरी

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 24/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
‘मराठी ऐतिहासिक कादंबरी’ असं म्हटलं की काही ठराविक नावं समोर येतात. त्यांचा एक साचादेखील जवळपास ठरलेला असतो. एखादी ऐतिहासिक महत्त्वाची व्यक्ती किंवा घटना घ्यायची आणि अलंकृत (किंवा अगदी शब्दबंबाळ!) भाषेची खैरात करून त्या व्यक्ती/घटनेभोवती एक महिरप तयार करायची. मराठी मनाला पूज्य आणि अभिमानास्पद वाटतील अशा, म्हणजे मराठ्यांचं शौर्य वगैरे उदात्त गोष्टींची त्या कादंबरीत भलामण करायची. असं केलं म्हणजे मराठी लोक तिच्याविषयी भरभरून बोलतात.

हुतात्मा भगतसिंह आणि भयभीत इंग्रज सरकार

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 23/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक २३ मार्च १९३१ रोजी हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांनी लाहोर मध्यवर्ती कारागृहाच्या वधस्तंभावर तेजस्वी हौतात्म्य पत्करले. आज त्या हौतात्म्याचा ८० वा स्मरणदिन. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करणारे असंख्य क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी आपल्या ध्येयास्तव स्वत:ला वाहुन घेतले आणि ते हसत हसत फासावर चढले. या सर्व देशभक्त हुतात्म्यांचे शिरोमणी म्हणजे हुतात्मा भगतसिंह.

नीलकांत यांचा आज वाढदिवस

लेखक इंटरनेटस्नेही यांनी मंगळवार, 22/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, आज आपल्या मिसळपाव या बेव साईटचे मालक श्री. नीलकांत यांचा आज (२२ मार्च) वाढदिवस आहे! सुरुवातीस मिपाची तांत्रिक बाजु भक्कमपणे सांभाळणारे नीलकांत, अनेक महिन्यांपासुन मिसळपाव.कॉम चा एवढा प्रचंड डोलारा एकहाती समर्थपणे चालवत आहेत. काळाबरोबर अतिशय वेगाने बदलत्या तांत्रिक आणि अन्य आव्हानांच्या आजच्या घडीला नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही. नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- २)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 16/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- १) दुसरे कोकण...पण अशांत! आसामात मोरीगावातल्या मिंटुरंजन डेका या मित्राच्या घरी जाण्याचा योग काही वर्षांपूवीर् आला. मुख्यत: बांबूचा वापर केलेलं दुमजली घर. गंमत म्हणून घराच्या वरच्या मजल्यावर गेलो. तिथे बरीचशी अडगळ व एक छोटेखानी बोट दिसली. ब्रह्मापुत्रा सहा किलोमीटर अंतरावर असताना घरात ही नौका कशाला, असा प्रश्न मला पडला. मित्रानं त्याचं उत्तर दिलं. पावसाळ्यात पूर आला की ब्रह्मापुत्रा नदी सैरभैर होते. तळमजला पाण्याखाली जातो, मग मुक्काम पहिल्या मजल्यावर.

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-२)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 02/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१) संगीतकार- दत्ताराम दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वाडकर. यांनी स्वतंत्रपणे सुमारे १९ चित्रपटांना संगीत दिले. शंकर जयकीशन यांचे सहकारी म्हणून त्यांनी प्रामुख्याने काम केले. श्रीमान सत्यवादी, अब दिल्ली दूर नही, परवरीश इद्यादी प्रमुख चित्रपट त्यांच्या खाती जमा होते. हिंदी सिनेमातील संगीतात त्यांनी ठेक्यात (rhythms) नवनवीन प्रयोग केले.

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 02/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
(काही वर्षांपुर्वी एका कम्युनिटीवर हा लेख मी इंग्रजीत लिहीला होता. त्याचेच रुपांतर थोडा संपादित करून येथे ठेवत आहे.) ३-४ वर्षांपुर्वी विविध भारतीला ५० वर्षे पुर्ण झाली. त्यानिमीत्ताने जे विविध कार्यक्रम प्रसारीत व्हायचे त्यात "सुहाना सफर" नावाचा एक कार्यक्रम वर्षभर प्रसारीत व्हायचा. त्यात एकाच संगीतकाराची/संगीतकार जोडीची वाटचाल गाण्यासहीत प्रसारीत व्हायची.

हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांना आदरांजली

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 27/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आज हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांचा ८० वा हौतात्म्यदिवस. हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांच्या नंतरचे हिंदुस्थन प्रजासत्ताक समाजवादी सेनेचे सरसेनापती. प्रखर देशभक्त, धाडसी योद्धा, कुशल संघटक या बरोबरच नेता कसा आसावा याचे हुतात्मा चंद्रशेखर आजाद हे उत्कृष्ठा उदाहरण आहेत. एकदा देशकार्यात स्वत:ला झोकुन दिल्यानंतर कुठल्याही भावनांना थारा नाही हे त्यांनी वेळोवेळी आपल्या सहकार्‍यांना समजावलं. एकदा सहज हुतात्मा भगतसिंह त्यांना म्हणाले होते की त्यांनी त्यांच्या घरचा ठावटिकाणा द्यावा म्हणजे जर दुर्दैवाने वेळ आलीच तर इतर सहकारी त्यांच्या घरच्यांची वास्तपुस्त घेऊ शकतील.