Skip to main content

हे ठिकाण

बेसनलाडू समवेत मुंबई कट्टा

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/05/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत. येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे. तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा. समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.

विष्णूजी की रसोई...अनाहिता कट्टा वृत्तांत

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 07/04/2014 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : मधुमेह किंवा गोडाची एलर्जी असलेल्यांनी या शिकरण टाइप धाग्यापासून लांबच रहावे. कॉल्लिंग अनाहीतास ……… असे करून आमच्या इरोपस्थित मृणालिनी बाईनि त्या भारतवारीला येत आहेत तरी आपण सर्वंजणीनी भेटुन कट्टा करायचा आहे हो अशी दवंडी दिली अनाहिता मध्ये. मग काय… पोरगी माघारपणाला येत आहे (जरी नेरूळ सासर असले तरी) आमच्यासाठी तर माघारपणाला येत आहे म्हंटल्यावर आम्ही साऱ्या मुंबैकारणी स्वागताला हजरच. :dance: तर स्वागत हि शेवटी थोडे राजेशाही वाटायला हवे म्हणून " विष्णुजी कि रसोई, ओवळे नाका, ठाणे ठिक सकाळी ११ वाजता" येथे करण्याचे आयोजिले.

हर्षा भोगले यांचे IIM-Ahmadabad मधील भाषण

लेखक साधा मुलगा यांनी सोमवार, 07/04/2014 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा you tube वर फिरत असताना प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांचे IIM A मधील भाषण ऐकले. खरे तर पहिले मी या भाषणाचा एक तुकडा पाहिला. जो ‘talent Vs attitude’ अशा नावाने होता. तो पाहिल्यावर मला संपूर्ण भाषण बघण्याचा मोह आवरला नाही.हर्षा हे स्वतः या संस्थेचे विद्यार्थी होते. ते पट्टीचे वक्ते असल्याने त्यांनी अतिशय कौशल्याने हे भाषण फुलवले आहे. हे भाषण जुने म्हणजे ३० जुलै २००५ चे आहे. भाषणाचा विषय आहे, “achievers of excellence”.

नरसोबाची वाडी

लेखक जातवेद यांनी शनिवार, 05/04/2014 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
वांग्याच्या लेखावरून वाडीचा उल्लेख आला आणि आमचा पौर्णिमाक्रम आठवला. बरेच लोक वाडीला नरसोबाची वाडी म्हणतात पण इकडे सगळे नुस्त वाडीच म्हणतात. म्हैसूर डोसाला म्हैसूर मधे नुस्ताच डोसा म्हणतात त्यातला प्रकार. दर पौर्णिमेला वाडीला जाउन यायचे हा बर्‍याच जणांचा क्रम. मीही वडिलांच्या बरोबर म्हणून बर्‍याचदा जात असे. अगदी लहानपणीची वाडी आठवते ती म्हणजे खेळणी, ताजे पेढे आणि कवठाच्या बर्फी साठी. बरेच धार्मिक कार्यक्रम वाडीलाच व्हायचे, मग वाडीच्या पुजार्‍यांची मोठी मोठी थोड्या जुन्या प्रकाराची घरे, त्यांच्याकडच्या त्या तृप्त जेवणावळी आणि कृष्णेत मनसोक्त मारलेल्या डुबक्या.

तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही

लेखक drsunilahirrao यांनी रविवार, 16/03/2014 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
अजून नात्यात या पुरेसा तणाव नाही सिधासिधा खोल घाव आहे , बनाव नाही जरी तुझी धारदार हुकुमी कट्यार आहे, छलकपटाचा तुला पुरेसा सराव नाही किती दयाळू, महान आहेस तू खरोखर तुझ्यासमोरी इथे कुणाचा निभाव नाही! तुझ्या कृपेचे कधीच आकाश सोडले मी मला उमगले कुठेच माझा पडाव नाही अशीच ये तू कधीतरी भेटण्यास मजला तुला पुरेसा अजून माझा लगाव नाही हवी तशी उत्तरे तुझी दे ,तुझ्या कलाने तुझ्या खुशीचा सवाल आहे, दबाव नाही अखेर मरणात हात माझ्या तुझाच होता तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही डॉ.सुनील अहिरराव

घर खरेदी-विक्री व्यवहाराविषयी मदत हवी आहे

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी शनिवार, 08/03/2014 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, शक्यतो मी "मदत हवी आहे" असे लेख लिहित नाही पण माझ्या एका परिचितासाठी मदत हवी आहे. त्याचे झाले असे की त्यांनी एके ठिकाणी विकत घ्यायला एक घर बघितले.ते त्यांना आवडले आणि मागच्या शनीवारी त्यांनी त्यासाठीची टोकन रक्कम घरमालकाला दिली.२०% स्वतःचे पैसे आणि ८०% कर्ज असे नेहमीचे गणित होतेच.त्या २०% साठी त्यांच्या पालकांकडून आणि सासुरवाडीकडून काही पैसे उसने घ्यायचा त्यांचा इरादा होता.

मुक्तविहारींची भाषणभरारी

लेखक पैसा यांनी मंगळवार, 04/03/2014 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
१ तारखेच्या घारापुरी कट्ट्याहून अचानक गायब झालेले मुवि २ तारखेच्या दुसर्‍या कट्ट्याला उगवले. तेव्हा या मधल्या काळात आणखी कुठे कट्टा होता का काय अशी विचारणा त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांचा आणखी एक पैलू समोर आला. डोंबिवली इथल्या ब्राह्मण सभेत "तुम्हाला आवडलेला दिवाळी अंक" या विषयावरच्या भाषणांच्या स्पर्धेत मुवि यांनी भाग घेतला आणि चक्क दुसरं बक्षीस पटकावलं. या बक्षीस मिळवणार्‍या भाषणाबद्दल स्वतःच लिहायला त्यांना बरे वाटेना, मग म्हटलं, चला मीच मिपाकरांना याबद्दल सांगते. डोंबिवलीची ब्राह्मण सभा बरीच जुनी. १९३५ सालची स्थापना झालेली ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते.

मॉर्निंग वॉल्क ! माझगावचा डोंगर !!

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 16/02/2014 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सहा वाजता भारत-न्यूझीलंडचा सामना बघायला उठलो पण घरच्यांच्या ओरडा कम सूचनेनंतर प्लॅन चेंज करत कधी नव्हे ते मॉर्निंग वॉल्कला बाहेर पडलो. मस्त ट्रॅक पॅंट घातली, वर नवे कोरे पांढरे स्पोर्ट्स टीशर्ट. पायातले स्पोर्ट्सशूज मात्र जुनेच. एक फारसे वापरात नसलेले पण बर्‍यापैकी छान स्पोर्ट्सवॉच सुद्धा धुंडाळले. सकाळी साडेसहाला उन्हाचा पत्ता नसल्याने गॉगलचा मोह तेवढा आवरला. गाणी ऐकायला म्हणून हॅण्सफ्री कानात टाकले. एकंदरीत सज धज के घरापासून साडेसात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या माझगावच्या डोंगराकडे कूच केले.

"माझे मन तुझे झाले"

लेखक बरखा यांनी शनिवार, 11/01/2014 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, हा विषय लग्नाळु मुलगा आणि मुलगी या॑च्या बद्द्ल आहे. (तशी मी लिखाणात सराईत नाही, पण जे मनात आहे ते मा॑ड्ण्याचा हा प्रयत्न आहे. तरी समस्त मिपाकर आणि मिपा चे टिकाकर यातिल भावना समजुन घेतिल, बाकी टिका॑सहित मिपाकरा॑च्या हाति.) वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्ति॑नी "लग्न" या विषयी योग्य ते मार्गदर्शन करावे. माझ्या आज पर्यन्तच्या जीवन प्रवासात मी अशी मुल-मुली बघितली आहेत ,कि जी लग्न करताना त्या॑ना स्थळ कस हव असत हे ते ईतक पक्क ठरवतात कि त्यात तसुभर देखिल बदल करायला तयार नसतात. ब-याचदा सगळ चा॑गल (स्थळ) असताना देखिल त्या॑च्या अटीत बसत असताना देखिल कधी कधी त्या व्यक्तिला नकार देतात.