Skip to main content

हे ठिकाण

' यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा...'

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 12/01/2015 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा प्रेम नाही छंद नुसता भाळण्याचा छान हा दु:खासही आला फुलोरा ये, वसा घे वेदनेला माळण्याचा आणशी हे रोज तू कोठुन बहाणे केवढा हा सोस तुजला टाळण्याचा मी करू चिंता कशाला काजळाची सोडला संकल्प मी डागाळण्याचा श्वास घे माझे तुझ्या श्वासात भरुनी ये, ऋतू आला फुले गंधाळण्याचा डॉ.सुनील अहिरराव

अटलजींना भारतरत्न

लेखक क्लिंटन यांनी बुधवार, 24/12/2014 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न दिल्याचे आजच जाहिर झाले आहे.काही व्यक्ती अशा असतात की त्यांना कुठलाही पुरस्कार देऊन त्या व्यक्तींचा नव्हे तर त्या पुरस्काराचा सन्मान वाढवला जातो. अटलजींना भारतरत्न देऊन भारतरत्न पुरस्काराचा सन्मान अशा प्रकारेच वाढवला गेला आहे अशीच भावना बहुसंख्यांची असणार याविषयी शंका नाही.

एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 18/11/2014 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
२००५ दिवाळीचे दिवस बेंगलोर मधली एक संध्याकाळ. इंदीरा नगर एरिया. ऑफिसचं शेड्यूल पक्कं नसल्यानं त्यानं हैद्राबादची रिझर्वेशन्स केलेली नव्हती. बंगळूर ते हैद्राबाद आणि तेथून निजामाबाद. नेहमीचाच मार्ग होता. दिवाळीची चार दिवस असलेली सुट्टी बेंगलोर मध्ये घालवायची त्याची मुळीच ईच्छा नव्हती. ट्रेन मिळायची शक्यता आता शून्याहून कमी. सुट्टीचे दिवस म्हणल्यावर विमान कंपन्या लुटायला बसणार. बसने जाणे हाच एक आणि एकमेव पर्याय होता. खाली नही है- ऑपरेटर. दुसरे एजंटसे पूछके देखो. दुसर्या एजंटने तीन चार फोन केले. त्याचे पण तेच उत्तर आणि तोच सल्ला. सात आठ एजंटना विचारून झाल्यानंतर तो वैतागला.

कन्फ्यूजन /कम्युनिकेशन/कन्व्हिक्शन

लेखक विनायक पाचलग यांनी मंगळवार, 18/11/2014 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, बर्‍याच दिवसाने मिसळ्पाव वर लिहितोय.. आणि सांगायची गोष्टही तशीच आहे.. साधारण ६ वर्षापुर्वी हा प्रवास सुरु झाला, आधी कोल्हापुरी दादा या टोपणनावाने आणि मग स्वतःच्या नावाने इथे लिहु लागलो. अनेकदा बालिश आणि क्वचित बरे असे त्या लिखाणाचे स्वरुप होते. पण या कालावधीत बर्‍याच मिपाकरांनी मला मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले. कित्येकदा चेष्टाही केली, पण या सार्‍यातुन खुप काही शिकायला मिळाले. महत्वाचे म्हणजे लिखाणाची उर्मी कायम राहिली. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे आता हा माझ्या लिहिण्याचा प्रवास एका महत्वाच्या टप्प्यावर आलेला आहे .

तुम्ही काय करता ?

लेखक _मनश्री_ यांनी गुरुवार, 09/10/2014 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ? मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते

नथ........भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 08/10/2014 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ...... माधव गोविंद भानू (खाजगीवाले)....... १९९२ साली जानेवारीत रशियन सरकारने अफगाणिस्थानच्या नजिब़उल्ला सरकारची मदत थांबिविली. त्याचा परिणाम लगेचच दिसून आला. मुख्य म्हणजे इंधनाचा पुरवठा थांबल्यावर सरकारी फौजेचा कणाच मोडला. त्या उलट पाकिस्तानच्या मदतीने तालिबानचा हैदोस जोरात चालू झाला.

गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी

लेखक _मनश्री_ यांनी मंगळवार, 07/10/2014 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न ठरवताना काय आवश्यक असतं , व्यक्ती मधले गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी माझी एक मैत्रीण आहे ,ती लहान असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि नंतर दोघांचाही पुनर्विवाह झाला . ते आता त्यांच्या प्रपंचात सुखी आहेत . पण माझ्या मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात ,कारण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे . आणि तिचे वडील मराठा होते आणि आई ब्राम्हण ,आणि ती आईबरोबर राहिली त्यामुळे ब्राम्हणी संस्कारात वाढली पण जेव्हा ब्राम्हण स्थळे पहिली जातात तेव्हा तिच्या वडिलांच मराठा असण आडव येत , आणि जेव्हा मराठा स्थळ पहिली जातात तेव्हा तिची आई ब्राम्हण आहे आणि ती लहानपणापासून ब्राम्हण कुटुंबात वाढली

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

ह्रुदयामध्ये घर बांधु या!अशा घराला दार कशाला!!

लेखक खुशि यांनी शनिवार, 13/09/2014 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला!! या ओळी कडव्याच्या शेवटी येतील अशी कविता लिहायची.चला मग सुरु करु या.