मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही

drsunilahirrao · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अजून नात्यात या पुरेसा तणाव नाही सिधासिधा खोल घाव आहे , बनाव नाही जरी तुझी धारदार हुकुमी कट्यार आहे, छलकपटाचा तुला पुरेसा सराव नाही किती दयाळू, महान आहेस तू खरोखर तुझ्यासमोरी इथे कुणाचा निभाव नाही! तुझ्या कृपेचे कधीच आकाश सोडले मी मला उमगले कुठेच माझा पडाव नाही अशीच ये तू कधीतरी भेटण्यास मजला तुला पुरेसा अजून माझा लगाव नाही हवी तशी उत्तरे तुझी दे ,तुझ्या कलाने तुझ्या खुशीचा सवाल आहे, दबाव नाही अखेर मरणात हात माझ्या तुझाच होता तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही डॉ.सुनील अहिरराव

वाचने 2257 वाचनखूण प्रतिक्रिया 10
तुमची ही कविता जास्त मोकळी वाटते, तिने “बनाव, सराव, निभाव, पडाव, लगावं, दबाव,” च्या जाडजूड बांगड्या घातल्या असल्या तरीदेखील. मला वाटतं यमक हा तुमचा ट्रेडमार्क आहे व तुम्हांला तो बदलायला सांगणं चुकीचं होईल.

In reply to by kurlekaar

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 19/03/2014 - 19:28
मला गझलेचा एकेक सुटा शेर आवडतो मराठी असू दे की उर्दू असू दे... ''बनाव, सराव, निभाव, पडाव, लगावं, दबाव,” हे सर्व गझलेत यमक उर्फ काफिया आवश्यक आहेत. बशीर बद्रच्या ओळी बघा- सुनसान रास्तों को सवारी न आयेगी अब धूल से अटी हुई लारी न आयेगी छप्पर के चाय खाने भी अब उंघने लगे पैदल चलो के कोयी सवारी न आयेगी तहरीर-ओ गुप्तगू में किसे ढुंढते है लोग तस्वीर में भी शक्ल हमारी न आयेगी सर पर जमीन ले के हवाओं के साथ जा आहिस्ता चलने वाले की बारी न आयेगी पहचान अपनी हम ने मिटाई है इस तरह बच्चो में कोई बात हमारी न आयेगी वरच्या प्रत्येक शेरात लारी, सवारी,हमारी,बारी, हे शब्द आलेत पण त्या ओळींतील त्या शब्दांच्या अर्थाने गझलेला एका उंचीवर नेलं आहे. मराठी आंतरजालावर बेफिकीर नावाचे एक ''थोर''मराठी गझलकार आहेत त्यांच्या मृत्युचा निरमा नावाची ही गझल पाहा. चळत, पळत, वळत, हिंदकळत, शब्द कसे नोकरीला नऊच्या ठोक्याला हजर झाल्यासारखे आले आहेत. :) असो. गझलेचे जाणकार बोलतीलच. -दिलीप बिरुटे

जयंत कुलकर्णी 19/03/2014 - 10:12
सुनिलराव, मस्त..... थोडीफार गझलेच्या वाटेने जाणारी....अगदी ह्रद्यातून उतरलेली. एक गझल आठवली...... अब क्या बताऊ तुझे तेरे मिलनेसे क्या मिला इर्फाने गम हुआ दिलका पता मिला......... आता काय सांगू तुला... तु भेटल्याने काय झाले. दु:खाचे ज्ञान झाले व जेथे होते ते सापडले....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 19/03/2014 - 19:02
आवडली गझल. अशीच ये तू कधीतरी भेटण्यास मजला तुला पुरेसा अजून माझा लगाव नाही खासच. डॉक्टर साहेब. अजून लिहा...! -दिलीप बिरुटे

drsunilahirrao 20/03/2014 - 18:02
प्रा.डॉ. दिलीप बिरुटे सर, जयंत कुलकर्णी सर, बेफिकीर यांच्या गजला खासच आहेत आपण म्हणालात त्याप्रमाणे पळत वळत चळत या शब्दांचा नाद मोहून टाकतो. आणि बशीर बद्र यांची वरील गजल निव्वळ ग्रेट !

drsunilahirrao 20/03/2014 - 18:13
बदल जीवनाचा स्थायीभाव आहे. आपल्याला नको असला तरी तो होतच असतो. कोणत्याही माध्यमाद्वारे व्यक्त होणे, हे त्या त्या बदलासाठीची पूर्वतयारी असू शकते आणि बदल स्वीकारल्याची खुण असावी कदाचित !

drsunilahirrao 20/03/2014 - 18:23
कॉमेंट एडिट करायची सोय नसतॅ का इथे मोबाईलवरुन अंदाज येत नाही थोडा बदल करुन तीच कॉमेँट पोस्ट करत आहे बदल जीवनाचा स्थायीभाव आहे. आपल्याला नको असला तरी तो होतच असतो. कोणत्याही माध्यमाद्वारे व्यक्त होणे, हे त्या त्या बदलासाठीची पूर्वतयारी असू शकते किँवा बदल स्वीकारल्याची खुणही कदाचित ! कुर्लेकर, जयंत कुलकर्णी, दिलीप बिरुटे सर आपल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार.

सुधीर 22/03/2014 - 16:50
काळीज खल्लास करणारी सुंदर गझल!