Skip to main content

हे ठिकाण

प्रकाशाची चोरी (२)

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 05/08/2016 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : या लेखाच्या पहिल्या भागात आणि या दुसऱ्या भागात लिहिलेले प्रसंग म्हणजे काही अधिकृत निवेदन नसून जस्ट अनुभव म्हणून दिलेले आहेत. पहिल्या भागात या विषयाबाबत पुष्कळांनी बऱ्याच शंका व्यक्त केल्या. ग्राहक सुविधा विभाग माझ्याकडे असल्याने त्यांची मी यथाशक्ती उत्तरे दिली आहेत. तथापि अधिक तपशीलवार आणि अचूक माहितीसाठी www.mahadiscom.in हे संस्थळ पाहावे. मागच्या भागावर काही जणांनी ‘प्रकाशाची’ चोरी या शब्दाला हरकत घेतली होती, की चोरी करणारे प्रकाशासाठी करत नाहीत.

नको भुलू जाहिरातींना !

लेखक पुणे मुंग्रापं यांनी मंगळवार, 02/08/2016 या दिवशी प्रकाशित केले.
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्राहकांनीच एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे. नाहीतर जाहिरातीचे युग आहे असे म्हणत या अतिरंजीत, खोटे दावे करणा-या जाहिरातींचा भडीमार होत राहणार. त्यासाठी अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडिया कार्यरत आहे. त्यांनी अ‍ॅप्सवरून तक्रार करण्याची सोय केली आहे. जाहिराती विरोधात तक्रार नोंदवा आणि त्याचा पाठपुरावा करा. जाहिरात ही ६५ वी कला आहे असे समजले जाते.

अंधविश्वास भाग (3) - सकारात्मक लढा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 30/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस रस्त्याहुन जाताना कानांत पडले "यह डॉक्टर के बस का नहीं है, नीम वाले बाबाके यहाँ झाडा लगवा लो. बच्चा ठीक हो जायेगा." दिल्ली देशाची राजधानी. बाह्यदिल्ली जिथे दिल्लीतले ७०% टक्क्याहून अधिक रहिवासी राहतात, तिथे लोकांचा विश्वास डॉक्टरपेक्षा नीमवाल्या बाबावर/ बंगाली बाबांवर विश्वास जास्त. काय कारण असावे हा विचार मनात आला. निरोगी व्यक्ती कष्ट करू शकतो, संसाराची गाडी चालवू शकतो. रोगी माणसाला हे शक्य नाही. रोगांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न प्रत्येक माणूस हा करणारच. आता आपण आपल्या देशातील चिकित्सा सुविधांकडे बघू. दिल्ली देशाची राजधानी.

चोरी प्रकाशाची (१)

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 25/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
...ती गेली की क्षण क्षण युगांसारखा होतो, ती आली की सळसळत चैतन्य येते, आनंद येतो, जीवनात जान येते ! , अशी ही ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून पहिलीच आहे नेहमी...! आणि ती आहे वीज ! -- आजच्या युगातली एक जीवनावश्यक बाब. जलसंपत्तीप्रमाणेच वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आता संपत्ती म्हटली की चोरीचा धोका आला ! आणि ही संपत्ती काही कडीकुलुपात ठेवता येत नाही. तेव्हा हिचे संरक्षण म्हणजे एक अवघड प्रकरण आहे. विजेची चोरी हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल फौजदारी केस आणि तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो. तरीही याबद्दल एक प्रकारची बेफिकिरी दिसून येते.

( मी बी पिरेम करीन म्हनतो ) : टपोरी तडका

लेखक नीलमोहर यांनी रविवार, 24/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
येकांद्या लैलाचा मजनू बनीन म्हनतो, मी बी पिरेम करीन म्हनतो... आयटम नं लाईन दिली काय, न दिली काय, आपल्याले हुंगत ऱ्हायची सवयच हाय, च्यान्सवर ड्यान्स मारीन म्हनतो, मी बी पिरेम करीन म्हनतो... चिकनी पोरगी पटली काय, न पटली काय, पोट्ट्यान्ले चप्पल खायची वायली हौसच हाय, चपलीलाबी फुलाने सजवीन म्हनतो, मी बी पिरेम करीन म्हनतो...
काव्यरस

( मी बी पिरेम करीन म्हनते ) : प्रेमळ तडका

लेखक नीलमोहर यांनी रविवार, 24/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
सावळ्याची त्या जोगीन बनीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... राया तो माजा भ्येटंल काय, न भ्येटंल काय, वाट पहायाची आपली पुरी तयारी हाय, दैवाचीबी परीक्शा घेइन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... जीवाचा सखा गावंल काय, न गावंल काय, समदं ह्या कपाळी लिव्हल्यालं हाय, नशिबासंगं आज पैज लावीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... आयुक्शाचे परश्न सुटले काय, न सुटले काय, धन्यासाटी आगीशीबी खेळने मंजूर हाय, डोरलं त्येच्याच नावचं गल्यात घालीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते ...
काव्यरस

अंधविश्वास भाग (२) - नकारात्मक लढा

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 11/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
http://vivekpatait.blogspot.in/2016/07/blog-post_7.html अंधविश्वास - सार्थक लढा (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय? नकारात्मक लढा (अंधविश्वास विरुद्ध लढणार्या संस्थांच्या विषयी माझ्या मनात आदर आहे, पण त्यांच्या हातून काय चुका होतात त्या वर हा लेख आहे. हे माझे आकलन आहे) एकदा नागपूरला एका लग्नात गेलो असताना, एक पुणेरी ग्रहस्थ मला भेटले होते. सहज अंधविश्वासावर चर्चा सुरु झाली. त्यांनी आपला एक अनुभव सांगितला. पुण्यात एका संस्थेने, अंधविश्वास विरोधात कार्य करणार्या एका संस्थेच्या महानुभावला बोलविले होते.

ऐका भारतीय ग्राहकांनो तुमची कहाणी..

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 11/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट (नेहमी नगर असते, इथे मात्र..) देश होता. कोणे एकेकाळी सोन्याचा धूर निघणा-या या देशाला काही वर्षापूर्वीपर्यंत मात्र तिस-या जगातील (थोडक्यात, मागासलेला) देश असे म्हटले जायचे. Consumer जागतिकीकरणाच्या रेटयामुळे या देशातही अनेक बदल घडले, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या. उत्तम शिक्षण मिळू लागले. तंत्रज्ञानाच्या अनेक वाटा खुल्या झाल्या.

अंधविश्वास - सार्थक लढा (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 07/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य माणूस काही आंधळा नाही आहे, कि डोळे बंद करून कुणावर विश्वास ठेवणार. सामान्य माणसाचा जगण्याचा उद्देश्य असतो - सुखी संसार, स्वस्थ्य शरीर आणि भरपूर पैसा. दुसर्या शब्दात स्वास्थ्य, सुख आणि समृद्धी या तीन बाबी भौतिक जगात महत्वाच्या. खान-पान, जीवनमान, व्यायाम इत्यादी बाबींचा प्रभाव आपल्या शरीरावर पडतोच. स्वस्थ्य राहण्यासाठी व्यायाम किंवा शारीरिक मेहनतीचे कामे करावी लागतात. खाण्यापिण्या वर हि नियंत्रण ठेवावे लागते. हे जर जमले नाही तर मनुष्य आजारी पडतोच. एकदा आजार झाला कि दीर्घकाळ औषध-उपचार हि करावा लागतो, पथ्य हि पाळावे लागतात. भरपूर पैसा हि खर्च होतोच.

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 03/07/2016 या दिवशी प्रकाशित केले.
दिलखेचक! रापचिक! धमाल! हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा! सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला.