आयुष्याच्या वाटेवर एखादा अजाणता क्षण ज्यावेळी कठोरपणे थांबलेला असतो..
आणि काही प्रारब्धातील प्रश्नांची उत्तर शोधायला ही पर्याय नसतो..
त्यावेळी अचानक एखादा पर्याय उभा दिसतो..
त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..
जेव्हा, सगळं जग सोबत असतानाही आम्ही एकटे असतो..
आणि संसारिक दुःखात आम्ही पराजित होत असतो..
तेव्हा आमच्या रथाचा सारथी म्हणून तू समोर दिसतो..
त्यावेळी फक्त तूच आठवतोस..
अनादी ...अनंत..
मी पणा सोबत घेऊन जेव्हा आम्ही तुला शोधत असतो..
दानपेटीत दान टाकून , तुला जणू विकतच घेत असतो..
आणि तरीही तुझ्यावरचा विश्वास जेव्हा आमचा डळमळीत होत असतो..
त्यावेळी फक्त तूच आठवत