Skip to main content

धर्म

`रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 15/06/2013 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो (अष्टावक्र महागीता) ओशो __________________________________ मन या जीवनातल्या गहनतम पैलूवरचं हे लेखन तुमच्या समोर मांडताना अतिशय आनंद होतो आहे. विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील. अनेकानेक अंगांनी मनाचा सांगोपांग वेध घेण्याचा प्रयत्न या लेखमालेतनं होईल.

जय परशुराम...जय वामन!!!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 22/05/2013 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची.
काव्यरस

सत्याचा विजय - विज्ञान विरुद्ध श्रद्धा

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 22/05/2013 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
इसवी सन 1600. फेब्रुवारी 17. रोममधल्या एका तुरुंगात सात वर्षं खितपत पडलेल्या एका कैद्याला पोलिसांनी बाहेर काढलं. रोममधल्या एका मोठ्या चौकात त्याला एका खांबाला बांधलं. 'दुष्ट/विकृत शब्द बोलते' म्हणून त्याच्या जिभेला एक खिळा ठोकला. त्याच्या पायाशी भरपूर लाकडं आणि त्याचीच पुस्तकं ठेवली. आणि त्यांना आग लावली. ज्वाळांनी होरपळून त्याचा अत्यंत हाल हाल होऊन मृत्यू झाला. त्याचं नाव होतं ज्योर्दानो ब्रूनो. आताच्या काळात असता तर आपण त्याला शास्त्रज्ञ म्हटलं असतं. पण त्यावेळी शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक अशी अधिकृत पदवी नव्हती. बहुतेक अभ्यासक आपल्या जबाबदारीवर अभ्यास करायचे.

कर्मविपाक - एक प्रयत्न

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 03/05/2013 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावर पुनर्जन्म, कर्मविपाक वगैरे वर बराच काथ्याकूट चालू आहे. म्हटल आपण पण एक जिलबी पाडावी. जमलीय का नाही ते सांगायला मोठे आहेतच... पुनर्जन्म, कर्मविपाक वगैरे माणसाला पहिल्यापसून भुरळ पाडणारे विषय आहेत. असंख्य लोकांनी त्यावर बरेच काही लिहून ठेवले आहे, त्यावर मी अणखीन लिहिणे म्हणजे.. उपनिषदांत एका शब्दात सांगितले आहे - तत्त्वमसि| ते समजायला कठीण जाऊ लागले म्हणून श्रीक्रुष्णांनी गीता संगितली. तेही कठीण जाऊ लागले म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. आता तेही कठीण जाऊ लागले म्हणून आता ज्ञानेश्वरीवर प्रवचने होतात :) असो.

कर्मविपाक

लेखक ढालगज भवानी यांनी गुरुवार, 02/05/2013 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
"सामान्य वाचक" यांची "महाराज" या लेखावरील "कर्माच्या गती गहन असतात" अशी प्रतिक्रिया वाचून जालावर याविषयी काही लेख आहेत का याचा शोध घेतला. एक साईट सापडली. या साईटवरती लेख मिळाले. पैकी एका लेखातील खालील चपखल उपमा आवडली. ती शेअर करते आहे. मला तरी ती पटते. पूर्वी लो. टिळकांच्या "गीतारहस्य" ग्रंथातील "कर्मविपाक" विवेचन वाचून मंत्रमुग्ध झाल्याचे पक्के स्मरते. कदाचित सतत या व अशा विषयांवरील लेख वाचून "कंडीशनींग" झाले असल्याने मला पटत असेल. पण निदान हिंदू धर्म व त्यातील "कर्मविपाक" सिद्धांत, "नशीब/नियती" या अतिशय गूढ गोष्टीचा/घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न तरी करतो.

अथातो धर्मजिज्ञासा - महावीराची वर्धमान अहिंसा

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 29/04/2013 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
अथातो धर्मजिज्ञासा - महावीराची वर्धमान अहिंसा ********************************************************************************* अथातो धर्मजिज्ञासा - महावीराची वर्धमान अहिंसा ********************************************************************************* संदर्भ : १) आकलन (नरहर कुरुंदकर ). २) भारतीय तत्वज्ञान (श्रीनिवास दीक्षित ) जैन आणि बौद्ध हे वैदिक नसलेले भारतीय धर्म आहेत . त्यांची परंपरा म्हणजे श्रमण परंपरा . या परंपरेत अहिंसेचे स्थान फार मोठे आहे. हि अहिंसा पुढे सर्वच भारतीयांनी निदान तत्व म्हणुन तरी मान्य केली आहे .

महाराज

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 25/04/2013 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
श्री निसर्गदत्त महाराज या औलीयाची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून हा लेख. एक अत्यंत सामान्य माणूस सुद्धा सिद्ध होऊ शकतो याचा दाखला म्हणजे महाराज. आपल्याला त्यांच्या जीवनात डोकावण्याच कारण नाही. ते सामन्याहून सामान्य होते, त्यांची शैक्षणिक, आर्थिक किंवा कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक नव्हती इतकी माहिती पुरेशी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मराठी होते. त्यांनी स्वतः तपासलेलं आणि त्यांच्या सिद्धत्वाची अपूर्व झलक दाखवणारं एकमेव पुस्तक म्हणजे 'सुखसंवाद'.

शिलाहारांचा कोप्पेश्वर.......भाग -१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 19/04/2013 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
खिद्रापूरचा कोप्पेश्वर: Simple, Free Image and File Hosting at MediaFire या दरवाजातून आत पाऊल टाका आणि हे बघा..........कोप्पेश्वरचे मंदीर. Simple, Free Image and File Hosting at MediaFire शिलाहार राजे दोन गोष्टींसाठी बरेच प्रसिद्ध होते एक म्हणजे त्यांनी त्या काळात

मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे !

लेखक आशु जोग यांनी रविवार, 31/03/2013 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
तर्‍हेतर्‍हेचे प्रश्न पडतात. उत्तरे शोधून सापडत नाहीत. अशावेळी मिसळीवर यावे वाटते. मिसळीवरचे तज्ञ काही मार्गदर्शन करु शकतील ही आशा असते. भारत देशामधे अनेक शतकांपासून हिंदू धर्म विद्यमान आहे. तर असे सांगितले जाते की या देशात खूप विषमता होती. त्यापासून सुटका व्हावी म्हणून पिचलेल्या लोकांनी इतर धर्माचा अवलंब केला. हे कितपत सत्य आहे ? विदेशी आक्रमकांबरोबर आलेले धर्म इथल्या लोकांनी स्वखुशीने स्वीकारले. तर मग ते स्वीकारल्यानंतर झोपडीत राहणारे लोक राजवाड्यात गेले का ? पूर्वीचे गुलाम नंतर राजे नाहीतर निदान सरदार बनल्याची उदाहरणे आहेत का ? विदेशी आक्रमक जे इथल्या जनतेवर जिझिया कर लादत असत.

हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 30/03/2013 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
अग्ने नय सुपथा राये अस्मान् विश्वानि देव वयुयानि विद्वान्. युयोध्यस्म्ज्जुहुराणमेनो भूयिष्ठां तेनमउक्तिं विधेम. [ईशोपानिषद (मंत्र १8)] शाब्दिक अर्थ: हे विश्वदेव विद्वान अग्नी, आपल्याजवळ पोहचण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मार्गातले अडथळे दूर करा. ही विनंती. अग्निदेव सर्वज्ञ आहेत, ते सर्वकाही जाणतात, त्यांच्या पासून काही ही लपलेले नाही. साधकच्या हातून घडलेल्या वाईट कृत्यांमुळे मुक्तीचा मार्ग अवरुद्ध झालेला आहे. पापांच्या परिणामांपासून मुक्त करण्यासाठी साधक अग्निदेवाची विनंती करीत आहे.