मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझ्या माझ्यासवे......(विडंबन)

OBAMA80 ·
तुझ्या माझ्यासवे.... तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही पडेना पापणी पाहून ओलेती तुला कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा कश्या युक्त्या मला शिकवायचा पाऊसही कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही आता शब्दांवरीया फक्त उरलेल्या खुणा कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही *********************** विडंबन तुझ्या माझ्यामागे कसा यायचा भाऊ तुझाही तुला बोलावता पोहोचायचा भाऊ तुझाही होईना पाच मिनीटे भेटूनी तुला कसा कोठूनी अलगद टपकाय

आठवणींचा पाऊस..!!

विशुमित ·
तू जवळ पाहिजे होतीस ढग आज गरजला होता पाऊस तुला आवडतो हे तो उमजला होता -- बिनधास्त तुझ्यासारखा असा काही तो कोसळतो तू नव्हतीस म्हणून तूझ्यावरचं मीच भिजत होतो. -- माहित नव्हतं भिजायचं तुच मला शिकवलं होतं पावसात कोणाला कळलं नाही अश्रू मात्र ओघळलंं होतं -- थांबला पाऊस वारं सुद्धा मंदावलं होतं तुझ्या आठवणींच्या मातीने मन माझं गंधावलं होतं =====

मूठ / कर्ज

संदीप-लेले ·
लेखनविषय:
मूठ झाकली मूठ म्हणे सव्वा लाखाची दाबली मूठ ती मात्र तिजोरी कुबेराची कर्ज अर्जावर अर्ज तरी नाही गरिबाला कर्ज हात करा ओले मिळेल अर्जाशिवाय कर्ज

चारोळी

Swapnaa ·
लेखनविषय:
काव्यरस
चारोळी चंद्रप्रकाश चोहीकडे चंचल चांदणे, चंद्रकोर चित्तचोरते चंद्रमा चमचमते.. कवी - स्वप्ना

अभिजात(चारोळी)

पराग देशमुख ·

राघव Tue, 01/16/2018 - 12:02
ते शब्द बांधलेले वाटेवरी निराळ्या.. उत्स्फूर्त भावनांशी सलगी "वयात" होते!

राघव Tue, 01/16/2018 - 12:02
ते शब्द बांधलेले वाटेवरी निराळ्या.. उत्स्फूर्त भावनांशी सलगी "वयात" होते!
छंदात बांधण्याचे, गेले सखे दिवस ते | मज अभिजात जे उमजले, ते मुक्त छंद होते....||

नेत्र न कोई

दिपक लोखंडे ·
काव्यरस
दुःख दर्शविण्या मझला दुजा मार्ग नाही रंग हजारो माझे पाहण्या नेत्र न कोई शोभून दिसते सुंदरी अन् सुगंध देते मोगरी फरक इतकाच सखे भार तुच्छ हा उरावरी टकटक आवाज करती चाले गुलाबी परी मधुर सुगंध तिचा वाटे नभाची सरी हे दृश्य पाहण्या मझला दुजा मार्ग नाही रंग हजारो माझे पाहण्या नेत्र न कोई

आवेग

अमित रेडीज ·
लेखनविषय:
तिला भेटायला जाताना वेगावर नियंत्रण जमतं मला पण तिला भेटल्यावर आवेग आवरला जात नाही